Skip to main content

इतिहास

कर्मयोगी श्री एकनाथजी रानडे- भाग २ कार्य

Published on 19/11/2016 - 21:31 प्रकाशित मुखपृष्ठ
एकनाथजी रानडे यांचे कार्य शिलास्मारकाची कथा एकनाथजींच्या आत्मचरित्रापासून वेगळी करणे अशक्य आहे. ज्यांनी प्रत्येक अडथळा संधीमध्ये परिवर्तित केला, प्रत्येक आव्हानाचे रूपांतर विजयात केले, अश्या असामान्य व्यक्तित्वाचे गुण सांगणे एका छोट्या लेखात शक्य नाही. तरीही हा छोटासा प्रयत्न: अशी कोणतीही समस्याच नव्हती त्यावरचा उपाय त्यांच्याजवळ नव्हता, त्यांचे स्वतःचे शब्दच द्यायचे तर ," प्रत्येक डावपेचाला प्रति-डावपेच, प्रत्येक शस्राला प्रतिशस्त्र असतेच ", या सत्याने समग्र दर्शन, निवारण होणारच अशा अडचणीतून एकनाथजींनी कसा मार्ग काढला यातून होते.

याद्या 2736

कर्मयोगी एकनाथजी रानडे भाग १

Published on 19/11/2016 - 21:20 प्रकाशित मुखपृष्ठ
सरदार वल्लभभाई पटेल म्हणतात, मला जर का लोकं लोह पुरुष म्हणत असतील तर एक पोलादी पुरुषही आहे आणि तो म्हणजे 'एकनाथजी' विवेकानंदांच्या विचारांचा अभ्यास करणाऱ्या व त्यांच्यापासून प्रेरणा घेणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत पण त्यांच्या रक्तात, नसानसात विवेकानंद भिनलेले आहेत अश्या प्रामुख्याने व ठळक तीन व्यक्ती आहेत प्रथम क्रमांकावर भगिनी निवेदिता, सुभाषचंद्र बोस व तिसरी व्यक्ती माननीय एकनाथजी रानडे! एक जीवन एक ध्येय चा मंत्र देणाऱ्या माननीय एकनाथजींचा एकशे दोनवा जन्मदिवस! त्यांना भावपूर्ण आदरांजली!
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1888

न्यूरेम्बर्ग

Published on 17/11/2016 - 11:02 प्रकाशित मुखपृष्ठ
दुस-या महायुद्धाच्या असंख्य वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे युद्धगुन्हेगार या संकल्पनेचा उदय. आज जे युद्धगुन्हेगारीमध्ये मोडतात तसे गुन्हे दुस-या महायुद्धाआधी झाले नाहीत असं नाही. पण दुस-या महायुद्धाने ही संकल्पना स्पष्ट केली. एकतर या युद्धात लष्करी आणि नागरी  (Military and Civilian)  ही सीमारेषाच पुसून टाकली गेली होती. १९व्या शतकाच्या अखेरीपर्यंत दोन किंवा अधिक देशांमधलं युद्ध हे लष्करापुरतं मर्यादित असे. पण जसजसं तंत्रज्ञान प्रगत होत गेलं, तसा युद्धाचा आवाका वाढत गेला.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 9412

मक्केतील उठाव ७ (शेवटचा भाग)

Published on 06/11/2016 - 04:31 प्रकाशित मुखपृष्ठ
भाग ६ ४ डिसेंबर १९७९. मक्केतील उठाव मोडून काढला गेला. सगळे बंडखोर एकतर मारले गेले किंवा पकडले गेले. मशिदीचे प्रचंड नुकसान झाले. काबाचा पाषाण शाबूत होता. पण बाकी मशिद उध्वस्त झाल्यासारखी दिसत होती. मारवा आणि सफा गेट आणि त्यांना जोडणारी मार्गिका ह्यांची खूप मोडतोड झाली होती. रणगाडे, चिलखती जीप ह्या चालवल्यामुळे फरशा उघडल्या होत्या. जिने तुटले होते. त्या दिवशी सगळ्या कैद केलेल्या बंडखोरांना टीव्हीवर दाखवले गेले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 19401

