मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चांगल्या बातम्या - एक उपक्रम!

राघव ·

चित्रगुप्त 11/08/2025 - 06:54
उत्तम आणि अत्यंत गरजेचे आहे असे करणे.... आणि अवघडही आहे जरा. कारण 'चांगल्या' बातम्या आपल्यापर्यंत फार कमी प्रमाणात पोचत असतात. 'बातम्या' या प्रकारात यूट्यूबवरील विडियोंचा समावेश केला तर ते जास्त सोपे आणि शक्य आहे असे वाटते. --- धागकर्त्यास ' बातमी' यात शब्दातून काय काय अभिप्रेत आहे ? फक्त अगदी 'ताजी' - आजची-आत्ताची खबर, की केंव्हाचीही ('कालची' पासून हजारो वर्षांपूर्वीची सुद्धा ?) -- तसेच 'चांगली' म्हणजे काय, याचेही विवेचन करावे. उदा. "अमुक इतक्या लोकांचे धर्मांतरण करण्यात आले" ही बातमी एका समूहासाठी चांगली, तर दुसर्‍यासाठी वाईट ठरत असते. माझ्या घरात झालेली चोरी माझ्यासाठी वाईट, तर त्या चोराच्या घरात चांगली बातमी असते. -- अमूक हत्तीणीला कुठे ठेवणे 'चांगले' याबद्दल दोन-तीन तटात वेगवेगळी मते असतात. खुद्द त्या हत्तीणीला काय वाटते, देवास ठाऊक. 'सर्वांसाठीच चांगले' असे काही घडणे प्रत्यक्षात शक्य असते का, हा संशोधनाचा विषय ठरावा. ( तर त्यावर संशोधन चालू आहे" - इति पांडुरंग सांगवीकर) असो. प्रथमाग्रासे मक्षिपात नको. तर धागार्त्याने स्वतःच अश्या चांगल्या बातम्या देण्याची सुरुवात करावी, हेच श्रेयस्कर. वाट बघतो आहे.

चित्रगुप्त काकांशी सहमत. चांगले वाईट हे परस्पेक्टीव चा विषय आहे आणि त्यातही राजकारणामुळे क्लस्टरिंग इतके टोकाचे झाले आहे की कोणत्याही विषयात दोन गट पडलेले च आहेत. तुमच्यासाठी जी चांगली बातमी असेल ती 2 नंबर साठी वाईट बातमी असू शकेल. किंबहुना असेलच. आणि हे लोकं कोठेही ओढून ताणून राजकारण आणणारच आहेत. तस्मात् चांगलं वाईट असं काहीही न मानता आपण अलिप्तपणे हा संसाराचा रिॲलिटी शो एन्जॉय करुयात.

गवि 12/08/2025 - 10:54
कल्पना उत्तम आहे. असा संवाद इथे अवश्य घडावा. तुमच्या प्रस्तावात माझे दोन आणे ॲडवायचे झाल्यास.. चांगल्या बातम्या आपल्यापर्यंत पोचणे तसे दुर्मिळ आणि अवघडच आहे कारण विविध प्रस्थापित माध्यमे हीच आपला स्रोत आहेत. मनुष्यस्वभावातच कुठेतरी ही सुप्त प्रवृत्ती आहे, की संकट, आपत्ती, दुर्घटना (इतरांच्या बाबतीत घडलेली) यातच त्यांना रस असतो आणि त्यातच बातमीमूल्य असते. काही बरे घडले तर ती बातमी मिळमिळीत वाटू लागते. ब्रेकिंग न्यूज असे ओरडत लालभडक रंगाच्या पार्श्वभूमीवर मृतांचे आकडे, मृतांत किती महिलांचा समावेश, पडझड आणि नुकसानाची (आमच्या वार्ताहराने जीव धोक्यात घालून टिपलेली) एक्स्लूझिव चित्रे.. असे सर्व दाखवण्यात मिळणारा टी आर पी चांगल्या बातमीत नाहीसा होती. माकडाच्या हाती शॅम्पेन हे नाटक काळा विनोद करता करता भेदक रीतीने हे वास्तव समोर आणते. असो. तर माझा प्रस्ताव असा की याच सोबत आपल्याला थेट दिसलेल्या चांगुलपणाच्या घटना, आपल्याला थेट कोणीतरी दाखवलेला सज्जनपणा, सच्चेपणा, प्रामाणिकपणा.. अशाही घटना लिहील्या तर आपणच सिटीझन रिपोर्टर बनू. चांगल्या बातम्यांचे. आपला प्रत्यक्ष काही सहभाग असेल नसेल, केवळ एखादा प्रसंग डोळ्यासमोर घडला असला, इतर कोणाच्या बाबतीत, तरीही तो लिहावा.

विवेकपटाईत 12/08/2025 - 11:51
चांगल्या बातम्यांसाठी दिशांनिर्देश ठरविले जाऊ शकतात. 1. भारतीय उद्योगांबाबत सकारात्मक लेख. 2. शेतीत नवीन प्रयोग करणार्‍यांच्या बाबतीत लेख 3. नव्या स्टार्ट अप संबंधित लेख 4. भारतात होणारे नवीन शोध इत्यादि बाबत 5. सकारात्मक सामाजिक लेख शिक्षा पर्यावरण इतिहास विज्ञान इत्यादि इत्यादि 6. लेखाच्या संदर्भात सोबत बातम्यांच्या लिंक , यूट्यूब लिंक इत्यादि

राघव 13/08/2025 - 16:59
आपल्या प्रतिसादांसाटी मनःपूर्वक धन्यवाद! चित्रगुप्त: अगदी ताज्याच नाही, जुन्याही चांगल्या बातम्या मांडल्यात तर काही हरकत नसावी. व्हिडियोज देखील चालू शकतील. पण बातमी बद्दल आपण दोन-तीन ओळीत संक्षिप्त माहिती देणं गरजेचं आहे. कारण नुसत्या लिंका डकवण्याचा काही उपयोग होत नाही. संक्षिप्त माहितीवरून मग कुणाला पुढे खोलात जाऊन बातमी वाचायची असेल तर तसं सोयीचं होईल. होय, सुरुवात मीच करेन. बाकी सगळे हातभार लावतीलच! :-) चित्रगुप्त, प्रसादः चांगलं/वाईट हे सापेक्ष आहे हे खरं. म्हणूनच त्याची व्याख्या मला करत बसायची नाहीये! विवेक आणि तारत्म्य वापरून कुणालाही हे समजेलंच की अभिप्रेत काय आहे ते. वादंगाचा धुरळा उडवण्याची मजा अनेक धाग्यात घेतंच असतो आपण. त्यामुळे व्याख्येवर खल करण्याच्या बाबतीत आपला पास! :-) राजकारण हा विषयच नको हे त्यासाठीच म्हटलंय. फार वाद होतात आणि धाग्याचा खफ होतो. चांगले प्रतिसाद देखील त्यात शोधत बसावे लागतात. त्यामुळे कुणी जर तसं काही करत असेल तर त्यासाठी संपादकांचं सहाय्य घेणं आलं. गवि:
तर माझा प्रस्ताव असा की याच सोबत आपल्याला थेट दिसलेल्या चांगुलपणाच्या घटना, आपल्याला थेट कोणीतरी दाखवलेला सज्जनपणा, सच्चेपणा, प्रामाणिकपणा.. अशाही घटना लिहील्या तर आपणच सिटीझन रिपोर्टर बनू. चांगल्या बातम्यांचे. आपला प्रत्यक्ष काही सहभाग असेल नसेल, केवळ एखादा प्रसंग डोळ्यासमोर घडला असला, इतर कोणाच्या बाबतीत, तरीही तो लिहावा.
हे फारच छान आहे. तसे करता येत असेल तर खूपच छान. नक्कीच आनंद होईल! :-) विवेकपटाईत: तुम्ही सुचवलेले बिंदुगामी उत्तम आहेत. जरूर टाकायला हवेत. पण बातमी बद्दल आपण दोन-तीन ओळीत संक्षिप्त माहिती देणं मात्र गरजेचं आहे. त्याशिवाय नुसत्या लिंका डकवण्यात काही उपयोग नाही. बघुयात. एक-दोन दिवसांत वेगळा धागा सुरु करतो. पुनःश्च धन्यवाद! शुभम्

चित्रगुप्त 13/08/2025 - 20:55
आगामी नवीन धाग्याच्या विविध प्रतिसादांमधून काही चांगले, आनंददायक, श्रवणीय, प्रेक्षणीय, शान्ति -समाधान देणारे, सकारात्मक भावना निर्माण करणारे असे वाचायला -बघायला - ऐकायला मिळावे, असेच ना ?

चित्रगुप्त 11/08/2025 - 06:54
उत्तम आणि अत्यंत गरजेचे आहे असे करणे.... आणि अवघडही आहे जरा. कारण 'चांगल्या' बातम्या आपल्यापर्यंत फार कमी प्रमाणात पोचत असतात. 'बातम्या' या प्रकारात यूट्यूबवरील विडियोंचा समावेश केला तर ते जास्त सोपे आणि शक्य आहे असे वाटते. --- धागकर्त्यास ' बातमी' यात शब्दातून काय काय अभिप्रेत आहे ? फक्त अगदी 'ताजी' - आजची-आत्ताची खबर, की केंव्हाचीही ('कालची' पासून हजारो वर्षांपूर्वीची सुद्धा ?) -- तसेच 'चांगली' म्हणजे काय, याचेही विवेचन करावे. उदा. "अमुक इतक्या लोकांचे धर्मांतरण करण्यात आले" ही बातमी एका समूहासाठी चांगली, तर दुसर्‍यासाठी वाईट ठरत असते. माझ्या घरात झालेली चोरी माझ्यासाठी वाईट, तर त्या चोराच्या घरात चांगली बातमी असते. -- अमूक हत्तीणीला कुठे ठेवणे 'चांगले' याबद्दल दोन-तीन तटात वेगवेगळी मते असतात. खुद्द त्या हत्तीणीला काय वाटते, देवास ठाऊक. 'सर्वांसाठीच चांगले' असे काही घडणे प्रत्यक्षात शक्य असते का, हा संशोधनाचा विषय ठरावा. ( तर त्यावर संशोधन चालू आहे" - इति पांडुरंग सांगवीकर) असो. प्रथमाग्रासे मक्षिपात नको. तर धागार्त्याने स्वतःच अश्या चांगल्या बातम्या देण्याची सुरुवात करावी, हेच श्रेयस्कर. वाट बघतो आहे.

चित्रगुप्त काकांशी सहमत. चांगले वाईट हे परस्पेक्टीव चा विषय आहे आणि त्यातही राजकारणामुळे क्लस्टरिंग इतके टोकाचे झाले आहे की कोणत्याही विषयात दोन गट पडलेले च आहेत. तुमच्यासाठी जी चांगली बातमी असेल ती 2 नंबर साठी वाईट बातमी असू शकेल. किंबहुना असेलच. आणि हे लोकं कोठेही ओढून ताणून राजकारण आणणारच आहेत. तस्मात् चांगलं वाईट असं काहीही न मानता आपण अलिप्तपणे हा संसाराचा रिॲलिटी शो एन्जॉय करुयात.

गवि 12/08/2025 - 10:54
कल्पना उत्तम आहे. असा संवाद इथे अवश्य घडावा. तुमच्या प्रस्तावात माझे दोन आणे ॲडवायचे झाल्यास.. चांगल्या बातम्या आपल्यापर्यंत पोचणे तसे दुर्मिळ आणि अवघडच आहे कारण विविध प्रस्थापित माध्यमे हीच आपला स्रोत आहेत. मनुष्यस्वभावातच कुठेतरी ही सुप्त प्रवृत्ती आहे, की संकट, आपत्ती, दुर्घटना (इतरांच्या बाबतीत घडलेली) यातच त्यांना रस असतो आणि त्यातच बातमीमूल्य असते. काही बरे घडले तर ती बातमी मिळमिळीत वाटू लागते. ब्रेकिंग न्यूज असे ओरडत लालभडक रंगाच्या पार्श्वभूमीवर मृतांचे आकडे, मृतांत किती महिलांचा समावेश, पडझड आणि नुकसानाची (आमच्या वार्ताहराने जीव धोक्यात घालून टिपलेली) एक्स्लूझिव चित्रे.. असे सर्व दाखवण्यात मिळणारा टी आर पी चांगल्या बातमीत नाहीसा होती. माकडाच्या हाती शॅम्पेन हे नाटक काळा विनोद करता करता भेदक रीतीने हे वास्तव समोर आणते. असो. तर माझा प्रस्ताव असा की याच सोबत आपल्याला थेट दिसलेल्या चांगुलपणाच्या घटना, आपल्याला थेट कोणीतरी दाखवलेला सज्जनपणा, सच्चेपणा, प्रामाणिकपणा.. अशाही घटना लिहील्या तर आपणच सिटीझन रिपोर्टर बनू. चांगल्या बातम्यांचे. आपला प्रत्यक्ष काही सहभाग असेल नसेल, केवळ एखादा प्रसंग डोळ्यासमोर घडला असला, इतर कोणाच्या बाबतीत, तरीही तो लिहावा.

