Skip to main content

जीवनमान

एक मिसळ बारा पावः नाशिकच्या मिसळपावची गाथा.

लेखक संदीप डांगे यांनी रविवार, 09/04/2017 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
नाशिकच्या मिसळीचे दिवाने हजारो है, नाशिकच्या मिसळ दिवानग्यांची ही दिवानगी नक्की केव्हापासून सुरु झाली आणि काय काय रुप घेऊन कशी कशी नव्याने अवतरत आली ह्याची सुरसरम्य कथा मांडली आहे खालच्या माहितीपटातून. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकही सेकंद चुकवू नये अशी नितांतसुंदर फिल्म मिसळपावडॉटकॉम वर असलीच पाहिजे म्हणून इथे शेअर करत आहे. एन्जॉय!!! श्रेयनिर्देशः दिग्दर्शक, कॅमेरामन, संकलकः तेजस जोशी ध्वनी आणि आवाज : रुचिर पंचाक्षरी संशोधनः लिनाली खैरनार, सी. एल.

वायूमंडल

लेखक नरेंद्र गोळे यांनी रविवार, 09/04/2017 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या पृथ्वीवर आपण राहतो, त्या पृथ्वीवरच्या भूपृष्ठाचा एक तृतियांश भाग पाण्याने अनावृत्त असला तरी दोन तृतियांश भागावर पाण्याचे विशाल साठे विपुलतेने विखुरलेले आहेत. महासागर आहेत ते. अनावृत्त भागही वस्तुतः वायूंच्या सुमारे दहा किलोमीटर उंचीच्या थराने आवृत्तच आहे. ह्या वायूंचे वजन, म्हणजेच वातावरणीय हवेचा दाब.

हे फक्त माणसातच !

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 07/04/2017 00:48 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री मासे आणणाऱ्या एकाकी माणसाला बोकेमांजरे चहुबाजूने घेरतात. माणूस पळू लागला कि, त्याच्यावर झेप घेऊन त्याला बोचकारतात. त्याच्या हातातील मासे क्षणार्धात लंपास होतात. मासे मिळताच बोकेमांजरे माणसाला तिथेच सोडून देतात. हे सगळे किती विश्वासाहार्य, predictable आहे! मासे मिळाल्यावर, मासे तर फस्त करायचेच पण माणसाची आतडी बाहेर येईपर्यंत त्याला ओरबाडत, बोचकारत रहायचे, मग, रात्रीच्या भयाण शांततेत फिस्कारत हिंडायचे ....... हे मात्र फक्त माणसातच ! - शिवकन्या.

(#मिपालेझीनेस - मी आज केलेला आराम - एप्रिल २०१७)

लेखक प्रसाद गोडबोले यांनी सोमवार, 03/04/2017 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. "मी आज केलेला आराम " या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे , इतका प्रतिसाद मिळत आहे की लोकं आरामात डुंबुन गेल्याने गेले तीन महीने धागा काढायलाही विसरलीत !! आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन आराम सुरू केला आहे. आराम सुरू केलेल्या आणि आरामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन. हां तर तसेही नवीन फायनान्शीयल ईयर सुरु झाल्यावर आम्हाला कामाचा लोड नसतो . ऑफीसात येऊन मस्टर क्लिक करणे अन जुने पुराणे काही उरले सुरले बग क्लीयर करणे इतकेच काय ते काम !

( वरपरीक्षा )

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 31/03/2017 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा वरपरीक्षा ........................... नव्हते मनांत तरीही, नाव नोंदवून आलो कांदेपोहे जिरले सारे, नकार पचवून आलो * होती एक परी, स्वप्नात तिच्या फसलो वर परीक्षेस मी, उगीच टाळत राहिलो * अशी नको तशी नको, कारणे शोधत राहिलो बोहल्यावर चढले मित्र, मी एकटाच राहिलो * बोलण्यास मागता वेळ, सांगे ती असते व्यस्त सकाळसायंकाळ जणू, मी पसरतो अस्ताव्यस्त * आवडलो ना तुला?,कितीदा तिला पुसावे येईल का होकार,म्हणुनी किती झुरावे * येता होकार तिचा,मन सैरभैर व्हावे वाघाची होऊन शेळी, पिंजऱ्यात बंद व्हावे * नव्हते मनात माझ्या,मग का असे

