Skip to main content

धोरण

अरे पाचशे हजार

लेखक मधुका यांनी बुधवार, 30/11/2016 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
(बहिणाबाईंची माफी मागून) अरे पाचशे हजार, जसा खिशावर भार आधी रांगेचे चटके, तेव्हा मिळती शंभर अरे पाचशे हजार, बंद झाला, खोटा नाही, भरा स्वतःच्या खात्यात, काम सोपे, तोटा नाही! अरे पाचशे हजार, नको रडनं कुढनं, येड्या, जरा सोस कळ, फायदा तुझा रांगेनं अरे पाचशे हजार, कर देशाचा विचार देई रोखीला नकार, ई-पैशा तिथे होकार!
काव्यरस

घराच्या किंमतीत ३०% घट ? मदत हवी आहे

लेखक मीउमेश यांनी शुक्रवार, 25/11/2016 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
मी महिन्या पूर्वी ठाण्यात हायलँड हेवन या ठिकाणी वन बीचके बुक केलाय, आता अश्या बातम्या येऊ लागल्यात कि घराच्या किंमती कमी होणार आहेत म्हणून काय करावे सुचत नाही. कृपया तज्ञ मंडळी कडून या विषयावर मदत हवी आहे. . घराची किंमत ५३ लाख + पार्किंग + २ वर्षाचा मेंटेनन्स + क्लब आणि इतर धरून ७४ लाखाला पडलाय. अजून रजिस्ट्रेशन झालेलं नाही, बुकिंग ८०-२० स्कीम मध्ये केलेले आहे. आता १४ लाख सुरुवातीला भरले आहेत. बाकी ६० लाख घर ताब्यात मिळाल्यावर २०१९. अजून बिल्डिंग चे काम सुरु झालेल नाही. काय करणे योग्य ठरेल; कृपया तज्ज्ञ मिपाकरानी आपले बहुमोल मार्गदर्शन करावे. धन्यवाद

कर्मयोगी श्री एकनाथजी रानडे- भाग २ कार्य

लेखक आर्या१२३ यांनी शनिवार, 19/11/2016 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
एकनाथजी रानडे यांचे कार्य शिलास्मारकाची कथा एकनाथजींच्या आत्मचरित्रापासून वेगळी करणे अशक्य आहे. ज्यांनी प्रत्येक अडथळा संधीमध्ये परिवर्तित केला, प्रत्येक आव्हानाचे रूपांतर विजयात केले, अश्या असामान्य व्यक्तित्वाचे गुण सांगणे एका छोट्या लेखात शक्य नाही. तरीही हा छोटासा प्रयत्न: अशी कोणतीही समस्याच नव्हती त्यावरचा उपाय त्यांच्याजवळ नव्हता, त्यांचे स्वतःचे शब्दच द्यायचे तर ," प्रत्येक डावपेचाला प्रति-डावपेच, प्रत्येक शस्राला प्रतिशस्त्र असतेच ", या सत्याने समग्र दर्शन, निवारण होणारच अशा अडचणीतून एकनाथजींनी कसा मार्ग काढला यातून होते.

मोदी, नोटबंदी आणि आमचा चहावाला .....

लेखक अमर विश्वास यांनी शुक्रवार, 11/11/2016 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
मोदी, नोटबंदी आणि आमचा चहावाला ..... Disclaimer : आमचा चहावाला आणि मोदी पूर्वी चहा विकायचे याचा काहीही नाही... --------------------------------------------------------------------------------- मोदी सरकारने ५०० व १००० रुपयांच्या नोटांवर बंदी घातली त्याचा सर्वात जास्त परिणाम आमच्यावर झाला .... (नोटा बदलायचा प्रॉब्लेम नव्हताच .. कारण आम्ही कायमच कॅशलेस असतो ... ) पण या निर्णयामुळे जणू चक्रीवादळच आले. थोबाडपुस्तक आणि कायअप्पा यांच्यावर मेसेजचा खच पडला. कितीही डिलिट केले तरी थांबायलाच तयार नाहीत. त्यातून हे सर्व मेसेज परस्पर विरोधी ... त्यामुळे आमच्या मनात गोंधळ मजला.

रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

लेखक ट्रेड मार्क यांनी मंगळवार, 08/11/2016 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे. काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे. असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे.