विवेकपटाईत 12/08/2025 - 11:51
चांगल्या बातम्यांसाठी दिशांनिर्देश ठरविले जाऊ शकतात. 1. भारतीय उद्योगांबाबत सकारात्मक लेख. 2. शेतीत नवीन प्रयोग करणार्‍यांच्या बाबतीत लेख 3. नव्या स्टार्ट अप संबंधित लेख 4. भारतात होणारे नवीन शोध इत्यादि बाबत 5. सकारात्मक सामाजिक लेख शिक्षा पर्यावरण इतिहास विज्ञान इत्यादि इत्यादि 6. लेखाच्या संदर्भात सोबत बातम्यांच्या लिंक , यूट्यूब लिंक इत्यादि

राघव 13/08/2025 - 16:59
आपल्या प्रतिसादांसाटी मनःपूर्वक धन्यवाद! चित्रगुप्त: अगदी ताज्याच नाही, जुन्याही चांगल्या बातम्या मांडल्यात तर काही हरकत नसावी. व्हिडियोज देखील चालू शकतील. पण बातमी बद्दल आपण दोन-तीन ओळीत संक्षिप्त माहिती देणं गरजेचं आहे. कारण नुसत्या लिंका डकवण्याचा काही उपयोग होत नाही. संक्षिप्त माहितीवरून मग कुणाला पुढे खोलात जाऊन बातमी वाचायची असेल तर तसं सोयीचं होईल. होय, सुरुवात मीच करेन. बाकी सगळे हातभार लावतीलच! :-) चित्रगुप्त, प्रसादः चांगलं/वाईट हे सापेक्ष आहे हे खरं. म्हणूनच त्याची व्याख्या मला करत बसायची नाहीये! विवेक आणि तारत्म्य वापरून कुणालाही हे समजेलंच की अभिप्रेत काय आहे ते. वादंगाचा धुरळा उडवण्याची मजा अनेक धाग्यात घेतंच असतो आपण. त्यामुळे व्याख्येवर खल करण्याच्या बाबतीत आपला पास! :-) राजकारण हा विषयच नको हे त्यासाठीच म्हटलंय. फार वाद होतात आणि धाग्याचा खफ होतो. चांगले प्रतिसाद देखील त्यात शोधत बसावे लागतात. त्यामुळे कुणी जर तसं काही करत असेल तर त्यासाठी संपादकांचं सहाय्य घेणं आलं. गवि:
तर माझा प्रस्ताव असा की याच सोबत आपल्याला थेट दिसलेल्या चांगुलपणाच्या घटना, आपल्याला थेट कोणीतरी दाखवलेला सज्जनपणा, सच्चेपणा, प्रामाणिकपणा.. अशाही घटना लिहील्या तर आपणच सिटीझन रिपोर्टर बनू. चांगल्या बातम्यांचे. आपला प्रत्यक्ष काही सहभाग असेल नसेल, केवळ एखादा प्रसंग डोळ्यासमोर घडला असला, इतर कोणाच्या बाबतीत, तरीही तो लिहावा.
हे फारच छान आहे. तसे करता येत असेल तर खूपच छान. नक्कीच आनंद होईल! :-) विवेकपटाईत: तुम्ही सुचवलेले बिंदुगामी उत्तम आहेत. जरूर टाकायला हवेत. पण बातमी बद्दल आपण दोन-तीन ओळीत संक्षिप्त माहिती देणं मात्र गरजेचं आहे. त्याशिवाय नुसत्या लिंका डकवण्यात काही उपयोग नाही. बघुयात. एक-दोन दिवसांत वेगळा धागा सुरु करतो. पुनःश्च धन्यवाद! शुभम्

चित्रगुप्त 13/08/2025 - 20:55
आगामी नवीन धाग्याच्या विविध प्रतिसादांमधून काही चांगले, आनंददायक, श्रवणीय, प्रेक्षणीय, शान्ति -समाधान देणारे, सकारात्मक भावना निर्माण करणारे असे वाचायला -बघायला - ऐकायला मिळावे, असेच ना ?
नमस्कार मिपाकर्स! खूप दिवसांपासून मनात एक विचार घोळतोय. येथे त्याबद्दल थोडी चर्चा कराविशी वाटली. आपल्याकडील मिडिया अट्टाहासानं नकारात्मक बातम्या देतांना आढळतो. टीव्ही पाहणं बंद करून टाकावं इतकं ते नकारात्मक असतं, मनांवर वाईट परिणाम करणारं असतं. खासकरून जेव्हा आपण आपल्या परिवारासमवेत टीव्ही पाहत असतो त्यावेळेस हे ठळकपणे जाणवतं. अगदी वर्तमानपत्रातून देखील एखादी सकारात्मक, सर्जनशील बातमी शोधून काढावी लागते. आणि बर्‍याचशा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत हेही तेवढंच खरं. म्हणून एक उपक्रम सुरु करावासा वाटला. चांगल्या, सकारत्मक, सर्जनशील बातम्या/माहिती पुढे आणण्याचा.

बंगळुरू- उटी- ईशा आदियोगी- कोची- कन्याकुमारी- रामेश्वरम- पाँडेचेरी- चेन्नै सायकल प्रवास

मार्गी ·

मार्गी 23/08/2025 - 12:36
बंगलोरला जाऊन व्हायरल फीवरचा त्रास झाला. तब्येत बिघडली. त्यामुळे हा सायकल प्रवास करता आला नाही. मैदानात उतरायच्या आधीच इंज्युरी असं झालं. पॅक करून नेलेली सायकल तशीच आणावी लागली. एक पेडलही सायकलिंगचा आनंद घेता आला नाही! हा प्रवास जानेवारीमध्ये करेन. धन्यवाद.

In reply to by मार्गी

गणेशा 25/08/2025 - 20:12
अरे रे... नक्कीच दुप्पट उत्साहाने तुम्ही जानेवारी मध्ये हा आनंद घेताल.. कदाचित या पावसाच्या वातावरणा पेक्षा तेंव्हाच्या थंडीत तुम्हाला आणखीन छान वाटेल.. अनेक शुभेच्छा!

मार्गी 04/02/2026 - 16:33
नमस्कार. हा सायकल प्रवास १२ जानेवारीला बंगळूरवरून सुरू केला आणि योजनेप्रमाणे ३१ जानेवारीला चेन्नैला थिऑसॉफिकल सोसायटीमध्ये पूर्ण झाला! ह्या वेळी काहीच अडचण आली नाही. पूर्ण झाल्यावर तर विश्वास बसत नव्हता! Yoga for fitness साठीचा 20 दिवसांचा बंगळुर- उटी- ईशा आदि योगी- कोची- कन्याकुमारी- रामेश्वरम- तंजावर- पाँडेचेरी- चेन्नै असा हा 1861 किमीचा सायकल होता. प्रत्येक दिवशीचे अनुभव, भेट दिलेल्या १० योग संस्था व इतर संस्था, योग साधकांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत झालेला संवाद ह्याबद्दल सविस्तर लिहीणारच आहे. सायकल प्रवास पूर्ण झाल्यावर लगेचच चेन्नैमध्ये माझी बहीण- अदिती वेलणकर शास्त्री हिने मला प्रश्न विचारले व सविस्तर चर्चा केली. त्या चर्चेमध्ये ह्या सायकल प्रवासाचं सगळं डिकोडिंग आहे. हा सायकल प्रवास का केला, काय उद्दिष्ट होतं, काय अडचणी होत्या, तयारी कशी केली, भाषेची अडचण, कठिण प्रसंग इ. मुद्दे ह्या चर्चेत आले आहेत. सायकल प्रवास कसा झाला ह्याची उत्सुकता असेल तर नक्की ही चर्चा बघू शकता किंवा ऐकू शकता! ह्या विषयाची आवड असलेल्यांसोबत शेअरही करू शकता. धन्यवाद. युट्युबवर इथे बघता येईल. स्पॉटिफायवर इथे ऐकता येईल. आणि काही निवडक फोटोज व प्रवासामधले अपडेटस इथे बघता येतील. धन्यवाद! -निरंजन वेलणकर 09422108376

कंजूस 04/02/2026 - 18:39
अभिनंदन . पण त्या थिऑसॉफिकल सोसायटीमध्ये प्रवेश मिळाला कारण बहिण सभासद असेल. आम्ही सप्टेंबरमध्ये (२०२५) गेलो तर तशी पाटीच होती. करोना सुरू झाल्यापासून प्रवेश बंदी आहे सामान्य पर्यटकांना. यूट्यूबवरचे विडिओ सवडीने बघेनच. सायकलवर सगळे सामान घेऊन अठराशे किमी प्रवास करणे अवघडच आहे.

मार्गी 12/02/2026 - 17:01
नमस्कार. निरामय योग प्रसार संशोधन संस्थेच्या पुणे सदस्यांसोबत अनुभव कथनाचा एक छोटा कार्यक्रम झाला. तो इथे ऐकता येईल. त्यामध्ये प्रवासासंदर्भात मुख्य बाबींवर चर्चा करता आली. निरामय संस्थेसाठी त्याचं फलित काय होतं, संस्थांचे अनुभव कसे होते अशी सविस्तर प्रश्नोत्तरं त्यात होती. लवकरच प्रवासाचे अनुभव लिहायला सुरूवात करणार आहे. धन्यवाद. @कंजूस जी, नाही तसं नाही. निरामय संस्थेतर्फे आधी सर्व योग संस्थांना संपर्क केला होता. आणि फॉलो अप घेतला होता. त्यामुळे थिऑसॉफिकल ला भेट देता आली. पण अन्यथा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तिथे सहज असं जाता येत नसावं. धन्यवाद.

मार्गी 23/08/2025 - 12:36
बंगलोरला जाऊन व्हायरल फीवरचा त्रास झाला. तब्येत बिघडली. त्यामुळे हा सायकल प्रवास करता आला नाही. मैदानात उतरायच्या आधीच इंज्युरी असं झालं. पॅक करून नेलेली सायकल तशीच आणावी लागली. एक पेडलही सायकलिंगचा आनंद घेता आला नाही! हा प्रवास जानेवारीमध्ये करेन. धन्यवाद.

In reply to by मार्गी

गणेशा 25/08/2025 - 20:12
अरे रे... नक्कीच दुप्पट उत्साहाने तुम्ही जानेवारी मध्ये हा आनंद घेताल.. कदाचित या पावसाच्या वातावरणा पेक्षा तेंव्हाच्या थंडीत तुम्हाला आणखीन छान वाटेल.. अनेक शुभेच्छा!

मार्गी 04/02/2026 - 16:33
नमस्कार. हा सायकल प्रवास १२ जानेवारीला बंगळूरवरून सुरू केला आणि योजनेप्रमाणे ३१ जानेवारीला चेन्नैला थिऑसॉफिकल सोसायटीमध्ये पूर्ण झाला! ह्या वेळी काहीच अडचण आली नाही. पूर्ण झाल्यावर तर विश्वास बसत नव्हता! Yoga for fitness साठीचा 20 दिवसांचा बंगळुर- उटी- ईशा आदि योगी- कोची- कन्याकुमारी- रामेश्वरम- तंजावर- पाँडेचेरी- चेन्नै असा हा 1861 किमीचा सायकल होता. प्रत्येक दिवशीचे अनुभव, भेट दिलेल्या १० योग संस्था व इतर संस्था, योग साधकांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत झालेला संवाद ह्याबद्दल सविस्तर लिहीणारच आहे. सायकल प्रवास पूर्ण झाल्यावर लगेचच चेन्नैमध्ये माझी बहीण- अदिती वेलणकर शास्त्री हिने मला प्रश्न विचारले व सविस्तर चर्चा केली. त्या चर्चेमध्ये ह्या सायकल प्रवासाचं सगळं डिकोडिंग आहे. हा सायकल प्रवास का केला, काय उद्दिष्ट होतं, काय अडचणी होत्या, तयारी कशी केली, भाषेची अडचण, कठिण प्रसंग इ. मुद्दे ह्या चर्चेत आले आहेत. सायकल प्रवास कसा झाला ह्याची उत्सुकता असेल तर नक्की ही चर्चा बघू शकता किंवा ऐकू शकता! ह्या विषयाची आवड असलेल्यांसोबत शेअरही करू शकता. धन्यवाद. युट्युबवर इथे बघता येईल. स्पॉटिफायवर इथे ऐकता येईल. आणि काही निवडक फोटोज व प्रवासामधले अपडेटस इथे बघता येतील. धन्यवाद! -निरंजन वेलणकर 09422108376

कंजूस 04/02/2026 - 18:39
अभिनंदन . पण त्या थिऑसॉफिकल सोसायटीमध्ये प्रवेश मिळाला कारण बहिण सभासद असेल. आम्ही सप्टेंबरमध्ये (२०२५) गेलो तर तशी पाटीच होती. करोना सुरू झाल्यापासून प्रवेश बंदी आहे सामान्य पर्यटकांना. यूट्यूबवरचे विडिओ सवडीने बघेनच. सायकलवर सगळे सामान घेऊन अठराशे किमी प्रवास करणे अवघडच आहे.

मार्गी 12/02/2026 - 17:01
नमस्कार. निरामय योग प्रसार संशोधन संस्थेच्या पुणे सदस्यांसोबत अनुभव कथनाचा एक छोटा कार्यक्रम झाला. तो इथे ऐकता येईल. त्यामध्ये प्रवासासंदर्भात मुख्य बाबींवर चर्चा करता आली. निरामय संस्थेसाठी त्याचं फलित काय होतं, संस्थांचे अनुभव कसे होते अशी सविस्तर प्रश्नोत्तरं त्यात होती. लवकरच प्रवासाचे अनुभव लिहायला सुरूवात करणार आहे. धन्यवाद. @कंजूस जी, नाही तसं नाही. निरामय संस्थेतर्फे आधी सर्व योग संस्थांना संपर्क केला होता. आणि फॉलो अप घेतला होता. त्यामुळे थिऑसॉफिकल ला भेट देता आली. पण अन्यथा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तिथे सहज असं जाता येत नसावं. धन्यवाद.
सर्वांना नमस्कार. लवकरच दक्षिण भारतामध्ये सायकल प्रवास करणार आहे. परभणीतली संस्था- निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र ह्यांच्या वतीने "Yoga for fitness" अभियानामध्ये हे सोलो सायकलिंग करणार आहे. दक्षिण भारतात सायकलिंग करायचं होतं. आणि आवडीबरोबर सायकलच्या माध्यम म्हणून असलेल्या क्षमतेचा वापर करत एखादा विचार घेऊन लोकांसोबत संवाद करावा असं‌ वाटत होतं. २०१८ मध्ये परभणीच्याच निरामयतर्फे मराठवाड्यामध्ये ५०० किमीचा एक सायकल प्रवास केला होताच. त्यावेळी त्यामुळे झालेल्या भेटी, संवाद आणि एकूण परिणाम माहिती‌ होता. संस्थेनेही ह्यामध्ये रस घेतला आणि अशी ही मोहीम ठरली.

रहें ना रहें हम महका करेंगे... एका गीताचे अनेक प्रतिध्वनी!

मार्गी ·

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

फूल खिले है गुलशन गुलशन मध्ये तबस्सुम यांनी आर डी ची मुलाखत घेतली होती. तिच्यात त्यांनी ह्या चाली कशा मीटर बघून थोड्या फिरवून बांधल्या आहेत ते स्पष्ट करून सांगितलं होतं.

चौथा कोनाडा 05/08/2025 - 21:48
छान लेखन ! आजकाल गाण्यांमागचा असा वेध घेणारे अनेक गोष्टी शोधत रसिकांना खजिना उपलब्ध करुन देतात. धन्यवाद !

परिंदा मधील तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके पण ह्याच सुरावटींवर आधारलेले गाणे आहे. पापा कहते है मधले घरसे निकलते ही हे ही अजुन एक गाणे.

