Skip to main content

इतिहास

पारध झालेला तो पारधी - २

लेखक श्रावण मोडक यांनी गुरुवार, 16/07/2009 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
सहजकाकांनी व्य. नि. मलाही केला होता. तो धागा खूप पुढं गेल्यानं हा नवा धागा काढतोय. मूळ धागा
---
सहजरावांचे म्हणणे - सक्तीने पुनर्वसन, दारुधंदे बंद करुन उपजीवीकेचे इतर प्रकल्प, लहान मुलांचे सक्तीचे शिक्षण, तरुणांचे संघटन, दीर्घकाल प्रबोधन, विविध योजना यांचा पाठपुरावा केल्याशिवाय त्यांचे गुन्हेगारी विश्व इतक्यात सुटेल असे वाटत नाही. पोलीस व पारधी समाजातील दोन्ही बाजुने पारध्यांना योग्य न्याय देण्याकरता जिल्हे/प्रांतवार संघटना करुन प्रयत्न.

मिपाभारत

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 06/07/2009 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
धिस पिक्चर इज जॉइंट प्रॉडक्शन ऑफ विप्र. खोपडा अ‍ॅंड परा थोपडा. मुळ कथा : बाबा म्हाराज ठाणेकर डायरेक्टर ,स्क्रिप्ट राईटींग : परा एडीटींग : धम्मु (अतिरिक्त भार) मुझी़क : विजूभौ सातारवी अँड प्रमोद देव बॅ़ग्राउंड मुझीक : प्रमोद देव फायनान्स : तात्या भयंकर स्टार कास्ट : नेहेमीचे यशस्वी मिपाकर पुनरपी मरणम पुनरपी जननम (पीत पीत जगणारे, आणि मरणारे) ह्या न्यायाने मिपाकर सुद्धा म्हाभारतातील युद्धात हजर होते. बहुतेक सर्व पांडवांच्या पार्टीत होते. काही चपला घातलेले कौरवांच्या पार्टीत होते. टारझन भीमाच्या बाजुला उभा होता.

पुस्तक परिचय (तेलाविषयक)

लेखक सुचेल तसं यांनी बुधवार, 01/07/2009 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच जेष्ठ पत्रकार गिरीश कुबेर ह्यांची दोन पुस्तकं वाचली. दोन्ही पुस्तकं खूप आवडल्यामुळे त्यांचा अल्पसा परिचय देण्याचा प्रयत्न करत आहे. १. हा तेल नावाचा इतिहास आहे: काळं सोनं असं ज्याला संबोधलं जातं त्या तेलाचा मनोरंजक इतिहास ह्या पुस्तकात मांडला आहे. अमेरीकेत पहिली तेलविहीर खणल्यानंतर अल्पावधीतच तेलाची मागणी प्रचंड वाढली. अमेरीकेतील उद्योगपती जॉन डी. रॉकफेलर (थोरले) ह्यांनी सुरु केलेली स्टँडर्ड ऑईल कंपनी, तेलातून मिळालेल्या प्रचंड नफ्यामुळे बलाढय बनली आणि तिची मक्तेदारी निर्माण झाली.

शताब्दी - अर्थशास्त्राच्या प्रकाशनाची

लेखक विकास यांनी बुधवार, 24/06/2009 01:38 या दिवशी प्रकाशित केले.
(इमेल वरून एका आलेल्या आणि त्या इमेलच्या वेधक मथळ्यामुळे सुदैवाने वाचल्या गेलेल्या एका लेखाचे हे स्वैर आणि संक्षिप्त भाषांतर.) १८९१ साली म्हैसुरच्या महाराजाने राणि व्हिक्टोरीयाच्या सन्मानार्थ "व्हिक्टोरीया ज्युबिली इन्स्टीट्यूट" नामक एक वास्तू म्हैसुरमधे बनवली. विविध संस्कृतीतील वास्तुशास्त्रांचे मिश्रण केलेली ही इमारत वेगळ्याच घाटणीतील तयार केली गेली आहे. या वास्तू मधे अनेक भुर्जपत्रांवरील लेखन विविध ठिकाणाहून आणून साठवले गेले होते. त्या काळात त्याला ओरीएंटल रिसर्च लायब्ररी म्हणायचे आता तीला ओरीएंटल रिसर्च इन्स्टीट्यूट म्हणतात.

रत्नपारखी शिवराय-भाग-१-बाजी पासलकर पुस्तकाचे प्रकाशन

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 08/06/2009 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
तात्या आणि समस्त मिपा कर, सप्रे नमस्कार ! कळविण्यास अत्यंत आनंद वाटतो की सदर पुस्तकाचे प्रकाशन काल म्हणजे रविवार दिनांक ७ जून २००९ रोजी ठाणे येथे शुभंकरोती हॉल येथे आमदार आणि ठाणे जिल्ह्याचे शिक्षण पालकमंत्री श्री.संजय केळकर यांच्या हस्ते झाले.सदर पुस्तक हे ३० पानी पुस्तिकाच आहे , हे पहिलेच रत्न आहे !