१०,००० पाऊले रोजची

लेखक निओ१ यांनी सोमवार, 07/11/2016 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
वयाच्या १४-१५ व्या वर्षी कधीतरी सवय लागली व मी स्मोक करु लागलो, व वयाच्या २२-२३ व्या वर्षीपासून हार्ड ड्रिन्क देखील सुरु झाले. रोज ३०-४० सिगरेट, सिगार. किमान ३६०mL ड्रिक. वयाच्या ३८ व्या स्टेप पर्‍य्न्त हे सगळे सोडण्यासाठी अनंत उपाय केले चालू आहेत. पण गेल्या २०१२ मध्ये मला कुठे तरी वाचताना समजले की रोज किमान १०,००० पाऊले चालावेत जेणे करुन तुमची आज पर्य्न्त झालेली हानी भरुन निघते. १३०० नियमित पाऊले म्हणजे १ किलोमिटर. वाचले व सोडून दिले, पण एकदा शरिराने सगळ्याच गोष्टीला नकार देण्यास सुरुवात केली, अगदी पाणी देखील पिले तर बाहेर येत होते वेळ होती २०१५ जुलै.

भारतीय सैनिक

लेखक सोहम कामत यांनी शुक्रवार, 21/10/2016 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय सैनिक राष्ट्र रक्षितो वीर होवूनी बलाढ्य खमका परवत.. नयन दाटूनी अश्रू कथिती सैनिकाचे मनोगत... शूरवीर तो धर्मवीर तो कर्तव्यदक्ष पुत्र.. भूमीरक्ष तो शत्रूभक्ष तो हिंदूस्वराज्य मित्र.. स्वाभिमानी तो प्राणदानी तो देशप्रेमी तो राणा.. तप्तसूर्य तो प्रांतधैर्य तो हिंदोस्तानी बाणा.. युद्ध खेळतो श्वास वेचूनी मनी स्थापितो भारत.. नयन दाटूनी अश्रू कथिती सैनिकाचे मनोगत... जीव हरवतो गर्व मिरवतो देशभक्त तो हिंदू.. नभी गरजतो फक्त समजतो शिवस्वराज्य शिवसिंधू.. विश्व विसरतो जगी पसरतो स्वतंत्र हिंदवी जीत.. रयत सुखवितो भाग्य पिकवितो स्मरितो राष्ट्रगीत.. ग्रिष्म शिशिर वर्षा तो भोगतो भगवे रक्त सांडत.. नयन द

आतंकवाद अणि कठपुतली बाहुल्या (फ़िल्मी सितारे)

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 01/10/2016 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
मला आठवते १९८०-९० दशकात मुंबईतल्या सिनेसृष्टीत '"दाऊद के इशारे के बिना यंहा पत्ता भी नहीं हिलता" अशी वाच्यता होती. तस्करी आणि उगाही (वसूली)चा पैसा दाऊद सिनेसृष्टीच्या माध्यमातून दुसर्या धंद्यात वळवायचा. दाऊद सारख्या तस्कारांमुळे आपल्या देश्यातील कोटीपेक्षा जास्त तरुण नशेच्या आहारी गेले, हजारोंच्या संख्येने अपराधी बनले, हे वेगळे. तरीही सिनेसृष्टीने दाऊदचे स्वागत केले. मोठे-मोठे मल्टी स्टारर् सिनेमे बनू लागले, त्यांत बहुतेक वसुली आणि तस्करीचा पैसाच लागत असे, अशी वाच्यता होती.

मनाचा एकांत - काळे पाणी

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 30/09/2016 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
अंदमानातले काळे पाणी, कोलूबेड्याहंटरकदान्न सोबत तीव्र अपमानाचा overtime ! साम्राज्याचा उग्र दर्प अन देशाने केलेली प्रेमळ उपेक्षा....... असे सगळे, अन वरती थोडी जयहिंदची जाळी ! या जीवघेण्या विषाणूजिवाणूंमध्येही, काही काही रक्तांचे malnourishment कि काय ते झालेच नाही! उलट, तुरुंगाच्या अजस्त्र काळभिंतीही त्यांच्या जहालहळव्या लेखणीने cultured झाल्या! मातृभूमीच्या मृत्युंजय विरोत्तमांसाठी, . . . दुसरं काय होता एकांत म्हणजे तरी! - शिवकन्या

मनाचा एकांत - चिमण्या

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 23/09/2016 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
डाव्या हाताच्या मुठी एवढ्या चिमण्या हा हा करतात या जीवघेण्या ओसाडीत.... कुठे दाणे टिपत असतील? कुठे पाणी शोधत असतील? घरटे कुठल्या आडोशाला असेल? यांच्यात यांचे दफन कसे करत असतील? कोण करत असेल? चिमण्या निमित्त असतात............ आपल्याच छाटलेल्या मनाचे हे तासनतास भिरभिरणे असते..... . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! ---- शिवकन्या