सुबोध खरे 06/08/2025 - 10:15
"ठण्डी हवाएँ" हे गाणंसुद्धा १९३८ च्या “C’est la vie” गाण्यापासून प्रेरणा घेऊन बनवलेलं होतं असं म्हंटलं जातं बऱ्याच वेळेस एखाद्या रागावर आधारित गाणे असेल तर त्याची चाल सुद्धा अगदी सारखी असते. मग संगीतकाराने दुसरे गाणे ऐकले नसले तरी केवळ त्या रागावर आधारित असल्याने चाल सारखी येते. आपल्याकडे काही लोकांना कोणतेही गाणे ऐकले कि त्याची चाल कुठूनतरी/ कुणाच्या तरी गाण्याची उचललेली आहे असा शोध लावण्याची हौसच असते. मग ते मागच्या काळात जाऊन कुठल्यातरी जुन्या संगीतकाराची किंवा इंग्रजी/ फ्रेंच/ इटालियन स्पॅनिश गाण्याची चाल शोधतात आणि या संगीतकाराने हे गाणे इथून उचलले आहे असा दावा करतात. तसे झाले असूही शकते पण तसे झालेले असेलच असे नाही. अशीच स्थिती अनेक वेळेस नाटकांची किंवा लेखांची असते. मराठीत लिहिलेले नाटक कोणत्यातरी इंग्रजी किंवा फ्रेंच किंवा इटालियन नाटककाराचे लेखकाने उचलले आहे असा दावा केला जात असे. मग त्या नाटककाराला त्या भाषेचा गंध नसला तरी. नाट्यसंगीतात पाहिले तर एकच पद अनेक गायक वेगवेगळ्या तर्हेने गाताना दिसतात. उदा प्रिये पहा हे पद श्री छोटा गंधर्व, पं प्रभाकर कारेकर आणि श्री सुधीर फडके यांनी तीन वेगवेगळ्या तर्हेने गायलेले आहे आणि प्रत्येक गायन उत्कृष्ट आहे. फार कशाला कट्यार काळजात घुसली या नाटकात एकच गाणे ( घेई छंद मकरंद) दोन वेगवेगळ्या चालीत गेले गेले आहे.

सुबोध खरे 06/08/2025 - 10:24
उदा मालकंस या रागावर आधारित मन तडपत हरी दर्शन को आज आधा है चंद्रमा छम छम घुंगरू बोले अशी अनेक गाणी आहेत किंवा केदार रागावर आधारित आज मी आळविते केदार गा कोकिळा गा जिवलगा कधी रे येशील तू प्रभूपदास नमिता दास हि कुणी छेडिली तार वाली वध ना खल निर्दालन सत्यम शिवम सुंदरा अशी अनेक गाणी आहेत.

In reply to by सुबोध खरे

गवि 07/08/2025 - 08:11
रोचक मुद्दा मांडलात. हो. रागाधारित गाणी एकसारखी नक्कीच वाटतात. उदा. आणखी एक. शिवरंजनी (उदबत्ती नव्हे, राग) हा हिंदी चित्रपट संगीतातला फारच आवडता राग. आता फार ऐकू येत नाही. पण अर्थात आमचं सगळं जुनं. जाने कहाँ गये वो दिन कहीं दीप जले कहीं दिल बहारों फूल बरसाओ ओ मेरे सनम ओ मेरे सनम मेरे नैना सावनभादो दिल के झरोके में तुझको बिठाकर क्या करते थे साजना तुम हमसे दूर रहेके ओ पिया पिया, क्यूँ भुला दिया (शब्दांची चुभुदेघे) तूने प्रीत जो मुझसे जोडी.. तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अगदी धक धक करने लगा पण.. आणखीही अनेक आठवतील. ही सर्व गाणी दर्जेदार आहेत किंवा माझी आवडती आहेत असे मुळीच नव्हे. आणि जुनं जुनं म्हणत हल्लीची अलग आसमां आणि कार्बन डाय ऑक्साईड, .. आणि जाना तू आता नहीं, वगैरे देखील आवडीने ऐकत असतोच. संगीत कधीच मरत नाही.

In reply to by गवि

सुबोध खरे 07/08/2025 - 10:24
दिसला ग बाई दिसला मोहुनीया तुजसंगे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रानात सांग कानात वारा फोफावला सावळाच रंग तुझा हि पण गाणी शिवरंजनी रागातील आहेत. अर्थात संपूर्ण गाणे एकाच रागात असेल असेही नाही त्यात इतर रागांच्या छटा हि असू शकतात. शेवटी संगीतकाराला स्वतःच्या प्रतिभेतून आयत्यावेळेस काय सुचेल हे सांगणे कठीण आहे.

In reply to by गवि

ओ मेरे सनम ओ मेरे सनम अशी पार्टीतली गाणी आजकाल दिसत नाहीत. एक हातात ड्रिंक्स भरून उभे आहे, दुसरे दिलाचे दर्द सांगण्यासाठी गाणं सुरू करते किंवा पियानोवर बसते आणि गाणे म्हणते. त्यातही अशी शिवरंजनी रागावर आधारित, उर्दू गाणी अशा पाश्चिमात्य पार्ट्यांत म्हणणे हे एक कलात्मक लघूबंड आहे हे या पात्रांच्या मनात देखील येत नाही. गाण्यातले शब्द चेहऱ्यावर आणून दुसऱ्याला ते 'दुजेविन संवादू' पद्धतीने समजावून देण्यातच ते इतके गर्क असतात.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

या गाण्यात अजून एक कॉमन ट्रोप आहे. शेवटी नायिका जोर जोरात गिरकी घेऊन खाली पडते

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 07/08/2025 - 17:09
अगदी अगदी.. आपल्याला (पक्षी: प्रेक्षकांना) ढळढळीत दिसत असते की दोनच पात्रे अत्यंत गंभीर किंवा रडायच्या घाईत आहेत. किंवा एक पात्र दुसऱ्याला बेवफा किंवा तत्सम म्हणत पियानोवर हाण हाण हाणते आहे.. आणि इतर सर्व पार्टी सदस्य (होणारा नवरा धरून) मजेत हास्य करत त्यातल्या त्यात त्या दुःखी गाण्यावर नृत्य करत आहेत. हिरॉईन भावी पतीच्या मिठीत बॉल डान्स करता करता आपल्या मूळ आशिकाकडे एकटक बघून रडत आहे.. आणि तो मस्त दारू पीत नाचतो आहे. खरे तर त्याने हिरॉईनचा चेहरा बघून तिच्या माहेरी कोणी निर्वाणास प्राप्त तर झाले नाही ना अशी चौकशी केली पाहिजे.

विजुभाऊ 06/08/2025 - 10:53
याच चालीवरचे आणखी एक गाणे हमे रासतो की जरुरत नही है https://www.youtube.com/watch?v=sDXMPGKJrTo&list=RDsDXMPGKJrTo&start_radio=1 1 नरम गरम सिनेमामधले हे गाणे अगदी सागर किनारे सारखेच आहे

युयुत्सु 06/08/2025 - 11:20
प्रिये पहाचे समूहगीत (ते पण शाळेच्या गॅदरींग थाटाचे) केल्याबद्दल याला उलटे टांगून मिरच्यांची धुरी का देऊ नये? https://www.youtube.com/watch?v=-wDCd9so4rM&list=RD-wDCd9so4rM&start_radio=1

मार्गी 06/08/2025 - 15:46
माहितीपूर्ण प्रतिसादासाठी सर्वांना धन्यवाद! ही गाणी काहीशी सारखी असली तरी कॉपी अजिबात नाहीत. समान सूत्र असलेली पण स्वतंत्र आहेत.

गवि 07/08/2025 - 08:17
असे पाहण्यात आले आहे की काही वेळा हे मोठे लोक (संगीत आणि कलेतले) मुलाखती देताना काहीतरी ट्रिव्हिया सांगतात. त्यात असे साम्य अनेकदा दाखवून देतात. थोडे गुणगुणून वगैरे. रोचक वाटते. काही गाणी मात्र थेट कॉपी असतात. अर्थात अनेकदा हिंदी गाणी तरीही मूळ इंग्रजी गाण्यापेक्षा अधिक बरी वाटतात. आपला कान त्याला सरावला असल्याने बहुधा.

अशा गीतांचे अजून काही अर्थ लावता येतात. हे कविता(प्रेयसी) आणि कवी(प्रियकर) यांचे रूपक आहे किंवा प्रतिभा आणि कलावंत यांचे द्वंद्व. थोडक्यात कलाकृति व कलाकार.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

फूल खिले है गुलशन गुलशन मध्ये तबस्सुम यांनी आर डी ची मुलाखत घेतली होती. तिच्यात त्यांनी ह्या चाली कशा मीटर बघून थोड्या फिरवून बांधल्या आहेत ते स्पष्ट करून सांगितलं होतं.

चौथा कोनाडा 05/08/2025 - 21:48
छान लेखन ! आजकाल गाण्यांमागचा असा वेध घेणारे अनेक गोष्टी शोधत रसिकांना खजिना उपलब्ध करुन देतात. धन्यवाद !

परिंदा मधील तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके पण ह्याच सुरावटींवर आधारलेले गाणे आहे. पापा कहते है मधले घरसे निकलते ही हे ही अजुन एक गाणे.

सुबोध खरे 06/08/2025 - 10:15
"ठण्डी हवाएँ" हे गाणंसुद्धा १९३८ च्या “C’est la vie” गाण्यापासून प्रेरणा घेऊन बनवलेलं होतं असं म्हंटलं जातं बऱ्याच वेळेस एखाद्या रागावर आधारित गाणे असेल तर त्याची चाल सुद्धा अगदी सारखी असते. मग संगीतकाराने दुसरे गाणे ऐकले नसले तरी केवळ त्या रागावर आधारित असल्याने चाल सारखी येते. आपल्याकडे काही लोकांना कोणतेही गाणे ऐकले कि त्याची चाल कुठूनतरी/ कुणाच्या तरी गाण्याची उचललेली आहे असा शोध लावण्याची हौसच असते. मग ते मागच्या काळात जाऊन कुठल्यातरी जुन्या संगीतकाराची किंवा इंग्रजी/ फ्रेंच/ इटालियन स्पॅनिश गाण्याची चाल शोधतात आणि या संगीतकाराने हे गाणे इथून उचलले आहे असा दावा करतात. तसे झाले असूही शकते पण तसे झालेले असेलच असे नाही. अशीच स्थिती अनेक वेळेस नाटकांची किंवा लेखांची असते. मराठीत लिहिलेले नाटक कोणत्यातरी इंग्रजी किंवा फ्रेंच किंवा इटालियन नाटककाराचे लेखकाने उचलले आहे असा दावा केला जात असे. मग त्या नाटककाराला त्या भाषेचा गंध नसला तरी. नाट्यसंगीतात पाहिले तर एकच पद अनेक गायक वेगवेगळ्या तर्हेने गाताना दिसतात. उदा प्रिये पहा हे पद श्री छोटा गंधर्व, पं प्रभाकर कारेकर आणि श्री सुधीर फडके यांनी तीन वेगवेगळ्या तर्हेने गायलेले आहे आणि प्रत्येक गायन उत्कृष्ट आहे. फार कशाला कट्यार काळजात घुसली या नाटकात एकच गाणे ( घेई छंद मकरंद) दोन वेगवेगळ्या चालीत गेले गेले आहे.

सुबोध खरे 06/08/2025 - 10:24
उदा मालकंस या रागावर आधारित मन तडपत हरी दर्शन को आज आधा है चंद्रमा छम छम घुंगरू बोले अशी अनेक गाणी आहेत किंवा केदार रागावर आधारित आज मी आळविते केदार गा कोकिळा गा जिवलगा कधी रे येशील तू प्रभूपदास नमिता दास हि कुणी छेडिली तार वाली वध ना खल निर्दालन सत्यम शिवम सुंदरा अशी अनेक गाणी आहेत.

In reply to by सुबोध खरे

गवि 07/08/2025 - 08:11
रोचक मुद्दा मांडलात. हो. रागाधारित गाणी एकसारखी नक्कीच वाटतात. उदा. आणखी एक. शिवरंजनी (उदबत्ती नव्हे, राग) हा हिंदी चित्रपट संगीतातला फारच आवडता राग. आता फार ऐकू येत नाही. पण अर्थात आमचं सगळं जुनं. जाने कहाँ गये वो दिन कहीं दीप जले कहीं दिल बहारों फूल बरसाओ ओ मेरे सनम ओ मेरे सनम मेरे नैना सावनभादो दिल के झरोके में तुझको बिठाकर क्या करते थे साजना तुम हमसे दूर रहेके ओ पिया पिया, क्यूँ भुला दिया (शब्दांची चुभुदेघे) तूने प्रीत जो मुझसे जोडी.. तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अगदी धक धक करने लगा पण.. आणखीही अनेक आठवतील. ही सर्व गाणी दर्जेदार आहेत किंवा माझी आवडती आहेत असे मुळीच नव्हे. आणि जुनं जुनं म्हणत हल्लीची अलग आसमां आणि कार्बन डाय ऑक्साईड, .. आणि जाना तू आता नहीं, वगैरे देखील आवडीने ऐकत असतोच. संगीत कधीच मरत नाही.

In reply to by गवि

सुबोध खरे 07/08/2025 - 10:24
दिसला ग बाई दिसला मोहुनीया तुजसंगे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रानात सांग कानात वारा फोफावला सावळाच रंग तुझा हि पण गाणी शिवरंजनी रागातील आहेत. अर्थात संपूर्ण गाणे एकाच रागात असेल असेही नाही त्यात इतर रागांच्या छटा हि असू शकतात. शेवटी संगीतकाराला स्वतःच्या प्रतिभेतून आयत्यावेळेस काय सुचेल हे सांगणे कठीण आहे.

In reply to by गवि

ओ मेरे सनम ओ मेरे सनम अशी पार्टीतली गाणी आजकाल दिसत नाहीत. एक हातात ड्रिंक्स भरून उभे आहे, दुसरे दिलाचे दर्द सांगण्यासाठी गाणं सुरू करते किंवा पियानोवर बसते आणि गाणे म्हणते. त्यातही अशी शिवरंजनी रागावर आधारित, उर्दू गाणी अशा पाश्चिमात्य पार्ट्यांत म्हणणे हे एक कलात्मक लघूबंड आहे हे या पात्रांच्या मनात देखील येत नाही. गाण्यातले शब्द चेहऱ्यावर आणून दुसऱ्याला ते 'दुजेविन संवादू' पद्धतीने समजावून देण्यातच ते इतके गर्क असतात.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

या गाण्यात अजून एक कॉमन ट्रोप आहे. शेवटी नायिका जोर जोरात गिरकी घेऊन खाली पडते

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 07/08/2025 - 17:09
अगदी अगदी.. आपल्याला (पक्षी: प्रेक्षकांना) ढळढळीत दिसत असते की दोनच पात्रे अत्यंत गंभीर किंवा रडायच्या घाईत आहेत. किंवा एक पात्र दुसऱ्याला बेवफा किंवा तत्सम म्हणत पियानोवर हाण हाण हाणते आहे.. आणि इतर सर्व पार्टी सदस्य (होणारा नवरा धरून) मजेत हास्य करत त्यातल्या त्यात त्या दुःखी गाण्यावर नृत्य करत आहेत. हिरॉईन भावी पतीच्या मिठीत बॉल डान्स करता करता आपल्या मूळ आशिकाकडे एकटक बघून रडत आहे.. आणि तो मस्त दारू पीत नाचतो आहे. खरे तर त्याने हिरॉईनचा चेहरा बघून तिच्या माहेरी कोणी निर्वाणास प्राप्त तर झाले नाही ना अशी चौकशी केली पाहिजे.

