Skip to main content

इतिहास

साडेतीन टक्क्याचे ब्रॉडबँड आणि मराठी ब्लॉग्ज्स वगैरेची चर्चा

लेखक रामदास यांनी मंगळवार, 09/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी संध्याकाळी मी चर्चासत्रात भाग घेण्यासाठी म्हणून टॅक्सीच्या शोधात होतो तेव्हा स्ट्रँड बुकस्टॉल च्या जवळ माझा वरळीचा एकविसाव्या मजल्यावर राहणारा मित्र मला भेटला. "काय कुठे ?" त्यानी मला विचारलं. "काही नाही आपलं एक चर्चासत्र आहे दादरला .जरा जाऊन येतो." मी हळूच उत्तर दिलं. तसा मी प्रसिध्दीचा झगमगाट टाळतोच म्हणा. पण हा म्हणजे प्रसिध्दीवाला मित्र .तो म्हणाला "म्हणजे ते गांगलांच्या साईटच्या उदघाटनाला जातोयेस म्हण की." मी मान डोलावली. "मग घाई काय आहे .जरा स्वागतमध्ये इडली खाऊ. मग जा दादरला.मी माझ्या गाडीतून सोडतो."त्याने प्रस्ताव मांडला . माझ्या मनात दोन विचार आले.

मदनगड

लेखक बज्जु यांनी सोमवार, 08/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मदनगड या वर्षी थर्टी फस्ट्ला मदनगडावर जाऊया असा नुसता विषय काढ्ला आणि नाक्यावरच्या काही लोकांचे चेहरे सुतकी झाले. थर्टी फस्ट्ला गडावर ? आणि ते सुध्दा मदनगडावर ?? ~X( तिथे काय ठेवलयं ? :''( वेड**च आहेत मस्त एन्जॉय करायचं सोडून शरीराचे हाल करुन घ्यायला चाललेत #:S वगैरे वगैरे चर्चा झाल्या. मन का राजा (म्हणजे आपण आप्ल्याला हवं तेच करायचं) ही आमच्या नाक्यावरची पॉलीसी असल्याने ही अशा प्रकारची बोलणी आम्ही गडप्रेमी मंड्ळींनी अर्थातच मनावर घेतली नाहीत.

अपरिचीत किल्ले: अनघई आणि म्रुगगड

लेखक बज्जु यांनी शनिवार, 06/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सफर अपरिचीत किल्ल्यांची: अनघई आणि म्रुगगड आमची जोडी तशी ठरलेलीच. मी आणि सुजीत साठे. एकदा ट्रेकला जायचं ठरलं कि फारसं कोणाला न विचारता बाईक काढतो आणि सुटतो. या वेळी सफर करायची होती दोन अपरिचीत किल्ल्यांची ते म्हणजे अनघई आणि म्रुगगड. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासुन थोडे वेगळे झालेले आणि नेहमीच्या हौशी ट्रेकर्सपासुन जरा दुर्लक्षिलेले असे हे किल्ले. शनिवारी पहाटे बाईक काढ्ली. पनवेल, खालापुर मार्गे जांभुळपाड्यापासुन ५ कि.मि. असलेल्या कळंब गावात आलो. कळंब गाव तसं लहानच. ४०-५० घर असावीत जेमतेम.

जय भवानी ............. जय शिवाजी.........

लेखक विनोदबाण़खेले यांनी बुधवार, 03/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
जय भवानी जय शिवाजी........................ निश्चयाचा महा मेरु , बहुत जनांसी आधारु, अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी......... यशवंत,कीर्तिवंत, सामर्थ्यवंत,वरदवंत, पुण्यवंत,नीतिवंत, जाणता राजा

होळी..

लेखक हर्षद आनंदी यांनी सोमवार, 01/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सप्तअश्वांचा लगाम सुटला, दाही दिशा झाकोळल्या तमदैत्याचा नि:पात करावया नीशापती अवतरला फाल्गुन शुक्ल पुनव आजी, सण होळीचा आज दिन तेजाचा, करुया नमन अग्निदेवाला रचली ही रास शुष्ककाष्टांची वेढुनी ओंडक्याला, धुप, कापूर, तुप घालुनी वडवानल प्रज्वलिला, सुवासिनी घालिती रींगण पाण्याचे, नेवैद्य पोळीचा श्रीफळ वाढवुनी अग्निनारायण तुष्टविला धगधगती ज्वाळा, गजर ढोलताशांचा तांडव करीती लवलवत्या जीव्हा कळीकाळही थबकला आसमंत अवघा निनादला, महाध्वनी बोंब जाहला पाहुनी खेळ भावनांचा, मृत्युसुध्दा गहीवरला घाली सांगड निसर्गाशी, अमुल्य ठेवा संस्कृतीचा ईथेच घडले शिवराय आमुचे, विश्वसांगे तो जाणता राजा धगधगत्या होळीतुन श्री

