मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

मध्यरात्री

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
काव्यरस
मध्यरात्री गजबजावे नभ वितळत्या चा॑दण्याने भरुनी जावा ओ॑जळीचा चषक त्या फेनिल प्रभेने मध्यरात्री सळसळावे बेट पिवळे केतकीचे भरुनी जावे आसम॑ती ग॑ध थरथरत्या तृणांचे मध्यरात्री कुजबुजावा मेघ बिलगुनी पर्वता त्या ध्वनीने विरत जावी दाट गहिरी शा॑तता

चेटकीण

·
लेखनविषय:
आमच्या लहान पणी म्हणे एक चेटकीण असायची जी मुलं मस्ती करतात त्यांना ती पकडून न्यायची गावाबाहेर नदीच्या पल्याड तिची झोपडी असायची नाही म्हटलं तरी आम्हाला तिची मनापासून भीती वाटायची मोठे लोक म्हणायचे मुकाट्याने जेवा नाही तर ती येईल वेदना असह्य होतील अशा गरम तेलाच्या कढईत ती टाकील हि चेटकीण आम्हाला विविध रूपात भेटायची कधी हडळ बनून तर कधी बुआ बनून यायची मस्तीखोर मुलांना पकडून नेणच जणूं तीच काम होत आमच्या आयुष्यात मात्र तिला बागुलबुवा च स्थान होत आमच्या बालपणाच्या गोष्टीत तिला एक खास जागा होती अगदी आई बाबांच्या लहान पणी सुद्धा ती अशीच म्हातारी होती तिच्या भीतीने का होई ना आमचे बालपण घडले चांगल

जीवात्मा

संदीप-लेले ·
कधी ह्या देहात, कधी त्या देहात आणि फिरतसे, अनेक योनीत असे कुठे वास, मधल्या वेळेत? आणि करे काय, नसता कशात? ओळख तयाची, कोणत्या खात्यात? तोच हा अमुक, कोण ठरवत? आहे तो खरेच, कसे हे ठरत? नसती भावना, प्राण्याच्या योनीत अचानक येती, मानवी देहात आज जारे बाबा, अमुक देहात आणि कर मजा, तमुक योनीत सांगा असे सारे, कोण त्यां सांगत? आणि गुपचूप, कोण शिकवत? जातो का शाळेत, मधल्या सुट्टीत? वेदना जखम, काया ही झेलत स्वत्वाची जाणीव, कायम सोबत सतत कर्मात, असे हीच रत तरी म्हणे भोग, असे हा भोगत फळाची आसक्ती, नसावी कायेत ह्यास मात्र फळ, मुक्तीच्या रुपात ऐकावे नवल, गंमत जंमत नाही रंग रूप, आकार बंधात तरी लागे गुण, किंव

वधूपरीक्षा

अविनाशकुलकर्णी ·
लेखनविषय:
वधूपरीक्षा ........................... नव्हते मनांत तरीही,कसे अघटित घडले त्या चित्त चोरट्याला,आपले म्हणून बसले * होते पुढे शिकायचे,आईचे ऐकून फसले वधू परीक्षेस मी,का सजून बसले? * त्या हस~या छबीत,मीच हरवून बसले. त्या एका कटाक्षाने,घायाळ होऊन गेले.. * बोलणे असे आर्जवी,का मनास गुंतवावे.?. ठेवले जे सांभाळून,का वाटे उधळावे? * असेल मी आवडली?,कितीदा मना पुसावे येईल का होकार,म्हणुनी किती झुरावे * येता होकार त्यांचा,मन पाखरू व्हावे. वाटे हे जीवन,त्या चरणी अर्पावे.. * नव्हते मनात माझ्या,मग का असे घडावे? या गारुडास सांगा,काय नाव द्यावे?