विजुभाऊ 06/08/2025 - 10:53
याच चालीवरचे आणखी एक गाणे हमे रासतो की जरुरत नही है https://www.youtube.com/watch?v=sDXMPGKJrTo&list=RDsDXMPGKJrTo&start_radio=1 1 नरम गरम सिनेमामधले हे गाणे अगदी सागर किनारे सारखेच आहे

युयुत्सु 06/08/2025 - 11:20
प्रिये पहाचे समूहगीत (ते पण शाळेच्या गॅदरींग थाटाचे) केल्याबद्दल याला उलटे टांगून मिरच्यांची धुरी का देऊ नये? https://www.youtube.com/watch?v=-wDCd9so4rM&list=RD-wDCd9so4rM&start_radio=1

मार्गी 06/08/2025 - 15:46
माहितीपूर्ण प्रतिसादासाठी सर्वांना धन्यवाद! ही गाणी काहीशी सारखी असली तरी कॉपी अजिबात नाहीत. समान सूत्र असलेली पण स्वतंत्र आहेत.

गवि 07/08/2025 - 08:17
असे पाहण्यात आले आहे की काही वेळा हे मोठे लोक (संगीत आणि कलेतले) मुलाखती देताना काहीतरी ट्रिव्हिया सांगतात. त्यात असे साम्य अनेकदा दाखवून देतात. थोडे गुणगुणून वगैरे. रोचक वाटते. काही गाणी मात्र थेट कॉपी असतात. अर्थात अनेकदा हिंदी गाणी तरीही मूळ इंग्रजी गाण्यापेक्षा अधिक बरी वाटतात. आपला कान त्याला सरावला असल्याने बहुधा.

अशा गीतांचे अजून काही अर्थ लावता येतात. हे कविता(प्रेयसी) आणि कवी(प्रियकर) यांचे रूपक आहे किंवा प्रतिभा आणि कलावंत यांचे द्वंद्व. थोडक्यात कलाकृति व कलाकार.
नमस्कार. आपल्यापैकी अनेकांना "ठण्डी हवाएँ लहरा के आए.. " (गायिका लता, चित्रपट नौजवान वर्ष १९५१) गाणं माहिती असेल आणि आवडत असेल. "रहें ना रहें हम, महका करेंगे..." (गायिका लता, चित्रपट ममता, वर्ष १९६६) हेसुद्धा अनेकांचं आवडतं गाणं असेल. त्याशिवाय "सागर किनारे दिल ये पुकारे" (गायिका लता- किशोर, चित्रपट सागर, वर्ष १९८५) हे गाणं तर माहिती असेलच. तसंच "हमें और जीने की चाहत ना होती" (गायिका लता- किशोर, चित्रपट अगर तुम ना होते, वर्ष १९८३) हे माहिती असेलच. पण तुम्हांला हे माहिती नसेल की, ह्या चारही गीतांची चाल एकमेकांशी विलक्षण जुळते!

शाप की आशीर्वाद?

युयुत्सु ·

गवि 04/08/2025 - 13:11
कौतुकास्पद. इतक्या लहानपणी असे कौतुक ऐकायला मिळणे म्हणजे टॅलन्ट असणारच. अच्युत गोडबोले यांच्या "मुसाफिर" या लेखनाची आठवण झाली. त्यांचेही असेच अनुभव. लहानपणापासूनच सर्व आदर्श आणि सर्वगुणसंपन्न, प्रगल्भ. असे वाचले की आपण खुद्द म्हणजे अगदीच "ह्या.." आहोत हे पुन्हा एकदा पटते.

In reply to by गवि

अभ्या.. 04/08/2025 - 14:11
अगदी अगदी... आम्हाला ना काही वारसा, ना स्वतःची बुध्दीमत्ता म्हणावी इतकी बुध्दी, ना कुठले अधिकारवाणीने बोलावे असे इंटलेक्ट फिल्ड, ना काही पदाधिकार, ना फारशा साहित्याशी ओळख होण्याच्या संधी, ना प्रोत्साहन, ना काही अचिव्हमेंट.... अगदी कुणी "ह्या..." म्हण्ण्याइतके तरी लक्ष देइल असे वाटत माही. फारच न्युनगंडाचाही न्यूनगंड यावा इतके लो वाटतेय.... :(

In reply to by अभ्या..

गवि 04/08/2025 - 16:41
अरे मी तर केस कापायला नेले तरी रडायचो. कोणी इतर असते तर वेळेवर केस कापण्याची आवश्यकता त्यांना त्याच वयात लक्षात आल्यामुळे स्वतः सलूनमधे जाऊन व्यवस्थित कानावरून मानेवरून पोलीस कट मारून आले असते. आम्हाला आमचे पाय झाडत असताना खेचत घेऊन जावे लागायचे. शहाणपण यायला फार वेळ घेतला. दहावीत निबंधाचे कौतुक झाले होते पण गणिताच्या पेपरवर असा शेरा होता: (काहीही बदल किंवा अतिशयोक्ती नाही) गणिताच्या पायऱ्या जिथे लिहितो तिथे: शेरा : पायरी एक: ??? कसे? पायरी दोन: जादू ..?? पायरी तीन: आपल्याला सूचना करण्यास किंवा आपले कौतुक करण्यास शब्द अपुरे पडतात. ताबडतोब पालकांना भेटायला बोलवावे. एकाही शब्दाची चूक नाही कारण ते शब्द घणाघात होऊन डोक्यात आजन्म पक्के झाले आहेत. असे आम्ही. डुबोया मुझको होने ने.. न होता मैं तो क्या होता? (ओळी: मिर्जा गालिब यांजकडून साभार)

स्वातंत्र्यवीर सावरकरांची पण अशीच एक गोष्ट आहे. ते शाळेत असताना एका वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी असे असामान्य भाषण केले की परीक्षकांना ते भाषण शाळेतील विद्यार्थ्याने तयारी करून लिहिले आहे याची खात्रीच पटली नाही. त्यांना वाटले की सावरकरांनी ते भाषण कोणा मोठ्या व्यक्तीकडून लिहून घेतले आहे आणि नुसती पोपटपंची केली आहे. त्यामुळे त्यांना बक्षिस दिले गेले नाही. तेव्हा सावरकरांनी परीक्षकांना विचारले की माझ्या भाषणाला इतर कोणाच्याही भाषणापेक्षा जास्त टाळ्या होत्या मग मला बक्षिस का नाही? त्यावर परीक्षकांनी त्यांना वाटत होते ते सांगितले. त्यावर सावरकरांनी आव्हान दिले की आता मला दुसरा कोणताही विषय आणि थोडा वेळ द्या. मी त्याच उंचीचे भाषण तयार करून इथल्या इथे सभागृहात देईन. परीक्षकांनी त्याप्रमाणे दुसरा विषय दिला आणि पूर्वीइतकेच असामान्य भाषण सावरकरांनी केले. सभागृहात पूर्वीपेक्षा जास्त टाळ्यांचा कडकडाट झाला. मग परीक्षकांनी सावरकरांना एक विशेष पारीतोषिक जाहिर केले. त्यावर सावरकर म्हणाले- ज्या परीक्षकांना मी काय लिहिले आहे हे पण समजले नसेल त्यांच्याकडून मला बक्षिस नको. काय तो बाणेदारपणा. त्याप्रमाणेच मी काय लिहिले आहे हे समजायची पात्रता नसलेल्यांच्या मासिकात माझा लेख नाही छापून आला तरी चालेल असे म्हटले असते तर उत्तम झाले असते. कदाचित आयत्या वेळेस तसे बोलायचे सुचले नसावे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अभ्या.. 04/08/2025 - 18:27
लोकमान्यांच्या शेंगा असोत की सावरकरांचे दुसरे भाषण, गांधीजींची घरातील चोरी किंवा अगदी रिसेंट म्हणजे नदीतली मगर पकडून घरी आणणे. अशा गोष्टी कोण लिहिते? जर स्व्तःच सांगितल्या आहेत ह्या गोष्टी तर तत्वनिष्टा, बाणेदारपणा, सत्यप्रियता किंवा धाडसीपणा आदि गुणांची त्यांना त्याचवेळी जाणीव झालेली असते की नंतर ते चिकटवले जातात? कारण वय शेवटी वय असते. वयासुलभ काहीच नसते का मोठ्या माणसांचे?

In reply to by अभ्या..

हेच म्हणतो. तो न्युनगंड येण्यामागे ह्या फुगवुन सांगितलेल्या गोष्टी पण कारणीभूत आहेत. नको तिथे असा बाणेदार का तत्सम गुण दाखवुन फजितीही करवुन झालेली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या जवळपास प्रत्येक सुपरस्टार ने लहानपणी संघर्ष केलेला असतो. फुटकळ पैसे घेऊन मुंबैत येतो काय मरीन ड्राईव च्या बाकावर झोपतो काय यंव न त्यंव. एकदा मोठे झाले कि अश्या गोष्टी जाणुनबुजुन पसरवल्या जात असाव्यात हे नक्की.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

असंका 06/08/2025 - 05:00
अं... बक्षिस बिक्षिस नि ते स्विकारणे नाकारणे या तर पुढच्या गोष्टी. सावरकरांनी भाषण केलं. यांनी आपला लेख प्रकाशित केला. मग फरक काय आहे?

nutanm 04/08/2025 - 20:38
मला वर दाखवलेला लादीपाव खूप आवडतो. मला त्यात थोडीशीच जास्त साखर घालून गोडसर पाव वृ भाजलेला पाव फार आवडतझ पण विकत तसा मिळत नाही. लहान शहरात एकदा खाल्लेला होता्. घरी करायचा तर हात दुखेपर्यत कोण फेसणार म्हणून करत नाही घरी हवा तेवढा गोड व जास्त भाजलेला करता येईल पण तेवढी सहन शीलता (patience ) नाही. मग विकत मिळेल तसा खाणे अपरिहार्य.

गवि 04/08/2025 - 13:11
कौतुकास्पद. इतक्या लहानपणी असे कौतुक ऐकायला मिळणे म्हणजे टॅलन्ट असणारच. अच्युत गोडबोले यांच्या "मुसाफिर" या लेखनाची आठवण झाली. त्यांचेही असेच अनुभव. लहानपणापासूनच सर्व आदर्श आणि सर्वगुणसंपन्न, प्रगल्भ. असे वाचले की आपण खुद्द म्हणजे अगदीच "ह्या.." आहोत हे पुन्हा एकदा पटते.

In reply to by गवि

अभ्या.. 04/08/2025 - 14:11
अगदी अगदी... आम्हाला ना काही वारसा, ना स्वतःची बुध्दीमत्ता म्हणावी इतकी बुध्दी, ना कुठले अधिकारवाणीने बोलावे असे इंटलेक्ट फिल्ड, ना काही पदाधिकार, ना फारशा साहित्याशी ओळख होण्याच्या संधी, ना प्रोत्साहन, ना काही अचिव्हमेंट.... अगदी कुणी "ह्या..." म्हण्ण्याइतके तरी लक्ष देइल असे वाटत माही. फारच न्युनगंडाचाही न्यूनगंड यावा इतके लो वाटतेय.... :(

In reply to by अभ्या..

गवि 04/08/2025 - 16:41
अरे मी तर केस कापायला नेले तरी रडायचो. कोणी इतर असते तर वेळेवर केस कापण्याची आवश्यकता त्यांना त्याच वयात लक्षात आल्यामुळे स्वतः सलूनमधे जाऊन व्यवस्थित कानावरून मानेवरून पोलीस कट मारून आले असते. आम्हाला आमचे पाय झाडत असताना खेचत घेऊन जावे लागायचे. शहाणपण यायला फार वेळ घेतला. दहावीत निबंधाचे कौतुक झाले होते पण गणिताच्या पेपरवर असा शेरा होता: (काहीही बदल किंवा अतिशयोक्ती नाही) गणिताच्या पायऱ्या जिथे लिहितो तिथे: शेरा : पायरी एक: ??? कसे? पायरी दोन: जादू ..?? पायरी तीन: आपल्याला सूचना करण्यास किंवा आपले कौतुक करण्यास शब्द अपुरे पडतात. ताबडतोब पालकांना भेटायला बोलवावे. एकाही शब्दाची चूक नाही कारण ते शब्द घणाघात होऊन डोक्यात आजन्म पक्के झाले आहेत. असे आम्ही. डुबोया मुझको होने ने.. न होता मैं तो क्या होता? (ओळी: मिर्जा गालिब यांजकडून साभार)

स्वातंत्र्यवीर सावरकरांची पण अशीच एक गोष्ट आहे. ते शाळेत असताना एका वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी असे असामान्य भाषण केले की परीक्षकांना ते भाषण शाळेतील विद्यार्थ्याने तयारी करून लिहिले आहे याची खात्रीच पटली नाही. त्यांना वाटले की सावरकरांनी ते भाषण कोणा मोठ्या व्यक्तीकडून लिहून घेतले आहे आणि नुसती पोपटपंची केली आहे. त्यामुळे त्यांना बक्षिस दिले गेले नाही. तेव्हा सावरकरांनी परीक्षकांना विचारले की माझ्या भाषणाला इतर कोणाच्याही भाषणापेक्षा जास्त टाळ्या होत्या मग मला बक्षिस का नाही? त्यावर परीक्षकांनी त्यांना वाटत होते ते सांगितले. त्यावर सावरकरांनी आव्हान दिले की आता मला दुसरा कोणताही विषय आणि थोडा वेळ द्या. मी त्याच उंचीचे भाषण तयार करून इथल्या इथे सभागृहात देईन. परीक्षकांनी त्याप्रमाणे दुसरा विषय दिला आणि पूर्वीइतकेच असामान्य भाषण सावरकरांनी केले. सभागृहात पूर्वीपेक्षा जास्त टाळ्यांचा कडकडाट झाला. मग परीक्षकांनी सावरकरांना एक विशेष पारीतोषिक जाहिर केले. त्यावर सावरकर म्हणाले- ज्या परीक्षकांना मी काय लिहिले आहे हे पण समजले नसेल त्यांच्याकडून मला बक्षिस नको. काय तो बाणेदारपणा. त्याप्रमाणेच मी काय लिहिले आहे हे समजायची पात्रता नसलेल्यांच्या मासिकात माझा लेख नाही छापून आला तरी चालेल असे म्हटले असते तर उत्तम झाले असते. कदाचित आयत्या वेळेस तसे बोलायचे सुचले नसावे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अभ्या.. 04/08/2025 - 18:27
लोकमान्यांच्या शेंगा असोत की सावरकरांचे दुसरे भाषण, गांधीजींची घरातील चोरी किंवा अगदी रिसेंट म्हणजे नदीतली मगर पकडून घरी आणणे. अशा गोष्टी कोण लिहिते? जर स्व्तःच सांगितल्या आहेत ह्या गोष्टी तर तत्वनिष्टा, बाणेदारपणा, सत्यप्रियता किंवा धाडसीपणा आदि गुणांची त्यांना त्याचवेळी जाणीव झालेली असते की नंतर ते चिकटवले जातात? कारण वय शेवटी वय असते. वयासुलभ काहीच नसते का मोठ्या माणसांचे?

