ज्या धुरिणांनी नाशिकचा क्रीडालौकिक वाढवला, ती आता काळाच्या पडद्याआड गेली आहेत. क्रीडा क्षेत्रातील अशा महान व्यक्तिमत्त्वांच्या स्मृतींना उजाळा देणारा ‘प्रकाशयात्रा आठवणींची’ हा उपक्रम कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे सोमवारी, १६ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे होत आहे. त्यानिमित्त हा लेखप्रपंच. नाशिकसंदर्भातील काही आठवणी तुमच्याकडे असतील तर त्याही शेअर करा.
पी. महेश
नाशिकमध्ये ५० च्या दशकात कबड्डी, कुस्तीबरोबरच मल्लखांबही तितकाच लोकप्रिय होता. अगदी ८०-९० च्या दशकापर्यंत ही समृद्धी टिकून होती. स्वातंत्र्यदिनी जेव्हा शाळेत कार्यक्रम व्हायचे तेव्हा विद्यार्थ्यांचे पिरॅमिड म्हणजे मनोरे रचले जायचे.