Skip to main content

इतिहास

मेंदुला दुखापत

लेखक रानरेडा यांनी सोमवार, 04/09/2017 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
मेंदुला दुखापत पाशवी गवत आहे पाशवी गवत आहे खेळ आणि डेझी चेन आणि हसणे स्मरण पथ्यावर ल्यूनी ठेवण्यासाठी आला पापी हॉलमध्ये आहे पार्सर्स माझ्या हॉलमध्ये आहेत या कागदाच्या चौकटीत चेहर्यावर जमिनीवर ठेवलेले आहेत आणि प्रत्येक दिवशी पेपर बॉय अधिक आणतो आणि जर बांध काही वर्षांनी खुले होते आणि जर टेकडीवर काहीच जागा नसेल आणि जर आपले डोकेदेखील अंधाऱ्या विरहीत असतील तर मी तुम्हाला चंद्राच्या गडद बाजूला बघितो पागल माझ्या डोक्यात आहे पागल माझ्या डोक्यात आहे आपण ब्लेड लावा, आपण बदल करा मी पुन्हा विचार करेन 'जोपर्यंत मी समजणार नाही आपण दार लॉक आणि कळ टाकून द्या माझ्या डोक्यात कोणीतरी आहे पण मी नाही आहे जर मेघगर

विष्णू - बोधचिन्हे आणि प्रतिकं

लेखक आर्य यांनी शनिवार, 19/08/2017 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच दिवसांपासून लिहायचे होते, पण कामामुळं राहून जात होतं... थोडी रोचक माहिती............ काही दिवसांपूर्वी पुन्हा दक्षिण भारत फिरायचा योग आला, त्यामध्ये अनेक मंदिरात गेलो, अर्थातच सर्वात जास्त मंदिरं विष्णूची किंवा त्याच्या विविध अवतारांची होती उदा: राम, कृष्ण, नृसिंह, केशव इत्यादी. पण प्रत्येक ठिकाणी वेगळी मुर्ती, वेगळी रचना, नाव वेगळं त्याचे सहचारीही वेगळे होते. एव्हढाच काय आपण विष्णूच्या विविध मूर्ती, चित्रं आणि ग्राफिक बघतो त्यात प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं विष्णूची रूपं दाखवतो, म्हणून त्यावर अभ्यास करायचा ठरवलं आणि त्यातून काही रोचक माहिती समोर आली.

स्त्री पुरूष मिश्र व्यवहार व पडदा पध्दतीचे परिणाम

लेखक माहितगार यांनी सोमवार, 14/08/2017 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे कर्ते, श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी जवळपास १०० वर्षापुर्वी An Essay on Indian Economics, and Hindu Law and the Methods and Principles of the Historical Study Thereof. या विषयांवर लेखन केले The History of Caste in India या विषयावर Phd केली. स्त्री सहभागाचा समाज व्यवहारात अभाव आणि जाती व्यवस्थेचा पगडा यांचा आर्थीक विकासावर होणार्‍या परिणामांकडे त्यांनी त्यांच्या ज्ञानकोशातील लेखातून दिशा निर्देश केलेला दिसून येतो.

एक आठवण

लेखक अनिवासि यांनी सोमवार, 14/08/2017 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
आज १४ ऑगस्ट . बऱ्याच वर्षांनी ह्या दिवशी भारतात असण्याचा योग आला. सकाळी बाहेर गेलो असताना एक मुलगा मोटारीपाशी तिरंगा विकावयास आला आणि जुन्या आठवणी जागृत झाल्या. ८ऑगस्ट ४२ ला 'चले जाव' ची घोषणा झाली आणि त्याच रात्री काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना अटक झाली व ते तुरुंगात गेले. चळवळीचे नेतृत्व दुसऱ्या/ तिसऱ्या फळीतील नेत्यांकडे गेले. चळवळीचे स्वरूप बदलले . पण आम्हां ८/९ वर्षाच्या मुलांना फक्त एवढेच समजत होते की काहीतरी निराळे घडत आहे. युद्ध संपले -- सर्व नेते सुटले आणि परत फरक जाणवला. ज्या नेत्यांना तुरुंगात टाकले होते त्यांना आता दिलीहून आमंत्रणे येऊ लागली.

जनरेशन गॅप आणि निळाई

लेखक झपाटलेला फिलॉसॉफर यांनी बुधवार, 02/08/2017 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
CD प्लेयर मध्ये बिप्या बघताना अचानक light जाऊन CD आतमध्ये अडकण्याची जी भीती आहे.....त्याची जाणीव आजच्या generation ला नाही. वरचा मेसेज कायप्पा वर भिरभिरत आला आणि डोळ्यासमोर अनेक निळ्या पिवळ्या आठवणी रुंजी घालु लागल्या (त्या यथावकाश डोक्यात विसावल्या). त्यांना शब्दरुप देउन जोवर प्रसारित करत नाहित तोवर त्या तिथेच ठाण मांडुन बसणार याची खात्री पटल्याने लगोलग जिल्बी टंकायला घेतली. तरी टंचनिका हाताशी नसल्याने (आणी विषय इतका स्फोटक असताना ती हाताशी वगैरे नसणेच जास्त श्रेयस्कर असल्याने) अंमळ जास्त वेळ लागला टंकायला.

