Skip to main content

जीवनमान

बौद्धिक संपदा हक्क दिवस २०१७

लेखक खेडूत यांनी बुधवार, 26/04/2017 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
h . . (प्रासंगिक) सोशल मिडीया आपल्या बोटावर नाचायला लागल्यापासून चांगलं काय झालं याचं मोजमाप प्रत्येकाचं वेगळं असेल. सोय आणि मनोरंजनाचे साधन म्हणून ते आवश्यक झालेय. पण दुष्परिणामही कमीअधिक प्रमाणात अनुभवायला मिळत आहेत. एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे कसलीही खातरजमा ना करता, मूळ लेखकाला डावलून (कधी कधी तर वाचायच्या आधीच) पुढे ढकलण्याची प्रवृत्ती.

गती

लेखक नरेंद्र गोळे यांनी शनिवार, 22/04/2017 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
अन्न, वस्त्र, निवारा किंवा “आहार निद्रा भय मैथुनंच” इतक्याच काय त्या जीवनाच्या मूलभूत गरजा असतात, असा आपला समज असतो. तसा तो सततच करून दिला जात असतो. मात्र हे खरे नाही. जीवनाला आवश्यकता असते ती गतीची. ह्याची आपल्याला जाणीवही क्वचितच करून दिली जात असते. काळाची गती अपरंपार असते. काळासारखी गतीमान वस्तू तर जगात दुसरी कुठलीही नसेल. मनुष्य कालवश होतो. मग आपण सांत्वना करत असतो, की ईश्वर मृतात्म्यास सद्-गती देवो. म्हणजेच गतीला आपण हवीशी मानत असतो. मनुष्याच्या पूर्वसुकृतांनुरूप चांगली वा वाईट गती त्यास प्राप्त होतच असते. मात्र गतीविरहित जीवनाची कल्पनाच करता येत नाही. सर्व चराचर सृष्टी सततच बदलत असते.

ताण, स्ट्रेस मॅनेजमेंट, संघर्ष ह्यावर एक मुक्तचिंतन!

लेखक मार्गी यांनी बुधवार, 19/04/2017 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. काही गोष्टी बोलाव्याशा वाटल्या. म्हणून हे आधी लिहिलेलं पत्र नावं व किरकोळ संदर्भ बदलून आपल्यासोबत शेअर करतो आहे. आपल्या आयुष्यातले ताण, स्ट्रेस मॅनेजमेंट, संघर्ष ह्यावर एक मुक्तचिंतन! दि. ३ जुलै २०१६ प्रिय लोकेश आणि तेजश्री वहिनी! तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. आज सकाळी उठल्यापासूनच लोकेशशी बोलणं सुरू होतं. तेव्हा म्हंटलं चला थोडं सविस्तर बोलू. त्या दिवशी आम्ही भेटलो असतानाही भेटायचं चाललं होतं. तेव्हा आता इथे पत्रातूनच भेटावं म्हंटलं. आणि मला पत्रातून भेटायला खूप आवडतं. जेव्हा प्रत्यक्ष भेटतो; तेव्हा खूप वेळ फॉर्मल बोलण्यात- हाय हॅलोमध्ये जातो किंवा जनरल बोलण्यात जातो.

आठवणी

लेखक संदीप-लेले यांनी मंगळवार, 18/04/2017 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणी क्षणांच्या क्षणातील भावनांच्या भावनातील स्पंदनांच्या स्पंदनातील आवेगाच्या आठवणी पावसाच्या, पावसातील प्रवासाच्या, प्रवासातील गाण्याच्या गाण्यातील प्रेयसीच्या आठवणी थंडीच्या थंडीतील शेकोटीच्या शेकोटीतील हुरड्याच्या हुरड्यातील गोडीच्या आठवणी उन्हाळ्याच्या उन्ह्याळ्यातील सुट्टीच्या सुट्टीतील पुस्तकांच्या पुस्तकातील जादूच्या आठवणी खेळाच्या खेळातील भांडणाच्या भांडणातील मैत्रीच्या मैत्रीतील ओलाव्याच्या आठवणी कधीकधीच्या आठवणी कुणाकुणाच्या आठवणी कशाकशाच्या साठवणी मनामनांच्या - संदीप लेले

नाशिकचा उद्योग ०२ : उद्यमशीलतेची परंपरा

लेखक सुधीर मुतालीक यांनी रविवार, 16/04/2017 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या नाशकात एक बोली आहे. विशेषतः इथले बहुदा सर्व प्रकारचे राजकीय पुढारी उद्योगांशी संबंधित कार्यक्रमामध्ये हा डायलॉग आपल्या भाषणात ठोकतात. बहुदा सगळीच स्थानिक वृत्तपत्रे या डायलॉगचा कुठे ना कुठे वापर आपल्या लिखाणात करत असतात. म्हणे "मंत्र भूमी कडून तंत्र भूमीकडेनाशिकची वाटचाल होते आहे". नाशिकच्या मंत्रभूमी म्हणून असणाऱ्या लौकिकाचा मला आदर आहे. पण या दोनही शब्दांच्या अर्थात दडलेल्या वास्तवाचा एकमेकांशी काहीच संबंध नाही. मंत्र आणि तंत्र या शब्दांचे फारतर यमक जुळण्यापलीकडे नाशिकच्या संदर्भाततरी या दोनही बाबी भिन्न आहेत.