In reply to by अभ्या..

हेच म्हणतो. तो न्युनगंड येण्यामागे ह्या फुगवुन सांगितलेल्या गोष्टी पण कारणीभूत आहेत. नको तिथे असा बाणेदार का तत्सम गुण दाखवुन फजितीही करवुन झालेली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या जवळपास प्रत्येक सुपरस्टार ने लहानपणी संघर्ष केलेला असतो. फुटकळ पैसे घेऊन मुंबैत येतो काय मरीन ड्राईव च्या बाकावर झोपतो काय यंव न त्यंव. एकदा मोठे झाले कि अश्या गोष्टी जाणुनबुजुन पसरवल्या जात असाव्यात हे नक्की.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

असंका 06/08/2025 - 05:00
अं... बक्षिस बिक्षिस नि ते स्विकारणे नाकारणे या तर पुढच्या गोष्टी. सावरकरांनी भाषण केलं. यांनी आपला लेख प्रकाशित केला. मग फरक काय आहे?

nutanm 04/08/2025 - 20:38
मला वर दाखवलेला लादीपाव खूप आवडतो. मला त्यात थोडीशीच जास्त साखर घालून गोडसर पाव वृ भाजलेला पाव फार आवडतझ पण विकत तसा मिळत नाही. लहान शहरात एकदा खाल्लेला होता्. घरी करायचा तर हात दुखेपर्यत कोण फेसणार म्हणून करत नाही घरी हवा तेवढा गोड व जास्त भाजलेला करता येईल पण तेवढी सहन शीलता (patience ) नाही. मग विकत मिळेल तसा खाणे अपरिहार्य.
शाप की आशीर्वाद? ========== -राजीव उपाध्ये ...हा मला मिळालेला शाप की आशीर्वाद माहित नाही, पण त्यामुळे टॉक्सिक लोकांच्याकडून माझ्या प्रगतीत अडथळे खुपच निर्माण झाले आहेत. मला मी विठ्ठल सीताराम गुर्जरांचा पणतू आहे (गुर्जरांची सख्खी बहिण माझी सख्खी पणजी) याचं शाळेत असल्यापासून खुप भारी वाटत असे. ९वीत असतांना मी शाळेच्या वार्षिकात त्यांच्यावर लेख लिहायचे ठरवले आणि आजोबांना (आईच्या वडिलांना) सांगितले. आजोबांनी टुणकन उडी मारून मला सर्व मदत करायचे ठरवले.

नाग पंचमी

Bhakti ·

श्वेता२४ 29/07/2025 - 15:06
लेख थोडक्यात आटोपला अजून वाचायला आवडला असता. पुरणाचे दिंड हे प्रकार कधीही घरात झाले नाही. याच धाटणीचा कडबू हा प्रकार केला जायचा. म्हणजे पुरण चपातीच्या लाटीवर ठेवून करंजीसारखा आकार द्यायचा . हे करंजीपेक्षा छोटे कडबू तळायचे व तूपासोबत खायचे. याच काळात घरात होणारा पदार्य़ म्हणजे लाह्याचे पीठ. हे तूप, दूध व गुळाबरोबर मिक्स करुन प्यायचे किंवा त्याचे लाडूही बनत. लहानपणी आवडायचे नाहीत. पण आता हेल्दी रेसिपी म्हणून खूप मिस करते.

नवीन माहीती मिळाली. ते जनुकीय वगैरे समजत नाही. नागपंचमी ही किती पुरातन आहे याची कल्पना आली. दिंड याच्या पाठिमागे चातुर्मासातील नागपंचमीची कहाणी मधे तवा आगीवर ठेवायचा नाही, भाज्या विळीने कापायच्या नाही, लांडोबा पुंडोबा असे बरेच काही आईकडून लहानपणी कळाले होते. गारुडी नाग टोपलीत घेऊन घर घर फिरायचे. मुलाना दहाचा आकडा बघायला मजा यायची. लाह्या दुध पाच पैशे एखादे दिंड असे गारूड्याला मिळायचे. पुंगी पण ऐकायला मिळायची. संध्याकाळ पर्यंत गारूड्याची झोळी भरायची पण नागोबाची वाट लागायची. काहिही म्हणा ,अंधश्रद्धा इ. पण सणावाराची मजा आता नाही. नोकरी,प्रपंच सांभाळून आणी वर हा लेखन प्रपंच केला यासाठी लेखिकेच्या उत्साहाला सॅल्युट व हा उत्साह दिन दुना रात चौगुना होत राहो. लेख आवडला. धन्यवाद.

छान माहिती दिलीत, दिंडे छानच दिसत आहेत. आजी असेपर्यंत ती म्हणायची नागपंचमीला तवा ठेवू नये, म्हणून दिंडे व्हायचे घरात. तेव्हा विशेष आवडीचे नव्हते पण तुमच्या फोटोमुळे आजीच्या हातच्या पुरणाची आठवण आली. नागपंचमीच्या शुभेच्छा!

विवेकपटाईत 30/07/2025 - 09:53
दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी दिंड आणि वडे हे बनतात. माझी सौ. छत्तीस वर्षांत न चुकता प्रत्येक सणात, सणाचे पदार्थ बनवते. आपले सणवार म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी.

सुबोध खरे 30/07/2025 - 10:23
तपशिलात चूक -- साप आणि इतर सरपटणारे प्राणी (काही अपवाद वगळता) पाण्याखाली श्वास घेऊ शकत नाहीत कारण यांच्या माशांसारखे गिल नसून त्यांना श्वसनासाठी फुप्फुसे असतात. एकंदर थंड रक्ताचे प्राणी असल्याने त्यांना श्वसनात ऑक्सिजनची गरज बरीच कमी असते आणि त्यामुळे ते बराच काळ श्वास रोखून धरू शकतात. तसेच काही अपवाद वगळता साप आणि बहुसंख्य सरपटणारे प्राणी जमिनीवरच अंडी घालतात. उदा मगरी, कासवं याचे कारण पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांचे अंडे हे सच्छिद्र असते आणि त्यातून (अंड्याला) भ्रूणाला विकसित होण्यासाठी लागणारा ऑक्सिजन मिळू शकतो. याउलट माशांची अंडी सच्छिद्र नसली तरी ती गॅस परमीएबल ( म्हणजेच वायू ला आरपार जाण्यास सक्षम) असतात. यामुळं मासे पाण्यात अंडी घालू शकतात.

श्वेता२४ 29/07/2025 - 15:06
लेख थोडक्यात आटोपला अजून वाचायला आवडला असता. पुरणाचे दिंड हे प्रकार कधीही घरात झाले नाही. याच धाटणीचा कडबू हा प्रकार केला जायचा. म्हणजे पुरण चपातीच्या लाटीवर ठेवून करंजीसारखा आकार द्यायचा . हे करंजीपेक्षा छोटे कडबू तळायचे व तूपासोबत खायचे. याच काळात घरात होणारा पदार्य़ म्हणजे लाह्याचे पीठ. हे तूप, दूध व गुळाबरोबर मिक्स करुन प्यायचे किंवा त्याचे लाडूही बनत. लहानपणी आवडायचे नाहीत. पण आता हेल्दी रेसिपी म्हणून खूप मिस करते.

नवीन माहीती मिळाली. ते जनुकीय वगैरे समजत नाही. नागपंचमी ही किती पुरातन आहे याची कल्पना आली. दिंड याच्या पाठिमागे चातुर्मासातील नागपंचमीची कहाणी मधे तवा आगीवर ठेवायचा नाही, भाज्या विळीने कापायच्या नाही, लांडोबा पुंडोबा असे बरेच काही आईकडून लहानपणी कळाले होते. गारुडी नाग टोपलीत घेऊन घर घर फिरायचे. मुलाना दहाचा आकडा बघायला मजा यायची. लाह्या दुध पाच पैशे एखादे दिंड असे गारूड्याला मिळायचे. पुंगी पण ऐकायला मिळायची. संध्याकाळ पर्यंत गारूड्याची झोळी भरायची पण नागोबाची वाट लागायची. काहिही म्हणा ,अंधश्रद्धा इ. पण सणावाराची मजा आता नाही. नोकरी,प्रपंच सांभाळून आणी वर हा लेखन प्रपंच केला यासाठी लेखिकेच्या उत्साहाला सॅल्युट व हा उत्साह दिन दुना रात चौगुना होत राहो. लेख आवडला. धन्यवाद.

छान माहिती दिलीत, दिंडे छानच दिसत आहेत. आजी असेपर्यंत ती म्हणायची नागपंचमीला तवा ठेवू नये, म्हणून दिंडे व्हायचे घरात. तेव्हा विशेष आवडीचे नव्हते पण तुमच्या फोटोमुळे आजीच्या हातच्या पुरणाची आठवण आली. नागपंचमीच्या शुभेच्छा!

विवेकपटाईत 30/07/2025 - 09:53
दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी दिंड आणि वडे हे बनतात. माझी सौ. छत्तीस वर्षांत न चुकता प्रत्येक सणात, सणाचे पदार्थ बनवते. आपले सणवार म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी.

सुबोध खरे 30/07/2025 - 10:23
तपशिलात चूक -- साप आणि इतर सरपटणारे प्राणी (काही अपवाद वगळता) पाण्याखाली श्वास घेऊ शकत नाहीत कारण यांच्या माशांसारखे गिल नसून त्यांना श्वसनासाठी फुप्फुसे असतात. एकंदर थंड रक्ताचे प्राणी असल्याने त्यांना श्वसनात ऑक्सिजनची गरज बरीच कमी असते आणि त्यामुळे ते बराच काळ श्वास रोखून धरू शकतात. तसेच काही अपवाद वगळता साप आणि बहुसंख्य सरपटणारे प्राणी जमिनीवरच अंडी घालतात. उदा मगरी, कासवं याचे कारण पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांचे अंडे हे सच्छिद्र असते आणि त्यातून (अंड्याला) भ्रूणाला विकसित होण्यासाठी लागणारा ऑक्सिजन मिळू शकतो. याउलट माशांची अंडी सच्छिद्र नसली तरी ती गॅस परमीएबल ( म्हणजेच वायू ला आरपार जाण्यास सक्षम) असतात. यामुळं मासे पाण्यात अंडी घालू शकतात.
नाग,साप हे सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे Reptilia क्लासमध्ये जरी येत असले तरी पाण्यात पोहण्याची,श्वास घेण्याची,पाण्यातही अंडे देण्याची क्षमता amphibians प्रमाणे आहे. उत्क्रांतीमध्ये survival of the fittest असं डार्विनने सांगितले आहेच.पण याबाबत जनुकीय माहिती मिळवणं खुपच रोमांचित असते. या सापाने जगण्याच्या लढाईत काय केले मग?

Tour de Parbhani! सायकलीवर पुणे- परभणी प्रवास

मार्गी ·

ramjya 31/07/2025 - 11:40
मस्त सर.......बीड ला बालाघाट डोंगर रांगा आहेत पण पाडळसिंगी-बीड-तेलगाव-माजलगाव-पाथ्री-परभणी मार्ग एवढा डोंगराळ नाहिये......दक्षिण भारत भ्रमंती साठी शुभेच्छा....मी ऐकुन आहे कन्याकुमारी आनी रामेश्वररम मधला 'मान्न्पाड' ( Manapad)भाग सुन्दर आहे

दक्षिण भारत निसर्ग समृद्ध आहे. या भागात स्वताच्या गाडीने प्रवास केल्याने अनुभवला आहे. दाक्षिणात्य लोक हिन्दी बोलत नाही,समजत नाहीत. पण इंग्रजीत संभाषण करू करतात. हे आपल्याला माहीत असेलच पण फक्त समयोचीत पुनरावृत्ती. पुढील ट्रिप साठी शुभेच्छा.

मार्गी 02/08/2025 - 11:43
सर्वांना धन्यवाद! :) @ rmjya जी, ओके. @ अनामिक सदस्य जी, खूप मोहीमा केल्या आहेत. त्यानुसार जितकं आवश्यक तितकंच सामान. किरकोळ दुरुस्ती करता येते. पंक्चर किट ठेवतो. सर्व सर्विसिंग केलं व नवीन टायर्स घेतले तर जास्त काही करावं लागत नाही.

ramjya 31/07/2025 - 11:40
मस्त सर.......बीड ला बालाघाट डोंगर रांगा आहेत पण पाडळसिंगी-बीड-तेलगाव-माजलगाव-पाथ्री-परभणी मार्ग एवढा डोंगराळ नाहिये......दक्षिण भारत भ्रमंती साठी शुभेच्छा....मी ऐकुन आहे कन्याकुमारी आनी रामेश्वररम मधला 'मान्न्पाड' ( Manapad)भाग सुन्दर आहे

दक्षिण भारत निसर्ग समृद्ध आहे. या भागात स्वताच्या गाडीने प्रवास केल्याने अनुभवला आहे. दाक्षिणात्य लोक हिन्दी बोलत नाही,समजत नाहीत. पण इंग्रजीत संभाषण करू करतात. हे आपल्याला माहीत असेलच पण फक्त समयोचीत पुनरावृत्ती. पुढील ट्रिप साठी शुभेच्छा.

मार्गी 02/08/2025 - 11:43
सर्वांना धन्यवाद! :) @ rmjya जी, ओके. @ अनामिक सदस्य जी, खूप मोहीमा केल्या आहेत. त्यानुसार जितकं आवश्यक तितकंच सामान. किरकोळ दुरुस्ती करता येते. पंक्चर किट ठेवतो. सर्व सर्विसिंग केलं व नवीन टायर्स घेतले तर जास्त काही करावं लागत नाही.
✪ केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ✪ तीन दिवसांमध्ये ३९५ किलोमीटर सायकलिंग ✪ नियमित सायकलिंग = स्कूटीचा वेग ✪ रमणीय निसर्ग आणि डोंगररांगा ✪ निसर्गासोबत धारणा आणि ध्यान ✪ सायकलीची लोकांना जोडण्याची क्षमता ✪ जुन्या ऋणानुबंधांना उजाळा ✪ विद्यार्थ्यांसोबत संवाद आणि गप्पा नमस्कार. परभणीच्या निरामय योग प्रसार व संशोधन केंद्राच्या "Yoga for fitness" सायकल अभियानाच्या तयारीसाठी नुकताच पुणे ते परभणी सायकल प्रवास केला. पुढच्या महिन्यातल्या दक्षिण भारतात १८०० किलोमीटरच्या सायकल अभियानाची तयारी सुरू आहे. त्याच तयारीचा भाग म्हणून ही अशी राईड करावीशी वाटली.