{मोस्ट एलिजिबल संपादक...२०१७ }

Published on 01/11/2016 - 13:00 प्रकाशित मुखपृष्ठ
पेर्णा "याड लागलं, याड लागलं" अशा फॉरिन ऑर्केस्ट्रासहीत मोबाइलची रिंग वाजली. नंबर कोणाचा असावा असा विचार करीत असतानाच लक्षात आलं, सुरवातीला‘०७१५२’ आणि शेवटी डबल झीरो… अरे हा तर वर्ध्यावरुन आलेला, म्हणजे विदर्भातील दिसतोय. सोन्याबापू तर आला नाही ना सुट्टीवर? का कुणा विदर्भवासीवर अन्याव झाला आता? ‘हॅलो…’ आता कुणा टिपिकल वर्‍हाडी हेल कानावर पडणार म्हणून आनंद झाला. ‘हॅलो, आभ्या बोलून राह्यला का बे?’ – नावाची एवढी वाट लावली म्हणजे रिलेटिव्हपैकी कोणीच नाही.

याद्या 16967

प्रो.के एस कृष्णमुर्ती

Published on 01/11/2016 - 07:17 प्रकाशित मुखपृष्ठ
ज्योतिषशास्त्र हा ज्यांचा आवडीचा विषय आहे त्यांना, कृष्णमुर्ती ही ज्योतिषपध्दती नक्कीच परिचयाची किंवा निदान ऐकून तरी नक्की माहिती असेल. कोण होते हे कृष्णमुर्ती? काय योगदान होतं त्यांचं ज्योतिषशास्त्रात? या कृष्णमुर्ती पध्दतीचे जनक प्रोफेसर के.एस.

याद्या 2267

मक्केतील उठाव ६

Published on 24/10/2016 - 09:10 प्रकाशित मुखपृष्ठ
आधीचा भाग ५ जॉर्डनचा राजा हुसेन सौदी राजाला भेटायला आला. त्याला आपले सैनिक पाठवून मक्केतील बंडखोरांचा निकाल लावण्याची खूप इच्छा होती. सौदी राजाने आदरातिथ्य, आगतस्वागत व्यवस्थित केले. पण जेव्हा मक्केचा विषय आला तेव्हा स्पष्ट सांगितले की तुमची मदत घेणे आम्हाला परवडणार नाही. किंग हुसेनचा आजोबा हा मक्केचा सेनापती (शेरीफ ) होता. तो हाशमी टोळीचा. ऑटोमन साम्राज्य अरेबियावर राज्य करत असताना त्यांच्याकडे त्या भागाची जबाबदारी होती. नंतर सौदी सैन्याने त्यांचा १९२४ साली पराभव करून त्यांना जॉर्डनला हाकलले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 28088

चंदबरदाई

Published on 21/10/2016 - 15:25 प्रकाशित मुखपृष्ठ
चंदबरदाई हे नाव तुम्हाला माहिती आहे का ? ch स्वामीनिष्ठेचं आणि मैत्रीचं असं उदाहरण मानव इतिहासात फक्त छत्रपती संभाजी आणि कवी कलश यांच्या व्यतिरिक्त कुठेच पाहायला नाही. उत्तर भारतात ही कथा खूप प्रसिद्ध आहे पण आपल्याकडे खूप कमी लोकांना याची माहिती आहे. त्यासाठीच ही माहितीपर कथा आपल्यासाठी देत आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 12267

मराठ्यांचा आदर्श.. छत्रपती शिवाजी महाराज...

Published on 21/10/2016 - 15:12 प्रकाशित मुखपृष्ठ
शिवचरित्रावर आधारित रचलेली कविता.. नाही आम्हा भिती कोणा मुघल और निजामाची.. फक्त आहे भूक तळपती मर्द मराठी प्रेमाची.. आले बहु गेले बहु उध्वस्त करण्या धरती.. सर्वांवरती भारी पडला एकला तो छत्रपती.. रक्त मराठी श्वास मराठी मराठी तो बाणा.. शिवनेरीवर बाळ जन्मला स्वराज्याचा राणा.. जिजाऊंचे मार्गदर्शन अन् कोंडदेवांचे शिक्षण.. उभा राहीला बाल मराठा करण्या शत्रूंचे भक्षण.. मित्रांसवे त्या शंभूमंदिरी घेतली शपथ स्वराज्याची.. हिंदूत्वाच्या वीर लढ्याची अन् प्रेमळ सुंदर सुराज्याची.. जिंकूनी प्रथम तोरणागड जगद्जाहीर केली वीरता.. सतराव्या वर्षीच पराक्रम दाविला वार्याने पसरली वार्ता.. आदिलशहाने होऊनी अस्वस्थ ने
लेखनविषय:

याद्या 4094