दिवस....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी गुरुवार, 13/04/2017 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या दिवसांचं काही कळतच नाही बुवा...कधी शेवरीच्या कापसासारखे आपसूक उडतात,कधी लोखंडी रोलरसारखे ढकलावे लागतात.... कँलेंडरमधे दिसणारे दिवस दिसतात त्यापेक्षा अधिक जवळ असतात... प्रत्येक उगवणारा दिवस मावळतोच...उद्याचा दिवस दिसेलच याचीही काही खात्री नसते..... काही लोक दिवस मोजत असतात ...

मनाच्या बाहेर !

लेखक संजय क्षीरसागर यांनी मंगळवार, 11/04/2017 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
अरांच्या मनातल्या मनात !! वर चाललेली चर्चा निर्णयाप्रत येऊ शकत नाही याची दोन कारणं आहेत : १) अरांच्या धारणेत `मनावेगळं कुणीही नाही' आणि माझ्यामते हे `उघडपणे स्वतःलाच नाकारणं' आहे. जगात फक्त एकाच गोष्टी कुणीही नाकारु शकत नाही ती म्हणजे `मी आहे ' ! सो, अरा इज ट्राइंग इंपॉसिबल. २) इन अ वे, `मी आहे' हे विधान नाकारता येत नसलं तरी जोपर्यंत व्यक्ती स्वतःप्रत येत नाही तोपर्यंत तिला आपण `मनावेगळे आहोत' हा उलगडा होत नाही. नाऊ द ट्रबल इज, (१) लॉजिकचा विषय आहे आणि (२) अध्यात्म आहे.

कामिनीबाईंना वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये

लेखक चित्रगुप्त यांनी मंगळवार, 11/04/2017 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
. (याच त्या कामिनी बाई, ज्यांना मदत हवी आहे) डिअर ऑल, हल्लीची अध्यात्माची चालती बघून आपणही काहीतरी केले पाहिजे, या विचाराने आम्ही "सायुज्यमुक्तीचे सहा सोपान" या नावाने पुस्तक काढणार होतो (त्यात जागोजागी झेन, सुफियाना वगैरे शब्द पेरणार होतो), तेवढ्यात इथे एक प्रेरणालेख वाचनात आला, आणि पुस्तकाऐवजी वेबसाईट काढण्याचा विचार बळावला. लगेचच आम्ही आमचे परममित्र आणि मार्केटिंग गुरु वेदप्रकाश चौबे यांना आमचा मानस सांगितला.

स्वारस्याची अभिव्यक्ती

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 11/04/2017 08:16 या दिवशी प्रकाशित केले.
वामन आणि मी, आम्ही दोघेही बसमध्ये बसून तासभर कसा काढावा ह्याचा विचार करत असता, ही चर्चा सुरू झाली. आणि मग उत्तरोत्तर रंगतच गेली. तिचाच हा वृत्तांत. हा संवाद कमीअधिक प्रमाणात प्रत्यक्षात असाच घडलेला आहे. मीः हे बघा, तुम्हाला ह्यात रुची आहे का? वामनः छे! हे सगळे गणिताने भरलेले आहे. ह्यात आपल्याला काय ’इंटरेस्ट’ असणार? मीः ’इंटरेस्ट’? म्हणजे तुम्हाला ’स्वारस्य’ म्हणायचाय काय? वामनः हो. तेच ते. मीः तुम्हाला ह्यात स्वारस्य नसेल, तर आपण अधिक सुरस गप्पा करू या! तुम्ही ’इंस्ट्रुमेंटेशन’ मध्ये एवढी वर्षे काम करताय.

नाशिकचा औद्योगिक इतिहास : १

लेखक सुधीर मुतालीक यांनी सोमवार, 10/04/2017 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
बॉलपेनच्या टाचणी सारख्या छोट्या तोंडापासून विमानापर्यंत हजारो उत्पादने बनवणाऱ्या नाशिकची एक औद्योगिक नगरी म्हणून जगभर आज ख्याती आहे. नाशिकमध्ये कार्यरत असणाऱ्या वेगवेगळ्या औद्योगिक वसाहतींमधून मानवी जीवनाला आवश्यक असणाऱ्या जवळ जवळ सगळ्या उत्पादनाची निर्मिती आज नाशिक मध्ये होते. गंमत अशी आहे की देशांतर्गत जवळपास सगळ्या महत्वाच्या शहरांना रस्ते रेल्वे यांनी जोडलेल्या नाशिकची मुख्यत्वे उद्योगामुळेच अखिल विश्वाशी जरी अलगद नाळ आता जोडली गेली असली तरी नाशिकने आपलं गावपण छान जपलंय. त्यामुळे नाशिकचा आजवरचा औद्योगिक इतिहास आणि भविष्याकडे होणारी वाटचाल हा एक छान चिंतनाचा, अभ्यासाचा विषय होऊ शकतो.