मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संदर्भांच्या शोधात

जे.पी.मॉर्गन ·

गॉडजिला 20/04/2021 - 11:45
आयपीएल मध्ये भावनिक गुंतवणुक कधीच झाली नाही आणि आता तर ती होणं ही शक्य नाही. आम्ही ज्या क्रिकेटवर मनापासून प्रेम केलं ते हे नव्हे.
जे ब्बात...

खेडूत 20/04/2021 - 12:01
मनोगत आवडलं! किंबहुना असंच काही (कुणीतरी) लिहावं असं वाटत होतं...! अन्य खेळांवर होणारे दुर्लक्श्य वाईटच. पण हल्ली कब्बड्डी, होकी, फुटबॉल वगैरे लीग्स होत असतात ते एक बरे झाले. किमान त्या नवोदितांचा वरखर्च निघत असेल. आय पी एल नामक प्रकार मनापासून आवडणं- ज्यांनी क्रिकेट खेळलंय, जगलंय त्यांना शक्य नाही. आता इथे टाईम्पास म्हणून कधी दोन ओव्हर्स पहिल्या तर ठीक. अति एक्स्पोझर मिळून काही चांगले खेळाडू सामान्य वाटतात, आणि अतिसामान्य (संदर्भः यदुनाथजी जवळकर) खेळाडूंना वलय प्राप्त होते- होईना बिचारे.. पण यातही एक चांगली गोष्ट म्हणजे नव्या खेळाडूंना रिकी पाँटिंग, संगाकारा किंवा मुरली वगैरेकडून थेट धडे मिळतात. पर्यायी खेळाडू, कप्तान तयार होतात. बाकी हल्ली देशाची मान वगैरे उंचावायला कुणी खेळणार नाहीत, पुढची बोली कशी लागेल याची चिंता सगळ्यांना राहील, म्हणून जास्त स्पर्धा, जास्त जाहिराती, ऑफर्स हे सगळं अपरिहार्य आहे!

In reply to by खेडूत

अति एक्सपोझर चा मुद्दा हा एकदम फिट्ट काढलात. हे एक्सपोझर खेळाडूंसाठी तर वाईट आहेच आणि प्रेक्षकांसाठी पण. रोजच कोहली आणि रोहित शर्मा बघायला मिळताहेत तर अजीर्ण होणारच. पण "विका" हाच परवलीचा शब्द असताना अजून काय अपेक्षित आहे? आणि त्याहून महत्वाचं म्हणजे इंग्लंड सीरीजमुळे विजय हजारे सारखी स्पर्धा झाकोळली गेली. कल्पना करा - पृथ्वी शॉ आणि रोहित शर्मा मुंबईसाठी ओपनिंग करताहेत. समोर दिल्लीचा कर्णधार कोहली आणि शिखर धवन ईशांत शर्माबरोबर व्यूहरचना करतोय. काय धमाल आली असती. पण पैशाच्या मोहात रणजी ट्रॉफीपेक्षा अर्थातच आयपीएल महत्वाची वाटली इथेच सगळं आलं.

Bhakti 20/04/2021 - 12:41
ऑलिम्पिकवीरांच्या कामगिरीच्या बातम्यांसाठी. हळू हळू संदर्भ लागत जातील, ज्योती पेटत जातील आणि "पैसा फेक तमाशा देख" पलिकडचा खेळ आम्हाला पुन्हा बघायला मिळेल. ते चैतन्य लवकर मिळो.

श्रीगुरुजी 20/04/2021 - 16:46
आयपीएल साठी रणजी स्पर्धेचा बळी दिला. मी रणजी स्पर्धैचा नियमित मागोवा घेतो. अनेक जुने रोमहर्षक रणजी सामने अजूनही स्मरतात. रणजी स्पर्धा, दुलीप करंडक, नंतर परदेशी संघाबरोबरील सराव सामने व शेवटी भारतीय संघात प्रवेश असा प्रवास असायचा. या प्रवासात शेवटपर्यंत टिकायचे तेच भविष्यात भारतीय संघात टिकायचे. आता २-३ आयपीएल सामन्यात बरी कामगिरी केली की हा खेळाडूंना सिद्ध करणारा प्रवास टाळून थेट भारतीय संघात प्रवेश मिळतो. अर्थात आयपीएल स्पर्धेतून काही मोजके चांगले खेळाडू मिळालेत. परंतु बहुसंख्य खेळाडू, चकाकते ते सर्व सोने नव्हे, ही उक्ती सार्थ ठरवितात.

धोनी, रोहित, विराट, सौरव, युवराज झाला.. दुर्दैवचा कळस म्हणजे आता सचिन पण पे टी एम fantasy लीग ची जाहिरात करतोय. यातल्या कुणाला पैसा कमी आहे, की इतक्या खालच्या स्तरावरील जाहिराती कराव्यात? Fantasy लीग, टीम मॅनेजमेंट स्किल अशी कितीही चकाकती नवे दिली तरी तो जुगारच आहे. नाहीतर आता त्या जाहिराती संपताना ' डिस्क्लेमर' द्यावा लागला नसता. चेन्नई संघावर बंदी घातल्यानंतर त्या खेळाडूंची सोय करण्यासाठी पुणे नावाची टीम बनवायची. दोन वर्षे ' आमची पुणे टीम' ' आमचा धोनी' म्हणून नाचायचं. आणि बंदी संपली की त्यांनी परत व्हिसल पोडू करायचं. अन् आम्ही ' हमारी मुंबई इंडीयन फॅमिली' म्हणून वहिनींच्या आवाजात सुर मिसळायचे. संघातील एखाद्या खेळाडूची कामगिरी ठीक नसेल किंवा स्थानिक स्पर्धात विशेष काही न केलेला खेळाडू असेल तर सुनील गावस्कर लाईव्ह टिव्ही कॉमेंटरी करताना निवड समितीचे वाभाडे काढायचा. आठवतं? आता कुणाच्या बापाची हिंमत आहे, निवड समिती, BCCI किंवा आयसीसी वर टीका करायची? किंवा एखाद्या साध्या खेळाडू विषयी टीकात्मक वर्णन करायची? पण कुठे तरी आपण सुद्धा जबाबदार आहोत का? विदर्भ अन् ओरिसा जाऊ द्या. मुंबई, दिल्ली, तामिळनाडू रणजी संघाचे कर्णधार किती जणांना माहिती आहेत? २०१९ च्या रणजी, हजारे, दुलीप स्पर्धा कुणी जिंकल्या किती जणांना माहिती आहे? सब बिके हुए है जी..!

चौकस२१२ 20/04/2021 - 17:47
मुंबई, दिल्ली, तामिळनाडू रणजी संघाचे कर्णधार किती जणांना माहिती आहेत? सब बिके हुए है जी..! आई पी एल हि एक कृत्रिम स्पर्धा आहे , राज्य किंवा देश या संघामागे ज्या "आपले पणाची भावना" असते ती येथे असणे शक्य नाही असे मला पहिल्या पासून वाटते त्यामुळे केवळ करमणूक म्हणून किंवा जास्तीत जास्त बेटफेयर एक्सचनगे वर ट्रेडिंग करण्यासाठी याचाच उपयोग बाकी आपलेपणा असा काही वाटतच नाही .. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने हे मला तरी पूरतात अर्थात असे काही लिहिणे म्हणजे क्रिकेट या धर्माचा अपमान करण्यासारखे आहे ! तरी "मनकी बात " हि अशीच आहे

चौकटराजा 20/04/2021 - 18:09
आय पी एल ला काही निकष नसल्याने मी कुणाच्या बाजूचा असा प्रकार नसतो त्यामुळे पहाताना निव्वळ दृष्टीसुख या पलीकडे अस्मितेचे हे सुख असते ते मिळत नाही ! कुणीही बाद झाला तरी वाईट वाटत नाही वा आनंद होत नाही ! आय पी एल ने दोन फायदे असे झाले की देशीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेलाडूच्या विरुद्ध खेळायला मिळते त्यामुळे भारतीय संघाची बेंच स्ट्रेंग्थ वाढती आहे ! व गुणी आहे पण "अकरात " बसू शकत नाही अशा खेळाडूंना चांगली नोकरी इतकाच पर्याय असे तो आता बऱ्यापैकी पैसाही मिळवू लागला आहे ! गोविंदराज ,व्ही व्ही कुमार , पदमाकर शिवलकर हे चुकीच्या वेळी जन्माला आले असे वाटतें ते त्यामुळे !!

ह्यांच्या प्रत्येक गोष्ट विकायच्या हव्यासापोटी स्थानिक स्पर्धांचा बळी गेला तो वेगळाच. डेक्कन वि PYC सामन्याला हजारभर प्रेक्षक मी बघितले आहेत. आता सगळं फक्त tv वर जाहिरातींसोबतच बघायचं. पुण्याच्या कबड्डी लीग मध्ये गल्लीतली "सरस्वती क्रीडा संस्था" पलीकडल्या बदामी हौद संघापेक्षा जवळची वाटायची. खो-खो मध्ये आर्य क्रिडोद्धारकपेक्षा नवमहाराष्ट्र संघ आवडायचा. आता ही सगळी लोकल जवळीक संपली.

कंजूस 21/04/2021 - 10:09
त्याच्या क्रिकेट सिअरिजला packer circus म्हणायचे असं त्यावेळचे जाणकार सांगतात. आणि विकीपेजमधून "Packer was famously quoted from a 1976 meeting with the Australian Cricket Board, with whom he met to negotiate the rights to televise cricket. According to witnesses, he said: "There is a little bit of the whore in all of us, gentlemen. What is your price?"[9]" तर खेळाडूंच्या जाहिराती आणि मार्केटिंगचं वावडं कशाला? चलती आहे तोपर्यंतच कलाकाराला पैसे छापता येतात. नंतर रिटायरमेंट.

गॉडजिला 20/04/2021 - 11:45
आयपीएल मध्ये भावनिक गुंतवणुक कधीच झाली नाही आणि आता तर ती होणं ही शक्य नाही. आम्ही ज्या क्रिकेटवर मनापासून प्रेम केलं ते हे नव्हे.
जे ब्बात...

खेडूत 20/04/2021 - 12:01
मनोगत आवडलं! किंबहुना असंच काही (कुणीतरी) लिहावं असं वाटत होतं...! अन्य खेळांवर होणारे दुर्लक्श्य वाईटच. पण हल्ली कब्बड्डी, होकी, फुटबॉल वगैरे लीग्स होत असतात ते एक बरे झाले. किमान त्या नवोदितांचा वरखर्च निघत असेल. आय पी एल नामक प्रकार मनापासून आवडणं- ज्यांनी क्रिकेट खेळलंय, जगलंय त्यांना शक्य नाही. आता इथे टाईम्पास म्हणून कधी दोन ओव्हर्स पहिल्या तर ठीक. अति एक्स्पोझर मिळून काही चांगले खेळाडू सामान्य वाटतात, आणि अतिसामान्य (संदर्भः यदुनाथजी जवळकर) खेळाडूंना वलय प्राप्त होते- होईना बिचारे.. पण यातही एक चांगली गोष्ट म्हणजे नव्या खेळाडूंना रिकी पाँटिंग, संगाकारा किंवा मुरली वगैरेकडून थेट धडे मिळतात. पर्यायी खेळाडू, कप्तान तयार होतात. बाकी हल्ली देशाची मान वगैरे उंचावायला कुणी खेळणार नाहीत, पुढची बोली कशी लागेल याची चिंता सगळ्यांना राहील, म्हणून जास्त स्पर्धा, जास्त जाहिराती, ऑफर्स हे सगळं अपरिहार्य आहे!

In reply to by खेडूत

अति एक्सपोझर चा मुद्दा हा एकदम फिट्ट काढलात. हे एक्सपोझर खेळाडूंसाठी तर वाईट आहेच आणि प्रेक्षकांसाठी पण. रोजच कोहली आणि रोहित शर्मा बघायला मिळताहेत तर अजीर्ण होणारच. पण "विका" हाच परवलीचा शब्द असताना अजून काय अपेक्षित आहे? आणि त्याहून महत्वाचं म्हणजे इंग्लंड सीरीजमुळे विजय हजारे सारखी स्पर्धा झाकोळली गेली. कल्पना करा - पृथ्वी शॉ आणि रोहित शर्मा मुंबईसाठी ओपनिंग करताहेत. समोर दिल्लीचा कर्णधार कोहली आणि शिखर धवन ईशांत शर्माबरोबर व्यूहरचना करतोय. काय धमाल आली असती. पण पैशाच्या मोहात रणजी ट्रॉफीपेक्षा अर्थातच आयपीएल महत्वाची वाटली इथेच सगळं आलं.

Bhakti 20/04/2021 - 12:41
ऑलिम्पिकवीरांच्या कामगिरीच्या बातम्यांसाठी. हळू हळू संदर्भ लागत जातील, ज्योती पेटत जातील आणि "पैसा फेक तमाशा देख" पलिकडचा खेळ आम्हाला पुन्हा बघायला मिळेल. ते चैतन्य लवकर मिळो.

श्रीगुरुजी 20/04/2021 - 16:46
आयपीएल साठी रणजी स्पर्धेचा बळी दिला. मी रणजी स्पर्धैचा नियमित मागोवा घेतो. अनेक जुने रोमहर्षक रणजी सामने अजूनही स्मरतात. रणजी स्पर्धा, दुलीप करंडक, नंतर परदेशी संघाबरोबरील सराव सामने व शेवटी भारतीय संघात प्रवेश असा प्रवास असायचा. या प्रवासात शेवटपर्यंत टिकायचे तेच भविष्यात भारतीय संघात टिकायचे. आता २-३ आयपीएल सामन्यात बरी कामगिरी केली की हा खेळाडूंना सिद्ध करणारा प्रवास टाळून थेट भारतीय संघात प्रवेश मिळतो. अर्थात आयपीएल स्पर्धेतून काही मोजके चांगले खेळाडू मिळालेत. परंतु बहुसंख्य खेळाडू, चकाकते ते सर्व सोने नव्हे, ही उक्ती सार्थ ठरवितात.

धोनी, रोहित, विराट, सौरव, युवराज झाला.. दुर्दैवचा कळस म्हणजे आता सचिन पण पे टी एम fantasy लीग ची जाहिरात करतोय. यातल्या कुणाला पैसा कमी आहे, की इतक्या खालच्या स्तरावरील जाहिराती कराव्यात? Fantasy लीग, टीम मॅनेजमेंट स्किल अशी कितीही चकाकती नवे दिली तरी तो जुगारच आहे. नाहीतर आता त्या जाहिराती संपताना ' डिस्क्लेमर' द्यावा लागला नसता. चेन्नई संघावर बंदी घातल्यानंतर त्या खेळाडूंची सोय करण्यासाठी पुणे नावाची टीम बनवायची. दोन वर्षे ' आमची पुणे टीम' ' आमचा धोनी' म्हणून नाचायचं. आणि बंदी संपली की त्यांनी परत व्हिसल पोडू करायचं. अन् आम्ही ' हमारी मुंबई इंडीयन फॅमिली' म्हणून वहिनींच्या आवाजात सुर मिसळायचे. संघातील एखाद्या खेळाडूची कामगिरी ठीक नसेल किंवा स्थानिक स्पर्धात विशेष काही न केलेला खेळाडू असेल तर सुनील गावस्कर लाईव्ह टिव्ही कॉमेंटरी करताना निवड समितीचे वाभाडे काढायचा. आठवतं? आता कुणाच्या बापाची हिंमत आहे, निवड समिती, BCCI किंवा आयसीसी वर टीका करायची? किंवा एखाद्या साध्या खेळाडू विषयी टीकात्मक वर्णन करायची? पण कुठे तरी आपण सुद्धा जबाबदार आहोत का? विदर्भ अन् ओरिसा जाऊ द्या. मुंबई, दिल्ली, तामिळनाडू रणजी संघाचे कर्णधार किती जणांना माहिती आहेत? २०१९ च्या रणजी, हजारे, दुलीप स्पर्धा कुणी जिंकल्या किती जणांना माहिती आहे? सब बिके हुए है जी..!

चौकस२१२ 20/04/2021 - 17:47
मुंबई, दिल्ली, तामिळनाडू रणजी संघाचे कर्णधार किती जणांना माहिती आहेत? सब बिके हुए है जी..! आई पी एल हि एक कृत्रिम स्पर्धा आहे , राज्य किंवा देश या संघामागे ज्या "आपले पणाची भावना" असते ती येथे असणे शक्य नाही असे मला पहिल्या पासून वाटते त्यामुळे केवळ करमणूक म्हणून किंवा जास्तीत जास्त बेटफेयर एक्सचनगे वर ट्रेडिंग करण्यासाठी याचाच उपयोग बाकी आपलेपणा असा काही वाटतच नाही .. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने हे मला तरी पूरतात अर्थात असे काही लिहिणे म्हणजे क्रिकेट या धर्माचा अपमान करण्यासारखे आहे ! तरी "मनकी बात " हि अशीच आहे

चौकटराजा 20/04/2021 - 18:09
आय पी एल ला काही निकष नसल्याने मी कुणाच्या बाजूचा असा प्रकार नसतो त्यामुळे पहाताना निव्वळ दृष्टीसुख या पलीकडे अस्मितेचे हे सुख असते ते मिळत नाही ! कुणीही बाद झाला तरी वाईट वाटत नाही वा आनंद होत नाही ! आय पी एल ने दोन फायदे असे झाले की देशीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेलाडूच्या विरुद्ध खेळायला मिळते त्यामुळे भारतीय संघाची बेंच स्ट्रेंग्थ वाढती आहे ! व गुणी आहे पण "अकरात " बसू शकत नाही अशा खेळाडूंना चांगली नोकरी इतकाच पर्याय असे तो आता बऱ्यापैकी पैसाही मिळवू लागला आहे ! गोविंदराज ,व्ही व्ही कुमार , पदमाकर शिवलकर हे चुकीच्या वेळी जन्माला आले असे वाटतें ते त्यामुळे !!

ह्यांच्या प्रत्येक गोष्ट विकायच्या हव्यासापोटी स्थानिक स्पर्धांचा बळी गेला तो वेगळाच. डेक्कन वि PYC सामन्याला हजारभर प्रेक्षक मी बघितले आहेत. आता सगळं फक्त tv वर जाहिरातींसोबतच बघायचं. पुण्याच्या कबड्डी लीग मध्ये गल्लीतली "सरस्वती क्रीडा संस्था" पलीकडल्या बदामी हौद संघापेक्षा जवळची वाटायची. खो-खो मध्ये आर्य क्रिडोद्धारकपेक्षा नवमहाराष्ट्र संघ आवडायचा. आता ही सगळी लोकल जवळीक संपली.

कंजूस 21/04/2021 - 10:09
त्याच्या क्रिकेट सिअरिजला packer circus म्हणायचे असं त्यावेळचे जाणकार सांगतात. आणि विकीपेजमधून "Packer was famously quoted from a 1976 meeting with the Australian Cricket Board, with whom he met to negotiate the rights to televise cricket. According to witnesses, he said: "There is a little bit of the whore in all of us, gentlemen. What is your price?"[9]" तर खेळाडूंच्या जाहिराती आणि मार्केटिंगचं वावडं कशाला? चलती आहे तोपर्यंतच कलाकाराला पैसे छापता येतात. नंतर रिटायरमेंट.
लेखनविषय:
आज बरोब्बर दोन महिने झाले पांढर्‍यावर काळं करून. किंबहुना व्यक्त होण्यासाठी विषयच सापडत नव्हता. आजकालची परिस्थिती बघता "किंबहुना" या एका शब्दावर एक लेखमाला लिहिली जाऊ शकेल हा भाग अलाहिदा! बहुतेक वेळा मी क्रिकेट आणि इतर खेळांबद्दल लिहितो कारण खेळांमधली सकारात्मक ऊर्जा मला भावते. पण सध्या चालू असलेल्या क्रिकेटचा देखील काही संदर्भ लागत नाही हो. आधी त्या अतिभव्य रिकाम्या स्टेडियम्समध्ये उगाच रतीब टाकल्यासारख्या टी-२० आणि वन डे खेळवल्या गेल्या. ते पण एकीकडे विजय हजारे ट्रॉफीसारखी महत्वाची डोमेस्टिक स्पर्धा चालू असताना आणि जुलै - ऑगस्टमध्ये पुन्हा इंग्लंडचा दौरा असताना.