अस्पृश्य

·
लेखनविषय:
आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या शरीराच्या गरजा भागवण्या साठी वेगवेगळी सोंग नाचवतो,ह्या संसाराच्या शर्यतीत ,आपली लाईफ स्टाईल मेनटेन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो,पण ह्या शर्यतीत पळत असताना आपल्या आत असलेल्या परब्रम्हाला मात्र विसरून जातो,आणि आणि आपला इग्नोरन्स त्या आत्म्याला कायम अस्पृश्य ठेवतो,देहाला नटवताना आणि रंगवताना,अंतरीचा वेगळा रंग पाहायला मात्र आपण कधी कधी विसरतो.....त्या आत्म्याने जर स्वतः बद्दल काही सांगितले तर तो काय सांगेल बर ? अंतरीच्या गूढ गर्भात मी अस्पर्शित च राहिलो संसाराच्या शर्यतीत मी दुर्लक्षितच राहिलो पंचकोशांचे लेणे लेऊन मी आत बंधिस्त जाहलो पंचे

निशीगंधाचे उखाणे

परशु सोंडगे ·
लेखनविषय:
काव्यरस
रात शांत शांत कशी वारा अबोल जरासा. पेटला धूंदीत गारवा चाहूलीत तू चंद्र जसा. निशीगंधाचे हे उखाणे. अंगी शहारांची रे टिंबे. सांगू नको तू कुणाला प्राणात गोंदले प्रतिबिंबे. परशुराम सोंडगे,पाटोदा 9673400928

बोललो नाही कधी पण...

सत्यजित... ·
लेखनविषय:
काव्यरस
शब्द,शपथा,भाव,कविता..बेअसर झाले बोललो नाही कधी पण दुःख तर झाले! चेहऱ्यावरची न रेषा एकही ढळली वार काही काळजाच्या खोलवर झाले! लागला धक्का असा अन् सांडला पेला... पान दुष्काळी कथेचे ओलसर झाले! या इथे,खेळायची ती सूर-पारंब्या हेच अंगण..आज त्याचे माजघर झाले! तू दिलेली डायरी अन् पीसही जपले डायरी आकाश माझे..पीस पर झाले! व्हायचे असतेच ते होवून जाते पण नेमके कळले कुठे जे आजवर झाले? —सत्यजित

'नाते' म्हणून आहे!

सत्यजित... ·
लेखनविषय:
काव्यरस
तुटली सतार पण मी गाते म्हणून आहे या मैफलीत मीही,'नाते' म्हणून आहे! निर्व्याज सोबतीच्या भेटी गहाळ झाल्या नाते अता खरेतर 'खाते' म्हणून आहे! जेवण,चुडा नि साड्या,देतोच ना मला तो खात्यात नाव त्याचे,'दाते' म्हणून आहे! गजरा गुलाब अत्तर,निर्गंध होत गेले शृंगारही अताशा,'न्हाते' म्हणून आहे! स्मरते नि छिन्न करते,एकेक गीत त्याचे या काळजात फिरते पाते म्हणून आहे! या लेखणीस कितिदा,तोडून पाहते पण माझ्यासवेच तीही,'जाते' म्हणून आहे! —सत्यजित

निघाला (गजल)

संदीप-लेले ·
लेखनविषय:
ज्याला हवे कळाया, तो भाबडा निघाला नको नेमका तो, मनकवडा निघाला त्याची अदा निराळी, मी लुब्ध आज झाले अंदाज हा चुकीचा, तो दारुडा निघाला नीती नियम सारे, त्याला जरी पढवले माणूस पाहण्याला, तो नागडा निघाला घेऊन कर्ज माथी, ते शेतात पेरले म्हशीला टोणगा, ढग कोरडा निघाला नागास पाहता मी, वार इतके केले घाव ज्यावरी झाला, तो केवडा निघाला शत्रूस पाजून पाणी, सैनिक तहानलेले नदीच्या पात्राचा रंग तांबडा निघाला देवास नवसून, ज्यास हुलकावले ‘तो’ पाहतो म्हणणारा शेंबडा निघाला (दोस्त हो, इथे नुकतेच पदार्पण केले. आणि इतरांच्या अतिशय सुंदर गजल वाचून प्रभावित झालो. ही माझी पहिलीच गजल आहे.