Skip to main content

इतिहास

विनोद खन्ना

Published on 28/04/2017 - 09:52 प्रकाशित मुखपृष्ठ
आज विनोद खन्ना आपल्या मध्ये नाहीत एक आठवण ...... गोष्ट जुनी आहे.. अभिनेता विनोद खन्ना यांच्या आयुष्यातला नाजुक काळ होता तो पत्नी गीतांजली बरोबर फाटले होते.. स्मिता पाटील त्यांच्या जवळ येत होती.. त्या सुमारात विनोद ओशो कडे सल्ल्या साठी गेले होते.. आपली समस्या सांगितल्यावर भगवान ओशो म्हणाले.. "फिल्म जीवन मे तो आप ऍक्टींग कर रहे हो उसे जीवन समजो और निजी जीवन जो जि रहे हो उसमे ऍक्टींग करो" Act like you are living life Live life like you are acting ................................ मनका मित मध्ये ब्रेक मिळाला अन विनोद खन्ना उदयास आला तशी लिना चंदावरकर पण.. तिला पण ब्रेक याच सिनेमात मिळाला
लेखनविषय:

याद्या 2340

चकल्या….. ३४२५

Published on 23/04/2017 - 14:41 प्रकाशित मुखपृष्ठ
नमस्कार मंडळी. यावेळी तुमच्यासाठी एक चॅलेंज टाकलं आहे. तिसरी कथा मजेदार आहे…पण ती आहे अपूर्ण. तुम्हाला येईल का ती पुर्ण करता? … १) १२३४५६७८९…… मी माझ्या बायकोच्या दबावा मूळे या प्रयोगात सामिल झालो होतो. माझ्या कवटीला भोक पाडताना सुध्दा ती डॉक्टरांना अखंड सूचना देत होती. माझे डोके बधिर असल्यामुळे परत बधिर करायची गरज नाही असे तिनेच डॉक्टरांना सांगीतले होते, ऑपरेशन सक्सेसफुल, डॉक्टरांनी जाहिर केले, आणि हिच्या चेहर्यावर आन्ंदाचा महापुर उसळला, लगेच तिने पर्स मधुन एक बटाटा काढून डोक्याच्या पोकळीत टाकला. आणि आन्ंदाने म्हणाली “ बरं झाल!

याद्या 6984

नाशिकचा उद्योग ०३ : याज्ञिकीने तारले !

Published on 22/04/2017 - 16:14 प्रकाशित मुखपृष्ठ
औरंगजेबाच्या मृत्यू नंतर म्हणजे इस १७०७ नंतर काही वर्षांनी पेशवाईचा ऱ्हास होई पर्यंत म्हणजे इस १८१८ पर्यंत नाशकात संपूर्ण मराठयांची राजवट होती म्हणजे पेशवाई होती. पेशवाई अवतरणे हा सर्वार्थाने एक प्रचंड मोठा बदल होता. पेशव्यांचा एकूणच मराठी मुलुखाच्या औद्योगिक उत्कर्षासाठी कसून प्रयत्न सुरु होता असे दिसते. पण त्या प्रयत्नांची दिशा आजच्या संदर्भातच नव्हे पण तत्कालीन जागतिक संदर्भात सुद्धा जी होती ती तशी का होती असा प्रश्न पडतो. युरोपातला उद्योग ज्वालामुखी सारखा अगदी तोंडाशी येऊन खदखदत होता. फार पुढे नव्हे १७५० साल युरोपातल्या औद्योगिक क्रांतीचे पडघम वाजु लागले होते.

याद्या 5057

नाशिकचा उद्योग ०२ : उद्यमशीलतेची परंपरा

Published on 16/04/2017 - 13:51 प्रकाशित मुखपृष्ठ
आमच्या नाशकात एक बोली आहे. विशेषतः इथले बहुदा सर्व प्रकारचे राजकीय पुढारी उद्योगांशी संबंधित कार्यक्रमामध्ये हा डायलॉग आपल्या भाषणात ठोकतात. बहुदा सगळीच स्थानिक वृत्तपत्रे या डायलॉगचा कुठे ना कुठे वापर आपल्या लिखाणात करत असतात. म्हणे "मंत्र भूमी कडून तंत्र भूमीकडेनाशिकची वाटचाल होते आहे". नाशिकच्या मंत्रभूमी म्हणून असणाऱ्या लौकिकाचा मला आदर आहे. पण या दोनही शब्दांच्या अर्थात दडलेल्या वास्तवाचा एकमेकांशी काहीच संबंध नाही. मंत्र आणि तंत्र या शब्दांचे फारतर यमक जुळण्यापलीकडे नाशिकच्या संदर्भाततरी या दोनही बाबी भिन्न आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3439

नाशिकचा औद्योगिक इतिहास : १

Published on 10/04/2017 - 14:54 प्रकाशित मुखपृष्ठ
बॉलपेनच्या टाचणी सारख्या छोट्या तोंडापासून विमानापर्यंत हजारो उत्पादने बनवणाऱ्या नाशिकची एक औद्योगिक नगरी म्हणून जगभर आज ख्याती आहे. नाशिकमध्ये कार्यरत असणाऱ्या वेगवेगळ्या औद्योगिक वसाहतींमधून मानवी जीवनाला आवश्यक असणाऱ्या जवळ जवळ सगळ्या उत्पादनाची निर्मिती आज नाशिक मध्ये होते. गंमत अशी आहे की देशांतर्गत जवळपास सगळ्या महत्वाच्या शहरांना रस्ते रेल्वे यांनी जोडलेल्या नाशिकची मुख्यत्वे उद्योगामुळेच अखिल विश्वाशी जरी अलगद नाळ आता जोडली गेली असली तरी नाशिकने आपलं गावपण छान जपलंय. त्यामुळे नाशिकचा आजवरचा औद्योगिक इतिहास आणि भविष्याकडे होणारी वाटचाल हा एक छान चिंतनाचा, अभ्यासाचा विषय होऊ शकतो.