आमचा Valentine Week - मोठी तिची साऊली

जे.पी.मॉर्गन ·

सौंदाळा 14/02/2021 - 08:37
दिपाबद्दल इतकी तपशीलवार माहिती नव्हती. लेख नेहमीप्रमाणे मस्तच. पुढचा लेख कोणावर असेल याचा विचार आतापासूनच करतोय.

जिमनॅस्टिक मध्ये प्रवेशिका आहे, हेच धक्कादायक होतं. टोक्यो ऑलिम्पिक साठी दीपाला शुभेच्छा!

व्यायामशाळा नाहीत ... अशा राष्ट्रात, हिरे दुर्लक्षितच राहणार... माझी चुलतबहिण, नॅशनल लेव्हलला, जिमनॅशियम होती.. तिला योग्य त्या सुखसोई तेंव्हा पण मिळाल्या नाहीत आणि आत्ता पण हेच आहे ... बाबाला 2-4 कोटीचे मंदिर, पण उत्तम जिमनॅशियम नाही... ही डोंबिवली येथील वस्तुस्थिति आहे. जे जे डोंबिवली येथे, ते ते भारतात... अमरावती येथील, हनुमान व्यायाम शाळा, हा अपवाद ...

In reply to by मुक्त विहारि

चौथा कोनाडा 14/02/2021 - 17:21
व्यायामशाळा नाहीत ... मंदिरे अपार ....
अगदी सहमत ! असं मत वाचलं, ऐकलं की हमखास देऊळ सिनेमा आठवतो. रुग्णालयाच्या जागी दत्त मंदिर उभा राहतं अन दिखाऊ भरभराट होते.

सुकामेवा 14/02/2021 - 22:13
सुविधा नाहीत हे जरी खरे असले तरी जे आहे त्यातून काहीतरी एकमेकांच्या मदतीने करायची प्रवृत्ती पण नाहीये, आपल्या लोकांना मध्ये हे सगळे जवळून पहिले आहे मी जिम्नॅस्टिक मध्येच

सौंदाळा 14/02/2021 - 08:37
दिपाबद्दल इतकी तपशीलवार माहिती नव्हती. लेख नेहमीप्रमाणे मस्तच. पुढचा लेख कोणावर असेल याचा विचार आतापासूनच करतोय.

जिमनॅस्टिक मध्ये प्रवेशिका आहे, हेच धक्कादायक होतं. टोक्यो ऑलिम्पिक साठी दीपाला शुभेच्छा!

व्यायामशाळा नाहीत ... अशा राष्ट्रात, हिरे दुर्लक्षितच राहणार... माझी चुलतबहिण, नॅशनल लेव्हलला, जिमनॅशियम होती.. तिला योग्य त्या सुखसोई तेंव्हा पण मिळाल्या नाहीत आणि आत्ता पण हेच आहे ... बाबाला 2-4 कोटीचे मंदिर, पण उत्तम जिमनॅशियम नाही... ही डोंबिवली येथील वस्तुस्थिति आहे. जे जे डोंबिवली येथे, ते ते भारतात... अमरावती येथील, हनुमान व्यायाम शाळा, हा अपवाद ...

In reply to by मुक्त विहारि

चौथा कोनाडा 14/02/2021 - 17:21
व्यायामशाळा नाहीत ... मंदिरे अपार ....
अगदी सहमत ! असं मत वाचलं, ऐकलं की हमखास देऊळ सिनेमा आठवतो. रुग्णालयाच्या जागी दत्त मंदिर उभा राहतं अन दिखाऊ भरभराट होते.

सुकामेवा 14/02/2021 - 22:13
सुविधा नाहीत हे जरी खरे असले तरी जे आहे त्यातून काहीतरी एकमेकांच्या मदतीने करायची प्रवृत्ती पण नाहीये, आपल्या लोकांना मध्ये हे सगळे जवळून पहिले आहे मी जिम्नॅस्टिक मध्येच
लेखनविषय:
लेखनप्रकार
तीरगी की अपनी ज़िद है जुगनुओं की अपनी ज़िद | ठोकरों की अपनी ज़िद है हौसलों की अपनी ज़िद || - प्रबुद्ध सौरभ महान व्यक्तीला चांगल्या व्यक्तीपासून वेगळं करणारा हा एकमेव गुण - जि़द! एखादी गोष्ट मिळवण्यासाठीचा हट्टीपणा. यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करण्याचा चिवटपणा. यश मिळवण्यासाठी वाटेल ते आव्हान स्वीकारण्याचं धाडस. महान लोकांची एक जमात असते ती संकटांच्या नजरेला नजर भिडवून त्याच्याशी दोन हात करणार्‍यांची. पण काही लोकं तर त्याही पुढे जाऊन आव्हानांसमोर, संकटांसमोर धैर्यानी सोडा.... उर्मटपणानी, माजात उभी राहतात.

आमचा Valentine Week - आँखोंकी गहराइयाँ |

जे.पी.मॉर्गन ·

लेख आवडला .. बाय द वे, तुम्ही चेस हा प्रकार कधी, 4-6-8-10-12,-14, असा पार्टी पाडून खेळला आहात का? आमच्या रूमवर एकच चेस बोर्ड होता आणि खेळाडू, कमीतकमी 4... त्यामुळे, चेस मध्ये डबल्सच्या मॅचेस, आमच्याच रूममध्ये चालायच्या... 304, पण तिघांत खेळू शकतो, हा पण एक शोध तिथलाच .. चेस डबल्स, हा एक अतिशय मनोरंजक प्रकार आहे ... फक्त दोनच पथ्ये पाळायची .... 1. दारू हवीच .... 2. अतिशय जीवलग मित्र हवेत ... खूप भांडायचो पण लगेच विसरायचो ....

सौंदाळा 10/02/2021 - 20:05
वा, मॉर्गन भाऊ फॉर्मात आहेत. मस्तच, लिहीत राहा. शांत, सुस्वभावी, वलयापासून दूर राहणारा आनंद हा माझा कायम आवडता खेळाडू राहिला आहे. राहून राहून नेहमी एक वाटते की बीच व्हॉलीबॉल सारखे टुकार गेम असताना ऑलिम्पिकमध्ये चेसचा सहभाग का झाला नाही? एक सुवर्णपदक नक्की झालं असत आपलं. (बिलियर्ड बद्दल पण गीत सेठी, अशोक शंडील्यकडून मिळाले असते)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

टवाळ कार्टा 10/02/2021 - 22:57
राहून राहून नेहमी एक वाटते की बीच व्हॉलीबॉल सारखे टुकार गेम असताना ऑलिम्पिकमध्ये चेसचा सहभाग का झाला नाही?
म्याच "बघणेबल"असली पाहिजे हा निकष असेल कदाचित ;)

Bhakti 11/02/2021 - 09:45
समुद्राची खोली कळण्यासाठी scuba dive करण्याची गरज नसते. त्याच्या धीर-गंभीर गाजेवरूनच तिचा अंदाज येतो. आणि बुद्धिबळाची क्लिष्टता कळण्यासाठी तो खेळण्याची गरज नसते. विश्वनाथन आनंदच्या डोळ्यांतलं गहन गांभीर्य पुरेसं असतं. वाह!!!

चौथा कोनाडा 15/02/2021 - 13:14
समुद्राची खोली कळण्यासाठी scuba dive करण्याची गरज नसते. त्याच्या धीर-गंभीर गाजेवरूनच तिचा अंदाज येतो. आणि बुद्धिबळाची क्लिष्टता कळण्यासाठी तो खेळण्याची गरज नसते. विश्वनाथन आनंदच्या डोळ्यांतलं गहन गांभीर्य पुरेसं असतं.
व्वा, जेपी साहेब !

लेख आवडला .. बाय द वे, तुम्ही चेस हा प्रकार कधी, 4-6-8-10-12,-14, असा पार्टी पाडून खेळला आहात का? आमच्या रूमवर एकच चेस बोर्ड होता आणि खेळाडू, कमीतकमी 4... त्यामुळे, चेस मध्ये डबल्सच्या मॅचेस, आमच्याच रूममध्ये चालायच्या... 304, पण तिघांत खेळू शकतो, हा पण एक शोध तिथलाच .. चेस डबल्स, हा एक अतिशय मनोरंजक प्रकार आहे ... फक्त दोनच पथ्ये पाळायची .... 1. दारू हवीच .... 2. अतिशय जीवलग मित्र हवेत ... खूप भांडायचो पण लगेच विसरायचो ....

सौंदाळा 10/02/2021 - 20:05
वा, मॉर्गन भाऊ फॉर्मात आहेत. मस्तच, लिहीत राहा. शांत, सुस्वभावी, वलयापासून दूर राहणारा आनंद हा माझा कायम आवडता खेळाडू राहिला आहे. राहून राहून नेहमी एक वाटते की बीच व्हॉलीबॉल सारखे टुकार गेम असताना ऑलिम्पिकमध्ये चेसचा सहभाग का झाला नाही? एक सुवर्णपदक नक्की झालं असत आपलं. (बिलियर्ड बद्दल पण गीत सेठी, अशोक शंडील्यकडून मिळाले असते)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

टवाळ कार्टा 10/02/2021 - 22:57
राहून राहून नेहमी एक वाटते की बीच व्हॉलीबॉल सारखे टुकार गेम असताना ऑलिम्पिकमध्ये चेसचा सहभाग का झाला नाही?
म्याच "बघणेबल"असली पाहिजे हा निकष असेल कदाचित ;)

Bhakti 11/02/2021 - 09:45
समुद्राची खोली कळण्यासाठी scuba dive करण्याची गरज नसते. त्याच्या धीर-गंभीर गाजेवरूनच तिचा अंदाज येतो. आणि बुद्धिबळाची क्लिष्टता कळण्यासाठी तो खेळण्याची गरज नसते. विश्वनाथन आनंदच्या डोळ्यांतलं गहन गांभीर्य पुरेसं असतं. वाह!!!

चौथा कोनाडा 15/02/2021 - 13:14
समुद्राची खोली कळण्यासाठी scuba dive करण्याची गरज नसते. त्याच्या धीर-गंभीर गाजेवरूनच तिचा अंदाज येतो. आणि बुद्धिबळाची क्लिष्टता कळण्यासाठी तो खेळण्याची गरज नसते. विश्वनाथन आनंदच्या डोळ्यांतलं गहन गांभीर्य पुरेसं असतं.
व्वा, जेपी साहेब !
लेखनविषय:
इश्क़ पर ज़ोर नहीं है ये वो आतिश 'ग़ालिब' कि लगाए न लगे और बुझाए न बने | . . . म्हणजे नक्की काय हे खरंतर आपल्यातल्या निम्म्या होऊन जास्त लोकांना कळालेलं नसतं. काही लोकं तर हा शेर ऐकून 3 idiots मधल्या प्रोफेसर सारखा "अरे कहना क्या चाहते हो?" असा चेहरा देखील करतात. पण एक तर 'ग़ालिब' आहे आणि इश्क सुद्धा आहे म्हणजेच काहीतरी जोरदार काम असणार इतकं आपल्याला कळतंच की. ऐकायला भारी वाटतंय, "दिल से" मधली काळ्या - पांढर्‍या कपड्यांत नाचणारी मनीषा कोईराला आठवतीये - वाईट काय त्यात? चांगलंच आहे की. आणि कळत अथवा झेपत नसलेल्या गोष्टी आवडू नयेत असं थोडंच आहे? आता नाही आम्हाला चेस मधलं काही कळत.

आमचा Valentine Week - क्रशामि क्रशावः क्रशामः

जे.पी.मॉर्गन ·

NAKSHATRA 09/02/2021 - 18:30
एक तर आता टेनिस हा इतका आक्रमक आणि ताकदीचा खेळ झालाय की single handed backhand म्हणजे सोज्वळ दिसणार्‍या सनी लियोन इतकं दुरापास्त झालंय. हा मुळातच अतिशय majestic - राजेशाही फटका. महाभारतात ब्रह्मास्त्र जसं निवडकच योद्ध्यांना अवगत होतं तसं हा फटका भात्यात असणारे वीर खूप कमी. आणि majestic गोष्टीवर फेडररपेक्षा जास्त अधिकार कोणाचा असणार? त्यात फेडररच्या बॅकहॅन्डमधली सहजता, तो मूर्तीमंत डौल, ती ग्रेस, ते राजसि व्यक्तिमत्व, तो ठहराव म्हणजे एखादी कसलेली कथक नृत्यांगना अवधड आवर्तन पूर्ण करून सहजपणे समेवर यावी तसा अपार नेत्रसुख देऊन जातो.

In reply to by NAKSHATRA

मूकवाचक 10/02/2021 - 21:09
मस्तच लिहीलंय. सांख्यिकी आकडेवारी प्रमाणे वेगवेगळे निष्कर्ष निघू शकत असले तरी फेडरर हाच अस्मादिकांच्या मते GOAT - Greatest Of All Time टेनिस प्लेअर आहे. फेडररचा बॅकहँड लाजबाबच आहे. स्टॅन वॉरविंकासारखा 'हातोडा' नसला तरी तो हातोड्यापेक्षाही प्रभावी आहे. फेडररची आणखी एक खासियत अशी की मानसीक दबाव आणणारी परिस्थिती निर्माण झाली की हमखास बिनतोड सर्व्हिस करून ती झुगारून देणे. फॉलो ऑन टाळण्यासाठी कपिलदेवने इंग्लंडविरूद्ध सलग चार षटकार खेचले होते, तसा प्रकार फेडररने कित्येक वेळा केला आहे.

आमचा क्रश जे पी मॉर्गन. मग तेंडुलकरवर लिहिलंय, की ऋषभ पंतवर वर की रॉजर फेडरर वर... काय फरक पडतो. आपण लेखाचा आस्वाद घ्यायचा!

Bhakti 09/02/2021 - 22:32
इंग्रजीत जशी "ओवाळणे" ही कन्सेप्टच नाही तशी आपल्याकडे Crush हे प्रकरण नाही. मस्त! सुंदरच प्रस्तावना. पुढील लेखही सहज सुंदर भाषेत मांडलय,एकदम स्ट्राबेरी क्रशसारखा मस्त लिहिलंय.

गामा पैलवान 10/02/2021 - 20:59
जे.पी.मॉर्गन, तुमचा क्रश माझाही आहे. फेडररची जादू काही औरंच ! एक जोरदार तडाखा लगावणार असं वाटंत असतांनाच हा पठ्ठ्या अतिशय नाजूक कोमल सव्यपात ( = फोरह्यांड ड्रॉप ) टाकायचा. प्रतिस्पर्ध्यासोबत प्रेक्षकांचाही पोपट व्हायचा ! हा फटका त्याने शोधून काढला व विकसित केला. ताकदवान खेळाच्या जमान्यात हा फटका शोधणं खरोखरंच उच्च दर्जाची कलाकारी आहे. बाकी, क्रशला मराठीत प्रेमज्वर/प्रीतज्वर कसा वाटतो? ज्याच्यावर क्रश जडला त्याला/तिला प्रीतप्रमोद/प्रीतप्रमोदिनी म्हणायचं. ज्याला/जिला जडला त्याला/तिला प्रीतज्वरी/प्रीतज्वरिणी म्हणायचं. आ.न., -गा.पै.

NAKSHATRA 09/02/2021 - 18:30
एक तर आता टेनिस हा इतका आक्रमक आणि ताकदीचा खेळ झालाय की single handed backhand म्हणजे सोज्वळ दिसणार्‍या सनी लियोन इतकं दुरापास्त झालंय. हा मुळातच अतिशय majestic - राजेशाही फटका. महाभारतात ब्रह्मास्त्र जसं निवडकच योद्ध्यांना अवगत होतं तसं हा फटका भात्यात असणारे वीर खूप कमी. आणि majestic गोष्टीवर फेडररपेक्षा जास्त अधिकार कोणाचा असणार? त्यात फेडररच्या बॅकहॅन्डमधली सहजता, तो मूर्तीमंत डौल, ती ग्रेस, ते राजसि व्यक्तिमत्व, तो ठहराव म्हणजे एखादी कसलेली कथक नृत्यांगना अवधड आवर्तन पूर्ण करून सहजपणे समेवर यावी तसा अपार नेत्रसुख देऊन जातो.

In reply to by NAKSHATRA

मूकवाचक 10/02/2021 - 21:09
मस्तच लिहीलंय. सांख्यिकी आकडेवारी प्रमाणे वेगवेगळे निष्कर्ष निघू शकत असले तरी फेडरर हाच अस्मादिकांच्या मते GOAT - Greatest Of All Time टेनिस प्लेअर आहे. फेडररचा बॅकहँड लाजबाबच आहे. स्टॅन वॉरविंकासारखा 'हातोडा' नसला तरी तो हातोड्यापेक्षाही प्रभावी आहे. फेडररची आणखी एक खासियत अशी की मानसीक दबाव आणणारी परिस्थिती निर्माण झाली की हमखास बिनतोड सर्व्हिस करून ती झुगारून देणे. फॉलो ऑन टाळण्यासाठी कपिलदेवने इंग्लंडविरूद्ध सलग चार षटकार खेचले होते, तसा प्रकार फेडररने कित्येक वेळा केला आहे.

आमचा क्रश जे पी मॉर्गन. मग तेंडुलकरवर लिहिलंय, की ऋषभ पंतवर वर की रॉजर फेडरर वर... काय फरक पडतो. आपण लेखाचा आस्वाद घ्यायचा!

Bhakti 09/02/2021 - 22:32
इंग्रजीत जशी "ओवाळणे" ही कन्सेप्टच नाही तशी आपल्याकडे Crush हे प्रकरण नाही. मस्त! सुंदरच प्रस्तावना. पुढील लेखही सहज सुंदर भाषेत मांडलय,एकदम स्ट्राबेरी क्रशसारखा मस्त लिहिलंय.

