मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विरंगुळा

कार्यकारणभाव (लघुकथा)

मराठी कथालेखक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
वैताग नुसता वैताग.. घरातल्यांनी नुसता वैताग आणला आहे. माणसाने बुद्धीने चालावे की अंधश्रद्धेने ? आयुष्याची तिशी ओलांडल्यावर पहिली कार घेणार आहे तर घरच्यांनी हे तारे तोडावेत ? बायको म्हणतेय "अहो.. माझ्या बाबांनी सुचवलं आहे, गाडीच्या क्रमांकाची बेरीज ७ यायला हवी. ७ अंक आपल्या दोघांकरिताही शुभ आहे" इकडे बाबा म्हणतायत "अरे गाडी घ्यायचीच तर किमान दोन महिने थांब. सध्याची ग्रहस्थिती तुला अनुकुल नाही".. निवृत्तीनंतर बाबांना ज्योतिषशास्त्राने तर सासर्‍यांना न्युमरोलोजीने पछाडले. तर आईची अजूनच वेगळी तर्‍हा "अरे आपल्या कुटूंबात कुणाला चार चाकी वाहन लाभत नाही रे.

मॅच-फिक्सिंग

कुमार जावडेकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
(क्रिकेटमधलं मॅच फिक्सिंग जेव्हा २००० साली दिल्ली पोलिसांना दिलेल्या हॅन्सी क्रोनिएच्या कबुलीतून जाहीर झालं, त्यावेळी - १२ एप्रिल २००० या दिवशी - मी ही कथा लिहिली होती 'लोकमत. पुणे'मध्ये .) गुलमोहर सोसायटीच्या कमानीतून मी कमीत कमी वेगानं आत गाडी वळवली, जवळ-जवळ थांबलोच म्हणा ना. असं केलं ना की तिथे खेळणाऱ्या मुलांचं लक्ष वेधलं जातं (गाडीचा हॉर्न न वाजवताही. हे महत्त्वाचं. फक्त आपल्यात थांबायची तयारी हवी.).... बोलर आपण लांबच लांब आपला रन-अप धुंडाळत जातो. मिड-ऑफचा लाँग-ऑफ होतो आणि फॉरवर्ड शॉर्टलेगचा बॅकवर्ड. जेव्हा जेव्हा एखादी गाडी आत वळते, तेव्हा तेव्हा असंच फील्ड सेटिंग बदलतं.

मोगँबो - ६

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काहितरी करायलाच हवे, त्या खोलीला एक खिडकी होती . ती उघडायचा प्रयत्न केला. पण एकदम ज्याम होती. कधी उघडलीच नसावी. त्या खोलीत एक पलंग त्यावर मळकट चादर आणि एक बाथरूम होते. मला बसायला एक तोडकी मोडकी खुर्ची. तो माणूस यायच्या आत इथून पळून जायला हवे. खिडकी उघडतच नव्हती इथून बाहेर जायचा काहीतरी मार्ग शोधायलाच हवा. मी दारापाशीच उभी राहिले..
मागील दुवा : http://misalpav.com/node/46314 किती वेळ गेला असेल माहीत नाही. मी तशीच दाराच्या जवळ उभी राहिले. जिन्यावर कोणाची तरी पावले वाजली. दाराची कडी उघडल्याचा आवाज. हाच एक क्षण हीच एक संधी. अखेरची.

मोगँबो - ५

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तिथल्या माणसानेअगोदर मला जवळजवळ हाकलूनच दिले. बराच वेळ थांबल्यावर त्याला माझी दया आली असावी. त्याने आतल्या एका माणसाला विचारले आतल्या माणसाने परळ च्या पोस्ट ऑफिसात विचारा परळचे पोस्ट ऑफिस उद्या सकाळी उघडेल म्हणून सांगीतले. मी पुन्हा दादर स्टेशनवर आले. त्याच प्लॅटफॉर्मवर रंजन ताईची वाट पहात राहिले. रंजन ताई जीना उतरत कोणाबरोबर तरी येत होती.
रंजन ताईने मला हात केला. मीही केला. तीच्या सोबत असलेल्या दाट कुरळे केस , असलेल्या त्या काळ्या कुळकुळीत माणसाशी ती कसल्याशा कानडी भाषेत बोलत होती. तो माझ्या कडे बघत मान हलवत होता. रंजन ताईने मग माझ्याशी ओळख करून दिली.