याद्या 11374

आईस क्रिम

Published on 10/04/2017 - 12:19 प्रकाशित मुखपृष्ठ
आमच्या बालपणी " वाडीलाल..अमुल..वॉल्स"असे ब्रान्डेड आईसक्रिम नसायचे... सुट्या लागल्या कि पॉट भा्डयानी आणायचा..्बर्फ आणायचा...खडे मिठ..आणायचे.. घरचे दुध साखर..त्यात आंबे वा कलिंगड घालुन ते मिश्रण पॉट मधे घालायचे बाजुनी बर्फ ्मिठ घालुन पोराना बसवायचे फिर्वायला.... फिरवताना जड जायला लागले कि समजायचे आईस क्रिम तयार झाले... मग आतले भांडे अलगद बाहेर काढायचे..अन मस्त आईस क्रिम चापायचे.. आईस क्रिम फिरवत असताना ह्याच्या शर्टाच्या आत बर्फ टाक अश्या मज्या मस्करी चालायच्या .
लेखनविषय:

याद्या 2552

न्यूरेम्बर्ग - भाग २

Published on 09/04/2017 - 22:41 प्रकाशित मुखपृष्ठ
न्यूरेम्बर्ग - भाग १ न्यूरेम्बर्ग - भाग २ खटला सुरु होण्याआधी काही गोष्टींचं स्पष्टीकरण अत्यंत आवश्यक होतं. मुख्य मुद्दा म्हणजे हा खटला चालणार कुठे? याचं सगळं कामकाज कसं होणार? कैद्यांना – ज्यांच्यातले काहीजण साक्षीदारही असणार होते – ठेवायचं कुठे? त्यांचं संरक्षण कसं करायचं? ज्या कोर्टरूममध्ये हा खटला चालणार होता ती कशी असेल? या सर्व कामकाजाची नोंद कशी ठेवायची?
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3627

मोसाद - भाग १४

Published on 05/04/2017 - 00:29 प्रकाशित मुखपृष्ठ
मोसाद - भाग १३ मोसाद भाग १४ १९८० चं दशक हे जागतिक राजकारणात आणि अर्थकारणात मोठी उलथापालथ घडवणारं होतं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सत्तरीच्या दशकातले राजकीय नेते या दशकाच्या सुरुवातीला अंतर्धान पावले. १९७९ मध्ये इराणमध्ये घडून आलेल्या इस्लामिक क्रांतीमुळे आणि ज्या पद्धतीने अमेरिकन सरकारने ते संपूर्ण प्रकरण हाताळलं त्यामुळे जिमी कार्टर यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाबद्दल अमेरिकेत असंतोष होता. तो जनतेने रोनाल्ड रीगन यांना निवडून देऊन दाखवून दिला. ब्रिटनमध्येही सततचे संप आणि हरताळ यांच्यामुळे लोकांमध्ये असंतोष खदखदत होता.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 44663

( वरपरीक्षा )

Published on 31/03/2017 - 23:54 प्रकाशित मुखपृष्ठ
आमची प्रेरणा वरपरीक्षा ........................... नव्हते मनांत तरीही, नाव नोंदवून आलो कांदेपोहे जिरले सारे, नकार पचवून आलो * होती एक परी, स्वप्नात तिच्या फसलो वर परीक्षेस मी, उगीच टाळत राहिलो * अशी नको तशी नको, कारणे शोधत राहिलो बोहल्यावर चढले मित्र, मी एकटाच राहिलो * बोलण्यास मागता वेळ, सांगे ती असते व्यस्त सकाळसायंकाळ जणू, मी पसरतो अस्ताव्यस्त * आवडलो ना तुला?,कितीदा तिला पुसावे येईल का होकार,म्हणुनी किती झुरावे * येता होकार तिचा,मन सैरभैर व्हावे वाघाची होऊन शेळी, पिंजऱ्यात बंद व्हावे * नव्हते मनात माझ्या,मग का असे

याद्या 9303

गोविंदराव तळवळकर

Published on 22/03/2017 - 09:44 प्रकाशित मुखपृष्ठ
आत्ताच कळले आणि नंतर वाचले की महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार-विचारवंत गोविंदराव तळवळकर यांचे ह्युस्टन येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ज्या एका व्यक्तीमुळे आजही जालावर मराठी वृत्तपत्र पहायला गेलो की आपोआप महाराष्ट्र टाईम्सचे पान उघडले जाते अशी एक विचारवंत व्यक्ती आज काळाच्या पडद्याआड गेली. महाराष्ट्राच्या आणि त्यातही खासकरून मुंबई-पुण्याच्या वृत्तपत्रीय जगताची स्वातंत्र्यपूर्व काळात टिळक-आगरकर, काळकर्ते परांजपे, न.चिं केळकर आदी अनेक दिग्गजांनी एक जडणघडण घातली. त्याच काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातही सुरवातीस आचार्य अत्रे, ह.रा. महाजनी आदींनी वैचारीक जडणघडण चालूच ठेवली.

याद्या 14747