गामा पैलवान 10/02/2021 - 20:59
जे.पी.मॉर्गन, तुमचा क्रश माझाही आहे. फेडररची जादू काही औरंच ! एक जोरदार तडाखा लगावणार असं वाटंत असतांनाच हा पठ्ठ्या अतिशय नाजूक कोमल सव्यपात ( = फोरह्यांड ड्रॉप ) टाकायचा. प्रतिस्पर्ध्यासोबत प्रेक्षकांचाही पोपट व्हायचा ! हा फटका त्याने शोधून काढला व विकसित केला. ताकदवान खेळाच्या जमान्यात हा फटका शोधणं खरोखरंच उच्च दर्जाची कलाकारी आहे. बाकी, क्रशला मराठीत प्रेमज्वर/प्रीतज्वर कसा वाटतो? ज्याच्यावर क्रश जडला त्याला/तिला प्रीतप्रमोद/प्रीतप्रमोदिनी म्हणायचं. ज्याला/जिला जडला त्याला/तिला प्रीतज्वरी/प्रीतज्वरिणी म्हणायचं. आ.न., -गा.पै.
लेखनविषय:
C - R - U - S - H - CRUSH ज्या काही थोड्याफार भाषा कळतात / समजतात किंवा आवडतात त्यामध्ये इंग्रजी Crush ला समर्पक समानार्थी शब्दच सापडत नाही हो. आमची मराठी मुळातच रांगडी आणि इरसाल. Crush च्या नाजुकपणाला इथे जागा कमीच. संस्कृत ही साक्षात देववाणी. तिथे Crush मधली अगतिकता नाही. हिंदी मध्ये Crush मधला छिछोरपणा नाही. उर्दू Crush सारख्या अर्धवट गोष्टींमध्ये इंटरेस्टच घेत नाही. तिथे म्हणजे एकदम तबाही का मंजर - आग का दर्या है और डूब जाना है वगैरे मयखान्यातला सीन. पंजाबीत "मर जावां गुड खाके" असलं तरी Crush मधलं अव्यक्त राहणं पंजाबीला मंजूर नाही.

गँग ऑफ बदलापुर -

जे.पी.मॉर्गन ·

बांवरे 20/01/2021 - 22:37
व्वा जेपी !!! खूप दिवसांनी चांगली मालिका आणि त्यावरचे तुमचे भाष्य वाचायला मिळाले. यथायोग्य वर्णन !

सौंदाळा 20/01/2021 - 22:52
तुमच्या लेखाची वाटच बघत होतो पण थोडक्यात आटपलात. अजून एक भाग येऊ दे. द्वारकानाथ संझगिरी यांचे पोस्ट पण व्हाट्सएपवर जोरात फिरतायत आणि मस्तच आहेत. ते इथे चिकटवतो मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला. द्वारकानाथ संझगिरी. डोळे आनंदाश्रूने डबडबलेले आहेत. एका डोळ्यात आनंद ओसंडून वाहतोय. दुसऱ्या डोळ्यात बसलेला सुखद धक्का आहे. मध्येच चिमटा काढून मी मनाला विचारतोय, 'आपण कसोटी सामना जिंकला?' नुसती मॅच ड्रॉ झाली असती, तरी नाचलो असतो. आंधळा मागतो एक डोळा, देवाने तीन डोळे दिले. लहानपणी एक अतिशयोक्ती अलंकार मी निबंधात वापरत असे - " मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही ना?" आज मला खरंच वाटलं 'मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला.' माझ्या आयुष्यात, भारतीय क्रिकेटपटू लिहीत असलेली अनेक सोनेरी पानं पाहाण्याचा किंवा ऐकण्याचा योग आला. मग तो इंग्लंडमधला १९७१ चा विजय असो, किंवा १९८३ चं ते वर्ल्डकप जिंकणं, किंवा मग पाकिस्तानात पाकिस्तनाला हरवणं, तो वेस्टइंडिज मधला 400 धावांचा पाठलाग . कितीतरी!पण आजचा विजय सुद्धा त्याच दर्जाचा होता. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या विजयाने सर्वबाद ३६ धावांच्या राखेतून जन्म घेतलाय. विजयाचं बाळ रांगता रांगता एका मागोमाग एक संकटं कोसळत गेली. या संघाकडे टायटॅनिकचं वैभव कधीच नव्हतं. पण सर्वबाद ३६ नंतर भारतीय संघाकडे कुणी शिडाची बोट म्हणून सुद्धा बघत नव्हतं. आणि तरीही ती प्रत्येक वादळात तरली. किनाऱ्याला लागली. तेव्हा त्या अजस्र लाटांचं संगीत कानाला अधिक गोड वाटायला लागलं. वास्को दि गामाचं धैर्य आणि चिकाटी या भारतीय संघाने दाखवली. मागे वळून पाहताना आपल्याला असं लक्षात येतं की, या कसोटीत नव्या संघाचंच उदघाटन कर्णधार राहणेने केलं होतं. जवळपास फिट असलेले ११ जणं खेळले आणि त्याला आपण संघ म्हटला. गोलंदाजांच्या बाबतीत तर इतका अननुभवी संघ १९३२ सालानंतर झाला नसेल. १९३२ साली आपण पहिला कसोटी सामना खेळलो त्यावेळेस सर्वच अननुभवी होते. भारतीय संघात अनुभवापेक्षा जिद्दी तरुण अधिक होते. त्यांच्या गुणवत्तेची पूर्ण कसोटी नीट झालेलीच नव्हती. त्यांची मानसिक ताकद सुद्धा फारशी जोखली गेलेली नव्हती. पण या संघाने आपल्या सर्व अपेक्षांच्या मर्यादा पार ओलांडल्या. आणि ते खूप पुढे पुढे गेले. प्रत्येक पावलावर त्यांनी आपल्याला एक विलक्षण आनंद वाटला. या मॅचचा विचार केला तर काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. भारतीय संघ ५ गोलंदाजांने खेळला. आणि ते योग्यच झालं. कारण पाचही गोलंदाजांचा कसोटी अनुभव हा जेमतेम ४ कसोटीचा होता. त्यामुळे नुसत्या ४ गोलंदाजांवर खेळून काही होणार नव्हतं. आणि पाचवा गोलंदाज घेतला गेला. ते सर्वच जवळपास नवे कोरे होते. एक दोनच एकदाच घडी उघडलेल्या कपड्यांसारखे!. त्यांनी या कसोटीत ऑस्ट्रेलियाचे २० बळी घेतले. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया कधी डाव घोषित करणार यावर चर्चा होत होती. भारतीय गोलंदाजांना ती चर्चा झोंबली असली पाहिजे. त्यांनी सरळ ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारत ऑलआऊट केलं. शेवटच्या दिवशी 328 धावांचा पाठलाग करताना, सामना नुसता अनिर्णित झाला असता ना तरी आपण गावस्कर-बॉर्डर ट्रॉफी घेऊन घरी गेलो असतो. माझ्या लहानपणी १० पैकी १० भारतीय संघांनी ही मॅच ड्रॉ करून शॅम्पेन उघडली असती. ही दादागिरी, रिची बेनाॅ , क्लlईव्ह लाॅईड किंवा स्टीव्ह वाॅ च्या संघाने दाखवली असती . समोर आव्हान काही सोपं नव्हतं. गोलंदाजी दर्जेदार होती. खेळपट्टी वारंवार खोड्या काढत होती. मध्येच चेंडू उसळायचा, मध्येच तो खाली जायचा. नॅथन लायनचा चेंडू हातभर वळायचा. तर कधी सरळ जायचा. नॅथन लायनचा चेंडू एकदा तर विकेटकिपरला चुकवून थेट स्लिपमध्ये गेला. पण महत्त्वाची गोष्ट अशी होती की, अशा खेळपट्टीवर आणि दर्जेदार गोलंदाजीसमोर सुद्धा आपल्या संघाची जिंकण्याची जिद्द कधी कमी झाली नाही. स्लिपमध्ये गेलेल्या त्या चेंडूनंतर पुढे सरसावत रिषभ पंतने नॅथन लायनला षटकार ठोकला. 'आज मी दादा आहे' हे त्याला दाखवायचे होते .मला सलीम दुराणी आठवला . तो चूक करून जर बाद झाला असता तर आपण त्याचे वाभाडे काढले असते. पण यश बऱ्याचदा अशाच जोखमीतून जन्म घेतं. ही पाखराची ज्योतीवर उडी होती. पण इथे ज्योत विझली. पाखरू जिवंत राहिलं. या पाठलागामागे एक आखणी होती. भारतीय संघ जिंकू शकतो हा भुंगा ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या कानाभोवती घोंघावणार हे भारतीय संघाने पाहिलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियन कर्णधार फार आक्रमक क्षेत्ररचना करू शकला नाही. शुभमन गिलने ९१ धावांची खेळी करून विजयाच्या ताजमहालाची बैठक तयार केली. पंत मुळे त्याचं कौतुक कमी झालं.नेहमीच शिखर पटकन दिसत. लंच नंतर रहाणेने स्वतःकडे आक्रमक भूमिका घेतली. पुजाराला त्याने तंबू ठोकायला लावला. रहाणे मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्यावेळेला मला ते बाद होणं फारसं आवडलं नाही. कारण अशा खेळपट्टीवर अप्पर कट हा सेफ फटका कधीच नसतो. पण त्यामागे त्याच्या भावना वेगळ्या होत्या. विजयाकडे जायची त्याने वृत्ती दाखवली होती. आणि त्यांनतर येऊन पंतची बॅट नेमकी तीच भावना वारंवार बोलायला लागली. पंतच्या रक्तात बचावात्मक पेशी फार कमी असल्या तरी त्यांच्यावर त्याने ह्या वेळी थोडंफार काम सोपवलं. पण कधी संधी उत्पन्न करताना त्याच्या त्या आक्रमक पेशी उसळायच्या. अशा फलंदाजांना नेहमीच सुदैवाचा पांढरा घोडा मिळतो. कारण दैवाला ठाऊक असतं की, हा परिकथेतला राजपुत्र आहे. आणि त्याला राजकन्या जिंकायची आहे. पण तितकीच महत्त्वाची भूमिका ही पुजाराची होती. आणि ती त्याने एखाद्या अशोक कुमार सारख्या बुजुर्ग नटाप्रमाणे अत्यंत सुंदरपणे रंगवली. ऑस्ट्रेलियाला ठाऊक होतं की पुजारा हा दीपस्तंभ आहे. त्याला एक बाजू लावून धरायची आहे तरच इतर फटकेबाज फलंदाजांना आक्रमण करायची संधी मिळू शकेल आणि विजयाकडे भारताला जाता येईल. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनाही पुजाराची विकेट मिळवण्यासाठी त्याच्यावर बाउन्सरचा मारा केला. बरेच चेंडू त्याला अंगावर घ्यावे लागले. काही चेंडू त्याने सोडले. चेंडू अंगावर घेणे हे काही तंत्राच्या दृष्टीने फार चांगलं लक्षण नाहीय. पण सर्वजण सुनील गावस्कर नसतात. काही जणांकडे तितकं अचूक तंत्र नसतं. पण यातून दिसते ती हिंमत.1976 साली गायकवाड अणि मोहिंदर अमरनाथने ती वेस्ट इंडीज मध्ये दाखवली होती.पुजारा चेंडूच्या डागाने काळा निळा झाला असेल पण त्याने तिथे दीर्घकाळ उभं राहण्याचा प्रयत्न केला.ते काळे निळे डाग ही लढाऊ वृत्तीची मेडल्स होती. ऑस्ट्रेलियाला आधी नॅथन लायन जिंकून देईल असं वाटत होतं. पण पुजारा - पंत यांनी बचाव आणि आक्रमणाचा सुरेख संगम आपल्या खेळात दाखवला आणि ते मनसुबे हाणून पाडले. त्याचबरोबर डाव्या, उजव्या हाताच्या फलंदाजांमुळे त्याला वांरवार चेंडूची दिशा बदलावी लागली. नंतर त्यांची मदार होती नव्या चेंडूवर. नव्या चेंडूवर त्यांना पुजाराची विकेट सुद्धा मिळाली. ती षटकं या मॅचच्या दृष्टीने फार महत्त्वाची होती. पॅट कमिन्सची गोलंदाजी सर्वात जास्त धोकादायक वाटत होती. त्याने पंतसाठी तीन स्लिप, गली लावले. आणि चेंडूचा टप्पा खोलवर ठेवला. डावपेच चुकीचा नव्हता. पंत ड्राईव्ह करताना स्लिपमध्ये झेल देईल ही त्यांची अपेक्षा होती. कदाचित ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजानी चेंडू जास्तच खोलवर टाकले. आणि त्यामुळे पंतला ड्राईव्हज् करायला सुवर्ण संधी मिळाली. ती त्याने सोडली नाही. त्याने अप्रतिम कव्हर ड्राईव्हज् आणि ऑफ ड्राईव्हज् मारले. हे पंतचे जे आव्हान स्वीकारणं होतं ना, ते मला आवडलं. आणि तिथे पुन्हा त्याने एक गोष्ट सिद्ध केली, आम्ही मॅच जिंकायला आलेले आहोत. आम्हाला मॅच ड्रॉ करायची नाहीये. तेव्हा ऑस्ट्रेलियन संघाची जिद्द हरवली. त्यांच्या हातून चुका व्हायला लागल्या. पंतला साथ वॉशिंग्टन सुंदरने दिली. वॉशिंग्टन सुंदर अशी बॅटिंग करत होता की, कमीत कमी १० कसोटी सामने त्याच्या खिशात आहेत आणि तो ११ वा खेळतोय. अमेरिकेतलं वॉशिंग्टन डीसी सध्या कडेकोट बंदोबस्तात आहे. या वॉशिंग्टन सुंदरने इथे गब्बावर स्वतःच्या विकेटभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. आणि मधूनच त्याने जो एक हूकवर षटकार लगावला त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं अवसान गळलं मग स्लिपच्या डोक्यावरून चौकार आला.. तिथून ही मॅच टीट्वेन्टी व्हायला लागली. आणि भारतीय संघाने डोकं थोडं शांत ठेवलं तर आरामात जिंकणार असं वाटत होतं. आणि अचानक वॉशिंग्टन सुंदर रिव्हर्स स्वीप मारायला गेला. खरं तर त्याची काही गरजच नव्हती. कारण अपेक्षित रनरेट आपल्या खिशातच होता. पण त्याला ती आपली चूक उमगली सुद्धा. कितीतरी वेळ तो खेळपट्टीवर उभा होता. आणि निघाला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर उद्ध्वस्त हिरोशिमाचे भाव होते. त्यानंतर 'खास प्रयत्न 'केले असते तरच भारतीय संघ हरला असता. गंमत पहा ही मॅच कसोटी म्हणून खेळली गेली. नंतर तिची वनडे झाली. आणि शेवटी शेवटी टीट्वेन्टी झाली. तिन्ही प्रकारची फलंदाजी यात पाहायला मिळाली. पुजाराने कसोटीत कशी बॅटिंग करावी याचं प्रात्यक्षित दाखवलं. गिलने कसोटीत खेळताना वनडेचा कसा उपयोग होतो हे पण दाखवलं. आणि पंतने तर वनडे आणि टीट्वेन्टी या दोन्ही फॉरमॅटचा टेस्टमध्ये कसा उपयोग करायचा याचं प्रात्यक्षिक दाखवलं. आणि भारतीय संघ सामना जिंकला. मला सर्वात महत्त्वाची गोष्ट जी जाणवते ती या नव्या खेळाडूंचा पेशन्स त्यांची जिद्द, त्यांचा निर्धार आणि त्याच्यासाठी त्यांचं कौतुक किती करावं ते कमीच आहे. एका बाबतीत मी अजिंक्य रहाणेचं कौतुक करीन की, अजिंक्य रहाणेने त्या सर्वांना प्रचंड कॉन्फिडन्स दिला. अजिंक्य रहाणे असा माणूस आहे की, ज्याच्याकडे कुठलाही नवखा फलदांज जाऊन आपलं मन व्यक्त करतो. काही काही गोष्टींना उत्तरच नाही. म्हणजे आता साधं उदाहरण जर घ्यायचं झालं तर, शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर हे किती आंतरराष्ट्रीय सामने खेळलेत? काहीही नाही. त्यांना नेटमध्ये सुद्धा नीट बॅटिंग करायला मिळत नसेल. कारण नेटमध्ये नेहमीच वरच्या फलंदाजांना बॅटिंग करायला मिळते. तरी पहिल्या डावात त्यांनी अशी भागीदारी केली की, ती धावांच्या तराजूत तोलताच येत नाही. ती सोन्यामध्येच तोलली पाहिजे. आपलं या मॅचमध्ये आव्हान टिकलं हे केवळ त्याच भागीदारीमुळे टिकलं. त्या दोघांकडे विशेषतः शार्दूल ठाकूरकडे पाहिल्यानंतर आपल्यातला फलंदाज तो विसरलाय की काय? असं मला वाटायला लागलं. त्याने त्याच्यातल्या फलंदाजाला पुढे प्रत्येक वेळी कानाला धरून बाहेर काढायला पाहिजे. एक विचार करा अख्या भारतीय गोलंदाजीचा अनुभव होता ४ कसोटीचा आणि तरीही त्यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजीला दोनदा बाद केलं. मला एक गोष्ट मान्य आहे, गेल्या तीन वर्षातली ही अशक्त ऑस्ट्रेलियन फलंदाजी आहे, अशी ऑस्ट्रेलियन फलंदाजी मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलेली नाही. तरी सुद्धा आपल्या गोलंदाजांचं कौतुक कमी होत नाही. कारण त्यांच्याकडे तरी कुठे अनुभव होता?. मी तुलना करत नाही पण माझ्या लाडक्या इतिहासात शिरतो. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या समोर केवढं प्रचंड आव्हान होतं. एका बाजूला आदिलशाही होती, दुसऱ्या बाजूला मोगल होते. शिवाजी महाराजांनी सामान्य माणसातून, मावळ्यांमधून सैन्य उभं केलं. ते मावळे बघता बघता भाले झाले. भारतीय संघाच्या बाबतीतही तेच झालं. हे खेळाडू बघता बघता भाले झाले. आणि त्या तीक्ष्ण भाल्यांनीऑस्ट्रेलियन संघ कोसळला. भारतीय संघाने आग्र्याहून नुसती सुटका नाही केली, तर भारतीय संघ आग्रा जिंकूनच परतला. म्हणुनच म्हणतो मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला.

श्रीगुरुजी 20/01/2021 - 22:59
कोहली, राहुल, अश्विन, जडेजा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर, बुमराह, शमी व उमेश यादव हे भारताचे ९ प्रमुख खेळाडू चौथ्या कसोटी संघात नव्हते. शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, सैनी, सिराज, ठाकूर व नटराजन हे ११ पैकी ६ खेळाडू एकत्रित एकूण फक्त ६ कसोटी सामने खेळले होते. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ प्रमुख खेळाडू घेऊन सामन्यात होता. तरीसुद्धा भारताने सामना जिंकला. भारताचे राखीव खेळाडू इतके जबरदस्त कामगिरी करताना बहुधा पहिल्यांदाच दिसले असावे. यापूर्वी २००१ मध्ये भारतात इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिकेत झहीर, नेहरा, श्रीनाथ वगैरे प्रमुख मध्यमगती गोलंदाज जायबंदी असताना एकाच सामन्यात टिनू योहानन, इक्बाल सिद्दीकी व संजय बांगर या तीन मध्यमगती गोलंदाजांनी पदार्पण केले होते. या मालिकेत शुभमन गिल, सिराज, नटराजन, सुंदर, सैनी या पाच खेळाडूंनी पदार्पण केले.

In reply to by कपिलमुनी

लेख आवडला, गँग्ज ऑफ वासेपूर अन बदलापूर चित्रपट पाहिले नसल्याने संदर्भ फारसे कळले नाहीत. बादवे कर्णधार अजिंक्य रहाणेचे नाव लेखात नसल्याने आश्चर्य वाटले.