राणी पद्मावती

लेखक कल्पतरू यांनी रविवार, 16/07/2017 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
येत्या वर्षाच्या अखेरीस एक हिंदी चित्रपट येतोय. राणी पद्मावती नावाचा. दीपिका पदुकोण राणी पद्मावतीची भूमिका साकारतेय. आता हा चित्रपट रिलीज होणार आणि त्यामध्ये आपल्याला निर्मात्यांच्या अगम्य आणि अतर्क्य कल्पनाशक्तीचे(जसे बाजीराव मध्ये सुरवातीलाच मस्तानीची धडाकेबाज एंट्री, पिंगा गाण्यावर काशी आणि मस्तानीचा डान्स वैगरे वगैरे) दर्शन होऊन खरी राणी पद्मावती कुठेतरी हरवून जाणार.

सिक्कीम भारतात सामील झाला कसा ?

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 16/07/2017 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
सिक्कीम भारतात सामील झाला कसा ? (संदर्भ:इंदिरा गांधी, आणीबाणी आणि भारतीय लोकशाही – लेखक पी. एन. धर, अनुवाद- अशोक जैन) गेले काही दिवस भारत आणि चीन मधले संबंध परत ताणले गेले आहेत. दोन्ही देशात परत एखाद्या युद्धाला सुरुवात होते कि काय अशी अवस्था निर्माण झाली. आता काय होणार हे तर कालच ठरवेल परंतु ह्यावेळच्या कात्कातीचे कारण ठरला तो सिक्कीम-आपल्या सिक्कीम राज्याच्या सीमेलगत असलेला डोकाला ( ला म्हणजे खिंड)ह्या भागात चीन ने घुसखोरी करत सुरु केलेले रस्त्याचे बांधकाम आणि भारताने घेतलेला आक्षेप.साधारण गेले महिनाभर भारत आणि चीनी सैन्यात ह्यावरून तणाव आहे .

दुहेरी ब्राह्मण ?

लेखक माहितगार यांनी सोमवार, 10/07/2017 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
लेख प्रस्तावना: ग्राहकाच्या दृष्टीने सहसा एका चांगल्या विक्रेत्याकडून असलेली अपेक्षा, ग्राहकाची गरज आणि क्षमता लक्षात घेऊन विक्रेत्याने योग्यते मार्ग दर्शन आणि साहाय्य करावे अशी असते. पण प्रत्यक्षात एस्कीमोंच्या गळ्यात फ्रीज, टकल्याच्या गळ्यात कंगवा लटकवणारा, मातीस सोने म्हणून विकणारा किंवा आधी तर्कसुसंगत समजावून द्या, समजले नाही तर पैसे द्या (करप्ट करा) आणि तेही शक्य नसेल तर ग्राहकास कन्फ्यूज करणारा तो विक्रेता अशा प्रकारची इमेज जनमानसात उभी रहाण्यास बाकी समाजा सोबत बहुतांश विक्रेते स्वतःही जबाबदार असतात.

एस. एस. रामदास, समुद्राच्या गर्तेतील ७० वर्ष.

लेखक कल्पतरू यांनी रविवार, 09/07/2017 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
एस. एस. रामदास बोटीला या १७ जुलैला ७१ वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने घेतलेला हा आढावा. तूनळीवर याच घटनेवर मी एक लहान बायोग्राफी बनवले त्याची लिंक खाली देत आहे. https://www.youtube.com/watch?v=rGC2r-RawQU हा लेख लिहिण्याचं प्रमुख कारण म्हणजे एस. एस. रामदास बोटीच्या दुर्घटनेबाबत अनेक लोकांना म्हणावी तेव्हडी फारशी माहिती नाही खास करून नव्या पिढीला. मीडिया सुद्धा थोड्या फार प्रमाणात याला कारणीभूत आहे. फालतू TRP घेणारे विडिओ तासंतास TV चॅनेलवर दाखवायला याना वेळ आहे, आजकाल मराठी चॅनेलसुद्धा हिंदी चॅनेलच्या पावलावर पाऊल ठेवायला लागले.

आर्य हे दक्षिण भारतीय होते

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 09/07/2017 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
(आपल्या स्वार्थासाठी नव्याने इतिहास लिहिणाऱ्या आजच्या महान इतिहासकारांपासून प्रेरणा घेऊन लिहिलेला तर्क पूर्ण लेख) आर्य शब्दाचा संस्कृत अर्थ आहे उत्तम आणि सुसंस्कृत व्यक्ती अर्थात आचार आणि विचाराने चांगला व्यक्ती. आर्य नावाची कुठली जाती होती आणि ती परदेशातून भारतात आली या भाकड कथेवर मी कधीच विश्वास ठेवला नाही. तरीही जे माझे मित्र आर्य आणि संस्कृत बोलणारे ब्राम्हण विदेशातून भारतात आले होते, त्यांच्या साठी हा लेख. आर्य हे दक्षिण भारतीय होते आणि त्यांची भाषा संस्कृत होती हे मी लेखात तार्किक रित्या सिद्ध करणार आहे. पुरातन इतिहासाचे लिखित प्रमाण कमीच आहे.