जिवधन किल्ला

लेखक विनोदबाण़खेले यांनी बुधवार, 24/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्रीच्या रांगेतील जो मानाचा तुरा तो शिवनेरी आपल्या सर्वाना माहित आहे , पण अजुन बर्याच जणांना माहित नसेल की या शिवनेरीला अजुन मित्र मंडळी आहेत .या जुन्नर ने अनुभवले आहे एक श्रीमंत साम्राज्य , ती श्रीमंती फ़क्त शिवजन्माचीच नव्हती ,तर ती होती येथील मातीच्या सुगंधाची ,खड्कांच्या कणखरतेची, युगायुगां पासून येथल्या भूमिपुत्रांनी आपल्या शिंपलेल्या घामाची, त्यांच्या श्रमांची .सह्यकड्या प्रमाणे पोलादी छाताडांची अन श्रुष्टीचा पसारा रचनार्या त्या निसर्ग देवतेच्या मुक्त हस्ताची .

जिजाऊ दाखवा.....

लेखक उदय सप्रे यांनी शुक्रवार, 19/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सप्रेम नमस्कार आणि सुप्रभात ! हिंदु(स्थान) हॄदयसम्राट प्रौढप्रताप पुरंदर गोब्राह्मणप्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांची आज ३८० वी जयंती ! या थोर सेनानीस मानाचा त्रिवार मुजरा करून एक लेख इथे देत आहे त्याचा स्वीकार व्हावा ही विनंती ! विज्ञापना, जाणिजे.....लेखनालंकार..... जिजाऊ दाखवा..... 'रायगडावरील होळीच्या माळावरून जगदीश्वराच्या मंदिराकडे जाताना आज इतक्या वर्षांनी पण आम्हांस असं अस्वस्थ का वाटावं?' असा वेडा प्रश्न आज आम्हाला स्वतःला ३८० वर्षांनी पण पडलाय ! अं , काय म्हणालात? ३८० वर्षे कुणी जिवंत असेल का?

"रत्नपारखी शिवराय - भाग २ : कान्होजी जेधे".....एक झलक

लेखक उदय सप्रे यांनी मंगळवार, 12/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सप्रेम नमस्कार मंडळी ! दिनांक ७ जून २००९ रोजी माझे पहिले पुस्तक "रत्नपारखी शिवराय - भाग १ : बाजी पासलकर" प्रकाशित झाले आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळतो आहे.या छोटेखानी पुस्तिकेद्वारे मी काहि वाचकांच्या मनापर्यंत पोचलो याची साक्ष देणारे अनेक फोन्स , ईमेल्स , पत्र येतात त्यावरून लक्षात येते आहे.आता "रत्नपारखी शिवराय - भाग २ : कान्होजी जेधे" जे ८५ % लिहून झाले आहे पण गेले सुमारे सव्वा वर्ष ते ८५ % एव्हढेच पूर्ण राहिले आहे ते लिहायला घेण्याचा मानस आहे.यासाठी एक सुरेख संधी पण डोंबिवलीच्या रोटरी क्लब ने उपलब्ध करून दिली आहे - १६-१७ जानेवारीला रायगड्-प्रतापगड वारी (हो आम्हा शिवप्रेमींस

गोलमाल है भाई सब गोलमाल है..

लेखक रामदास यांनी गुरुवार, 07/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
तारीख :२००३ सालच्या फेब्रुवारी महिन्याची. स्थळ :ठाण्याजवळची एक नविन सोसायटी. दुसर्‍या मजल्यावरच्या एका फ्लॅटमध्ये चार माणसं .तीन पुरुष .एक स्त्री. एका पुरुषाला बेडरुममध्ये पलंगावर बांधून ठेवलेलं आहे. त्याच्या तोंडात बोळा कोंबून ठेवला आहे. स्त्री बहुधा नर्स असावी.पण पूर्णशिक्षीत नसावी. पलंगावर बांधून ठेवलेल्या माणसाच्या लक्षात आलं आहे की हे त्याचे शेवटचे काही श्वास आहेत. एकदा निकराचा प्रयत्न करून तो स्वत:ला सोडवण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो. त्या बाईच्या हातात एक सिरींज .त्यात पोटॅशियम क्लोराईड.