साहना 21/01/2021 - 12:03
क्रिकेटचे ज्ञान नाही पण उत्कृष्ट लेख आहे. IPL ने भारतीय क्रिकेट आणि सर्वच क्रीडाक्षेत्राचे चित्र पालटले आहे. पूर्वी गांगुली किंवा द्रविड सारखी पोरे सरळ बेंगलोर कोलकातातील सध्या खेळपट्टीवरून सरळ इंग्लंड च्या लॉर्ड्स वर इंग्लंड च्या भेदक गोलंदाजीचा सामना करायची. पैसा वगैरे ह्यांनी पहिला सुद्धा नव्हता मग विनोद कांबळी सारखे अत्यंत गुणवान खेळाडू भरकटयाचे. पण शार्दूल असो वा वॉशिंग्टन सुंदर, पैसा आणि प्रसिद्धीची सवय आहे तसेच जागतिक दर्जाची गोलंदाजी सुद्धा खेळण्याची क्षमता IPL द्वारे निर्माण झाली आहे. अनेक क्रीडापटू जखमी आहेत हे ऐकून अत्यंत आश्चर्य वाटले. फिटनेस खरेतर वाढायला पाहिजे होते. ह्याशिवाय राहुल द्रविड ह्यांना ह्या विजयाचे बरेच श्रेय जाते युवा क्रिकेटपटूंना ह्यांनी मार्गदर्शन बऱ्यापैकी केले आहे. येत्या २० वर्षांत भारत देश क्रिकेट मधील अद्वितीय असा बलाढ्य देश असणार आहे. दुःख फक्त एका गोष्टीचे वाटते कि ICC ने क्रिकेट खेळाला इतर देशांत लोकप्रियता मिळवण्याच्या दृष्टीने काहीही विशेष काम केले नाही. अफगाणिस्तान, अमेरिका, कॅनडा इत्यादी देशांत क्रिकेटचे वेड भारी आहे तिथे खरे तर त्यांनी पैसे ओतून क्रिकेट ची लोकप्रियता वाढवायला पाहिजे होती. BCCI ची व्यावसायिकता सुद्धा थोडी मागे पडत आहे असे वाटते. सामान्याशिवाय आणि IPL शिवाय मर्चन्डाईस, action फिगर्स, थीम पार्क्स, कॉर्पोरेट इव्हेंट्स, व्हिडीओ गेम्स, अप्प्स, इत्यादी क्षेत्रांचे व्यावसायिकरण अजून केले गेले नाही. टीप : जगमोहन दालमियांनी ह्या व्यवसायीकरणाचा पाया रचला, शरद पवार ह्यांनी त्याला खूप हातभार लावला आणि श्रीनिवासन ह्यांनी त्यावर कदाचित कळस चढवला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

राघव 21/01/2021 - 12:24
लेख आवडला. वेगळा दृष्टीकोन छान मांडलात! तसेच संझगिरींचा लेखही सुंदर. धन्यवाद! जिंकलेली पूर्ण मॅच बॉल-टू-बॉल बघूनसुद्धा आढावा घेणारे लेख खूप आनंद देतात. त्यात जेपींसारखे दर्जेदार लिहिणारे असतील तर क्या कहने! जाता जाता: अजिंक्य रहाणेचे खास कौतुक करणे अगत्याचे आहे हे मात्र अगदी खरे.

अजून एक जाणवलेली गोष्ट म्हणजे, अंडर 19 Cricket World Cup... विशेषतः, ह्या Under 19, मधले बरेच खेळाडू, आता IPL मध्ये येतात. गिल, पृथ्वी शाॅ, पंत, वाॅशींग्टन सुंदर, हे पण Under 19, मध्ये खेळले होते .

लेखन आवडलं. लेखनातील भावना अतिशय उत्तम. आपण नेहमीचं हटके लेखन केलं आहे. धंस. खेळाडू कोण आहेत, कोण गोलंदाजी करतो. हा कोण आहे ? अशी ओळख परेड करायला लावणारा सध्याच्या भारतीय संघ. ३६ धावात गुंडाळले गेल्यावर, ही जखम अजून किती वर्ष भळभळत राहणार असे वाटत होते. आणि चमत्कार झाला... सर्व नवोदित खेळाडू. तरी या संघाने एकदिवशीय, ट्वेंटी ट्वेंटीचा आनन्द आनंद, या कसोटी सामन्यांनी दिला. एकेक चेंडू , एकेक धाव, एकेक फलंदाज आणि हृदयाची धड़धड वाढवणारे सामने कायम मेंदूत रेकॉर्ड झाले. देहभान हरपून जाणे म्हणतात तो आनंद या काही दिवासातल्या क्रिकेटने दिला. -दिलीप बिरुटे

खेडूत 21/01/2021 - 15:07
आवडला. जिगरबाज भारतीय संघाचे अभिनंदन! या निमित्ताने ज्येष्ठ खेळाडूंना योग्य संदेश गेला असेल हा आणखी एक फायदा.

फारएन्ड 21/01/2021 - 21:40
अतिशय सुंदर आढावा! गेल्या काही दशकातील क्रिकेटचा प्रवास व भारतातील आर्थिक्/सामाजिक बदलाचे त्यात पडलेले प्रतिबिंब बरोब्बर जमले आहे. सचिनने या सामन्याचे वर्णन "Every session produced a new hero!" असे चपखल केले. या सिरीज मधे इतक्या विविध लोकांनी कामगिरी केली आहे! त्यांची गावे वरती लेखात वाचली त्यावरून नकाशावर प्रत्येकाच्या गावावर एक पिन ठेवली तर भारतभर पिना दिसतील. पहिल्याच मॅच मधे खेळणारा वॉशिंग्टन सुंदर दुसरीकडून शार्दूल ठाकूर आउट झाल्यावर उरलेल्या "शेपटा" ला सांभाळत, स्ट्राइक स्वतःकडे ठेवत सिनीयर बॅट्समन सारखा खेळताना पाहिला तेव्हाच हे पाणी वेगळे आहे लक्षात आले. पहिल्या डावात लायन ला व दुसर्‍या डावात कमिन्सला त्याने मारलेल्या सिक्सेस अफलातून होत्या. टोटल रिस्पेक्ट!

आदरणीय प्रा डॉ साहेबांनी म्हटल्याप्रमाणे ३६ आकड्याची जखम २००७ एकदिवसीय वर्ल्ड कप मधल्या बांगला देशाकडून झालेल्या पराभवासारखी कायम भळभळत राहणार यात शंका नव्हती. पण २००७ मध्ये त्यानंतर काही दिवसातच एका नव्या कर्णधाराने नव्या जोषाच्या तरुण रक्ताच्या खेळाडूंना घेऊन टी २० वर्ल्ड कप जिंकून दिला. त्याही आधी २००१ मध्ये, मॅच फिक्सिंग च्या वादळानंतर, मुंबईत पहिला सामना तीन दिवसांत गमावल्या नंतर नव्या जुन्या (त्यातला एक होता नुकताच मिसरूड फुटलेला एक सरदार) खेळाडूंना लढायला लावून स्टीव्ह वॉ ची फ्रंटीयर रोखली होती. आणि नंतर जिंकली होती. २००२ मध्ये NatWest अंतिम सामन्यात लॉर्ड्स वर गांगुलीने अंगातला शर्ट काढून फडकवला होता तेव्हा त्याच्या ओठांच्या हालचाली पाहा.. तो सामना जिंकून देणारे युवराज - कैफ किती वर्षांचे होते. परत तेच झालं. ३६ ही राख होती तर शेवटचा विजय म्हणजे भारतीय फिनिक्सचं उड्डाण होतं. १९९६ शारजा, २००१ कोलकाता, २००२ लॉर्ड्स यांच्यासारखा हा सामना आयुष्यभर लक्षात राहील.

In reply to by तुषार काळभोर

१९९६ शारजा की १९९८ शारजा? - ऑस्ट्रेलियाविरुद्ध सचिनची पाठोपाठ दोन शतके व मालिका जिंकणे प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमीसाठी अविस्मरणीय आहे. बादवे १९९६च्या शारजा दौर्‍यातही प्रथमच भारतीय संघाने एक दिवसीय सामन्यात ३०० धावांचा टप्पा पार केला होता.

श्रीगुरुजी 22/01/2021 - 09:44
२००७ ची जखम भळभळत राहणार कारण तुलनेने अतिसामान्य संघाकडून पराभव झाला होता व त्या पराभवामुळे पुढील फेरीचे दार बंद होऊन घरी परतावे लागले होते. त्या तुलनेत ३६ धावांच्या जखमेचे दु:ख अल्पकालीन आहे कारण हा नीचांक परदेशात व तगड्या गोलंदाजांसमोर झाला होता आणि त्यामुळे मालिका हरली नव्हती किंवा मालिका जिंकण्याची/अनिर्णित ठेवण्याची संधी संपली नव्हती.

मित्रहो 22/01/2021 - 13:10
या विजयानंतर मी इतका खूष आहे की यावर काहीही लिहिले तरी आवडते हा तर नितांत सुंदर लेख आहे त्यामुळे प्रचंड आवडला आहे. दिल खूष केला तुम्ही. गाबावर शेवटल्या दिवशी ३२८ धावा काढून मॅच जिंकायचा प्रयत्न करायचा नसतो तर विकेट वाचवून सामना अनिर्णीत राखता आला तरी खूप झाले. तेवढे करुनही बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सु्द्धा मिळेल. जिंकण्याच्या प्रयत्नात हार नको. से जर कुणी या नवीन खेळाडूंना सांगितले तर ते म्हणतील हॅ हम नही मानते, ३०० धावा तर काढायच्या आहे आणि पूर्ण दिवस आहे. सिडनीत जर शुभमन, अजिंक्य किंवा ऋषभ पंत यापैकी एकाला जरी एक तास अधिक मिळाला असता तर कदाचित तो सामना सुद्धा भारताने जिंकला असता. डोंबिविलीच्या अजिंक्य रहाणेचे योगदान पण खूप मोठे आहे, त्याचे शतक खऱ्या अर्थाने मालिकेचा निकाल बदलणारे आहे. गावस्करने एका मुलाखतीत मांडलेला विचार महत्वाचा आहे IPL मुळे ही मंडळी मोठमोठ्या खेळाडूंसोबत सतत खेळतात त्यामुळे मोठ्या आंतरराष्टीय खेळाडूंची ती भिती तितकी आता तितकी राहिली नाही. IPL मधे किंवा नेटमधे त्याला खेळलेले असतात. फार काही मोठे आहे असे त्यांना वाटत नाही. गांगुलीची बेधडक प्रवृत्ती ही अशी सहजासहजी अंगात येत नाही आणि आली तर जात नाही. आता काही दिवसापूर्वी कुण्या खेळाडूने गांगुलीने दिलेल्या सल्लयाचे आभार मानले. एका पत्रकाराने कुचकट प्रश्न विचारला. तेंव्हा अजिबात बचावात्मक पवित्रा न घेता गांगुलीने सांगितले मी अध्यक्ष वगैरे नंतर आहे, मी खेळाडू आधी आहे इतके इतके सामने खेळलो आहे तेंव्हा कुणीही खेळाडू मला सल्ला विचारु शकतो आणि तो मी देणार.

चौकटराजा 22/01/2021 - 17:51
या सर्व आक्रमणासाठी चेतेश्वर पुजारा सारखा एक तरी एक बाजू लढवणारा संघात असावा लागतो . व्ही व्ही एस , द्रवीड, बिल लॉरी, स्टीव्ह वॉ , शिवनारायण चन्दरपॉल , मुदस्सर नझर ,जेफ बॉयकॉट या तार्‍यानी ते काम वेळोवेळी केले म्हणून त्यान्चे सन्घ जिन्कले ! चौथ्या डावात २७५ पेक्षा जास्त धावा करणे सामान्यतः कोणत्याही सन्घाला अवघड असते खास करून खेळपट्टी फिरकीला व त्यातही खास करून लेग स्पिनर् ला अनुकूल असेल तर ! ४०० पेक्शा जास्त धावा करून सामना चौथ्या डावात जिंकण्याचा पराक्रम भारतीय सन्घाने केला आहे पण अशावेळी एखादी मोठी खेळी त्यात असतेच . ४०४ च्या " त्या" डावात गावस्कर व विश्वनाथ दोघान्चीही शतके तर मोहिन्दर अमरनाथ च्या ४४० मिनिटातील ८६ धावा सामील होत्या. आताच्या यावेळचे खास विशेष असे की सर्वानी विजयास हातभार लावला. सबब कपिल देवने याचे वर्णन व्ही व्ही एस च्या २८१ वाल्या डावाशी न करता १९८३ च्या वर्ल्ड कप फायनलशी केले आहे. खरे तर हा ३२९ चा विजय " त्या' पेक्शाही महान आहे असे कपिल म्हणतो ते उगाच नाही !!

बांवरे 20/01/2021 - 22:37
व्वा जेपी !!! खूप दिवसांनी चांगली मालिका आणि त्यावरचे तुमचे भाष्य वाचायला मिळाले. यथायोग्य वर्णन !