अंजलीची गोष्ट - आनंदयात्री

लेखक aanandinee यांनी गुरुवार, 30/03/2017 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
"हाय" त्या ओळखीच्या आवाजाने चमकून तिने दरवाज्याकडे पाहिलं. अपूर्वाला पाहून ती चकितच झाली. "अपूर्वा, तू इथे? सगळं ठीक आहे ना?" तिने काळजीने विचारलं. "खरं म्हणजे ठीक नाहीये. ठीक असताना कोणी डॉक्टरकडे कशाला येईल?" अपूर्वाने हसत हसत म्हटलं. "ते ही खरंच. अगं पण घरी यायचस, बोल काय म्हणतेस?" अंजलीने विचारलं.  "आमची न्यूज तुझ्या कानावर आली की नाही?"क्षणभर विचार करून अंजली म्हणाली, "हो, आई म्हणाली की तुझं आणि तुषारचं पटत नाहीये म्हणून"  "हो त्याचबद्दल बोलायचं होतं" अपूर्वाने समोरचा पाण्याचा ग्लास उचलला, एक घोट पाणी पिऊन मग तिने सांगायला सुरुवात केली, "आमच्या लग्नाला आता नऊ वर्ष झाली.

अँबी वॅली - बियाँड दि हेवन !

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 30/03/2017 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
अँबी वॅली हा काय माहौल आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न इतकाच या लेखनाचा उद्देश आहे. माझ्या असिस्टंटनं आमच्यासाठी ही काँप्लिमेंटरी पिकनिक अरेंज केली होती. तिचा पती तिथे डिरेक्टर आहे आणि त्यानं डे-वन पासून अँबी वॅलीची संपूर्ण निर्मिती गेल्या तेवीस वर्षात केलीये. तिथे वी वेअर ट्रिटेड अ‍ॅज इनवेस्टर्स पण अदरवाइज ते एकूण प्रकरण आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे सुब्रता रॉय, सहारा कंपनी, सुप्रीम कोर्ट केस, पिकनिक अफोर्डेबिलीटी हे विषय बाजूला ठेवलेत तर पोस्टचा आनंद नक्की घेता येईल.

मी बाई होते म्हणुनी - भाग १५

लेखक ५० फक्त यांनी बुधवार, 29/03/2017 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
मी बाई होते म्हणुनी . . भाग - १४ - http://www.misalpav.com/node/39099 .. ‘लक्ष्मणाचा विवाह उर्मिलेशी, शत्रुघ्नाचा श्रुतकिर्तीशी आणि भरताचा मांडवीबरोबर होणं योग्य आहे असे मला वाटते.’ राजा दशरथांचा आवाज त्या ठिकाणी भरून राहिला आहे असा भास झाला.

पांडू पाटील

लेखक ज्ञानदेव पोळ यांनी बुधवार, 29/03/2017 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
4 पोरं, 3 पोरी, 21 नातवंडे, 16 परतुंड आणि अजून काही दिवस जगला असता तर खापर परतुंड बघण्याचं भाग्य लाभलेला चालता फिरता माझा आज्जा पांडू पाटील रात्री साडे दहा वाजता मातीत मिसळून गेला. 98 वर्षे जगलेला आणि जुनी चवथी शाळा शिकलेला गावातला शेवटचा दणकट म्हातारा. पण या वयापर्यंत कधी दाताला कीड लागली नाही कि डोळ्याला चष्मा लागला नाही. स्वातंत्र मिळायच्या आधी जन्माला आला तेव्हा राबायला शेताचा एक तुकडा होता आणि राहायला खणभर घर. पण दिवस रात्र राबून पंचवीस एकर जमीन केली. दोन विहिरी पाडल्या. सगळया वावरांचा कोपरा न कोपरा भिजवून काढला, आणि शहरात नोकरी करणाऱ्या पोरांना गावात चार घरे सुद्धा बांधली.

त्यांना हे जमत कसं..?

लेखक Pradeep Phule यांनी सोमवार, 27/03/2017 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरचा माझा हा पहिला लेख. पण विषय कोणता निवडावा हा यक्षप्रश्न माझ्यासमोर आं वासून उभा होता. कारण मिपावर सर्व विषयांवर भरपूर प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. शेवटी विषय मिळालाच. ज्यांच्या कविता वाचून मी मोठा झालो, त्यांनाच निवडावं असं ठरवलं. यांच्या शिवाय मराठी साहित्य संस्कृती अपूर्ण आहे, असं म्हंटलं तर काही वावगं ठरणार नाही. त्या म्हणजे "बहिणाबाई चौधरी". लिहायला सुरवात तर केली, पण शब्द मात्र ययातीतल्या अलका सारखे गट्टी फु करून बसलेत. माझं प्रत्येक वेळी असचं होतं, कोरा कागद समोर आला कि डोकं कसं अगदी बधिर होऊन जातं. आणि त्यांच्या बद्दल मी काय लिहावं. त्या म्हणजे शब्दांच्या पलीकडे आहेत.