<strong>आता रायगडावर रहावत नाही.....</strong>

लेखक उदय सप्रे यांनी बुधवार, 03/06/2009 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
आता रायगडावर रहावत नाही..... आजच्या या इंग्रजाळलेल्या वातावरणात वाढलेल्या माझ्या तमाम भारतीय बांधवांनो आणि भगिनींनो , स्वराज्याच्या पहिल्या छत्रपतींचा तुम्हा सर्वांना नमस्कार ! तुमच्या हल्लीच्या इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे , आज ६ जून २००९. म्हणजे आज आमचा राज्याभिषेक ३३६ वर्षांचा झाला - म्हणजेच आज ३३५ वा वर्धापन दिन !पर्यायाने तुमच्या हे ही लक्षात आलं असेलच की , आज ३३५ व्या वर्धापन दिनानिमित्त , आणि आमच्या निर्वाण दिनानंतर ३२९ वर्षांनी पण आमचा आत्मा तुमच्याशी संपर्क साधतोय म्हणजे ही सारी वर्षे आम्ही होरपळतोय !

गीता, पुल, आणि कोसंबी

लेखक चित्रा यांनी शुक्रवार, 29/05/2009 02:06 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी मिपाच्या मुखपृष्ठावर गीतेत सांगितलेली "स्थितप्रज्ञाची" लक्षणे यावरून " तुझे आहे तुजपाशी "मधील काकाजींचा संवाद वाचला. या मराठी साहित्यातील अजरामर नाटकाने मराठी मनाला बरीच मोहिनी घातलेली आहे. पुल यांच्याबद्दल तर सांगणेच नको. पुल यांनी एक प्रकारे आपल्या व्यक्तिमत्वामुळे महाराष्ट्रातील एक मोठा लेखकवर्ग तर समाजातील एक बराच मोठा विचारी वर्ग (मध्यमवर्गीयही असेल कदाचित) घडवला असे म्हणता येईल. एक उदाहरण द्यायचे झाले तर लहानपणी मला मंगला गोडबोले यांचे "स्त्री" मासिकामध्ये येणारे "झुळूक" सदर आवडत असे, याचे कारण त्यांच्या विनोदी लेखनावर असलेला पुल यांचा प्रभाव.

फडफड फडफड फडकतो.....

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी मंगळवार, 19/05/2009 03:35 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लहानपणी टीव्ही म्हणजे फक्त संध्याकाळीच आणि ते पण फक्त एकच वाहिनी... खरं म्हणजे तेव्हा वाहिनी / चॅनल वगैरे शब्दच माहित नव्हते. टीव्ही हा एकच शब्द. तर, अशा त्या टीव्हीवर कधीमधी समूहगान असा एक प्रकार असायचा (आणिबाणी नुकतीच संपली होती पण काही नवीन प्रकार देऊन गेली होती, त्यातलेच समूहगीत हे एक). त्या समूहगीतांमधे एक गाणे नेहमी ऐ़कू यायचे... "ध्वज विजयाचा उंच धरा रे..." त्यातले ते लांबवलेले हुंऽऽऽ चांगलेच आवडायचे. पण ध्वज / झेंडा वगैरे काही प्रकार असतो हे तेव्हाच लक्षात आले होते. थोडं मोठं झाल्यावर मी आणि माझी आई एक खेळ खेळायचो. नकाशात एखादं गाव शोधायचं किंवा देश शोधायचा.

तयांचे व्यर्थ न हो बलिदान ( अंदमान पर्व)

लेखक सर्वसाक्षी यांनी शनिवार, 16/05/2009 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
ध्येयाने भारलेला मनुष्य जेव्हा संग्रामात उतरतो तेव्हा त्याला जीवनाची आशा नसते आणि मृत्युचे भयही नसते. अखेर बलाढ्य शत्रूही अशा वीरांपुढे हतबल होतो. हिंदुस्थान प्रजासत्ताक सेना, युगांतर, अनुशिलन चे क्रांतिकारक हे ध्येयवादाचे प्रतिक आहेत. हाती शस्त्र घेउन रणांगणात उतरलेले हे योद्धे. काही आपल्या कार्यात धारातिर्थी पडले, काही शत्रूच्या गोळ्यांना बळी पडले, काही फासावर चढले आणि आपल्या हौतात्म्याने हिंदुस्थानच्या इतिहासात अजरामर झाले. मात्र या सशस्त्र संग्रामपर्व गाजविणाऱ्या संघटनांमध्ये कार्यरत असलेले अनेक वीर इंग्रजांच्या हाती जीवंत सापडले आणि अभियोग दाखल होऊन जन्मठेपेला गेले.