हम किसी भी हद तक जा सकते है|

युयुत्सु ·

रामचंद्र 25/07/2025 - 12:43
ही तत्परता... ही बाब न्यायालयालाच नाही तर कोणत्याही अधिकारपदालाही लागू होते. न्यायालयासंदर्भात बोलायचं झालं तर न्या. अभय ओक यांनी सार्वजनिक ध्वनिप्रदूषणाची आवर्जून दखल घेतल्याचं लक्षात येतं. आपल्याही लेखनात नियमावर बोट ठेवून मुद्दाम त्रास देणारे अधिकारपदावरचे लोक आणि उलट विवेक, उमदेपणा आणि शक्य तितकी मदत करण्याची तयारी दाखवणाऱ्या व्यक्तींची उदाहरणे आढळतात. वेगळ्या संदर्भात पाहिलं तर मिपावरीलच डॉ. सुबोध खऱ्यांच्या लेखनात तथाकथित कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन पुढाकार घेऊन काही गोष्टी केल्याने कसा फरक पडतो याचे स्वानुभव कथन केले आहेत. म्हणजे ही बाब त्या त्या व्यक्तीची संवेदनशील वृत्ती तसेच संबंधित परिस्थितीत आपली जबाबदारी सर्वार्थाने पार पाडण्याची प्रवृत्ती, तडफदारपणा यावर अवलंबून आहे असे दिसते.

रामचंद्र 25/07/2025 - 12:43
ही तत्परता... ही बाब न्यायालयालाच नाही तर कोणत्याही अधिकारपदालाही लागू होते. न्यायालयासंदर्भात बोलायचं झालं तर न्या. अभय ओक यांनी सार्वजनिक ध्वनिप्रदूषणाची आवर्जून दखल घेतल्याचं लक्षात येतं. आपल्याही लेखनात नियमावर बोट ठेवून मुद्दाम त्रास देणारे अधिकारपदावरचे लोक आणि उलट विवेक, उमदेपणा आणि शक्य तितकी मदत करण्याची तयारी दाखवणाऱ्या व्यक्तींची उदाहरणे आढळतात. वेगळ्या संदर्भात पाहिलं तर मिपावरीलच डॉ. सुबोध खऱ्यांच्या लेखनात तथाकथित कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन पुढाकार घेऊन काही गोष्टी केल्याने कसा फरक पडतो याचे स्वानुभव कथन केले आहेत. म्हणजे ही बाब त्या त्या व्यक्तीची संवेदनशील वृत्ती तसेच संबंधित परिस्थितीत आपली जबाबदारी सर्वार्थाने पार पाडण्याची प्रवृत्ती, तडफदारपणा यावर अवलंबून आहे असे दिसते.
https://www.youtube.com/watch?v=Dt8FOiyA72E वरील एका प्रकरणात न्यायाधीशांनी स्वतः सर्वासमक्ष चालू कोर्टात संबंधित अधिकार्‍याला फोन लावला आणि प्रकरण समजाऊन घेतले आणि समस्या सोडवली. ही तत्परता खालच्या कोर्टात दिसली तर जनतेचा न्यायालयांवरचा विश्वास वाढेल. अल्पोळी धाग्याबद्दल क्षमस्व!

मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक

आर्या१२३ ·

अंहं ही कथा काही भावली नाही. महत्वाचे कारण म्हणजे ह्या कथेत असलेले spiritual materialism. नामस्मरणाने चमत्कार होतो, पेशंट तीन महिन्याने शुद्धीवर येतो, वैकुंठ , परलोक वगैरे सगळं spiritual materialism आहे. त्याचा उपयोग अत्यंत प्राथमिक स्तरावरील साधकांसाठी आहे. त्यांना त्या ओढीने का होईना अध्यात्माची ओढ लागते. एरव्ही " जाणत्या" साधकांसाठी हे सारं फारच हास्यास्पद आहे. मुळात कोणीतरी आपल्या पापपुण्याचा, आपल्या नामस्मरणाचा हिशेब ठेवत आहेत ही संकल्पनाच हास्यास्पद आहे. ते 13 कोटी जप वगैरे फार अलीकडे आले. बस एकवार , मोजून एकदा समजून घेतले एक " राम" हे नाम , फक्त एकदा, बस इतके "पुरेसे" आहे. हा तुकोबांचा अभंग पहा : राम म्हणता रामचि होईजे।पदी बैसोन पदवी घेईजे ।।१।। ऐसे सुख वचनी आहे।विश्वासे अनुभव पाहे ।।धृ।। रामरसाचिया चवी।आन रस रुचती केवी ।।३।। तुका म्हणे चाखोनि सांगे ।मज अनुभव आहे अंगे ।।४।। तस्मात् हे सारं आध्यात्मिक भौतिकवाद इहवाद बाजूला सारून एकदा "राम" म्हणा , "समजून" म्हणा. बस. इतके पुरेसे आहे. त्यानंतर व्हायचे ते होऊ दे देह जावो अथवा राहो। पांडुरंगीं दृढ भावो ।। काय फरक पडतो !! जे होतंय ते, जे झालं ते आणि जे जे काही होईल ते सर्वच रामाची इच्छा !!

आपापला दृष्टिकोन. लेखकाने ही कथा काल्पनिक आहे असे लिहीले आहे. आध्यात्म, परमार्थ वैगेरेच्या भानगडीत मी पडत नाही. स्वधर्मानुसार समोर येणारे कर्म करणे एवढेच समजते. तसे माझे पणजोबा,पणजी व आजोबा दत्तसंप्रदायातील अनुग्रहीत अधीकारी होते पण नात्याच्या पलिकडे काही नाही. एक कथा म्हणून आवडली.

आर्या१२३ 28/07/2025 - 12:48
नामस्मरणाने चमत्कार होतो, पेशंट तीन महिन्याने शुद्धीवर येतो, वैकुंठ , परलोक वगैरे सगळं spiritual materialism आहे. त्याचा उपयोग अत्यंत प्राथमिक स्तरावरील साधकांसाठी आहे. त्यांना त्या ओढीने का होईना अध्यात्माची ओढ लागते. एरव्ही " जाणत्या" साधकांसाठी हे सारं फारच हास्यास्पद आहे. प्रगो, हे अवास्तव नाही. साधकांनी सांगितलेले अनुभव आहे. माझ्या मैत्रिणीच्या सासुबाई शेवटी शेवटी तीन महिने कोमात होत्या. आणि तरी त्यांची बोटे माळ फिरवल्यासारखी हलत होती. मुळात कोणीतरी आपल्या पापपुण्याचा, आपल्या नामस्मरणाचा हिशेब ठेवत आहेत ही संकल्पनाच हास्यास्पद आहे. ते 13 कोटी जप वगैरे फार अलीकडे आले. नामस्मरणाचा हिशोब वैगेरे हे आकडे द्यावे म्हणुन मी लिहीले आहे, निव्वळ आपला जप प्रापंचिक मागणे पुर्ण करण्यात कसा खर्च होतो हे सांगण्यासाठी. आणि हे मनाचे नाही तर श्री बापुसाहेब मराठे यांच्या पुस्तकात येउन गेले आहे. बाकी तेरा कोटी जपाबद्दल म्हणशील तर महाराजांच्या चरित्रात उल्लेख आहे. महाराजांनी स्वतःच त्यांच्या काही शिष्यांना तेरा कोटीचा संकल्प करण्यास सांगितले होते. काहींना साडे तीन कोटीचा करण्यास सांगितले.

In reply to by आर्या१२३

म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो. अशा आध्यात्मिक इहवादी कथा , आख्यायिकांमुळे नास्तिक निधर्मी, धर्म विध्वसंक लोकांचे फावते , अन् त्यांना टीका करायला फट मिळते अन् गंभीर विषयाचे हसे उडवले जाते. मी तुम्हाला सांगतो - नामस्मरणाचा भौतिक , इहवादी जगात शून्य उपयोग होणार आहे असे, आणून आणि कळूनही जो केवळ प्रेमाने नामस्मरण करेल त्याला निमिषार्धात "लाभ" झाल्याशिवाय राहणार नाही !. रामाचे नाव घेऊन त्याला घर गाडी बायका पोरं वगैरे मागणे म्हणजे सोनाराच्या दुकानात जाऊन कोथिंबीरची जुडी मागण्यासारखं आहे. त्यामुळे समर्थांचे जे मागणे आहे ते च आपले मागणे आहे - " मागणेची निरसे जेणे l ऐसे देगा रामराया ll " नामाचा महिमा अगाध आहे , त्याला शुल्लक प्रापंचिक उपभोग प्राप्त करून घ्यायचा उपाय असे रूप यायला नको. नामाचे साध्य ही अवस्था आहे - देहींच विदेह होणें । करून कांहींच न करणें । जीवन्मुक्तांचीं लक्षणें । जीवन्मुक्त जाणती ॥ ३३॥ राम

In reply to by प्रसाद गोडबोले

अशा आध्यात्मिक इहवादी कथा , आख्यायिकांमुळे नास्तिक निधर्मी, धर्म विध्वसंक लोकांचे फावते , अन् त्यांना टीका करायला फट मिळते अन् गंभीर विषयाचे हसे उडवले जाते. प्रगो यांचे म्हणणे पटते की अशा प्रकारच्या लेखातून टीकाकारांना संधी मिळते. मी तुम्हाला सांगतो - नामस्मरणाचा भौतिक , इहवादी जगात शून्य उपयोग होणार आहे असे, आणून आणि कळूनही जो केवळ प्रेमाने नामस्मरण करेल त्याला निमिषार्धात "लाभ" झाल्याशिवाय राहणार नाही !. हे परस्पर विरोधी विधान वाटते. प्रगो यांनी थोडा प्रकाश टाकावा. विवेक पटाईत सो. बरोबर सहमत. नामस्मरणाचे साधन सामान्य प्रापंचिक माणसांसाठी व त्यातूनच अध्यात्मिक प्रगती साधून घेण्याची संधी संतानी सांगीतली आहे. मला नामस्मरण सर्वात सोपे व सहजसाध्य साधन वाटते. आगदी देशाच्या सीमेवर पहारा देत असताना सुद्धा हे सर्वांगसुंदर साधन उपलब्ध असते. नामस्मरणाचे महत्त्व सर्व संतानी सांगीतले आहे. काही उदाहरणार्थ माऊलींचा हरिपाठ बर्‍याच लोकांच्या नित्यवचनात असतो. माऊली म्हणतात किती तीर्थक्षेत्रे फिरली पण नामस्मरण नसेल तरी ती यात्रा फलद्रूप होणार नाही एवढी नामस्मरणाची महती सांगीतली आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्‍त नाही नामी तरी ते व्‍यर्थ॥ नामासी विन्‍मूख तो नर पापीया । हरीविण धावया न पवे कोणी॥ पुराण प्रसीध्‍द बोलीले वाल्‍मीक । नामे तिन्‍ही लोक उध्‍दरती॥ जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता उठाउठी, होय संसाराची तुटी || धृ || ऐस लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी मिठी || १ || नामपरते साधन नाही, जे तू करिसी आणिक काही || २ || हाकरोनो सांगे तुका, नाम घेता राहो नका || ३ || संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचा अभंगही हेच सांगतो. पाहतां साधन विठ्ठलकीर्तन । भक्तसंजीवन आत्माराम ॥ १ ॥ विठ्ठल सधर भिवरा तें नीर । नाम निरंतर केशवाचें ॥ २ ॥ शिवसुरवर चिंतिती सुस्वर । कीर्तनविचार पंढरीसी ॥ ३ ॥ निवृत्ति कीर्तन दिननिशीं ध्यान । मनाचें उन्मन इये रूपीं ॥ ४ ॥ उघडें स्वरूप प्रत्येक्षाचें दीप । नाम घेतां पाप हरे जना ॥ १ ॥ तें रूप विनट विठ्ठल सकळ । सेवा दिनकाळ पंढरीयेसी ॥ २ ॥ रजतमें दूरी नामाची माधुरी । निशाणी एकसरी रामकृष्ण ॥ ३॥ भवाब्धितारक नावाडा विवेक । पुंडलिक देख सेवितसे ॥ ४ ॥ विश्व हें तारिलें नामचि पिकलें । केशवी रंगलें मन हेतु ॥ ५ ॥ निवृत्ति विठ्ठल सेवितु सकळ । दिनकाळफळ आत्माराम ॥ ६ ॥ परब्रह्नाचे नाम घेतले तर सगऴी पापे नष्ट होतात. केशव नामाच्या साधनेत मन रंगले की विश्व तरले जाते हा नामाचा महिमा आहे. निवृत्तिनाथ म्हणतात ह्या रात्रंदिवस केलेल्या नामाच्या साधनेने मला जगत आत्माराम स्वरुपात दिसले. सांप्रत कथेमधे जो नामस्मरणाचा जो हिशोब मांडला आहे तो काही पटत नाही व कुठल्याच संतानी सांगीतला नसावा. चुकभुल देणे घेणे. कथा काल्पनिक आहे असे बोलून कथावास्तूपासून लेखक दुर जाऊन शकत नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

हे परस्पर विरोधी विधान वाटते. प्रगो यांनी थोडा प्रकाश टाकावा
जरा जास्त सोपीकरण करून - थिअरी अर्थात ज्ञानयोग सहजसाध्य नाही, पूर्वजन्मीचे पुण्य असेल तरच तात्काळ उमगणारा आहे. प्रॅक्टिकल अर्थात कर्मयोग थकवणारा आहे. जेरीस आणणारा आहे. राजयोग सामान्य गृहस्थ प्रापंचिकाना सहजसाध्य नाही. मग सामान्य माणसाने करायचं काय तर म्हणून भगवंताने भक्तीयोग सांगितला जो की ह्या तिन्हीनचा समुच्चायात्मक आहे. तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च। मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्।। नामस्मरण ही नवविधाभक्ती मार्गातील तिसरी भक्ती. पण गोंदवलेकर महाराज म्हणाले तसे तुम्ही 9 कोस लांब राहणाऱ्या माणसाला भेटायला निघालात अन् तो तुम्हाला 3 कोसावरच भेटला तर पुढचे 6 कोस त्याच्याच सोबत गेले काय की न गेले काय , काहीही फरक पडत नाही. म्हणून नाम श्रेष्ठ. नाम देव आणि ज्ञान ही देव. पण नामदेव सुलभ आहे, ज्ञानदेव कठीण आहे पण सर्वोच्च आहे ! जैसा दीपें दीपु लाविजे, तेथ आदील कोण हें नोळखिजे। तैसा सर्वस्वें जो मज भजे, तो मीची होऊनि ठाके ॥ मी जो निमिषार्धात लाभ होईल म्हणालो , तो "लाभ" हा आहे ! हेचि जाण भक्तीचे फळ ! जेणे तुटे संसार मूळ ! निःसंग आणि निर्मळ ! आत्मा होईजे स्वये !! श्रीराम !! - समर्थ रामदास स्वामी. आता ही आभाळाएवढी मोठी गोष्ट सोडून कुठे अन् कशाला उगाच देवाला थातूरमातूर गोष्टी मागत बसायचे !! इत्यलम राम

In reply to by प्रसाद गोडबोले

आता ही आभाळाएवढी मोठी गोष्ट सोडून कुठे अन् कशाला उगाच देवाला थातूरमातूर गोष्टी मागत बसायचे !! शंभर टक्के सहमत. देव म्हणजे काय रेशन दुकानदार आहे काय?कार्डावरील युनिट बघून साखर वाटप करणारा. इथे मला कवी संदीप खरे यांच्या कवितेतल्या ओळी आठवतात. मी आस्तिक मोजत पुण्या‌ईची खोली, नवसांची ठेवून लाच लावतो बोली, तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या अन धन्यवाद देवाचे घेवून जातो.

