रंजीश हि सही

लेखनप्रकार
तसं पाहिलं तर १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली त्यात खूप साऱ्या गोष्टी विभागल्या गेल्या. माणसं, नदी, पर्वत, संस्कृती वेगवेगळ्या झाल्या. पण अश्या काही गोष्टी होत्या ज्यांच विभाजन होणं कधीच शक्य नव्हतं ज्यात भाषा, साहित्य, कला यांचा समावेष होता, नशिबाने राजकीय वैर,वेगळेपण यांचा यावर काहीच प्रभाव पडू शकला नाही, त्यापैकी म्हणजे उर्दू भाषा. जी भारत आणि पाकिस्तान दोन्ही कडे तेवढ्याच आत्मीयतेने लिहिली वाचली जाते. अशाच या उर्दू भाषेचे अहमद फराज हे प्रतिभावान शायर होते. त्यांची गझल जेवढी पाकिस्तानी होती तेवढीच भारतीय सुद्धा.

चुकचुकली पाल एक...!

गीत : चुकचुकली पाल एक, कालचक्र क्षण चुकले नकळत या रात्रीला मी माझे दिन विकले रंग तुझे स्वप्नमयी ल्यालेली ती पहाट धुक्यामधुन मी तुझी शोधियली वाट वाट परि दिशेस पुन्हा पुन्हा वळण नवे का फुटले अशी हरवले तशी मलाच मी अनोळखी इथेतिथे दंवातही तुझीच मूर्ती सारखी गीतातील सूर असे का मधेच पण तुटले तुजवाचून दूर दूर मी अशीच राहणार ही अशीच तव छाया पण मागे धावणार सावल्यांत साऱ्या, या चित्र असे मम कुठले गीत: वसंत निनावे , संगीत श्रीनिवास खळे, गायिका: लता मंगेशकर. वर्ष : १९७६ *** अत्यंत आवडीचे हे गीत कितीही ऐकले तरी 'अजून एकदाच' ऐकल्याशिवाय थांबवत नाही.

असेच काहितरी सुचलेले- फोटो.

लेखनप्रकार
"पप्पा,तुम्ही स्कुल मध्ये जायचे तेंव्हा मोबाईल नव्हते पण kodak camera तर असायचा ना मग तुम्ही त्याने स्कुलचे,स्कुल फ्रेंड्सचे फोटो का काढले नाहीत?" माझ्या मुलाने हा प्रश्न केला आणि मन भुर्रकन शाळेच्या दिवसात गेले. दिवाळी,घरातील कोणाचे तरी लग्न,उरूस आणि जून मध्ये सुरु होणारी शाळा अशा मोजक्याच प्रसंगी मिळणारे नविन कपडे त्यात शाळेचा पांढरा शर्ट,खाकी पँट नविन मिळणे हि सुद्धा एकप्रकारे चैनीची गोष्ट होती. तर वर्षातून दोन-तीनदा मिळणारे कपडे जिथे मुश्किलीने मिळायचे तिथे कॅमेरा कोठून येणार आणि फक्त कॅमेराच नाही तर त्याला लागणारा रोल व त्यानंतर निगेटिव्ह डेव्हलप साठीचा खर्च आवाक्याबाहेरचा होता. असो म

निर्गुणी भजने‬ (भाग २.७) सुनता है गुरु ग्यानी - समाप्त

पूर्ण भजनाचा अर्थ एकत्र लावायचा प्रयत्न केला तर मला हे भजन जीवाची आणि शिवाची भेट कशी घडवावी त्याचे वर्णन वाटते. म्हणून मग जीवाचा सोहं, शिवाचा ओहं आणि या दोघांचा कायम झीनी झीनी वाजत राहणारा बाजा म्हणजे "ओहं सोहं". धृवपदाबद्दल लिहिताना मी याचेच वर्णन, "कायम होत रहाणारा शांत आवाज" असे केले होते. हा जरी कायम चालू असला तरी त्याचे ऐक्य फक्त ज्ञानी साधकाला कळते. आणि मग त्या साधकाचे वर्णन करताना कबीर म्हणतात, सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी | गगन में आवाज हो रही झीनी-झीनी झीनी-झीनी || असा अर्थ मला जास्त सुसंगत वाटतो.