सौंदाळा 20/01/2021 - 22:52
तुमच्या लेखाची वाटच बघत होतो पण थोडक्यात आटपलात. अजून एक भाग येऊ दे. द्वारकानाथ संझगिरी यांचे पोस्ट पण व्हाट्सएपवर जोरात फिरतायत आणि मस्तच आहेत. ते इथे चिकटवतो मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला. द्वारकानाथ संझगिरी. डोळे आनंदाश्रूने डबडबलेले आहेत. एका डोळ्यात आनंद ओसंडून वाहतोय. दुसऱ्या डोळ्यात बसलेला सुखद धक्का आहे. मध्येच चिमटा काढून मी मनाला विचारतोय, 'आपण कसोटी सामना जिंकला?' नुसती मॅच ड्रॉ झाली असती, तरी नाचलो असतो. आंधळा मागतो एक डोळा, देवाने तीन डोळे दिले. लहानपणी एक अतिशयोक्ती अलंकार मी निबंधात वापरत असे - " मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही ना?" आज मला खरंच वाटलं 'मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला.' माझ्या आयुष्यात, भारतीय क्रिकेटपटू लिहीत असलेली अनेक सोनेरी पानं पाहाण्याचा किंवा ऐकण्याचा योग आला. मग तो इंग्लंडमधला १९७१ चा विजय असो, किंवा १९८३ चं ते वर्ल्डकप जिंकणं, किंवा मग पाकिस्तानात पाकिस्तनाला हरवणं, तो वेस्टइंडिज मधला 400 धावांचा पाठलाग . कितीतरी!पण आजचा विजय सुद्धा त्याच दर्जाचा होता. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या विजयाने सर्वबाद ३६ धावांच्या राखेतून जन्म घेतलाय. विजयाचं बाळ रांगता रांगता एका मागोमाग एक संकटं कोसळत गेली. या संघाकडे टायटॅनिकचं वैभव कधीच नव्हतं. पण सर्वबाद ३६ नंतर भारतीय संघाकडे कुणी शिडाची बोट म्हणून सुद्धा बघत नव्हतं. आणि तरीही ती प्रत्येक वादळात तरली. किनाऱ्याला लागली. तेव्हा त्या अजस्र लाटांचं संगीत कानाला अधिक गोड वाटायला लागलं. वास्को दि गामाचं धैर्य आणि चिकाटी या भारतीय संघाने दाखवली. मागे वळून पाहताना आपल्याला असं लक्षात येतं की, या कसोटीत नव्या संघाचंच उदघाटन कर्णधार राहणेने केलं होतं. जवळपास फिट असलेले ११ जणं खेळले आणि त्याला आपण संघ म्हटला. गोलंदाजांच्या बाबतीत तर इतका अननुभवी संघ १९३२ सालानंतर झाला नसेल. १९३२ साली आपण पहिला कसोटी सामना खेळलो त्यावेळेस सर्वच अननुभवी होते. भारतीय संघात अनुभवापेक्षा जिद्दी तरुण अधिक होते. त्यांच्या गुणवत्तेची पूर्ण कसोटी नीट झालेलीच नव्हती. त्यांची मानसिक ताकद सुद्धा फारशी जोखली गेलेली नव्हती. पण या संघाने आपल्या सर्व अपेक्षांच्या मर्यादा पार ओलांडल्या. आणि ते खूप पुढे पुढे गेले. प्रत्येक पावलावर त्यांनी आपल्याला एक विलक्षण आनंद वाटला. या मॅचचा विचार केला तर काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. भारतीय संघ ५ गोलंदाजांने खेळला. आणि ते योग्यच झालं. कारण पाचही गोलंदाजांचा कसोटी अनुभव हा जेमतेम ४ कसोटीचा होता. त्यामुळे नुसत्या ४ गोलंदाजांवर खेळून काही होणार नव्हतं. आणि पाचवा गोलंदाज घेतला गेला. ते सर्वच जवळपास नवे कोरे होते. एक दोनच एकदाच घडी उघडलेल्या कपड्यांसारखे!. त्यांनी या कसोटीत ऑस्ट्रेलियाचे २० बळी घेतले. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया कधी डाव घोषित करणार यावर चर्चा होत होती. भारतीय गोलंदाजांना ती चर्चा झोंबली असली पाहिजे. त्यांनी सरळ ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारत ऑलआऊट केलं. शेवटच्या दिवशी 328 धावांचा पाठलाग करताना, सामना नुसता अनिर्णित झाला असता ना तरी आपण गावस्कर-बॉर्डर ट्रॉफी घेऊन घरी गेलो असतो. माझ्या लहानपणी १० पैकी १० भारतीय संघांनी ही मॅच ड्रॉ करून शॅम्पेन उघडली असती. ही दादागिरी, रिची बेनाॅ , क्लlईव्ह लाॅईड किंवा स्टीव्ह वाॅ च्या संघाने दाखवली असती . समोर आव्हान काही सोपं नव्हतं. गोलंदाजी दर्जेदार होती. खेळपट्टी वारंवार खोड्या काढत होती. मध्येच चेंडू उसळायचा, मध्येच तो खाली जायचा. नॅथन लायनचा चेंडू हातभर वळायचा. तर कधी सरळ जायचा. नॅथन लायनचा चेंडू एकदा तर विकेटकिपरला चुकवून थेट स्लिपमध्ये गेला. पण महत्त्वाची गोष्ट अशी होती की, अशा खेळपट्टीवर आणि दर्जेदार गोलंदाजीसमोर सुद्धा आपल्या संघाची जिंकण्याची जिद्द कधी कमी झाली नाही. स्लिपमध्ये गेलेल्या त्या चेंडूनंतर पुढे सरसावत रिषभ पंतने नॅथन लायनला षटकार ठोकला. 'आज मी दादा आहे' हे त्याला दाखवायचे होते .मला सलीम दुराणी आठवला . तो चूक करून जर बाद झाला असता तर आपण त्याचे वाभाडे काढले असते. पण यश बऱ्याचदा अशाच जोखमीतून जन्म घेतं. ही पाखराची ज्योतीवर उडी होती. पण इथे ज्योत विझली. पाखरू जिवंत राहिलं. या पाठलागामागे एक आखणी होती. भारतीय संघ जिंकू शकतो हा भुंगा ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या कानाभोवती घोंघावणार हे भारतीय संघाने पाहिलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियन कर्णधार फार आक्रमक क्षेत्ररचना करू शकला नाही. शुभमन गिलने ९१ धावांची खेळी करून विजयाच्या ताजमहालाची बैठक तयार केली. पंत मुळे त्याचं कौतुक कमी झालं.नेहमीच शिखर पटकन दिसत. लंच नंतर रहाणेने स्वतःकडे आक्रमक भूमिका घेतली. पुजाराला त्याने तंबू ठोकायला लावला. रहाणे मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्यावेळेला मला ते बाद होणं फारसं आवडलं नाही. कारण अशा खेळपट्टीवर अप्पर कट हा सेफ फटका कधीच नसतो. पण त्यामागे त्याच्या भावना वेगळ्या होत्या. विजयाकडे जायची त्याने वृत्ती दाखवली होती. आणि त्यांनतर येऊन पंतची बॅट नेमकी तीच भावना वारंवार बोलायला लागली. पंतच्या रक्तात बचावात्मक पेशी फार कमी असल्या तरी त्यांच्यावर त्याने ह्या वेळी थोडंफार काम सोपवलं. पण कधी संधी उत्पन्न करताना त्याच्या त्या आक्रमक पेशी उसळायच्या. अशा फलंदाजांना नेहमीच सुदैवाचा पांढरा घोडा मिळतो. कारण दैवाला ठाऊक असतं की, हा परिकथेतला राजपुत्र आहे. आणि त्याला राजकन्या जिंकायची आहे. पण तितकीच महत्त्वाची भूमिका ही पुजाराची होती. आणि ती त्याने एखाद्या अशोक कुमार सारख्या बुजुर्ग नटाप्रमाणे अत्यंत सुंदरपणे रंगवली. ऑस्ट्रेलियाला ठाऊक होतं की पुजारा हा दीपस्तंभ आहे. त्याला एक बाजू लावून धरायची आहे तरच इतर फटकेबाज फलंदाजांना आक्रमण करायची संधी मिळू शकेल आणि विजयाकडे भारताला जाता येईल. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनाही पुजाराची विकेट मिळवण्यासाठी त्याच्यावर बाउन्सरचा मारा केला. बरेच चेंडू त्याला अंगावर घ्यावे लागले. काही चेंडू त्याने सोडले. चेंडू अंगावर घेणे हे काही तंत्राच्या दृष्टीने फार चांगलं लक्षण नाहीय. पण सर्वजण सुनील गावस्कर नसतात. काही जणांकडे तितकं अचूक तंत्र नसतं. पण यातून दिसते ती हिंमत.1976 साली गायकवाड अणि मोहिंदर अमरनाथने ती वेस्ट इंडीज मध्ये दाखवली होती.पुजारा चेंडूच्या डागाने काळा निळा झाला असेल पण त्याने तिथे दीर्घकाळ उभं राहण्याचा प्रयत्न केला.ते काळे निळे डाग ही लढाऊ वृत्तीची मेडल्स होती. ऑस्ट्रेलियाला आधी नॅथन लायन जिंकून देईल असं वाटत होतं. पण पुजारा - पंत यांनी बचाव आणि आक्रमणाचा सुरेख संगम आपल्या खेळात दाखवला आणि ते मनसुबे हाणून पाडले. त्याचबरोबर डाव्या, उजव्या हाताच्या फलंदाजांमुळे त्याला वांरवार चेंडूची दिशा बदलावी लागली. नंतर त्यांची मदार होती नव्या चेंडूवर. नव्या चेंडूवर त्यांना पुजाराची विकेट सुद्धा मिळाली. ती षटकं या मॅचच्या दृष्टीने फार महत्त्वाची होती. पॅट कमिन्सची गोलंदाजी सर्वात जास्त धोकादायक वाटत होती. त्याने पंतसाठी तीन स्लिप, गली लावले. आणि चेंडूचा टप्पा खोलवर ठेवला. डावपेच चुकीचा नव्हता. पंत ड्राईव्ह करताना स्लिपमध्ये झेल देईल ही त्यांची अपेक्षा होती. कदाचित ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजानी चेंडू जास्तच खोलवर टाकले. आणि त्यामुळे पंतला ड्राईव्हज् करायला सुवर्ण संधी मिळाली. ती त्याने सोडली नाही. त्याने अप्रतिम कव्हर ड्राईव्हज् आणि ऑफ ड्राईव्हज् मारले. हे पंतचे जे आव्हान स्वीकारणं होतं ना, ते मला आवडलं. आणि तिथे पुन्हा त्याने एक गोष्ट सिद्ध केली, आम्ही मॅच जिंकायला आलेले आहोत. आम्हाला मॅच ड्रॉ करायची नाहीये. तेव्हा ऑस्ट्रेलियन संघाची जिद्द हरवली. त्यांच्या हातून चुका व्हायला लागल्या. पंतला साथ वॉशिंग्टन सुंदरने दिली. वॉशिंग्टन सुंदर अशी बॅटिंग करत होता की, कमीत कमी १० कसोटी सामने त्याच्या खिशात आहेत आणि तो ११ वा खेळतोय. अमेरिकेतलं वॉशिंग्टन डीसी सध्या कडेकोट बंदोबस्तात आहे. या वॉशिंग्टन सुंदरने इथे गब्बावर स्वतःच्या विकेटभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. आणि मधूनच त्याने जो एक हूकवर षटकार लगावला त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं अवसान गळलं मग स्लिपच्या डोक्यावरून चौकार आला.. तिथून ही मॅच टीट्वेन्टी व्हायला लागली. आणि भारतीय संघाने डोकं थोडं शांत ठेवलं तर आरामात जिंकणार असं वाटत होतं. आणि अचानक वॉशिंग्टन सुंदर रिव्हर्स स्वीप मारायला गेला. खरं तर त्याची काही गरजच नव्हती. कारण अपेक्षित रनरेट आपल्या खिशातच होता. पण त्याला ती आपली चूक उमगली सुद्धा. कितीतरी वेळ तो खेळपट्टीवर उभा होता. आणि निघाला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर उद्ध्वस्त हिरोशिमाचे भाव होते. त्यानंतर 'खास प्रयत्न 'केले असते तरच भारतीय संघ हरला असता. गंमत पहा ही मॅच कसोटी म्हणून खेळली गेली. नंतर तिची वनडे झाली. आणि शेवटी शेवटी टीट्वेन्टी झाली. तिन्ही प्रकारची फलंदाजी यात पाहायला मिळाली. पुजाराने कसोटीत कशी बॅटिंग करावी याचं प्रात्यक्षित दाखवलं. गिलने कसोटीत खेळताना वनडेचा कसा उपयोग होतो हे पण दाखवलं. आणि पंतने तर वनडे आणि टीट्वेन्टी या दोन्ही फॉरमॅटचा टेस्टमध्ये कसा उपयोग करायचा याचं प्रात्यक्षिक दाखवलं. आणि भारतीय संघ सामना जिंकला. मला सर्वात महत्त्वाची गोष्ट जी जाणवते ती या नव्या खेळाडूंचा पेशन्स त्यांची जिद्द, त्यांचा निर्धार आणि त्याच्यासाठी त्यांचं कौतुक किती करावं ते कमीच आहे. एका बाबतीत मी अजिंक्य रहाणेचं कौतुक करीन की, अजिंक्य रहाणेने त्या सर्वांना प्रचंड कॉन्फिडन्स दिला. अजिंक्य रहाणे असा माणूस आहे की, ज्याच्याकडे कुठलाही नवखा फलदांज जाऊन आपलं मन व्यक्त करतो. काही काही गोष्टींना उत्तरच नाही. म्हणजे आता साधं उदाहरण जर घ्यायचं झालं तर, शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर हे किती आंतरराष्ट्रीय सामने खेळलेत? काहीही नाही. त्यांना नेटमध्ये सुद्धा नीट बॅटिंग करायला मिळत नसेल. कारण नेटमध्ये नेहमीच वरच्या फलंदाजांना बॅटिंग करायला मिळते. तरी पहिल्या डावात त्यांनी अशी भागीदारी केली की, ती धावांच्या तराजूत तोलताच येत नाही. ती सोन्यामध्येच तोलली पाहिजे. आपलं या मॅचमध्ये आव्हान टिकलं हे केवळ त्याच भागीदारीमुळे टिकलं. त्या दोघांकडे विशेषतः शार्दूल ठाकूरकडे पाहिल्यानंतर आपल्यातला फलंदाज तो विसरलाय की काय? असं मला वाटायला लागलं. त्याने त्याच्यातल्या फलंदाजाला पुढे प्रत्येक वेळी कानाला धरून बाहेर काढायला पाहिजे. एक विचार करा अख्या भारतीय गोलंदाजीचा अनुभव होता ४ कसोटीचा आणि तरीही त्यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजीला दोनदा बाद केलं. मला एक गोष्ट मान्य आहे, गेल्या तीन वर्षातली ही अशक्त ऑस्ट्रेलियन फलंदाजी आहे, अशी ऑस्ट्रेलियन फलंदाजी मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलेली नाही. तरी सुद्धा आपल्या गोलंदाजांचं कौतुक कमी होत नाही. कारण त्यांच्याकडे तरी कुठे अनुभव होता?. मी तुलना करत नाही पण माझ्या लाडक्या इतिहासात शिरतो. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या समोर केवढं प्रचंड आव्हान होतं. एका बाजूला आदिलशाही होती, दुसऱ्या बाजूला मोगल होते. शिवाजी महाराजांनी सामान्य माणसातून, मावळ्यांमधून सैन्य उभं केलं. ते मावळे बघता बघता भाले झाले. भारतीय संघाच्या बाबतीतही तेच झालं. हे खेळाडू बघता बघता भाले झाले. आणि त्या तीक्ष्ण भाल्यांनीऑस्ट्रेलियन संघ कोसळला. भारतीय संघाने आग्र्याहून नुसती सुटका नाही केली, तर भारतीय संघ आग्रा जिंकूनच परतला. म्हणुनच म्हणतो मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला.

श्रीगुरुजी 20/01/2021 - 22:59
कोहली, राहुल, अश्विन, जडेजा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर, बुमराह, शमी व उमेश यादव हे भारताचे ९ प्रमुख खेळाडू चौथ्या कसोटी संघात नव्हते. शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, सैनी, सिराज, ठाकूर व नटराजन हे ११ पैकी ६ खेळाडू एकत्रित एकूण फक्त ६ कसोटी सामने खेळले होते. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ प्रमुख खेळाडू घेऊन सामन्यात होता. तरीसुद्धा भारताने सामना जिंकला. भारताचे राखीव खेळाडू इतके जबरदस्त कामगिरी करताना बहुधा पहिल्यांदाच दिसले असावे. यापूर्वी २००१ मध्ये भारतात इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिकेत झहीर, नेहरा, श्रीनाथ वगैरे प्रमुख मध्यमगती गोलंदाज जायबंदी असताना एकाच सामन्यात टिनू योहानन, इक्बाल सिद्दीकी व संजय बांगर या तीन मध्यमगती गोलंदाजांनी पदार्पण केले होते. या मालिकेत शुभमन गिल, सिराज, नटराजन, सुंदर, सैनी या पाच खेळाडूंनी पदार्पण केले.

In reply to by कपिलमुनी

लेख आवडला, गँग्ज ऑफ वासेपूर अन बदलापूर चित्रपट पाहिले नसल्याने संदर्भ फारसे कळले नाहीत. बादवे कर्णधार अजिंक्य रहाणेचे नाव लेखात नसल्याने आश्चर्य वाटले.

साहना 21/01/2021 - 12:03
क्रिकेटचे ज्ञान नाही पण उत्कृष्ट लेख आहे. IPL ने भारतीय क्रिकेट आणि सर्वच क्रीडाक्षेत्राचे चित्र पालटले आहे. पूर्वी गांगुली किंवा द्रविड सारखी पोरे सरळ बेंगलोर कोलकातातील सध्या खेळपट्टीवरून सरळ इंग्लंड च्या लॉर्ड्स वर इंग्लंड च्या भेदक गोलंदाजीचा सामना करायची. पैसा वगैरे ह्यांनी पहिला सुद्धा नव्हता मग विनोद कांबळी सारखे अत्यंत गुणवान खेळाडू भरकटयाचे. पण शार्दूल असो वा वॉशिंग्टन सुंदर, पैसा आणि प्रसिद्धीची सवय आहे तसेच जागतिक दर्जाची गोलंदाजी सुद्धा खेळण्याची क्षमता IPL द्वारे निर्माण झाली आहे. अनेक क्रीडापटू जखमी आहेत हे ऐकून अत्यंत आश्चर्य वाटले. फिटनेस खरेतर वाढायला पाहिजे होते. ह्याशिवाय राहुल द्रविड ह्यांना ह्या विजयाचे बरेच श्रेय जाते युवा क्रिकेटपटूंना ह्यांनी मार्गदर्शन बऱ्यापैकी केले आहे. येत्या २० वर्षांत भारत देश क्रिकेट मधील अद्वितीय असा बलाढ्य देश असणार आहे. दुःख फक्त एका गोष्टीचे वाटते कि ICC ने क्रिकेट खेळाला इतर देशांत लोकप्रियता मिळवण्याच्या दृष्टीने काहीही विशेष काम केले नाही. अफगाणिस्तान, अमेरिका, कॅनडा इत्यादी देशांत क्रिकेटचे वेड भारी आहे तिथे खरे तर त्यांनी पैसे ओतून क्रिकेट ची लोकप्रियता वाढवायला पाहिजे होती. BCCI ची व्यावसायिकता सुद्धा थोडी मागे पडत आहे असे वाटते. सामान्याशिवाय आणि IPL शिवाय मर्चन्डाईस, action फिगर्स, थीम पार्क्स, कॉर्पोरेट इव्हेंट्स, व्हिडीओ गेम्स, अप्प्स, इत्यादी क्षेत्रांचे व्यावसायिकरण अजून केले गेले नाही. टीप : जगमोहन दालमियांनी ह्या व्यवसायीकरणाचा पाया रचला, शरद पवार ह्यांनी त्याला खूप हातभार लावला आणि श्रीनिवासन ह्यांनी त्यावर कदाचित कळस चढवला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

राघव 21/01/2021 - 12:24
लेख आवडला. वेगळा दृष्टीकोन छान मांडलात! तसेच संझगिरींचा लेखही सुंदर. धन्यवाद! जिंकलेली पूर्ण मॅच बॉल-टू-बॉल बघूनसुद्धा आढावा घेणारे लेख खूप आनंद देतात. त्यात जेपींसारखे दर्जेदार लिहिणारे असतील तर क्या कहने! जाता जाता: अजिंक्य रहाणेचे खास कौतुक करणे अगत्याचे आहे हे मात्र अगदी खरे.

अजून एक जाणवलेली गोष्ट म्हणजे, अंडर 19 Cricket World Cup... विशेषतः, ह्या Under 19, मधले बरेच खेळाडू, आता IPL मध्ये येतात. गिल, पृथ्वी शाॅ, पंत, वाॅशींग्टन सुंदर, हे पण Under 19, मध्ये खेळले होते .

लेखन आवडलं. लेखनातील भावना अतिशय उत्तम. आपण नेहमीचं हटके लेखन केलं आहे. धंस. खेळाडू कोण आहेत, कोण गोलंदाजी करतो. हा कोण आहे ? अशी ओळख परेड करायला लावणारा सध्याच्या भारतीय संघ. ३६ धावात गुंडाळले गेल्यावर, ही जखम अजून किती वर्ष भळभळत राहणार असे वाटत होते. आणि चमत्कार झाला... सर्व नवोदित खेळाडू. तरी या संघाने एकदिवशीय, ट्वेंटी ट्वेंटीचा आनन्द आनंद, या कसोटी सामन्यांनी दिला. एकेक चेंडू , एकेक धाव, एकेक फलंदाज आणि हृदयाची धड़धड वाढवणारे सामने कायम मेंदूत रेकॉर्ड झाले. देहभान हरपून जाणे म्हणतात तो आनंद या काही दिवासातल्या क्रिकेटने दिला. -दिलीप बिरुटे

खेडूत 21/01/2021 - 15:07
आवडला. जिगरबाज भारतीय संघाचे अभिनंदन! या निमित्ताने ज्येष्ठ खेळाडूंना योग्य संदेश गेला असेल हा आणखी एक फायदा.

फारएन्ड 21/01/2021 - 21:40
अतिशय सुंदर आढावा! गेल्या काही दशकातील क्रिकेटचा प्रवास व भारतातील आर्थिक्/सामाजिक बदलाचे त्यात पडलेले प्रतिबिंब बरोब्बर जमले आहे. सचिनने या सामन्याचे वर्णन "Every session produced a new hero!" असे चपखल केले. या सिरीज मधे इतक्या विविध लोकांनी कामगिरी केली आहे! त्यांची गावे वरती लेखात वाचली त्यावरून नकाशावर प्रत्येकाच्या गावावर एक पिन ठेवली तर भारतभर पिना दिसतील. पहिल्याच मॅच मधे खेळणारा वॉशिंग्टन सुंदर दुसरीकडून शार्दूल ठाकूर आउट झाल्यावर उरलेल्या "शेपटा" ला सांभाळत, स्ट्राइक स्वतःकडे ठेवत सिनीयर बॅट्समन सारखा खेळताना पाहिला तेव्हाच हे पाणी वेगळे आहे लक्षात आले. पहिल्या डावात लायन ला व दुसर्‍या डावात कमिन्सला त्याने मारलेल्या सिक्सेस अफलातून होत्या. टोटल रिस्पेक्ट!

आदरणीय प्रा डॉ साहेबांनी म्हटल्याप्रमाणे ३६ आकड्याची जखम २००७ एकदिवसीय वर्ल्ड कप मधल्या बांगला देशाकडून झालेल्या पराभवासारखी कायम भळभळत राहणार यात शंका नव्हती. पण २००७ मध्ये त्यानंतर काही दिवसातच एका नव्या कर्णधाराने नव्या जोषाच्या तरुण रक्ताच्या खेळाडूंना घेऊन टी २० वर्ल्ड कप जिंकून दिला. त्याही आधी २००१ मध्ये, मॅच फिक्सिंग च्या वादळानंतर, मुंबईत पहिला सामना तीन दिवसांत गमावल्या नंतर नव्या जुन्या (त्यातला एक होता नुकताच मिसरूड फुटलेला एक सरदार) खेळाडूंना लढायला लावून स्टीव्ह वॉ ची फ्रंटीयर रोखली होती. आणि नंतर जिंकली होती. २००२ मध्ये NatWest अंतिम सामन्यात लॉर्ड्स वर गांगुलीने अंगातला शर्ट काढून फडकवला होता तेव्हा त्याच्या ओठांच्या हालचाली पाहा.. तो सामना जिंकून देणारे युवराज - कैफ किती वर्षांचे होते. परत तेच झालं. ३६ ही राख होती तर शेवटचा विजय म्हणजे भारतीय फिनिक्सचं उड्डाण होतं. १९९६ शारजा, २००१ कोलकाता, २००२ लॉर्ड्स यांच्यासारखा हा सामना आयुष्यभर लक्षात राहील.

In reply to by तुषार काळभोर

१९९६ शारजा की १९९८ शारजा? - ऑस्ट्रेलियाविरुद्ध सचिनची पाठोपाठ दोन शतके व मालिका जिंकणे प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमीसाठी अविस्मरणीय आहे. बादवे १९९६च्या शारजा दौर्‍यातही प्रथमच भारतीय संघाने एक दिवसीय सामन्यात ३०० धावांचा टप्पा पार केला होता.

श्रीगुरुजी 22/01/2021 - 09:44
२००७ ची जखम भळभळत राहणार कारण तुलनेने अतिसामान्य संघाकडून पराभव झाला होता व त्या पराभवामुळे पुढील फेरीचे दार बंद होऊन घरी परतावे लागले होते. त्या तुलनेत ३६ धावांच्या जखमेचे दु:ख अल्पकालीन आहे कारण हा नीचांक परदेशात व तगड्या गोलंदाजांसमोर झाला होता आणि त्यामुळे मालिका हरली नव्हती किंवा मालिका जिंकण्याची/अनिर्णित ठेवण्याची संधी संपली नव्हती.

