मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गझल

तू दिलेल्या वेदना

जयवी ·
तू दिलेल्या वेदना मी गात नाही ती उधारी चुकविणे नशिबात नाही पेलणे गांडीव तुजला शक्य नाही मनगटी दुबळ्या तुझ्या ती बात नाही भोगण्याचा शाप आहे नंदिनीला आजही का आग प्रतिकारात नाही जी नशा युद्धातल्या मरणात आहे ती नशा लाचार या जगण्यात नाही उंब-याशी थांबले पाऊल माझे स्वागताला आसवे दारात नाही का जपावे व्यर्थ मी झोळीस माझ्या आज पुरते दु:ख ही पदरात नाही जयश्री अंबासकर

जगायचे जगायचे !

पल्लवी ·
वि.सु : ही कविता माझा मित्र राजदीप जोशी ह्याची असुन त्याच्या वतीने व पुर्वपरवानगीने इथे मी प्रसिद्ध करत आहे. असेच धडपडायचे..पुन्हा पुन्हा उठायचे, मधेच डगमगायचे.. तरी उभे रहायचे ! व्यथेत गलबलायचे..पडायचे..रडायचे, करुन अश्रु कोरडे, लढायचे लढायचे ! घाव घालता कुणी.. फुटायचे..तुटायचे, असेच मोड-मोडता, जडायचे घडायचे ! कल्पनेच्या अंगणी..निमग्न रिमझिमायचे, पहाट-पालवी सवे सजायचे.. फुलायचे ! ताम्र अग्रजेपरी..क्षितीज पेटवायचे, [पण] चंद्रभान ठेवुनी निमूट मावळायचे ! हवे तिथे असायचे,नको तिथे नसायचे, दुरांत रम्य जीवना, जगायचे जगायचे ! ~राजदीप जोशी~

हि कार!

केसुरंगा ·
प्रदीप कुलकर्णींची 'शिकार!' बघून आमची कार आम्हाला आठवली नसती तरच नवल! ;) ....................................... हि कार! ............................................... उन्हात या कोवळ्या सकाळीच धार येते नि संपता संपता बघा ही दुपार येते! कधी तरी भेटती जुने मित्र सांजवेळी... नशेत होतात छान गप्पा...

कधीच नाही

जयवी ·
का बंध रेशमाचे जुळले कधीच नाही चित्रात रंग माझ्या भरले कधीच नाही त्या सावळ्याच होत्या रात्री फिरून माझ्या देहात चांदणे मग फुलले कधीच नाही बरसात ही सुरांची तव मैफ़लीत होते मज त्या सरींत भिजणे जमले कधीच नाही डोळ्यात जागलेल्या रात्री कितीक माझ्या स्वप्नात भेटणे तुज सुचले कधीच नाही जखमा दिल्या जगाने, बुजल्या तशाच सा-या का घाव तू दिलेले भरले कधीच नाही जग जिंकले सदा मी, जिंकेन मी पुन्हा ते का जिंकणे तुला मज जमले कधीच नाही जयश्री अंबासकर

हिशोब

उपटसुंभ ·
कर्जाचे अन कर्जमाफीचे ओघ ठेवले. दान दिले पण परताव्याचे योग ठेवले. पाणी आता साधन झाले लढण्यासाठी, पिण्यास बाकी पेप्सी आणि कोक ठेवले. दर रविवारी संस्कृतिरक्षण पुरले नाही. रोज पार्वती अन तुलसीचे “सोप” ठेवले. विचार मांडायाला त्यांनी दिली मुभा पण, छातीवरती तलवारीचे टोक ठेवले. देवा तुजला नवसाचा बघ चेक फाडला. गार्‍हाणे मी मात्र आपुले “रोख” ठेवले. चित्रगुप्तही मला म्हणाला कमाल झाली. हिशोब होते मीही ऐसे “चोख” ठेवले..! – अभिजीत दाते

बरेच काही..!

उपटसुंभ ·
आठवशिल तर आठवेलसे बरेच काही. अजुनी आहे राहिले तसे बरेच काही. मुठीत नाही आली स्वप्ने खंत कशाला, ओंजळीतही मोहवेलसे बरेच काही.. क्षितिजापाशी सांज देऊनी गेली मजला. निशा, चांदणे, गंध, कवडसे बरेच काही.. तुझे वचन स्वप्नी येण्याचे म्हणून निजतो. घडले आहे जागवेलसे बरेच काही.. जगता जगता नकळत पायी तुडवत गेलो. श्रद्धा, निष्ठा, प्रेम, भरवसे बरेच काही.. आज किनारी उरलेले वेचण्यास आलो, वचने, शपथा, पावले, ठसे बरेच काही..! -- अभिजीत दाते

(होता खमंग, होता चकणाहि खास बाकी)

चतुरंग ·
मिलिंद फणसेंची अप्रतिम कारागिरी 'होता वसंत, होता सुमनात वास बाकी' वाचून आम्ही भारावून गेलो आणि त्या खुषीतूनच हे पहिल्या धारेचे विडंबन जन्मले! ;) होता खमंग, होता चकणाहि खास बाकी सारेच टुन्न होती पण आसपास बाकी जाईन घरकुला मी, अद्याप आस बाकी उरलेत मात्र आता थोडेच ग्लास बाकी मी प्यायलो किती ते? उमजे मला न काही हातात फक्त काजू करणे खलास बाकी! फुटलेत पेग सारे अन्‌ फोडलेत काही उरला तिथेच माझा 'रीगल शिवास' बाकी धुंडाळ नीट डावा पुढला खिसाच माझा अजूनी असेल तेथे 'चपटीच' खास बाकी ओठांवरी तिच्याही घनघोर युद्ध भाषा सांगू तिला कसे मी?

येथे..!

उपटसुंभ ·
दृष्टीस हिमनगाचा वरचाच बर्फ़ येथे. करतात मग कशाला भलताच तर्क येथे. लाखात मोल ज्यांचे कवड्यात भाव झाले. अर्थाशिवाय नसतो कुठलाच "अर्थ" येथे. निष्पाप अन निरागस ते वय निघून गेले. छळतो कटाक्ष आणि सलतात स्पर्श येथे. फुलशील केवड्यासम, ध्यानात ठेव तेव्हा, नसतात फक्त भुंगे, वसतात "सर्प" येथे. अश्रूत चिंब भिजल्या शब्दास भाव नाही लावायचा व्यथेचा हलकाच "वर्ख" येथे. -- अभिजीत दाते

(तसा कुठे मी....)

चतुरंग ·
गझलेच्या विशेषांकातली अनंत ढवळे ह्यांची 'तसा कुठे मी..' ही गजल वाचली आणि माझे जिवापाड चालवूनही फसलेले अनेक प्रयत्न डोळ्यांसमोर येऊन गेले!