भोपाळ
*
भोपाळ, ३ डिसेंबर १९८४: रात्रीचे चे साधारण ९:०० वाजले होते. कारखान्यातील पाण्याच्या नळ्या साफसफाईकरण्यासाठी चालू करण्यात आल्या. वास्तवीक त्यानी वरवरच साफ होणे अपेक्षित होते. पाणि हे काँक्रीट्च्या आत बसवलेल्या मेथील आयसोसायनाईटच्या टाकीत जाणे अपेक्षित नव्हते. तरी देखील तसे गेले. मेथील आयसोसायनाईट आणि पाणि एकत्र आल्याने होणारी रासायनीक प्रक्रीया ही उर्जेस जन्म देते. तो अपवादविरहीत रासायनीक नियम आहे आणि तसेच झाले. ती उर्जा बघता बघता इतकी वाढली की त्या ६१० क्रमांकाच्या टाकीचा सेफ्टी व्हाल्व जोरात उडाला आणि प्राणघातक वायू जोरात बाहेर आला...
पुढच्या काही तासांमधे ८ लाखांच्या वस्तीतील २००० अबालवृद्धांना मृत्यूने गाठले तर जवळपास तीन लाखांना हानीकारक इजा झाल्या. पाच लाखांच्या वर पोचलेल्या हानीमधे २ लाख ही पंधरावर्षाखालील मुले होती तर सुमारे ३००० ह्या गरोदर स्त्रीया होत्या. त्याचे दूरगामी परीणाम आजही भोगणारी जनता आहे. या व्यतिरीक्त हजाराहून अधिक गुरेढोरे मृत्यूमुखी पडली, परीसरातील झाडे, पिके खराब झाली आणि तीच अवस्था ही पाण्यातील माशांची...
अर्थात इतके नंतर झाले आणि होत राहीले पण त्या रात्री १ वाजता व्यवस्थापकाने, "काहीच झाले नाही", असे सांगितले तर सकाळी सहा वाजता पोलीसांनी "सगळे काही सुरळीत" म्हणून जाहीर करून टाकले! हा अपघात होता, का घातपात, निष्काळजीपणा की जाणीवपूर्वक केलेली मनुष्यावरील चाचणी यावर चर्चा होत राहीली आणि राहीलही. पहीली मदत करायला दोन दिवसांचा वेळ लागला... नंतर, भारतसरकारने $ ३ बिलीयन्स इतकी भरपाई जनतेच्या दबावाखाली युनियन कार्बाईडच्या अमेरिकन व्यवस्थापनास मागितली. अनेक वर्षांच्या कोर्टबाजीनंतर त्यातील $४७० मिलीयन्स मिळाले. त्यातील सरासरी रुग्णांना रू. २५,००० तर मृत व्यक्तींच्या नातेवाईकांस रू. ६२,००० इतके मिळाले. खरे किती हातात पडले असतील हा एक वेगळाच संशोधनाचा विषय ठरू शकतो. यातून जे काही भारतातील मानवी मुल्य दिसते ते विदारक आहे.
अनेक लेख, पुस्तके, शोध निबंध, छायाचित्रे आणि संघटना यांनी भोपाळ दुर्घटना जागी ठेवली. पर्यावरण विषय शिकताना अमेरिकेतील महाविद्यालयात यावरून चर्चा (केस स्टडीज) झाल्याचे आजही आठवते. अजूनही काही (भारतीय विद्यार्थी) या विषयावरून येथे जनजागरण करताना दिसतात.
जे झाले ते अचानक झाले का? - उत्तर नाही असे आहे. १९८१ ते १९८४ च्या काळात त्याच संकुलात सहा वेळेस वायूगळती झाली होती. अमेरिकेतपण व्हर्जिनियात त्याच कंपनीच्या संकुलात असे प्रकार झाले होते. पण हे सर्व काही जे लपवले होते ते भोपाळच्या भिषणेतून लपवता आले नाही... शिवाय रात्रपाळीचे कमी केलेले कर्मचारी, कामगारांना हिंदीच नीट समजत असताना अडमुठेपणाने इंग्रजीतीलच माहीतीपुस्तीका (instruction manuals) असणे, जो वायू हा लहान लहान टँक मधे ठेवायला हवा तो एकत्रीत एकाच ठिकाणी ठेवणे अशी अनेक इतरही कारणे शोधता आली... फांदी मोडणार होतीच, पण कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक गाठ पडली. त्यात फक्त अनेक निरपराधांना जीव घालवावा लागला अथवा अनेकांना उध्वस्त जीवन जगत बसावे लागले.
याला जबाबदार कोण? - फक्त युनियन कार्बाईड आणि ते पण अमेरिकेतील व्यवस्थापनच? ते आणि त्यांचा "कॉर्पोरेट माज" नक्कीच जबाबदार आहेत. पण केवळ तेच, असे म्हणता आले असते तर खूप बरे झाले असते. हरीत क्रांतीची स्वप्नपुर्ती करताना, किटकनाशके आयात करणे परवडत नसल्याने तत्कालीन गरीब भारताने हा अमेरिकन कंपनीचा कारखाना स्थापित करण्याचा प्रस्ताव मान्य केला. त्यात गैर काहीच नव्हते, असेल तर फक्त आपण गरीब असल्याने अमेरिकेत लागते तशी सुरक्षा यंत्रणेची आपल्याला, वास्तवीक लोकसंख्येची घनता जास्त असूनही, गरजेची नाही असे आपसुक समजून वागणे...
आजही पर्यावरणीय आणि सुरक्षेचे कायदे आणि त्यांचे कठोर पालन आपल्याकडे होत आहे का? जेंव्हा एखादा मोठा अपघात होतो आणि एकदम खूप मृत्यू अथवा अपघातग्रस्त दिसतात तेंव्हा सुरक्षा यंत्रणेतील दोष दिसून येतात. पण तसे म्हणालात तर वर्षाकाठी याहून अनेक जण त्याच अवस्थेतून जात असतात पण तो आकडा एकत्रीत, एका दिवसातील नसल्याने दुर्लक्ष होते. जसे विमान अपघातात गेलेले पटकन दिसतात पण त्याहूनही अधिक नियम न पाळल्याने गाड्यांच्या अपघातात बळी पडलेले असतात तसेच...
एकंदरीत ३ डिसेंबर १९८४ आणि नंतरचा काळ हा स्थानीक सामान्यांसाठीचा दुर्दैवी आणि अजूनही इतरत्र बर्याच अंशी असे परत घडू नये या कडे दुर्लक्ष करण्याचा (ignorance), तर सरकार आणि खाजगी क्षेत्रे यांचे एकंदरीत त्या त्या संस्थांना साजेलसे वर्तन दाखवणारा इतिहास आहे. त्या इतिहासाच्या या काळरात्रीला आज पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत.
----------
*Bhopal XXV
(वाचनीय आणि माहीतीपूर्ण) संदर्भ: Bhopal Gas Tragedy: An Analysis, Bhopal disaster
वाचने
9021
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
विकास जुनी
सुयोग्य विवेचन
लेख
आजही
चलता है आणि संभाल लेंगे!
लेखाने जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
In reply to लेखाने जुन्या आठवणी जाग्या झाल्या. by चतुरंग
लेखाबद्दल आभार
माहिती
यावरून आठवले -
छान लेख
यातून जे काही भारतातील मानवी मुल्य दिसते ते विदारक आहे.
छान
त्या
समायोचित
आर के लक्ष्मण यांचे चित्र
दोन प्रश्न
धन्यवाद
१९९० च्या
दु:ख देणारी आठवण.
भविष्यात
In reply to भविष्यात by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>करायचं