असेच काहितरी सुचलेले

लेखनप्रकार
मंडळी आपल्या लहानपणी सर्वांना आकर्षण असायचे ते दिवाळीला मिळणारे फटाक्यांच्या बरोबर नविन कपड्यांचे कारण फटाके फुटल्यानंतर मोठा आवाज व्हायचा आणि नंतर येणारा धुराचा वास जसा आवडायचा तसाच दिवाळीत अंगावर असणाऱ्या नविन कपड्यांचा सुगंध हा मनाला वेडे करायचा. थोडे मोठे झाल्यावर कधीकधी गावातल्या कोणाच्यातरी लग्नात मोठाल्या पंख्यांवरून सोडलेला अत्तरमिश्रित पाण्याचा फवाराही आवडू लागला नंतर नंतर तर नवरा-नवरी यांच्या आसपास वावरताना कार्यालयातील पंखा नाहीतर आलेला वारा सुद्धा अत्तर,सेंटचा मनमोहक सुगंधी झुळूक द्यायचा. कॉलेजला गेल्यावर चार्ली,डार्लिंग,ब्रुट, स्वीटहार्ट अशी काही नावे कानावर पडू लागली नव्हे त्या

स्क्रिन शॉट भाग - ६

लेखनविषय:
लेखनप्रकार
आतापर्यंत..... विशाल "अभिषाच्या पोस्टवर आम्ही या विषयी सगळे सविस्तर लिहिले असून आतापर्यंत तू निर्दोष आहेस हे जवळपास सगळ्यांनी मान्य केले आहे." हे ऐकून अमितला अतिशय आनंद झाला आपण आता काय बोलावे हे त्याला समजेना. विशाल " आम्हाला सकाळ पर्यंत वेळ दे या प्रकारामागे कोण आहे?

आतां आमोद सुनांस जाले

लेखनप्रकार
अंदाजे सात आठ वर्षांपूर्वी घरच्यांबरोबर आंध्रात फिरायला गेलो होतो. तेंव्हा काळहस्तीश्वर मंदिरात जाण्याचा योग आला होता. तिथून परत आलो आणि एकदा मॅजेस्टिक मध्ये पुस्तकं चाळत असताना "श्री वेंकटेश्वर आणि श्री काळहस्तीश्वर" अश्या नावाचे पुस्तक दिसले. लेखक होते रा चिं ढेरे. तेंव्हा पेपरात त्यांच्या "श्री विठ्ठल एक महासमन्वय" या पुस्तकाची जाहिरात येत होती. कुतूहल होते म्हणून दोन्ही पुस्तके घेतली आणि घरी आलो. वेळ मिळाला तसे विठ्ठलाचे पुस्तक वाचायला काढले. पण मन काही रमेना. मग वेंकटेश्वराचे पुस्तक काढले. तिथेही माझा लेखकाशी सूर जुळेना. म्हणून मग पुस्तके बाजूला ठेवली.

माझ्या मराठी भाषेची ......

लेखनविषय:
माझ्या मराठी भाषेची किती अभेद्य बांधणी किती तोडाल लचके ही तर रणाची रागिणी माझ्या मराठी भाषेची करा एकदा भेट तुम्हा गवसेल जगण्याची नवी पायवाट माझ्या मराठी भाषेत साऱ्या भावनांचे रंग खोली सागराची गोडव्यात वर प्रेमाचा तरंग माझ्या मराठी भाषेत भक्ती शक्तीचा मिलाप अभंग भारुडा संगे गुंजतो पोवाड्याचा आलाप माझ्या मराठी भाषेची माया तुम्हा काय सांगू आई माझ्या सोबती जगी काय मांगु

भाषिक खेळ

लेखनविषय:
लेखनप्रकार
सध्या आम्ही भाषेशी, खास करून उच्चारांशी संबंधित खेळ खेळतोय. मागे कधीतरी लेकीने आणि खेळायला घरी आलेल्या भाचे मंडळींनी “कंटाळा आला”चं पालुपद सुरू केलं. मग त्यांना म्हटलं, हे वाक्य सलग दहा वेळा म्हणून दाखवायचं... न चुकता... म्हणा... A good cook, could cook good. हं. करा सुरूवात. झालं. सगळ्यांनी उत्साहात सुरूवात केली आणि मग पहिल्या दुसऱ्या, तिसऱ्या प्रयत्नात सगळ्यांचं गुड-गुड-गुड ऐकू येऊ लागलं आणि खिदळायला सुरूवात... आई/मावशी अजून सांग ना... सांगते. पण आधी याचा सराव करा. थोडा वेळ त्यांचे प्रयत्न सुरू राहिले. मोठी भाची सातव्या इयत्तेत. भाचा आणि लेक, दोघंही दुसऱ्या इयत्तेत.

< < < < मजबूरी हय > > > >

मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू!
Subscribe to भाषा