ज्ञान आणि मनोरंजन : चित्रखेळ

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रत्येक चित्रातील म्हण ओळखा. चित्र व शब्दांचा क्रम जुळला पाहिजे. ok

मोगँबो - ४

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तीने हात जोडले थ्यांक्यू दादा. दोन दिवस झाले काहीतरी खाऊन . गावाहून आले. हातातली पर्स कुणीतरी चोरली. येताना आणले होते ते थोडेसे पैसे होते तेही नाहीसे झाले. काल दिवसभर तशीच बसून होते. पोटात अन्नाचा कण नव्हता. तुम्ही देवासारखे आलात. ती काय म्हणत होती ते आम्हाला अर्धवटच ऐकायला येत होते. तीची अवस्था बघवत नव्हती.आम्हालाच कसेतरी होत होते. भरपूर आजारी असावी . अंगात ताप जाणवत होता. डोळ्यातून पाणी वहात होते मधूनच हुंदके देत रडत होती. रडतारडताच बोलत होती.
मागील दुवा : http://misalpav.com/node/46300 घरात मी, धाकटा भाउ लाला. आई आणि बाबा. बाबाची थोडीशी शेती.

मोगँबो - ३

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
वर्गाच्या दारातून एक त्यांच्याच वयाची असेल …. एक मुलगी आत आली. सावळीशी ,पण खारदाणा वाटावा इतकी भरपूर पावडर लावलेला चेहेरा. टाईट जीन्स वर तसलाच अर्धा टॉप. लालभडक लिपस्टीक. लांब मोकळेच असलेले केस. डोळ्यात भरपूर काजळ. " मित्रानो ही आशा. माझी धाकटी बहीण…. आशा हे माझे मित्र" सारंगने सगळ्यांशी तीची ओळख करून दिली. तीला पहाताच सगळ्यांचेच आ वासले गेले. जे घडतंय ते त्यांच्या कल्पनेबाहेरचेच.. मीनाचा चेहेरा तर एकदम पांढरा फटक्क पडला.
मागील दुवा : http://misalpav.com/node/46262 नक्की काय चाललय कोणालाच कळत नव्हते. सारंग च्या सोबत आलेली मुलगी , तीला मुलगी तरी कसे म्हणायचे.

पार्टी

निखिल माने ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
३१/१२/२०१९ वेळ:संध्याकाळ अजून घेणार आहेस नको, उद्या त्रास होईल काही नाही होत रे, हाच प्रॉब्लेम असतो तुम्हा कधीतरी करणाऱ्यांचा. फार थोडक्यात आटपता. अरे काय करू तुझ्या सारखे आम्ही पिढीजात नाही, आमच्या वंशावळीत हे सेवन करणारे आम्ही पहिलेच, त्यामुळं जपून करावं लागत. घरी कळलं तर पिताश्री हाकलून काढतील. हो यार, पाहिलंय तुझ्या घरात मी. एकदा चुकून नाव काढलं तरी तुझा बाप मी धर्म भ्रष्ट केला असं बघत होता. जाऊदे आज तुझे बाबा कंपनी द्यायला नाहीयेत? अरे आई बरोबर गावी गेलेत. नाहीतर दोघांनीही मस्त कंपनी दिली असती.

मोगँबो - २

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हा सारंग ना नेहमी असेच करतो. ढोलकीवाल्याला आणायला दुसर्‍या कोणाला पाठवलं असते तर निदान तो तरी मिळाला असत अगिटारवर. हा कार्यक्रम होऊन जाऊदेत मग बघु या त्याला. "अरे हे आपण दरवेळी ठरवतो आणि होतं काय! कार्यक्रम झाला की सारंगसाहेब अभिनंदन स्वीकारत बसतात. आणि आपण लोकांना दिसतही नाही. " मीनाच्या बोलण्यात तक्रारीपेक्षाही कौतूकाचाच सूर होता. तीच काय पण सारंग बद्दल कोणीही तसेच बोलायचा. होताच तसा तो.
मागील दुवा : http://misalpav.com/node/46242 मीना च्या बोलण्यात तथ्य आहे या अर्थाने सर्वांनीच माना डोलावल्या.

कृतघ्न -5

बाप्पू ·
याआधीचे भाग भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 भाग 3: https://www.misalpav.com/node/46183 भाग 4: https://www.misalpav.com/node/46203 आता पुढे माऊली विचारात पडला कि या बाबतीत स्वतः हस्तक्षेप करावा कि नाही, रामदास ला तुकाराम च्या भरोश्यावर सोडून द्यावे कि आपण मदत करावी. मुलांच्या आणि बायकोच्या कानावर हि गोष्ट कळली तेव्हा त्यांनी या भानगडीत न पडण्याचा सल्ला दिला. त्यांचं तरी काय चुकीचं होत?? ज्यावेळी संधी होती तेव्हा रामदास ने सर्व विसरून चुकीच्या माणसांना निवडले आणि आता वाईट वेळेत आता आपण कश्याला मदत करावी?