मित्रहो 22/01/2021 - 13:10
या विजयानंतर मी इतका खूष आहे की यावर काहीही लिहिले तरी आवडते हा तर नितांत सुंदर लेख आहे त्यामुळे प्रचंड आवडला आहे. दिल खूष केला तुम्ही. गाबावर शेवटल्या दिवशी ३२८ धावा काढून मॅच जिंकायचा प्रयत्न करायचा नसतो तर विकेट वाचवून सामना अनिर्णीत राखता आला तरी खूप झाले. तेवढे करुनही बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सु्द्धा मिळेल. जिंकण्याच्या प्रयत्नात हार नको. से जर कुणी या नवीन खेळाडूंना सांगितले तर ते म्हणतील हॅ हम नही मानते, ३०० धावा तर काढायच्या आहे आणि पूर्ण दिवस आहे. सिडनीत जर शुभमन, अजिंक्य किंवा ऋषभ पंत यापैकी एकाला जरी एक तास अधिक मिळाला असता तर कदाचित तो सामना सुद्धा भारताने जिंकला असता. डोंबिविलीच्या अजिंक्य रहाणेचे योगदान पण खूप मोठे आहे, त्याचे शतक खऱ्या अर्थाने मालिकेचा निकाल बदलणारे आहे. गावस्करने एका मुलाखतीत मांडलेला विचार महत्वाचा आहे IPL मुळे ही मंडळी मोठमोठ्या खेळाडूंसोबत सतत खेळतात त्यामुळे मोठ्या आंतरराष्टीय खेळाडूंची ती भिती तितकी आता तितकी राहिली नाही. IPL मधे किंवा नेटमधे त्याला खेळलेले असतात. फार काही मोठे आहे असे त्यांना वाटत नाही. गांगुलीची बेधडक प्रवृत्ती ही अशी सहजासहजी अंगात येत नाही आणि आली तर जात नाही. आता काही दिवसापूर्वी कुण्या खेळाडूने गांगुलीने दिलेल्या सल्लयाचे आभार मानले. एका पत्रकाराने कुचकट प्रश्न विचारला. तेंव्हा अजिबात बचावात्मक पवित्रा न घेता गांगुलीने सांगितले मी अध्यक्ष वगैरे नंतर आहे, मी खेळाडू आधी आहे इतके इतके सामने खेळलो आहे तेंव्हा कुणीही खेळाडू मला सल्ला विचारु शकतो आणि तो मी देणार.

चौकटराजा 22/01/2021 - 17:51
या सर्व आक्रमणासाठी चेतेश्वर पुजारा सारखा एक तरी एक बाजू लढवणारा संघात असावा लागतो . व्ही व्ही एस , द्रवीड, बिल लॉरी, स्टीव्ह वॉ , शिवनारायण चन्दरपॉल , मुदस्सर नझर ,जेफ बॉयकॉट या तार्‍यानी ते काम वेळोवेळी केले म्हणून त्यान्चे सन्घ जिन्कले ! चौथ्या डावात २७५ पेक्षा जास्त धावा करणे सामान्यतः कोणत्याही सन्घाला अवघड असते खास करून खेळपट्टी फिरकीला व त्यातही खास करून लेग स्पिनर् ला अनुकूल असेल तर ! ४०० पेक्शा जास्त धावा करून सामना चौथ्या डावात जिंकण्याचा पराक्रम भारतीय सन्घाने केला आहे पण अशावेळी एखादी मोठी खेळी त्यात असतेच . ४०४ च्या " त्या" डावात गावस्कर व विश्वनाथ दोघान्चीही शतके तर मोहिन्दर अमरनाथ च्या ४४० मिनिटातील ८६ धावा सामील होत्या. आताच्या यावेळचे खास विशेष असे की सर्वानी विजयास हातभार लावला. सबब कपिल देवने याचे वर्णन व्ही व्ही एस च्या २८१ वाल्या डावाशी न करता १९८३ च्या वर्ल्ड कप फायनलशी केले आहे. खरे तर हा ३२९ चा विजय " त्या' पेक्शाही महान आहे असे कपिल म्हणतो ते उगाच नाही !!
लेखनविषय:
"एस पी साहेब, एक विधायक को सरेआम थानेमें थप्पड मारनेके लिये कितना दिन जेल में जाना पडता है?" काल गॅबावर ४५ ओव्हर्समध्ये १ बाद १०७ अशी परिस्थिती असताना ६ फूट ५ इंच उंचीच्या मिचेल स्टार्कला ३ चेंडूंत १४ धावा चोपतानाचा शुभमन गिलचा उर्मटपणा "गँग्स ऑफ वासेपुर" च्या सरदार खानपेक्षा काही कमी नव्हता.

क्रिकेटची आवाजकी दुनिया

जे.पी.मॉर्गन ·

माझे आवडते समालोचक न्यूझीलंड चा इयन स्मिथ (2019 वर्ल्ड कप फायनल चे समालोचन कोण विसरेल). ऑस्ट्रेलिया चे बिल लौरी (1999 वर्ल्ड कप सेमी फायनल) आणि मायकल स्लेटर.. हे दोघेही सध्या फॉक्स स्पोर्ट्स कडे नसल्याने आता ऑस्ट्रेलिया तील सामने पाहण्यात मजा येत नाही. वेस्ट इंडिज चा इयान बिशप (remember the name!) इंग्लंड चा नासिर हुसेन आणि डेव्हिड लॉइड. दक्षिण आफ्रिकेचे पोमी बांगवा आणि माईक हेसमन. आणि भारताचा फक्त सुनील गावस्कर. आणि ज्याचा आवाज ऐकला की टीव्ही चा आवाज mute करावा लागतो ते म्हणजे संजय मांजरेकर,वसीम अक्रम,शॉन पोलॉक, इन चॅपल,टोनी कोझियर.

महासंग्राम 14/12/2020 - 13:16
फारच सुरेख लेख..सध्या आकाश चोप्राचं समालोचन पाहून त्याला कॉमेंट्री बॉक्स मधून बाहेर काढून बदडाव वाटतं. बादवे तेवढी क्रिती बरोबरची डेट रद्द झाल्यास आमची शिफारस करावी ही नम्र विनंती आपला हर्षा भोगले आणि क्रिती चा पंखा महासंग्राम

क्या बात है. लेखन वाचून मजा आली. काही कमेट्रटर्स डोळ्यासमोर आले. आपण म्हणता तसे, रवी चतुर्वेदी, सुशील दोशी, आकाशलाल नेहमीच आवडले. टोनी ग्रेग, सनी, उच्चच. बाकी, अनुक्रमे तसेच. इंग्रजी कमेट्री लागली की अनेकदा आवाज कमी किंवा बंदही केल्याचे आठवते. पण हिंदी मंडळीं जब्रा. मराठीतले बाळ पंडित क्रिकेट समालोचनातही मजा आणायचे, उजव्या यष्टीकडून डावीकडे, मध्यम तीव्र गतीची गोलंदाजी, हळुवार मारा, चेंडुने सीमापार जाणे, चार धावा, उंचावून मारलेला फ़टका, उत्तम क्षेत्रररक्षण वगैरे.... आकाशवाणीच्या मुंबै केंद्रावरुन क्रिकेट सामन्याचं धावतं वर्णनांनी मजा आणली आहे. -दिलीप बिरुटे

साधारण ९० च्या दशकात परदेश दौर्यावर हिंदी कॉमेंटेटर्स नसत असत.तेव्हा मनिंदरसिंग व अजुन अश्याच कुणा निवृत्त क्रिकेटरला दूरदर्शन्च्या स्टूडिओ मधुन बसुन कॉमेंटरी करायला लावत असत.जेवढे दर्शकाला दिसते तेवढेच त्यांनाही दिसत असे त्यामुळे बर्याच वेळेला बॅट्समनने जोरात शॉट मारला आणि तो सीमारेषेपार जाणार असे दर्शकांना जसे वाटत असे तसेच त्यांनाही वाटत असे आणि त्यामुळे समालोचन काहीसे "बल्ला जोर से घुमाया और ये चार रन..लेकिन बाऊंड्रीपे फिल्डर ने रोक दिया" अश्या प्रकारचे होत असे.मध्ये मध्ये काहीवेळेस टी.वी दर्शकांना उल्लु बनवण्यासाठी कॉमेंटरी बॉक्सही दाखवत असत पण स्टुडिओतल्या लाईटचे टेक्श्चर लगेच कळत असे.काही दिवसांनंतर जेव्हा ही क्लृप्ती कळली त्यानंतर टीवी चा आवाज बंद करुन मॅच बघत असू.

अमीबा 15/12/2020 - 01:51
सुंदर लेख! खूप आवडला. तसा हा लेख क्रिकेटची 'आवाजकी' दुनियाचा आहे, पण ह्याविषयीची आणखी एक गोष्ट बोलल्याशिवाय राहवत नाही. माझ्या लहानपणी आधीच्या दिवशी मॅच पाहिली/ऐकली असली तरी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात मॅचचा सगळा वृत्तांत वाचायला मला जाम मजा यायची. पत्रकारांची नावं आठवत नाहीत, पण त्या बातम्यांची शीर्षके आणि कन्टेन्ट मला आवडायचे. आताशा वर्तमानपत्रांतून येणारा मॅचेसचा आढावा तितकासा रंजक वाटत नाही. धावचीत, यष्टिचीत, झेलबाद, यष्टीरक्षक असे शब्द, किंवा अगदी फलंदाज आणि गोलंदाज हे शब्दसुद्धा क्वचित वाचायला मिळतात. कदाचित या आणि अशा इतर मराठी शब्दांमुळेच मला ते मॅचेसचे वृत्तांत आपलेसे वाटायचे, आवडायचे, आणि त्या वयाच्या समजेप्रमाणे समजायचे. आता जास्त मॅचेस लाईव्ह पाहायला मिळत असल्यामुळे म्हणा किंवा आधीसारखे वृत्तांत येत नसल्यामुळे म्हणा, फारसा इंटरेस्ट येत नाही मॅचबद्दलच्या मराठी बातम्या वाचायला.

चौकटराजा 15/12/2020 - 09:54
दिस इज बाँबे व टू एटी एट पॉईंट फाइव्ह मीटर्स अँड थर्टी वन पॉईंट झिरो वन मीटर्स ....वी नाव टेक यू तो ब्रेबर्न स्टेडियम फॉर द रनींग कॉमेंट्री .... अवर कॉमेंटेटर्स आर अनंत सेटलवाड , राजू भारतन अँड केकी तारापोर ... अँड एक्स्पर्ट कॉमेंटस बाय विजय मर्चंट ... ओव्हर टू ब्रेबर्न स्टेडियम ... गुड मॉर्निंग लिस्नर्स ... हिअर इज विजय मर्चंट रिपोर्टींग फ्रॉम ब्राबन स्टेडियम विथ ब्राईट सनी मॉर्निंग . एअरलीर वेस्ट इंडीज स्कीपर वन द टॉस अँड इलेक्टड टू बॅट .. कीपिंग इन माईड इंडिया हैव चंद्रशेखर अँड वेंकट राघवन .. अँड कुड बी डिझास्ट्रस ऑन लास्ट डे ....

प्रचेतस 15/12/2020 - 10:18
हल्लीचे मायकल क्लार्क, मायकेल स्लेटर, केविन पीटरसन पण उत्कृष्ट कॉमेन्ट्री करतात. मुरली कार्तिक, संजय मांजरेकर, लक्ष्मण शिवरामकृष्णन मात्र टुकार.

माझे आवडते समालोचक न्यूझीलंड चा इयन स्मिथ (2019 वर्ल्ड कप फायनल चे समालोचन कोण विसरेल). ऑस्ट्रेलिया चे बिल लौरी (1999 वर्ल्ड कप सेमी फायनल) आणि मायकल स्लेटर.. हे दोघेही सध्या फॉक्स स्पोर्ट्स कडे नसल्याने आता ऑस्ट्रेलिया तील सामने पाहण्यात मजा येत नाही. वेस्ट इंडिज चा इयान बिशप (remember the name!) इंग्लंड चा नासिर हुसेन आणि डेव्हिड लॉइड. दक्षिण आफ्रिकेचे पोमी बांगवा आणि माईक हेसमन. आणि भारताचा फक्त सुनील गावस्कर. आणि ज्याचा आवाज ऐकला की टीव्ही चा आवाज mute करावा लागतो ते म्हणजे संजय मांजरेकर,वसीम अक्रम,शॉन पोलॉक, इन चॅपल,टोनी कोझियर.

महासंग्राम 14/12/2020 - 13:16
फारच सुरेख लेख..सध्या आकाश चोप्राचं समालोचन पाहून त्याला कॉमेंट्री बॉक्स मधून बाहेर काढून बदडाव वाटतं. बादवे तेवढी क्रिती बरोबरची डेट रद्द झाल्यास आमची शिफारस करावी ही नम्र विनंती आपला हर्षा भोगले आणि क्रिती चा पंखा महासंग्राम

क्या बात है. लेखन वाचून मजा आली. काही कमेट्रटर्स डोळ्यासमोर आले. आपण म्हणता तसे, रवी चतुर्वेदी, सुशील दोशी, आकाशलाल नेहमीच आवडले. टोनी ग्रेग, सनी, उच्चच. बाकी, अनुक्रमे तसेच. इंग्रजी कमेट्री लागली की अनेकदा आवाज कमी किंवा बंदही केल्याचे आठवते. पण हिंदी मंडळीं जब्रा. मराठीतले बाळ पंडित क्रिकेट समालोचनातही मजा आणायचे, उजव्या यष्टीकडून डावीकडे, मध्यम तीव्र गतीची गोलंदाजी, हळुवार मारा, चेंडुने सीमापार जाणे, चार धावा, उंचावून मारलेला फ़टका, उत्तम क्षेत्रररक्षण वगैरे.... आकाशवाणीच्या मुंबै केंद्रावरुन क्रिकेट सामन्याचं धावतं वर्णनांनी मजा आणली आहे. -दिलीप बिरुटे

साधारण ९० च्या दशकात परदेश दौर्यावर हिंदी कॉमेंटेटर्स नसत असत.तेव्हा मनिंदरसिंग व अजुन अश्याच कुणा निवृत्त क्रिकेटरला दूरदर्शन्च्या स्टूडिओ मधुन बसुन कॉमेंटरी करायला लावत असत.जेवढे दर्शकाला दिसते तेवढेच त्यांनाही दिसत असे त्यामुळे बर्याच वेळेला बॅट्समनने जोरात शॉट मारला आणि तो सीमारेषेपार जाणार असे दर्शकांना जसे वाटत असे तसेच त्यांनाही वाटत असे आणि त्यामुळे समालोचन काहीसे "बल्ला जोर से घुमाया और ये चार रन..लेकिन बाऊंड्रीपे फिल्डर ने रोक दिया" अश्या प्रकारचे होत असे.मध्ये मध्ये काहीवेळेस टी.वी दर्शकांना उल्लु बनवण्यासाठी कॉमेंटरी बॉक्सही दाखवत असत पण स्टुडिओतल्या लाईटचे टेक्श्चर लगेच कळत असे.काही दिवसांनंतर जेव्हा ही क्लृप्ती कळली त्यानंतर टीवी चा आवाज बंद करुन मॅच बघत असू.

अमीबा 15/12/2020 - 01:51
सुंदर लेख! खूप आवडला. तसा हा लेख क्रिकेटची 'आवाजकी' दुनियाचा आहे, पण ह्याविषयीची आणखी एक गोष्ट बोलल्याशिवाय राहवत नाही. माझ्या लहानपणी आधीच्या दिवशी मॅच पाहिली/ऐकली असली तरी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात मॅचचा सगळा वृत्तांत वाचायला मला जाम मजा यायची. पत्रकारांची नावं आठवत नाहीत, पण त्या बातम्यांची शीर्षके आणि कन्टेन्ट मला आवडायचे. आताशा वर्तमानपत्रांतून येणारा मॅचेसचा आढावा तितकासा रंजक वाटत नाही. धावचीत, यष्टिचीत, झेलबाद, यष्टीरक्षक असे शब्द, किंवा अगदी फलंदाज आणि गोलंदाज हे शब्दसुद्धा क्वचित वाचायला मिळतात. कदाचित या आणि अशा इतर मराठी शब्दांमुळेच मला ते मॅचेसचे वृत्तांत आपलेसे वाटायचे, आवडायचे, आणि त्या वयाच्या समजेप्रमाणे समजायचे. आता जास्त मॅचेस लाईव्ह पाहायला मिळत असल्यामुळे म्हणा किंवा आधीसारखे वृत्तांत येत नसल्यामुळे म्हणा, फारसा इंटरेस्ट येत नाही मॅचबद्दलच्या मराठी बातम्या वाचायला.

चौकटराजा 15/12/2020 - 09:54
दिस इज बाँबे व टू एटी एट पॉईंट फाइव्ह मीटर्स अँड थर्टी वन पॉईंट झिरो वन मीटर्स ....वी नाव टेक यू तो ब्रेबर्न स्टेडियम फॉर द रनींग कॉमेंट्री .... अवर कॉमेंटेटर्स आर अनंत सेटलवाड , राजू भारतन अँड केकी तारापोर ... अँड एक्स्पर्ट कॉमेंटस बाय विजय मर्चंट ... ओव्हर टू ब्रेबर्न स्टेडियम ... गुड मॉर्निंग लिस्नर्स ... हिअर इज विजय मर्चंट रिपोर्टींग फ्रॉम ब्राबन स्टेडियम विथ ब्राईट सनी मॉर्निंग . एअरलीर वेस्ट इंडीज स्कीपर वन द टॉस अँड इलेक्टड टू बॅट .. कीपिंग इन माईड इंडिया हैव चंद्रशेखर अँड वेंकट राघवन .. अँड कुड बी डिझास्ट्रस ऑन लास्ट डे ....

प्रचेतस 15/12/2020 - 10:18
हल्लीचे मायकल क्लार्क, मायकेल स्लेटर, केविन पीटरसन पण उत्कृष्ट कॉमेन्ट्री करतात. मुरली कार्तिक, संजय मांजरेकर, लक्ष्मण शिवरामकृष्णन मात्र टुकार.
लेखनविषय:
इयम आकाशवाणी| संप्रतिवार्ता श्रुयन्ताम| प्रवाचक: बलदेवानन्द सागरः "उठा बाळा... साडेसहा वाजून घेले बघ!" एsssss आघाडा दुर्वा फुलैsssय्यो.... सकाळची ६ वाजून १६ मिनिटं झालेली आहेत... आता ऐकूया "उत्तम शेती" ह्या सदरात उसावर पडणार्‍या तांबेरा रोगाच्या उपायांची माहिती... "कार्ट्या उठ नाहीतर शाळेला उशीर होईल" "पाचच मिनिटं गं आई" ह्यानंतर... र. ना.

सात वेळा मेलेला माणूस "The Dead Man"

rushikapse165 ·

ते WWF मधे जे काही दाखवतात ते खरं असतं? मला तर ते व्यवस्थीत बसवलेल्या नाटकासारखं वाटायचं. नंतर या खेळाला काही नियम आहेत की नाही हेच कळायचं नाही. नंतर लक्षात आलं की त्यात दाखवलेले प्रेक्षक सुद्धा मंदबुद्धी असतात. त्या नंतर ते पहाणं सोडुन दिलं! डिस्ने ची कार्टुन बघुन त्यापेक्षा जास्त चांगली आणि उत्त म करमणुक होते.

