Skip to main content

कथा

गृहिणी......आदरांजली-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 12/03/2015 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
आदरांजली-२ इस्मत चुगताई : (१९११-१९९१) त्यांच्या काळातील बंडखोर व रुढींवर, ढोंगीपणावर विनोदाच्या अंगाने आसूड ओढणारे लेखन ही यांची खासियत. त्यासाठी त्यांनी बरीच किंमत मोजली पण चातुर्याने त्या त्यातून सहिसलामत पार झाल्या. त्या काळात असे लेखन करणे किती अवघड असेल याची आपण कल्पना करु शकतो.... का आजच्या काळात ते त्याहून कठीण आहे ......? या कथेत पुरुषी अहंकार, एका स्त्रीकडे माणूस म्हणून न बघता स्त्री म्हणूनच बघण्याचा समाजाचा हट्ट, चांगल्या घरची व वाईट घरची हा भेदभाव, नैसर्गिक भावना, बंधने, माणसाच्या मनात चाललेले खेळ..... इ.वर इस्मतआपाने चांगला प्रकाश टाकला आहे.

" The Original Love Story" ( Part 2)"

लेखक विनित राजाराम धनावडे. यांनी गुरुवार, 12/03/2015 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
" सुची भेटलेली ...... ? पुण्याला ..... ? " थोडावेळ विनू तसाच उभा होता गोंधळलेला , काहीच कळलं नाही त्याला , अचानक एक वीज कडाडली , तसा विनू दचकला . , " बापरे , किती मोठयाने वीज कडाडली , पडली असेल कूठेतरी नक्कीच . " विनू भानावर आला . " आपण फोन घेऊन कशाला उभे आहोत ? खरंच फोन आलेला की भास झाला ? " काहीच समजत नव्हतं. अश्यातच १० मिनिटं गेली , फोन काही वाजला नाही, " आपल्याला भासच झाला असणार ." असं बोलून तो पुन्हा बाल्कनीत आला. थोडयावेळाने पुन्हा फोन वाजला , " hello , ....... अरे आहेस का विनू . " , " हो .....

" The Original Love Story" (Part 1)"

लेखक विनित राजाराम धनावडे. यांनी गुरुवार, 12/03/2015 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
" अरे .... विनू ?...... अजून घरी नाही गेलास ? ", " हो. निघतोच आहे सर आता.", " OK. पण लवकर घरी जा आणि सांभाळून जा.", "असं .. का सर ?", "अरे , बाहेर बघितलास का ? पाऊस सुरु होणार आहे म्हणून बोललो." "पाऊस ?.... आता ?" " कुठे हरवलेला असतोस कळत नाही. आज तारीख किती आहे माहित नाही वाटते ?", " नाही सर . खरंच नाही माहित ", "अरे माणसा, आज ७ तारीख, ७ जून . आज पावसाची सुरवात होते , एवढं तरी माहित आहे ना ? " त्यावर विनू काही बोललाच नाही. पुढे सर बोलले ," चल निघ लवकर . पाऊस बघ किती धरलाय, कधीही सुरवात होईल . छत्री आहे ना?. " पण विनू कुठेतरी दुसरीकडेच हरवला होता.

पत्र

लेखक आतिवास यांनी बुधवार, 11/03/2015 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
मीटिंग संपली. बाया लगबगीने घराकडे परतल्या. “माज्या घरी चल,” रखमामावशीने हुकूम सोडला. मला तिच्याबद्दल अधिक जाणून घ्यायची संधी हवीच होती. गेले . चहा झाल्यावर ती म्हणाली, “येक पत्तुर लिवायचंय.

घनचक्कर घोरींचे घनघोर-चक्र

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 11/03/2015 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
‘सईमावशी, तू, आदिमामा, संतोषकाका आणि ती प्रतिगामी शिल्पा असे बूर्झ्वा लोक्स माझ्या डिसीजनला बिलकुल धक्का लावू शकत नाहीत !’ स्वराने त्वेषाने हातातला काटा समोरच्या प्लेटमधल्या इडलीत खुपसला आणि दुसऱ्या हातातल्या चमच्याने झटक्यासरशी तिचे दोन तुकडे केले ! इडलीच्या जागी तिला प्रतिगामी शिल्पा, तिची साक्षात जन्मदात्री दिसत असावी की काय अशी मला शंका आली. ‘अगं, आमची काय बिशाद तुला धक्का लावायची ! ..आय मीन, तुझ्या डिसीजनला..

कथा-कॉलेज कट्टा भाग ४

लेखक चेतन677 यांनी सोमवार, 09/03/2015 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग...... कथा-कॉलेज कट्टा भाग १ कथा-कॉलेज कट्टा भाग 2 कथा-कॉलेज कट्टा भाग 3 वैष्णवी अभि शेजारी बसली.थोडा वेळ झाला मधेच नकळतपणे अभिचा हात वैष्णवीच्या हाताला लागला. " ओह सॉरी..." असं म्हणत अभि जरा बाजुला सरकला. त्यावर वैष्णवी गालातच हसली.कदाचित अभि हा खुपच लाजरा मुलगा आहे असे तिला वाटत होते. " हाय....वैष्णवी...काय गं ही काय वेळ आहे काय कॉलेजचा आज शेवटचा दिवस आणि तु आज चक्क कॉलेजला??

क्षमा परमो धर्म: - राजा कुशनाभच्या मुलींची कथा

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 07/03/2015 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
क्षमा दानं क्षमा सत्यं क्षमा यज्ञाश्च पुत्रिकाः I क्षमा यशः क्षमा धर्मः क्षमया विष्ठितं जगत्II (वाल्मीकि रामायण बाल कांड ३३/८) क्षमा दान आहे, क्षमा सत्य आहे, क्षमा यज्ञ आहे, क्षमा यश आहे, क्षमा धर्म आहे. क्षमेवरच हे सर्व जगत् टिकून आहे." ॥ ८ रामधारी सिंह यांनी आपल्या कवितेत लिहिले आहे: क्षमा शोभती उस भुजंग को जिसके पास गरल हो उसको क्या जो दंतहीन विषरहित, विनीत, सरल हो। क्षमा हे माणसाचे भूषण आहे. दुर्बल माणूस अन्याय सहन करतो, तो क्षमा करू शकत नाही. किंवा त्यांनी केलेल्या क्षमेला कोणी महत्व ही देत नाही.