मारवा 29/07/2025 - 05:25
अवघड आहे. कंदमुळे खाऊन एक लंगोट घालून (याचीही काय गरज म्हणा) बरे necessities सांभाळून संपूर्ण आयुष्य पूर्ण ताकद लावून नामस्मरण करणे हेच जीवनाचे सर्वस्व सार्थक फलित मानल्यास असे आयुष्य जगणाऱ्या समजा अशांची संख्या करोडोने झाली तर अशा अप्रगत रानटी समाजाचे जे चित्र डोळ्यासमोर उभे राहते ते भयावह आहे कुठलाही विकास नाही प्रगती नाही आनंद नाही सुविधा नाही भाव नाही भावना नाही केवळ नाम केवळ नाम अवघड आहे हेच करायचे तर मेंदूचा आणि इतर अवयवाचा उपयोग तरी काय केवळ मुखाने वाजत राहिले तरी खूप आहे. कल्पना करा 140 करोड सर्व शांत बसलेले आहेत सर्व चक्र कोरोना काळा सारखे थांबलेले आहे. सर्वत्र केवळ नामस्मरणाचा हुंकार अवघड आहे आण

In reply to by मारवा

विवेकपटाईत 29/07/2025 - 10:52
नामस्मरण करता करता पुरुषार्थ ही करता येतो. नामस्मरण हे सांसारिक माणसांसाठी आहे. हिमालयात साधू संत मानसिक आध्यात्मिक शक्ती प्राप्त करणे साठी तपस्या करतात.

In reply to by मारवा

Bhakti 29/07/2025 - 15:03
ज्यांना अध्यात्मिक उन्नती मिळवायची आहे त्यांना भक्तिमार्ग ही सहज वाट आहे.त्यातील नामस्मरण ही एक साधना आहे.परंतू शास्त्रात हे स्पष्ट आहे की ज्ञानमार्ग हा परब्रह्म एकरूपतेचा सर्व श्रेष्ठ मार्ग आहे.या मार्गाकडे सर्वांना वळवण्याचे काम ज्ञानी लोकांचे आहे.परंतू यासाठी भक्तिमार्गातील जणांना कमी लेखने योग्य नाही,जो पर्यंत आपल्याला त्रास नाही तो पर्यंत त्यांना त्यांच्या मार्गाने जाण्यास बंदी नाही.

In reply to by Bhakti

चूक
ज्ञानमार्ग हा परब्रह्म एकरूपतेचा सर्व श्रेष्ठ मार्ग आहे
चूक. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते | ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ||

In reply to by प्रसाद गोडबोले

अभ्यासाहूनि गहन । पार्था मग ज्ञान । ज्ञानापासोनि ध्यान । विशेषिजे ॥ १४१ ॥ मग कर्मफलत्यागु । तो ध्यानापासोनि चांगु । त्यागाहूनि भोगु । शांतिसुखाचा ॥ १४२ ॥

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 30/07/2025 - 10:33
पण कर्मयोग लगेच समजत नाही त्यासाठी ज्ञान व्हावं लागत वा भक्ति करत 'कृष्णार्पणमस्तु' करत निष्काम कर्मयोग साधावा लागतो.दोघांची तुलना करत इथे श्रेष्ठ सांगत आहे. निष्काम कर्मयोग हे बुद्धीगम्य व्हायला हे दोन्ही आहेत ना.पण नामस्मरणाने हा कर्मयोग मिळवण्यात काहीच आनंद मला वाटतं नाही हं !

श्वेता२४ 29/07/2025 - 14:57
त्यामुळे केवळ करमणुक म्हणून पाहणे गरजेचे. बाकी वास्तव व अवास्तव गोष्टींची छान मिसळ आहे. चांगला प्रयत्न. लिहीत राहा.

स्वधर्म 29/07/2025 - 16:16
खरे तर या कथेवर अजिबात प्रतिसाद लिहिणार नव्हतो. पण वरती काही जणांनी लिहिल्याने मला धाडस (होय धाडसच) करावेसे वाटले. आपल्या श्र्ध्देला धक्का लावण्याची आजिबात इच्छा नाही, त्यामुळे आधीच क्षमा असावी. कृपया पटले नाही तर सोडून द्या. आपण ही काल्पनिक कथा म्हणून लिहिली असली तरी त्यातून आपल्या अत्यंत श्रध्दावान अंतःकरणाचे दर्शन घडते. आपल्यासारखे अनेक सश्रध्द नातेवाईक स्वामी समर्थांचे भक्त झालेले आहेत. त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. पण ज्या अर्थी आपण कथा लिहिताय त्या अर्थी आपल्याकडे विचार करण्याची किमान शक्ती अजून असावी असे वाटून आपणांस भानावर या अशी विनंती करावीशी वाटत आहे. >>रोज एक तास जप याप्रमाणे १० वर्ष जप झाला आहे. तो जवळजवळ १ कोटी ८०,०००. त्यातला खरा मनापासून केलेला ७३लाख ८० हजार . १५ लक्ष मुलाचा ऍक्सीडेन्ट झाला, मुलगा आय सी यु मध्ये होता तेव्हा खर्च झाला, २३ लक्ष नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून लागले. स्वतःच्या मालकीचा फ्लॅट व्हावा म्हणून सद्गुरूंपाशी मागणे केले होते तेव्हा १७ लक्ष खर्च झाला. नवऱ्याची कोर्ट केस जिंकावी म्हणून महाराजांना केलेले मागणे यात १४ लक्ष जप खर्च झाला. मुलाला योग्य ठिकाणी ऍडमिशन मिळावी म्हणून मागणे मागितले त्यात २ लक्ष जप खर्च झाला. राहता राहिला २लक्ष ८०,००० जप. यातला १ लक्ष ७७००० हजार जप हा मनापासून झाला आहे. हे म्हणजे एखाद्या गल्लीच्या कोपर्‍यावरच्या सोनाराच्या भीशी योजनेसारखे वाटत आहे. स्वतः च्या मालकीचा फ्लॅट जर नामस्मरण मोजून घेता येतो असे मानणे हे आपल्या श्रध्देशी सुसंगत असेलही, पण काबाडकष्ट करून, प्रामाणिकपणे पैसे साठवून फ्लॅट घेणार्‍या तमाम सरळमार्गी पण स्वामी समर्थांवर श्रध्दा नसलेल्या लोकांचा घोर अपमान आहे. तसेच काहीही अपराध करा (कोर्ट केस का ते सांगितले नाही) पण जप केला तर सुटाल असे म्हणणे हा कदाचित स्वामींचाही अपमानच आहे की काय असे वाटते. कोणी तरी म्हटले आहे, की देव जर केवळ नामस्मरणाने प्रसन्न होत असेल तर त्याच्यासारखा आत्मस्तुतीची आस असणार कोत्या मनाचा दुसरा कोणी नाही. देव किंवा साधू नामाचा असा सौदा करतात असे म्हणणे हा त्यांचाच अपमान नाही का?

आर्या१२३ 29/07/2025 - 17:42
पण काबाडकष्ट करून, प्रामाणिकपणे पैसे साठवून फ्लॅट घेणार्‍या तमाम सरळमार्गी पण स्वामी समर्थांवर श्रध्दा नसलेल्या लोकांचा घोर अपमान आहे. लेखातील वाक्यांचा असा विपरीत अर्थ निघत असल्यास क्षमा करा. लेखाचा हेतु हा नव्ह्ता. खरे तर आपले नामस्मरण कुठे खर्च होते हे स्वतःच स्वतःला जोखण्याचा हा प्रयत्न होता. अनेक वर्ष नाम घेउनही नाम सखोल का जात नाही? नामाचा परिणाम वृत्तीबदल, चित्तशुद्धी का होत नाही? या प्रश्नांची ही स्वत:च स्वतःला दिलेली उत्तरे होती. ती त्या बाडधारी व्यक्तीच्या मुखातुन घालण्यात आली असे म्हणा हवे तर. हे सुचण्यासाठी , वर सांगितल्याप्रमाणे श्रीमहाराजांचे ज्येष्ठ शिष्य श्री ल ग मराठे उर्फ बापुसाहेब मराठे यांच्याविषयीची एक गोष्ट कारणीभुत झाली, एवढेच म्हणेन इथे. नाम हे कुठल्या कारणासाठी न घेता, किंवा प्रपंच स्थीर व्हावा यासाठी न घेता केवळ नामासाठी नाम घ्यावे असे महाराज म्हणतात. हे सांगायच, होत इतकेच. ,अवघड आहे. कंदमुळे खाऊन एक लंगोट घालून (याचीही काय गरज म्हणा) बरे necessities सांभाळून संपूर्ण आयुष्य पूर्ण ताकद लावून नामस्मरण करणे हेच जीवनाचे सर्वस्व सार्थक फलित मानल्यासअसे आयुष्य जगणाऱ्या समजा अशांची संख्या करोडोने झाली तर अशा अप्रगत रानटी समाजाचे जे चित्र डोळ्यासमोर उभे राहते ते नामस्मरणासारखा दुसरा सोपा मार्ग नाही. ते प्रपंचात राहुनही करता येते. बर, याला काही कर्मकाण्डाची गरज नाही. सोवळे ओवळे नाही. गाडीत, प्रवासात, चप्पल घालुन, न घालता, माळ हातात न घेता, कसेही करता येते. त्यासाठी लंगोट लावुन वनात जायची गरज नाही. काहीवेळा स्तोत्र म्हणायला सुद्धा शुचिर्भुतता लागते. त्याची इथे गरज पडत नाही. बाकी, नामाने काय मिळते, काय साध्य होते हे नाम घेतल्याशिवाय कळणार नाही.

अनेक सश्रध्द नातेवाईक स्वामी समर्थांचे भक्त झालेले आहेत. त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. आपला प्रतिसाद चुकीचा नाही. पोटतिडीक साफ दिसत आहे. आमच्या एका नातेवाईकांनी आपल्या मुलाला बारावी नंतर लोणावळ्यात कुठल्यातरी आश्रमात शिकायला पाठवले. (नाव सांगणे उचित नाही) मी म्हणत होतो पुढील शिक्षणाचे काय तर म्हणाले याला आगोदरच तीथे पाठवायला हवे होते. ऊशीर झाला. मी कपाळावर हात मारून घेतला. दोन तीन वर्षानंतर काढून घेतले कसाबसा पदवीधर झाला. इकडे तिकडे नोकरी करत आयुष्य घालवत आहे. जवळचा असल्याने वाईट वाटते. दुसरी एक अशीच केस, स्वामी भक्त,खुप लोकांची अर्थिक फसवणूक केली. वारंवार सुचना देऊन,अर्थिक संकटातून बाहेर काढल्यानंतर ही सुधारत नाही. त्यामुळे सर्व नातेवाईकांनी संबध तोडले. आता ज्यांना फसवले त्याचां ससेमिरा चुकवण्यासाठी गावोगाव भटकत असतो .(अर्थात स्वांमीचा काही दोष नाही. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीमागे आहे या स्वामींच्या आशिरवचनाचा चुकीचा अर्थ घेतला.) श्रद्धे बरोबर सबुरी आणी स्वधर्मानुसार कर्म हे ही हवे.

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म 29/07/2025 - 19:28
या कथेत पण दहा वर्षे नियमितपणे जप करणार्‍या स्त्रीचा नवरा करोनात अकाली गेला ज्याच्या मागे कोर्ट कचेरीचा त्रास होता. तिच्या मुलाचा आय सी यूत ठेवण्याएवढा गंभीर अपघात झाला. स्वत: तिला ५५ व्या वर्षी 'नुसते फॅन साफ करताना स्टूलावरून पडण्याचे निमित्त झाले आणि डोक्याच्या मागच्या भागाला जबरदस्त दुखापत' झाली. तेही गुरूपौर्णिमेच्या आधल्या दिवशी. शिवाय तीन महिने ज्युपीटरचे आय सी यूचे बील म्हणजे... ज्यांना त्याची कल्पना आहे तेच जाणोत अशा दवाखान्याचे बील किती असते ते. दहा वषे मनापासून जप करून इतके सारे दुर्दैव वाट्याला आले. तरी पण श्रध्दावानांना इथे 'नामाचा महिमा'च दिसणार. म्हणून म्हणालो, जे लोक पूर्णपणे अतिश्रध्देच्या आहारी गेले आहेत, त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. तुंम्ही समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by स्वधर्म

मारवा 29/07/2025 - 20:55
नवऱ्याची केस जिंकली आता विरोधी जो होता त्याने किंवा त्याच्या बायकोने नामस्मरणाचा घडा काउंटर करून भरला असता तर मग महाराजांनी निकालच रोखून धरला असता का ? बरे दोघांचे 10 लाख 10 लाख झाले मग टाय केला असता का ? सर्वात रोचक बाब बघा महाराजांना न्याय्य काय याची चाड नाही. नामस्मरण किती झाले हे नवऱ्याने जरी काही गैर वर्तन केले असले तरी त्याहूनही महत्वाचे आहे. नामस्मरण हे त्याला त्या गैरकृत्याला अधिकृत करून घेईल. नवऱ्यावर कितीही गंभीर गुन्हा असो. हे ही सोडा जे मन केवळ मोजदाद करत आहे ते किती अस्थिर आहे. मानस सरोवराची कल्पना केली समजा तर त्यावर किती तरंग उमटत आहेत. यात पलायनवाद आहे याला spiritual bypassing म्हणतात. हे निरर्थक बिनडोक आवर्तन सातत्याने करून स्वतःला स्वतःच्या नैसर्गिक संवेदनांना बधिर करून घेणं आहे. अशी बधिर झालेली व्यक्ती जीवन सन्मुख राहू शकते का ? कुणाच्या सुख दुःखात भाव भावनेत समरस होऊ शकते का ? असे बधिर असे अस्थिर मोजदाद करणारे भयभीत मन जीवनाला सकारात्मक सोडा मूलभूत प्रतिसाद देण्यास सक्षम असते का ? Can it appreciate life ?