In reply to by सामान्यनागरिक

rushikapse165 28/11/2020 - 12:46
आधी ते खरं वाटायचं,पण मग नंतर कळायला लागलं तसं फक्त मनोरंजन म्हणून त्याकडे बघायचो.एकंदरीतच कार्टून मीही बघतो.पण शेवटी लहान असताना या अंडरटेकरने मनावर अधिराज्य गाजवलं होतं,असा तर विस्मृतीत नाही जाणार तो.म्हणून हे.शेवटी WWE १००%खरं नाही,हे तर जगजाहीरच.

In reply to by सामान्यनागरिक

साहना 29/11/2020 - 11:12
१००% सर्व काही नकली असते. अर्थांत लोक आधीपासून शक्तिशाली असल्याने थोडाफार असली मार ते खाऊ शकतात. जॉन स्टोइस्स्ल हे माझे अमेरिकेतील सर्वांत प्रिय पत्रकार. जॉन आपल्या आधीच्या कारकीर्दींत ग्राहक विषयांचे पत्रकार होते. WWF हे संपूर्ण पाने खोटे असले तरी ते सार्वजनिक रित्या ते मेनी करत नसत त्यामुळॆ अनेक मुलांची फावणूक होत होती. एका पैलवानाला स्टोसेल ह्यांनी प्रश्न विचारला आणि त्या पैलवानाच्या सरळ स्टसेल ह्यांचा कानशिलात लगावली. हा एपिसोड पहा : https://www.youtube.com/watch?v=g3kip8_3z-A ह्या व्यतिरिक्त मी आजपर्यंत कधीही टीव्ही वर WWE पहिली नसली तरी प्रत्यक्षांत एकदा पहिली आहे. सर्व काही विनोदी आणि मूर्खपणाचे आहे. पुरुष मंडळीचा नेहमीच मूर्खपणा आहे !

In reply to by साहना

rushikapse165 29/11/2020 - 21:11
पुरुष मंडळीचा मुर्खपणा असं नाही,ती प्रत्येकाची आवड असते.एव्हाना मलाही महिलांच मालिका बघणं नाही आवडत.मग मी त्याला काय म्हणू? पण असो मी त्या लिंकवर गेलो होतो.हे खोटं आहे,हा अगदीच १००% नाही,कारण शेवटी तेही पैलवानच आहेत.आणि ते कानशिलात लगावणे म्हणजे शेवटी आरोपाचा अस्विकार करणेच होय.पण WWE बघणे हा काही पुरुषांचा मुर्खपणा नाही.@साहना

हिटमॅन हार्ट चे 'माय रिअल लाईफ इन कार्टून वर्ल्ड ऑफ रेसलिंग' हे ५०० पानांचे पुस्तक आहे. खुप भारी आहे. त्याच्यात सगळं काही लिहिलं आहे त्याने इंजुरीज, रिजल्ट्स, ट्रॅवल, टायटल्स, कॅरेक्टर्स बद्दल. विन्स मॅकमोहन ची आयडिया होती अंडरटेकरची.

टवाळ कार्टा 28/11/2020 - 18:23
ते व्व्फ वाले पत्ते खुप खेळलोय....अगदी शाळेत वर्ग सुरु असतानाही....तेव्हा ५० पैशाला एक असे पोस्टर मिळायचे, शाळेत त्याचा व्यापार चालायचा =)) बाकी "कधी कधी तर कोणाचे अंगवस्त्र अोले व्हायचे" हे चुकीचे लिहिले आहे....त्याचा अर्थ भलताच आहे =))

rushikapse165 28/11/2020 - 19:22
ते अंगवस्त्र अोले होणे म्हणजे केवळ उपमा आहे.तसं ती पत्ती त्यावेळी इथे मिळायची नाहीत.मग पुणे-मुंबईहून आलेल्या नातेवाईकांची मुलं ती घेऊन यायची मग खेळायचो,त्यामुळे विकत घेण्याची वेळच नाही आली.बाकी पोस्टर तर आजपण तसेच आहेत भिंतींवरती.असो त्यावेळी हे सगळं खरं आहे हे वाटायचंच.

आमच्याकडे ९५ मध्ये टिव्ही होता पण केबल नव्हती. ९६ मधे केबल आल्यावर पण काही दिवस स्टार स्पोर्ट्स नव्हतं. ज्या वर्गमित्रंकडे होतं, त्यांच्याकडून रसभरीत वर्णने ऐकून मनात एक कल्पना चित्र तयार झाले होते. कार्डमध्ये दिसणारे चेहरे आणि कुस्त्यांची ऐकलेली मसालेदार वर्णने ऐकून मनातल्या मनात ते पाहिलं जायचं. मग पुढे कधी स्टार sports दिसायला लागल्यावर WWE पाहिलं. ऐकून जेवढं विस्मयकारक वाटलं, तेवढं नसलं तरी मनोरंजक ठासून होतं. त्याविषयी चर्चा व्हायच्या. वाद व्हायचे. त्यावेळी हल्क हॉगन, Hitman, अंडर टेकर, योको झोना, बिग शो हे स्टार होते. पुढं सहस्रक उलटताना शालेय जीवन संपलं आणि मग WWE चं कौतुक कमी झालं. पण कधीतरी HHH, रे मिस्टरियो, द रॉक यांच्या मॅची बघितल्या. आता काही वाटत नाही. वरिजनल असतं तरी वाटलं नसतं. scripted आहे म्हणून आवडत नाही, असंही काही नाही.

In reply to by तुषार काळभोर

rushikapse165 28/11/2020 - 21:17
होय,आम्ही तर कधीकधी डंबेल्स उचलायचा प्रयत्न करायचो.कार्ड्सवरुन मग त्यांची रॅंकिंग बघून खेळायचं,मज्जा यायची.पण मग नंतर त्यातून निरस व्हायला लागला.पुन्हा बघायला लागलो त्याच कारण म्हणजे रोमन रेन्स आणि काही अंशी जाॅन सीना.त्यावेळी तर अगदीच ब्लॅक&व्हाईटवर पण पाहिलंय.पण आता मात्र वसतीगृहात आलो तर पुन्हा WWE कडे आकर्षण कमी झालं.असो.

ते WWF मधे जे काही दाखवतात ते खरं असतं? मला तर ते व्यवस्थीत बसवलेल्या नाटकासारखं वाटायचं. नंतर या खेळाला काही नियम आहेत की नाही हेच कळायचं नाही. नंतर लक्षात आलं की त्यात दाखवलेले प्रेक्षक सुद्धा मंदबुद्धी असतात. त्या नंतर ते पहाणं सोडुन दिलं! डिस्ने ची कार्टुन बघुन त्यापेक्षा जास्त चांगली आणि उत्त म करमणुक होते.

In reply to by सामान्यनागरिक

rushikapse165 28/11/2020 - 12:46
आधी ते खरं वाटायचं,पण मग नंतर कळायला लागलं तसं फक्त मनोरंजन म्हणून त्याकडे बघायचो.एकंदरीतच कार्टून मीही बघतो.पण शेवटी लहान असताना या अंडरटेकरने मनावर अधिराज्य गाजवलं होतं,असा तर विस्मृतीत नाही जाणार तो.म्हणून हे.शेवटी WWE १००%खरं नाही,हे तर जगजाहीरच.

In reply to by सामान्यनागरिक

साहना 29/11/2020 - 11:12
१००% सर्व काही नकली असते. अर्थांत लोक आधीपासून शक्तिशाली असल्याने थोडाफार असली मार ते खाऊ शकतात. जॉन स्टोइस्स्ल हे माझे अमेरिकेतील सर्वांत प्रिय पत्रकार. जॉन आपल्या आधीच्या कारकीर्दींत ग्राहक विषयांचे पत्रकार होते. WWF हे संपूर्ण पाने खोटे असले तरी ते सार्वजनिक रित्या ते मेनी करत नसत त्यामुळॆ अनेक मुलांची फावणूक होत होती. एका पैलवानाला स्टोसेल ह्यांनी प्रश्न विचारला आणि त्या पैलवानाच्या सरळ स्टसेल ह्यांचा कानशिलात लगावली. हा एपिसोड पहा : https://www.youtube.com/watch?v=g3kip8_3z-A ह्या व्यतिरिक्त मी आजपर्यंत कधीही टीव्ही वर WWE पहिली नसली तरी प्रत्यक्षांत एकदा पहिली आहे. सर्व काही विनोदी आणि मूर्खपणाचे आहे. पुरुष मंडळीचा नेहमीच मूर्खपणा आहे !

In reply to by साहना

rushikapse165 29/11/2020 - 21:11
पुरुष मंडळीचा मुर्खपणा असं नाही,ती प्रत्येकाची आवड असते.एव्हाना मलाही महिलांच मालिका बघणं नाही आवडत.मग मी त्याला काय म्हणू? पण असो मी त्या लिंकवर गेलो होतो.हे खोटं आहे,हा अगदीच १००% नाही,कारण शेवटी तेही पैलवानच आहेत.आणि ते कानशिलात लगावणे म्हणजे शेवटी आरोपाचा अस्विकार करणेच होय.पण WWE बघणे हा काही पुरुषांचा मुर्खपणा नाही.@साहना

हिटमॅन हार्ट चे 'माय रिअल लाईफ इन कार्टून वर्ल्ड ऑफ रेसलिंग' हे ५०० पानांचे पुस्तक आहे. खुप भारी आहे. त्याच्यात सगळं काही लिहिलं आहे त्याने इंजुरीज, रिजल्ट्स, ट्रॅवल, टायटल्स, कॅरेक्टर्स बद्दल. विन्स मॅकमोहन ची आयडिया होती अंडरटेकरची.

टवाळ कार्टा 28/11/2020 - 18:23
ते व्व्फ वाले पत्ते खुप खेळलोय....अगदी शाळेत वर्ग सुरु असतानाही....तेव्हा ५० पैशाला एक असे पोस्टर मिळायचे, शाळेत त्याचा व्यापार चालायचा =)) बाकी "कधी कधी तर कोणाचे अंगवस्त्र अोले व्हायचे" हे चुकीचे लिहिले आहे....त्याचा अर्थ भलताच आहे =))

rushikapse165 28/11/2020 - 19:22
ते अंगवस्त्र अोले होणे म्हणजे केवळ उपमा आहे.तसं ती पत्ती त्यावेळी इथे मिळायची नाहीत.मग पुणे-मुंबईहून आलेल्या नातेवाईकांची मुलं ती घेऊन यायची मग खेळायचो,त्यामुळे विकत घेण्याची वेळच नाही आली.बाकी पोस्टर तर आजपण तसेच आहेत भिंतींवरती.असो त्यावेळी हे सगळं खरं आहे हे वाटायचंच.

आमच्याकडे ९५ मध्ये टिव्ही होता पण केबल नव्हती. ९६ मधे केबल आल्यावर पण काही दिवस स्टार स्पोर्ट्स नव्हतं. ज्या वर्गमित्रंकडे होतं, त्यांच्याकडून रसभरीत वर्णने ऐकून मनात एक कल्पना चित्र तयार झाले होते. कार्डमध्ये दिसणारे चेहरे आणि कुस्त्यांची ऐकलेली मसालेदार वर्णने ऐकून मनातल्या मनात ते पाहिलं जायचं. मग पुढे कधी स्टार sports दिसायला लागल्यावर WWE पाहिलं. ऐकून जेवढं विस्मयकारक वाटलं, तेवढं नसलं तरी मनोरंजक ठासून होतं. त्याविषयी चर्चा व्हायच्या. वाद व्हायचे. त्यावेळी हल्क हॉगन, Hitman, अंडर टेकर, योको झोना, बिग शो हे स्टार होते. पुढं सहस्रक उलटताना शालेय जीवन संपलं आणि मग WWE चं कौतुक कमी झालं. पण कधीतरी HHH, रे मिस्टरियो, द रॉक यांच्या मॅची बघितल्या. आता काही वाटत नाही. वरिजनल असतं तरी वाटलं नसतं. scripted आहे म्हणून आवडत नाही, असंही काही नाही.

In reply to by तुषार काळभोर

rushikapse165 28/11/2020 - 21:17
होय,आम्ही तर कधीकधी डंबेल्स उचलायचा प्रयत्न करायचो.कार्ड्सवरुन मग त्यांची रॅंकिंग बघून खेळायचं,मज्जा यायची.पण मग नंतर त्यातून निरस व्हायला लागला.पुन्हा बघायला लागलो त्याच कारण म्हणजे रोमन रेन्स आणि काही अंशी जाॅन सीना.त्यावेळी तर अगदीच ब्लॅक&व्हाईटवर पण पाहिलंय.पण आता मात्र वसतीगृहात आलो तर पुन्हा WWE कडे आकर्षण कमी झालं.असो.
खेळ.खेळ म्हणजे खेळच.मग तो कुठलाही असो.आजकाल एक नवा ट्रेंड चाललाय,काय तर,90'Kids.तसा मी काही नव्वदच्या दशकातील नाही.आणि नसलो तरी मी काही दुर्देवीही नाही,कारण माझा जन्म तो २००० सालचा,त्यामुळे संगत होती ती नव्वदच्याच दशकाची. तो काळही तसाच होता.T.V.नावाचा प्रकार तितकासा सगळ्यांकडे नसायचा.त्यात त्यावेळच्या रामानंद सागरांच्या रामायण आणि श्रीकृष्ण या मालिकांनी अगदी दशक उलटल्यानंतरही आपलं वर्चस्व प्रेक्षकांच्या मनावर गाजवलं होतं,आणि त्यामुळे ज्याघरी T.V.त्याघरी संध्याकाळी गर्दी हे ठरलेलं.आणि दुसरं काय तर?क्रिकेट,त्यावेळी क्रिकेट म्हणलं की सचिन अाणि सचिन म्हणलं की क्रिकेट,एवढंच गणित.आणि आमच

एका खेळियाने - स्वयमेव मृगेंद्रता |

जे.पी.मॉर्गन ·

गणेशा 24/08/2020 - 17:59
पुन्हा एक अप्रतिम लेख.. महिंद्रसिंग धोनी अतिशय उत्क्रुष्ट कर्णधार होता.. मला त्याची सर्वात जास्त विकेटकिपरींग आवडायची.. एक ना अनेक किती स्टंपिंग डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या होत्या.. धोनी आणि दादा कायम कंप्यारीझन व्हायची, हे खेळात चालुच असते, पण प्रत्येक जन वेगळा असतो, आपल्याला दादा पण आवडायचा आणि महेंद्रसिंग धोनी सुद्धा. धोनी मला test cricket मध्ये पण आवडायचा.. पण खरी मज्जा त्याने आणली one day आणि t20 मध्ये.. तुमचे लेख खुप मस्त असतात...

राघव 24/08/2020 - 18:33
खरं सांगू का? खूप खूप आवडते खेळाडू आहेत क्रिकेट मधे. पण धोनी म्हणजे वीक पॉईंट आहे ब्वॉ. मॅच गेली असं सगळ्यांना वाटत असतांना हा माणूस तेवढ्याच शांतपणे लढा समोरच्या टीमच्या गोटात घेऊन जायचा. त्यात तो बर्‍याचदा यशस्वी व्हायचाच. आणि यदाकदाचित नाही ना झाला, तरी जिंकणार्‍या टीमला जिंकल्यासारखं वाटणारच नाही इतका दणका देऊन जायचा. त्या प्रयत्नांवरच आम्ही फिदा! ती विजिगिषु वृत्ती दादानं जागवली आणि धोनीनं रुजवली. दादावरून आठवलं, जसा कुंबळेचा किस्सा तुम्ही मांडलात तसंच - दादाच्या शेवटच्या टेस्ट मॅचच्या शेवटच्या सत्राची Captaincy धोनीनं दादाला करायला दिलेली. कृतज्ञता व्यक्त करण्याची ही पद्धत फार आवडून गेली. साध्या साध्या कृतींतून हा माणूस असा आवडत जातो. माईंड गेम्स मधेही हा महाबिलंदर माणूस आहे. कुणी एकदा त्याला कमी बॉल्स मधे जास्त रन्स काढायचे असतील तर काय स्ट्रॅटेजी वापरतोस असं विचारलं तर हा म्हणाला की - तसे अनेक मार्ग आहेत. उदा, जेव्हा असे शेवटचे ओव्हर असतात, तेव्हा त्या ओव्हरच्या पहिल्या वा दुसर्‍या बॉलला कडक चौकार/षटकार पडायला हवा. नुसता पडायला नको तर शॉट मारतांना त्या शॉटचा आवाज त्या बॉलरच्या कानांत वाजायला पाहिजे. [त्यामुळे बॉलरचे लक्ष विचलित होऊन त्याचे] पुढचे १-२ बॉल्स चुकण्याची शक्यता वाढते! मला स्टीव्ह वॉ चं एक वाक्य आठवतं. भावार्थ असा - We are a special team. Others will have to do something special to defeat us! हा जो स्वॅगर होता ना त्या वाक्यात, त्या स्वॅगर पर्यंत भारतीय टीमला नेऊन ठेवण्याचं काम धोनीनं केलंय. Alas, the most powerful number [7] has retired from the Game! Hats Off Captain!

सिरुसेरि 24/08/2020 - 20:36
लेख आवडला . कठीण प्रसंगी तळाच्या फलंदाजांना हाताशी धरुन शांतपणे एकेरी , दुहेरी धावा , फटकेबाजी यांचा ताळमेळ साधत संघाला जिंकुन देण्याची किमया माहिने अनेकदा केली आहे . " ये आडा मारेगा " असे गोलंदाजाला सांगणारा धोनी लक्षात आहे . क्रिकेटमधे सुरु झालेली डीआरएस पद्धत आणी धोनीचे अचुक सफाईदार निरिक्षण याचा संघाला अनेकदा फायदा झाला आहे . Thats the way , Mahi way .

आनन्दा 24/08/2020 - 21:59
धोनी हा धोनी होता.. आपल्यासाठी तो बेवन होता असे मी म्हणतो. तो आल्यामुळे भारताची वरची फळी चांगले काम करायला लागली, करण त्यांची जोखीम घेण्याची क्षमता वाढली.. 6व्या क्रमांकवरती धोनी आणि बऱ्याच वेळेस हार्दिक सारखा एखादा अर्धवेळ फलंदाज मॅच काढून द्यायला लागले, worst case मध्ये.. त्यामुळे मधल्या फळीचा खेळ सुधारला.. धोनी निवृत्त झाल्याची खूप हळहळ वाटली आहे, अगदी सचिन पेक्षा पण!!

द्रविड नंतर ज्यासाठी मॅच बघावी असा धोनीच होता. फिल्डर कडून येणाऱ्या थ्रो ला किंचित डिफ्लेक्ट करून स्टंप कडे पाठवणारा, बॉलर कडून आलेला बॉल हातात घेऊन अलगद, एकच बेल स्टंपला किंचितही धक्का ना लावता उडवणारा, स्टंप च्या मागे उभा राहून ससाण्यासारख्या नजरेने मैदानाचा वेध घेणारा, खराब बॉल टाकल्यावर नजरेने बॉलर ला उभा फाडणारा, धावपट्टीवर बोल्ट वाटणारा अन सहा बॉल मध्ये बारा रन करायचे असताना अन बरोबर अकरावा फलंदाज असताना सुद्धा आपल्या आशा जिवंत ठेवणारा ... एम एस धोनी! उत्कृष्ट खेळाडूवर तितकाच तोलामोलाचा लेख. धोनी रिव्यू सिस्टीम drs स्टंपिंग चा राजा . रन आउट चा बादशाह 1 रंनिंग बिट्विन द विकेट्स 1 आणि.. 1

आणि राघव, पैलवान यांचे प्रतिसाद आवडले. धोनीबद्दल काय आवडतं ते सांगायचं झाल्यास, तो एक उत्तम माणूस आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन यशाची सर्व शिखरे पादाक्रांत करून ते यश डोक्यात जाऊ न देणारा असा व्यक्ती विरळच. धोनीच नाव घेतलं की हात नकळत कानपाळीला स्पर्श करायला जातो. सं - दी - प

सुजित जाधव 10/09/2020 - 15:56
मैदानावर धावलेल्या चहात्याच्या हातचा तिरंगा जमीनीवर पडायच्या आत उचलणारा धोनी हा माझ्यासाठी वर्ल्डकप उंचावणार्‍या धोनीपेक्षा महान होता. मस्तच लेख..

