Skip to main content

इतिहास

भाषावार प्रांतरचनेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग ३

लेखक सातारकर यांनी सोमवार, 04/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मनसे च्या वादळानंतर मी ही माहीती इतरांना (अर्थातच ज्यांना नसेल त्यांना) देण्याच्या उद्देशान हे लिहायला घेतल खरं.

बुधवारची कविता: (वाढदिवस - ३)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी गुरुवार, 17/12/2009 या दिवशी प्रकाशित केले.
काही कामात व्यग्र असल्याने बरेच दिवसानी मिपावर आलो आणि हे सुचले. आमची प्रेरणा ओळखलीच असेल. ही बुधवारी सदरे, पाडण्यात वेळ गेला बाटली ठरे कपाटी, गिळण्यात वेळ गेला उडले कुठे कुणीसे, खपले आणी कितीसे परतता मिपावर, गणतीत वेळ गेला लावून ठोकशाही अवांतर चेपताना पडली कधीन रोशनी अंधारात तोल गेला का बुधवारी न येते मज भान चढल्याचे नशा उतरली परंतु गुरवारी वेळ गेला सरसावूनी लेखणी कविता विडंबताना पेशवाच राहीलो अन् गव्हर्नर कोणी झाला
काव्यरस

तुमच्या गावाचे नाव काय?

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 17/12/2009 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही खेडेगावात राहत असाल, शहरी असाल. तुम्ही राहता त्या गावाचे नाव घ्या, किंवा तुम्हाला माहित असलेल्या कोणत्याही गावाचे (किंवा गावांची नावे) नाव घ्या. त्या गावांची नावे कशी पडली असतील असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय? तुम्ही त्यावर विचार करून ते नाव का ठेवलेय असा कधी विचार केलाय? नक्कीच केला असणार. मी तर बुवा गावाचे नाव कसे पडले असेल त्याचा विचार करतो. उदाहरणच द्यायचे झाले तर: पिंपळगाव. गावात (पुर्वी) पिंपळाची झाडे जास्त. वडगाव : गावात (पुर्वी) वडाची झाडे जास्त होती. (आता कसली झाडे जास्त?) हे झाले आपले सरळसोट नावे असलेली गावे. पण काही गावांची नावे इरसाल असतात.

जन्मोजन्मी

लेखक हेरंब यांनी रविवार, 13/12/2009 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक माणसाला पुनर्जन्माबद्दल कुतुहल असतेच. मीही त्याला अपवाद नाही. मुले मोठी झाल्यावर, मी जेंव्हा निरवानिरवीच्या गोष्टी सुरू केल्या,. तेंव्हा एकदा माझी मुलगी मला म्हणाली होती,' बाबा, तुला मरायची एवढी घाई का ?" त्यावर मी उत्तर दिले की मला पलिकडे काय आहे हे जाणून घेण्याची फार उत्सुकता आहे. त्यातून मी आता माझ्या जबाबदार्‍यांतून मोकळा झालो आहे. आणि स्वतः मेल्याशिवाय सत्य काय आहे हे कसे कळणार? पण आत्महत्या हा मार्ग काही योग्य वाटत नव्हता. अचानक जिवंतपणीच ते जाणून घेण्याची एक संधी उपलब्ध झाली. नुकत्याच एका वाहिनीवर तुमचा पूर्वीचा जन्म जाणून घेण्याविषयी एक कार्यक्रम सुरू झाला.

<सवयीने मंद >

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 10/12/2009 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरीत होऊन लढवावे असे सध्या तुरळकच आढळते तरी ही आमची प्रेरणा ही (सवयीने मंद) होळीची याद देऊन जाणारे विविध नावांचे विरविरीत धागे... काही खुळे, आणि दिशाहीन मठ्ठ काही नेहमी व्यस्त काही सुस्त तेच वळण तेथेच नेणारे फक्त कधी रोडावलेले, निष्कारण थंडावलेले अतीसामान्य कवितेचे जंत ... तरीही एकूणएक कवीता वाचणारा रटाळलेला विचारवंत ... पोळीची साद घालून जाणारे विविध आचार्‍यांचे सुनसान धाबे... काही बळेबळे, आणि चववीहीन घट्ट काही स्वस्त काही फस्त काही जेवण तेच ;तेच वाढणारे रीक्त चवीचे तेच मीठ पीठ अन मसाले कधी शिजलेले , अर्धवट भिजलेले ,

अजून एक क्रियाशील आदर्श

लेखक विकास यांनी रविवार, 06/12/2009 या दिवशी प्रकाशित केले.
हे पार्सी बाबा भारताच्या किनार्‍यावर गुजराथच्या बाजूने नक्की कधी आले ते माहीत नाही, पण त्यावेळची एक कथा आत्ता एकदम आठवली. ते त्या भागातील राजाकडे गेले आणि स्वतःच्या देशातील अत्याचारांमुळे विस्थापित झालो आहोत तेंव्हा आम्हाला येथे आश्रय मिळूंदेत म्हणून विनंती केली. राजा काहीच बोलला नाही, फक्त त्याने दुधाने काठोकाठ भरलेला पेला दाखवला. उद्देश हा की आम्ही येथे परिपूर्ण आहोत असे काहीसे दाखवणे. पण त्या समुहाचा म्होरक्या पार्सीबाबा पण हुषार - त्याने त्या दुधात तसेच न बोलता साखर घातली. अर्थात त्याने सांगितले, की आम्ही या काठोकाठ दुधाने भरलेल्या पेल्यात जशी साखर विरघळली तसेच एकरूप होऊन राहू.

क्रियाशील आदर्श - हुतात्मा तुकाराम ओंबळे आणि कुटूंबिय

लेखक विकास यांनी शुक्रवार, 04/12/2009 या दिवशी प्रकाशित केले.
कधी काळी वृत्तपत्रातील बातमीवरून बोलत असताना, एका सन्माननीय व्यक्तीने मला एकदा मिष्कील उपदेश केला होता, "जर काही सामाजीक काम करायचे असेल तर, शहाणा हो आणि वृत्तपत्रे वाचणे बंद कर!"अर्थात उपदेश खरा होता जरी त्यातील हे वाक्य मिष्कील असले तरी... तर "वृत्तपत्रे वाचणे बंद कर" या वाक्याचा अर्थ काय? बातम्या म्हणून वाचायला लागले की खून, मारामार्‍या, भ्रष्टाचार, लबाड जोडती इमले माड्या-गुणवंतांना मात्र झोपड्या, असेच पहायला मिळते. यातून एखाद्या वेळेस चीड येईल पण एकंदरीत नैराश्यानेच ग्रासले जाते ज्यातून इतरांसाठीचे काय, स्वतःचे पण धड काम होत नाही.

भोपाळ

लेखक विकास यांनी बुधवार, 02/12/2009 या दिवशी प्रकाशित केले.
* भोपाळ, ३ डिसेंबर १९८४: रात्रीचे चे साधारण ९:०० वाजले होते. कारखान्यातील पाण्याच्या नळ्या साफसफाईकरण्यासाठी चालू करण्यात आल्या. वास्तवीक त्यानी वरवरच साफ होणे अपेक्षित होते. पाणि हे काँक्रीट्च्या आत बसवलेल्या मेथील आयसोसायनाईटच्या टाकीत जाणे अपेक्षित नव्हते. तरी देखील तसे गेले. मेथील आयसोसायनाईट आणि पाणि एकत्र आल्याने होणारी रासायनीक प्रक्रीया ही उर्जेस जन्म देते. तो अपवादविरहीत रासायनीक नियम आहे आणि तसेच झाले.