गणेशा 24/08/2020 - 17:59
पुन्हा एक अप्रतिम लेख.. महिंद्रसिंग धोनी अतिशय उत्क्रुष्ट कर्णधार होता.. मला त्याची सर्वात जास्त विकेटकिपरींग आवडायची.. एक ना अनेक किती स्टंपिंग डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या होत्या.. धोनी आणि दादा कायम कंप्यारीझन व्हायची, हे खेळात चालुच असते, पण प्रत्येक जन वेगळा असतो, आपल्याला दादा पण आवडायचा आणि महेंद्रसिंग धोनी सुद्धा. धोनी मला test cricket मध्ये पण आवडायचा.. पण खरी मज्जा त्याने आणली one day आणि t20 मध्ये.. तुमचे लेख खुप मस्त असतात...

राघव 24/08/2020 - 18:33
खरं सांगू का? खूप खूप आवडते खेळाडू आहेत क्रिकेट मधे. पण धोनी म्हणजे वीक पॉईंट आहे ब्वॉ. मॅच गेली असं सगळ्यांना वाटत असतांना हा माणूस तेवढ्याच शांतपणे लढा समोरच्या टीमच्या गोटात घेऊन जायचा. त्यात तो बर्‍याचदा यशस्वी व्हायचाच. आणि यदाकदाचित नाही ना झाला, तरी जिंकणार्‍या टीमला जिंकल्यासारखं वाटणारच नाही इतका दणका देऊन जायचा. त्या प्रयत्नांवरच आम्ही फिदा! ती विजिगिषु वृत्ती दादानं जागवली आणि धोनीनं रुजवली. दादावरून आठवलं, जसा कुंबळेचा किस्सा तुम्ही मांडलात तसंच - दादाच्या शेवटच्या टेस्ट मॅचच्या शेवटच्या सत्राची Captaincy धोनीनं दादाला करायला दिलेली. कृतज्ञता व्यक्त करण्याची ही पद्धत फार आवडून गेली. साध्या साध्या कृतींतून हा माणूस असा आवडत जातो. माईंड गेम्स मधेही हा महाबिलंदर माणूस आहे. कुणी एकदा त्याला कमी बॉल्स मधे जास्त रन्स काढायचे असतील तर काय स्ट्रॅटेजी वापरतोस असं विचारलं तर हा म्हणाला की - तसे अनेक मार्ग आहेत. उदा, जेव्हा असे शेवटचे ओव्हर असतात, तेव्हा त्या ओव्हरच्या पहिल्या वा दुसर्‍या बॉलला कडक चौकार/षटकार पडायला हवा. नुसता पडायला नको तर शॉट मारतांना त्या शॉटचा आवाज त्या बॉलरच्या कानांत वाजायला पाहिजे. [त्यामुळे बॉलरचे लक्ष विचलित होऊन त्याचे] पुढचे १-२ बॉल्स चुकण्याची शक्यता वाढते! मला स्टीव्ह वॉ चं एक वाक्य आठवतं. भावार्थ असा - We are a special team. Others will have to do something special to defeat us! हा जो स्वॅगर होता ना त्या वाक्यात, त्या स्वॅगर पर्यंत भारतीय टीमला नेऊन ठेवण्याचं काम धोनीनं केलंय. Alas, the most powerful number [7] has retired from the Game! Hats Off Captain!

सिरुसेरि 24/08/2020 - 20:36
लेख आवडला . कठीण प्रसंगी तळाच्या फलंदाजांना हाताशी धरुन शांतपणे एकेरी , दुहेरी धावा , फटकेबाजी यांचा ताळमेळ साधत संघाला जिंकुन देण्याची किमया माहिने अनेकदा केली आहे . " ये आडा मारेगा " असे गोलंदाजाला सांगणारा धोनी लक्षात आहे . क्रिकेटमधे सुरु झालेली डीआरएस पद्धत आणी धोनीचे अचुक सफाईदार निरिक्षण याचा संघाला अनेकदा फायदा झाला आहे . Thats the way , Mahi way .

आनन्दा 24/08/2020 - 21:59
धोनी हा धोनी होता.. आपल्यासाठी तो बेवन होता असे मी म्हणतो. तो आल्यामुळे भारताची वरची फळी चांगले काम करायला लागली, करण त्यांची जोखीम घेण्याची क्षमता वाढली.. 6व्या क्रमांकवरती धोनी आणि बऱ्याच वेळेस हार्दिक सारखा एखादा अर्धवेळ फलंदाज मॅच काढून द्यायला लागले, worst case मध्ये.. त्यामुळे मधल्या फळीचा खेळ सुधारला.. धोनी निवृत्त झाल्याची खूप हळहळ वाटली आहे, अगदी सचिन पेक्षा पण!!

द्रविड नंतर ज्यासाठी मॅच बघावी असा धोनीच होता. फिल्डर कडून येणाऱ्या थ्रो ला किंचित डिफ्लेक्ट करून स्टंप कडे पाठवणारा, बॉलर कडून आलेला बॉल हातात घेऊन अलगद, एकच बेल स्टंपला किंचितही धक्का ना लावता उडवणारा, स्टंप च्या मागे उभा राहून ससाण्यासारख्या नजरेने मैदानाचा वेध घेणारा, खराब बॉल टाकल्यावर नजरेने बॉलर ला उभा फाडणारा, धावपट्टीवर बोल्ट वाटणारा अन सहा बॉल मध्ये बारा रन करायचे असताना अन बरोबर अकरावा फलंदाज असताना सुद्धा आपल्या आशा जिवंत ठेवणारा ... एम एस धोनी! उत्कृष्ट खेळाडूवर तितकाच तोलामोलाचा लेख. धोनी रिव्यू सिस्टीम drs स्टंपिंग चा राजा . रन आउट चा बादशाह 1 रंनिंग बिट्विन द विकेट्स 1 आणि.. 1

आणि राघव, पैलवान यांचे प्रतिसाद आवडले. धोनीबद्दल काय आवडतं ते सांगायचं झाल्यास, तो एक उत्तम माणूस आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन यशाची सर्व शिखरे पादाक्रांत करून ते यश डोक्यात जाऊ न देणारा असा व्यक्ती विरळच. धोनीच नाव घेतलं की हात नकळत कानपाळीला स्पर्श करायला जातो. सं - दी - प

सुजित जाधव 10/09/2020 - 15:56
मैदानावर धावलेल्या चहात्याच्या हातचा तिरंगा जमीनीवर पडायच्या आत उचलणारा धोनी हा माझ्यासाठी वर्ल्डकप उंचावणार्‍या धोनीपेक्षा महान होता. मस्तच लेख..
लेखनविषय:
ये दौडेगा तो पुजारा को उसीके लिय रखा है, ताली बजानेके लिये नहीं है पहली बॉल तेज डालना - ये आगेसे खेलेगा जड्डू जाग के जरा... उसका पैर जैसे हिल रहा है.. उसके हिसाबसे अँटिसिपेट कर इशांत - अगर चौका गया तो मेरा रिस्क है... तू बिंदास डाल एक बार बोला है बार बार नहीं बोलूंगा - पैर पे खिलाना है तो पैर पे खिलाना है भारतीय क्रिकेटनी अशी वाक्यं कधी ऐकली नव्हती. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः म्हणतात खरे. पण आमच्याकडे रणजींपासून ते विराट कोहलीपर्यंत कितीतरी अतिरथी महारथी अर्जुन होऊन गेले तरी भारतीय क्रिकेटला असा "सारथी" कधी मिळाला नव्हता!

लॉकडाउनमधील रनिंगचा अनुभव

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्वांना नमस्कार! परभणीमध्ये गेल्या महिन्यामध्ये विद्यापीठाचा परिसर नुकताच मॉर्निंग वॉक व रनिंग करणा-यांसाठी खुला केला होता. तेव्हा खूप दिवसांनी तिकडे रनिंग चालू केलं. लॉकडाउनच्या काळात सायकलिंग बंद होतं. त्यामुळे त्या दिवसांमध्ये अंगणामध्येच आठवड्यातून दोन- तीनदा टायमर लावून रनिंग करत होतो. परिस्थिती काही काळ ठीक झाल्यावर रोडवर थोडे दिवस सायकलिंग केलं आणि विद्यापीठाच्या परिसरात रनिंग करण्याचा आनंद घेतला न घेतला तोच घरासमोरच कंटेनमेंट झोन आला. सरकारचे नियम काहीही असले तरी परिस्थितीचं गांभीर्य समजून घेऊन काळजी घेणं प्रत्येकाचं काम आहे.

... And a forward shortleg

जे.पी.मॉर्गन ·

सोत्रि 17/07/2020 - 06:36
एकी सोलकरनं फॉरवर्ड शॉर्टलेगच्या जागेचा ७/१२ आपल्या नावावर करून घेतला होता.
बोले तो बोलर बस ससी कपूर होता है... असली बच्चन तो कोई और है!
हे असले स्क्वेअर कट्स जेप्याचा फॅन असण्याची कारणं आहेत!! - (जेप्याचा पन्खा) सोकजी

छान लेख. फॉरवर्ड शॉर्ट लेगला एकनाथ सोलकर उभा असल्यास फलंदाजांना बचावात्मक फलंदाजी करायलाही भीती वाटायची. सिली पॉईंटला अबिद अली आणि फॉरवर्ड शॉर्ट लेगला एकनाथ सोलकर फलंदाजाला जखडून टाकायचे. वेस्ट इंडिजविरुद्ध १९७५ च्या मुंबई कसोटीत सोलकरने त्याच्या कसोटी कारकिर्तीतील एकमेव शतक झळकावले होते, ती खेळी तेव्हा दूरदर्शनवर बघितली होती.

फॉरवर्ड शॉर्टलेग ही तशी नॉन-ग्लॅमरस जागा. तिथे कोणी स्टार उभा राहत नाही. शक्यतो पदार्पण करणार्‍यांसाठी राखीव. त्यातही भारताकडून बर्‍याचदा ओपनरला तिथं उभं राहिलेलं पाहिलंय. (कदाचित २००० च्या दशकात सेहवाग-द्रविड-तेंडूलकर-गांगुली-लक्ष्मण या जागा फिक्स असल्याने फक्त दुसरा ओपनर बदलत राहायचा आणि तो या जागेवर यायचा.) त्यामुळे तिथं एस. रमेश, आकाश चोप्रा, कैफ, गंभीर, शिखर धवन, सध्या पुजारा, राहूल, यांना पाहिलेलं आहे. अगदी क्वचित गांगुली, युवराज यांना पाहिलंय. द्रविडने नेहमीप्रमाणे जेव्हा कुणी नसेल तेव्हा 'कमी तिथे आम्ही' या त्याच्या धर्माला जागून तिथे क्षेत्ररक्षण केलंय. पण कुणी का असेना, तिथं कॅच सुटल्यावर शिव्या नाही देता येत. पण जर कॅच पकडला तर तो अफलातूनच असतो.

गामा पैलवान 18/07/2020 - 14:05
जे.पी.मॉर्गन, लेख झकास जमलाय. या जागेविषयी अगदी त्रोटक माहिती उपलब्ध आहे असं दिसतंय. त्यामुळेच की काय लेख लहानखुरा वाटतो. या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतांना जलद आणि मंद गोलंदाजांच्या समोर वेगळ्या प्रकारचे डावपेच अंमलात आणावे लागंत असावेत. यावर विवेचन अपेक्षित होतं. जमल्यास नक्की लिहा. :-) आ.न., -गा.पै. अवांतर : आम्ही टवाळखोर लोकांनी आमच्या लहानपणी फॉरवर्ड शॉर्ट लेग याची संज्ञोत्पत्ती शोधली होती. इथे क्षेत्ररक्षण करतांना आपला पुढचा छोटा पाय सतत सांभाळावा लागतो. म्हणून याला इंग्रजीत फॉरवर्ड शॉर्ट लेग म्हणतात. खरंतर ही मराठी संज्ञा आहे.

आम्ही शाळेत असतांना मॅण्ड्रेक, वेताळ यांबरोबरच एकनाथ सोलकर हा पण आमचा हिरो होता. त्याच्या बद्दल अनेक कथा प्रचलित होत्या. त्या वेळी दुरदर्शन नस्ल्याने त्या खऱ्या मानण्याशिवाय इलाज नव्हता. त्याने एक झेल पाठीवर झोपुन दोन पायांमधे पकडल्याची कथा फ़ारच लोकप्रिय होती. आणी तो बॅट्समन ने मारलेला डायरेक्ट फ़टका होता.

विजुभाऊ 18/07/2020 - 18:55
टोनी ग्रेग याच्या बद्दल बर्‍याच दंतकथा आहेत. तो म्हणे फॉर्वर्ड शॉर्टलेग ला किंवा स्लीप मधे उभा राहून सतत बडबड करत असायचा. बॅट्समन ला उचकवणे हा हेतू तो बरेचदा साध्य करायचा

जगप्रवासी 21/07/2020 - 12:37
पण तुमच्या लेखणीच्या मानाने खूपच छोटा झालाय. तुमचा लेख म्हणजे मस्त चहाचे झुरके घेत चवीचवीने कांदाभजी खाण्याचा प्रकार. फॉरवर्ड शॉर्ट लेगचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मोहम्मद कैफने केलेला रन आऊट - https://www.youtube.com/watch?v=8KUCzjMBVTA

सोत्रि 17/07/2020 - 06:36
एकी सोलकरनं फॉरवर्ड शॉर्टलेगच्या जागेचा ७/१२ आपल्या नावावर करून घेतला होता.
बोले तो बोलर बस ससी कपूर होता है... असली बच्चन तो कोई और है!
हे असले स्क्वेअर कट्स जेप्याचा फॅन असण्याची कारणं आहेत!! - (जेप्याचा पन्खा) सोकजी

छान लेख. फॉरवर्ड शॉर्ट लेगला एकनाथ सोलकर उभा असल्यास फलंदाजांना बचावात्मक फलंदाजी करायलाही भीती वाटायची. सिली पॉईंटला अबिद अली आणि फॉरवर्ड शॉर्ट लेगला एकनाथ सोलकर फलंदाजाला जखडून टाकायचे. वेस्ट इंडिजविरुद्ध १९७५ च्या मुंबई कसोटीत सोलकरने त्याच्या कसोटी कारकिर्तीतील एकमेव शतक झळकावले होते, ती खेळी तेव्हा दूरदर्शनवर बघितली होती.

फॉरवर्ड शॉर्टलेग ही तशी नॉन-ग्लॅमरस जागा. तिथे कोणी स्टार उभा राहत नाही. शक्यतो पदार्पण करणार्‍यांसाठी राखीव. त्यातही भारताकडून बर्‍याचदा ओपनरला तिथं उभं राहिलेलं पाहिलंय. (कदाचित २००० च्या दशकात सेहवाग-द्रविड-तेंडूलकर-गांगुली-लक्ष्मण या जागा फिक्स असल्याने फक्त दुसरा ओपनर बदलत राहायचा आणि तो या जागेवर यायचा.) त्यामुळे तिथं एस. रमेश, आकाश चोप्रा, कैफ, गंभीर, शिखर धवन, सध्या पुजारा, राहूल, यांना पाहिलेलं आहे. अगदी क्वचित गांगुली, युवराज यांना पाहिलंय. द्रविडने नेहमीप्रमाणे जेव्हा कुणी नसेल तेव्हा 'कमी तिथे आम्ही' या त्याच्या धर्माला जागून तिथे क्षेत्ररक्षण केलंय. पण कुणी का असेना, तिथं कॅच सुटल्यावर शिव्या नाही देता येत. पण जर कॅच पकडला तर तो अफलातूनच असतो.

गामा पैलवान 18/07/2020 - 14:05
जे.पी.मॉर्गन, लेख झकास जमलाय. या जागेविषयी अगदी त्रोटक माहिती उपलब्ध आहे असं दिसतंय. त्यामुळेच की काय लेख लहानखुरा वाटतो. या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतांना जलद आणि मंद गोलंदाजांच्या समोर वेगळ्या प्रकारचे डावपेच अंमलात आणावे लागंत असावेत. यावर विवेचन अपेक्षित होतं. जमल्यास नक्की लिहा. :-) आ.न., -गा.पै. अवांतर : आम्ही टवाळखोर लोकांनी आमच्या लहानपणी फॉरवर्ड शॉर्ट लेग याची संज्ञोत्पत्ती शोधली होती. इथे क्षेत्ररक्षण करतांना आपला पुढचा छोटा पाय सतत सांभाळावा लागतो. म्हणून याला इंग्रजीत फॉरवर्ड शॉर्ट लेग म्हणतात. खरंतर ही मराठी संज्ञा आहे.

आम्ही शाळेत असतांना मॅण्ड्रेक, वेताळ यांबरोबरच एकनाथ सोलकर हा पण आमचा हिरो होता. त्याच्या बद्दल अनेक कथा प्रचलित होत्या. त्या वेळी दुरदर्शन नस्ल्याने त्या खऱ्या मानण्याशिवाय इलाज नव्हता. त्याने एक झेल पाठीवर झोपुन दोन पायांमधे पकडल्याची कथा फ़ारच लोकप्रिय होती. आणी तो बॅट्समन ने मारलेला डायरेक्ट फ़टका होता.

विजुभाऊ 18/07/2020 - 18:55
टोनी ग्रेग याच्या बद्दल बर्‍याच दंतकथा आहेत. तो म्हणे फॉर्वर्ड शॉर्टलेग ला किंवा स्लीप मधे उभा राहून सतत बडबड करत असायचा. बॅट्समन ला उचकवणे हा हेतू तो बरेचदा साध्य करायचा

जगप्रवासी 21/07/2020 - 12:37
पण तुमच्या लेखणीच्या मानाने खूपच छोटा झालाय. तुमचा लेख म्हणजे मस्त चहाचे झुरके घेत चवीचवीने कांदाभजी खाण्याचा प्रकार. फॉरवर्ड शॉर्ट लेगचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मोहम्मद कैफने केलेला रन आऊट - https://www.youtube.com/watch?v=8KUCzjMBVTA
लेखनविषय:
आपण कॉमेंटरीमध्ये नेहेमी ऐकतो बघा - Kumble resumes from round the wicket with an aggressive field – 2 slips, a gully, silly point and a forward shortleg. येस! ... And a forward shortleg! एकदम "...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" स्टाईलमध्ये! कारण ती जागाच तशी आहे. फुटबॉल मधे स्वीपर किंवा लिबेरो, हॉकीमध्ये quarterback , बास्केटबॉल मधे point guard, कबड्डीमधला कोपरा रक्षक यांचा जो माज, जे ग्लॅमर तेच क्रिकेटमध्ये फॉरवर्ड शॉर्टलेगचं. इथे डायलॉगबाजी करून टाळ्या शिट्ट्या घेण्याची बात नाही - कडक रोलमध्ये पिक्चर खाण्याचा विषय आहे.