In reply to by मारवा

मूकवाचक 29/07/2025 - 21:34
मुखी भगवंताचे नाम । हाती प्रपंचाचे काम । ऐसा जोडा मनी राम । सद्गुरू शिष्याचे भोग टाळीत नाहीत, पण भोग भोगत असताना ते त्यांचे समाधान टिकवतात. नामावरची निष्ठा कसे काम करते, हे निष्ठेने नाम घेणाऱ्यालाच कळते. व्यवहारातील कामे करण्यासाठी कर्तव्याचे स्मरण हवे आणि समाधानी वृत्तीत जगण्यासाठी कर्तव्यात भगवंताचे स्मरण हवे. आपल्या सोबत सदैव भगवंत आहे असे वाटणे हेच खरे अनुसंधान होय. स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो हेच आपले चुकते. परमार्थी माणसाने दैन्यवाणे राहायचे कारण नाही, पैसा असेल तर रोज त्याने श्रीखंड पुरी खावी, पण उद्या उपवास पडला तर मात्र आजच्या पक्वान्नाची आठवण होता कामा नये. नाम घेणाऱ्याला सत्कर्मे टाळू म्हणून टाळता येणार नाहीत. नाम मुखी आले की सत्कर्मे हातून आपोआप घडू लागतात. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असे समजून वागावे, म्हणजे दुष्कर्मे हातून घडणार नाहीत. बाकी असो ...

कथा म्हणून आवडली. अति सर्वत्र वर्जयेत् ! माझ्यासाठी नामस्मरण ही मन रिकामे असताना आपण फालतू विचार, चिंता करत बसतो तेव्हा करण्याची गोष्ट आहे. सगळा प्रपंच आणि पुरुषार्थ सोडून करण्याची गोष्ट नक्कीच नाही. उगीच विचारांच्या लूप्स मध्ये मन जायला लागलं की नामस्मरण ध्यानवत कार्य करते, मोजणी कधी केली नाही पण आजपर्यंत :)

अंहं ही कथा काही भावली नाही. महत्वाचे कारण म्हणजे ह्या कथेत असलेले spiritual materialism. नामस्मरणाने चमत्कार होतो, पेशंट तीन महिन्याने शुद्धीवर येतो, वैकुंठ , परलोक वगैरे सगळं spiritual materialism आहे. त्याचा उपयोग अत्यंत प्राथमिक स्तरावरील साधकांसाठी आहे. त्यांना त्या ओढीने का होईना अध्यात्माची ओढ लागते. एरव्ही " जाणत्या" साधकांसाठी हे सारं फारच हास्यास्पद आहे. मुळात कोणीतरी आपल्या पापपुण्याचा, आपल्या नामस्मरणाचा हिशेब ठेवत आहेत ही संकल्पनाच हास्यास्पद आहे. ते 13 कोटी जप वगैरे फार अलीकडे आले. बस एकवार , मोजून एकदा समजून घेतले एक " राम" हे नाम , फक्त एकदा, बस इतके "पुरेसे" आहे. हा तुकोबांचा अभंग पहा : राम म्हणता रामचि होईजे।पदी बैसोन पदवी घेईजे ।।१।। ऐसे सुख वचनी आहे।विश्वासे अनुभव पाहे ।।धृ।। रामरसाचिया चवी।आन रस रुचती केवी ।।३।। तुका म्हणे चाखोनि सांगे ।मज अनुभव आहे अंगे ।।४।। तस्मात् हे सारं आध्यात्मिक भौतिकवाद इहवाद बाजूला सारून एकदा "राम" म्हणा , "समजून" म्हणा. बस. इतके पुरेसे आहे. त्यानंतर व्हायचे ते होऊ दे देह जावो अथवा राहो। पांडुरंगीं दृढ भावो ।। काय फरक पडतो !! जे होतंय ते, जे झालं ते आणि जे जे काही होईल ते सर्वच रामाची इच्छा !!

आपापला दृष्टिकोन. लेखकाने ही कथा काल्पनिक आहे असे लिहीले आहे. आध्यात्म, परमार्थ वैगेरेच्या भानगडीत मी पडत नाही. स्वधर्मानुसार समोर येणारे कर्म करणे एवढेच समजते. तसे माझे पणजोबा,पणजी व आजोबा दत्तसंप्रदायातील अनुग्रहीत अधीकारी होते पण नात्याच्या पलिकडे काही नाही. एक कथा म्हणून आवडली.

आर्या१२३ 28/07/2025 - 12:48
नामस्मरणाने चमत्कार होतो, पेशंट तीन महिन्याने शुद्धीवर येतो, वैकुंठ , परलोक वगैरे सगळं spiritual materialism आहे. त्याचा उपयोग अत्यंत प्राथमिक स्तरावरील साधकांसाठी आहे. त्यांना त्या ओढीने का होईना अध्यात्माची ओढ लागते. एरव्ही " जाणत्या" साधकांसाठी हे सारं फारच हास्यास्पद आहे. प्रगो, हे अवास्तव नाही. साधकांनी सांगितलेले अनुभव आहे. माझ्या मैत्रिणीच्या सासुबाई शेवटी शेवटी तीन महिने कोमात होत्या. आणि तरी त्यांची बोटे माळ फिरवल्यासारखी हलत होती. मुळात कोणीतरी आपल्या पापपुण्याचा, आपल्या नामस्मरणाचा हिशेब ठेवत आहेत ही संकल्पनाच हास्यास्पद आहे. ते 13 कोटी जप वगैरे फार अलीकडे आले. नामस्मरणाचा हिशोब वैगेरे हे आकडे द्यावे म्हणुन मी लिहीले आहे, निव्वळ आपला जप प्रापंचिक मागणे पुर्ण करण्यात कसा खर्च होतो हे सांगण्यासाठी. आणि हे मनाचे नाही तर श्री बापुसाहेब मराठे यांच्या पुस्तकात येउन गेले आहे. बाकी तेरा कोटी जपाबद्दल म्हणशील तर महाराजांच्या चरित्रात उल्लेख आहे. महाराजांनी स्वतःच त्यांच्या काही शिष्यांना तेरा कोटीचा संकल्प करण्यास सांगितले होते. काहींना साडे तीन कोटीचा करण्यास सांगितले.

In reply to by आर्या१२३

म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो. अशा आध्यात्मिक इहवादी कथा , आख्यायिकांमुळे नास्तिक निधर्मी, धर्म विध्वसंक लोकांचे फावते , अन् त्यांना टीका करायला फट मिळते अन् गंभीर विषयाचे हसे उडवले जाते. मी तुम्हाला सांगतो - नामस्मरणाचा भौतिक , इहवादी जगात शून्य उपयोग होणार आहे असे, आणून आणि कळूनही जो केवळ प्रेमाने नामस्मरण करेल त्याला निमिषार्धात "लाभ" झाल्याशिवाय राहणार नाही !. रामाचे नाव घेऊन त्याला घर गाडी बायका पोरं वगैरे मागणे म्हणजे सोनाराच्या दुकानात जाऊन कोथिंबीरची जुडी मागण्यासारखं आहे. त्यामुळे समर्थांचे जे मागणे आहे ते च आपले मागणे आहे - " मागणेची निरसे जेणे l ऐसे देगा रामराया ll " नामाचा महिमा अगाध आहे , त्याला शुल्लक प्रापंचिक उपभोग प्राप्त करून घ्यायचा उपाय असे रूप यायला नको. नामाचे साध्य ही अवस्था आहे - देहींच विदेह होणें । करून कांहींच न करणें । जीवन्मुक्तांचीं लक्षणें । जीवन्मुक्त जाणती ॥ ३३॥ राम

In reply to by प्रसाद गोडबोले

अशा आध्यात्मिक इहवादी कथा , आख्यायिकांमुळे नास्तिक निधर्मी, धर्म विध्वसंक लोकांचे फावते , अन् त्यांना टीका करायला फट मिळते अन् गंभीर विषयाचे हसे उडवले जाते. प्रगो यांचे म्हणणे पटते की अशा प्रकारच्या लेखातून टीकाकारांना संधी मिळते. मी तुम्हाला सांगतो - नामस्मरणाचा भौतिक , इहवादी जगात शून्य उपयोग होणार आहे असे, आणून आणि कळूनही जो केवळ प्रेमाने नामस्मरण करेल त्याला निमिषार्धात "लाभ" झाल्याशिवाय राहणार नाही !. हे परस्पर विरोधी विधान वाटते. प्रगो यांनी थोडा प्रकाश टाकावा. विवेक पटाईत सो. बरोबर सहमत. नामस्मरणाचे साधन सामान्य प्रापंचिक माणसांसाठी व त्यातूनच अध्यात्मिक प्रगती साधून घेण्याची संधी संतानी सांगीतली आहे. मला नामस्मरण सर्वात सोपे व सहजसाध्य साधन वाटते. आगदी देशाच्या सीमेवर पहारा देत असताना सुद्धा हे सर्वांगसुंदर साधन उपलब्ध असते. नामस्मरणाचे महत्त्व सर्व संतानी सांगीतले आहे. काही उदाहरणार्थ माऊलींचा हरिपाठ बर्‍याच लोकांच्या नित्यवचनात असतो. माऊली म्हणतात किती तीर्थक्षेत्रे फिरली पण नामस्मरण नसेल तरी ती यात्रा फलद्रूप होणार नाही एवढी नामस्मरणाची महती सांगीतली आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्‍त नाही नामी तरी ते व्‍यर्थ॥ नामासी विन्‍मूख तो नर पापीया । हरीविण धावया न पवे कोणी॥ पुराण प्रसीध्‍द बोलीले वाल्‍मीक । नामे तिन्‍ही लोक उध्‍दरती॥ जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता उठाउठी, होय संसाराची तुटी || धृ || ऐस लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी मिठी || १ || नामपरते साधन नाही, जे तू करिसी आणिक काही || २ || हाकरोनो सांगे तुका, नाम घेता राहो नका || ३ || संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचा अभंगही हेच सांगतो. पाहतां साधन विठ्ठलकीर्तन । भक्तसंजीवन आत्माराम ॥ १ ॥ विठ्ठल सधर भिवरा तें नीर । नाम निरंतर केशवाचें ॥ २ ॥ शिवसुरवर चिंतिती सुस्वर । कीर्तनविचार पंढरीसी ॥ ३ ॥ निवृत्ति कीर्तन दिननिशीं ध्यान । मनाचें उन्मन इये रूपीं ॥ ४ ॥ उघडें स्वरूप प्रत्येक्षाचें दीप । नाम घेतां पाप हरे जना ॥ १ ॥ तें रूप विनट विठ्ठल सकळ । सेवा दिनकाळ पंढरीयेसी ॥ २ ॥ रजतमें दूरी नामाची माधुरी । निशाणी एकसरी रामकृष्ण ॥ ३॥ भवाब्धितारक नावाडा विवेक । पुंडलिक देख सेवितसे ॥ ४ ॥ विश्व हें तारिलें नामचि पिकलें । केशवी रंगलें मन हेतु ॥ ५ ॥ निवृत्ति विठ्ठल सेवितु सकळ । दिनकाळफळ आत्माराम ॥ ६ ॥ परब्रह्नाचे नाम घेतले तर सगऴी पापे नष्ट होतात. केशव नामाच्या साधनेत मन रंगले की विश्व तरले जाते हा नामाचा महिमा आहे. निवृत्तिनाथ म्हणतात ह्या रात्रंदिवस केलेल्या नामाच्या साधनेने मला जगत आत्माराम स्वरुपात दिसले. सांप्रत कथेमधे जो नामस्मरणाचा जो हिशोब मांडला आहे तो काही पटत नाही व कुठल्याच संतानी सांगीतला नसावा. चुकभुल देणे घेणे. कथा काल्पनिक आहे असे बोलून कथावास्तूपासून लेखक दुर जाऊन शकत नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

हे परस्पर विरोधी विधान वाटते. प्रगो यांनी थोडा प्रकाश टाकावा
जरा जास्त सोपीकरण करून - थिअरी अर्थात ज्ञानयोग सहजसाध्य नाही, पूर्वजन्मीचे पुण्य असेल तरच तात्काळ उमगणारा आहे. प्रॅक्टिकल अर्थात कर्मयोग थकवणारा आहे. जेरीस आणणारा आहे. राजयोग सामान्य गृहस्थ प्रापंचिकाना सहजसाध्य नाही. मग सामान्य माणसाने करायचं काय तर म्हणून भगवंताने भक्तीयोग सांगितला जो की ह्या तिन्हीनचा समुच्चायात्मक आहे. तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च। मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्।। नामस्मरण ही नवविधाभक्ती मार्गातील तिसरी भक्ती. पण गोंदवलेकर महाराज म्हणाले तसे तुम्ही 9 कोस लांब राहणाऱ्या माणसाला भेटायला निघालात अन् तो तुम्हाला 3 कोसावरच भेटला तर पुढचे 6 कोस त्याच्याच सोबत गेले काय की न गेले काय , काहीही फरक पडत नाही. म्हणून नाम श्रेष्ठ. नाम देव आणि ज्ञान ही देव. पण नामदेव सुलभ आहे, ज्ञानदेव कठीण आहे पण सर्वोच्च आहे ! जैसा दीपें दीपु लाविजे, तेथ आदील कोण हें नोळखिजे। तैसा सर्वस्वें जो मज भजे, तो मीची होऊनि ठाके ॥ मी जो निमिषार्धात लाभ होईल म्हणालो , तो "लाभ" हा आहे ! हेचि जाण भक्तीचे फळ ! जेणे तुटे संसार मूळ ! निःसंग आणि निर्मळ ! आत्मा होईजे स्वये !! श्रीराम !! - समर्थ रामदास स्वामी. आता ही आभाळाएवढी मोठी गोष्ट सोडून कुठे अन् कशाला उगाच देवाला थातूरमातूर गोष्टी मागत बसायचे !! इत्यलम राम

In reply to by प्रसाद गोडबोले

आता ही आभाळाएवढी मोठी गोष्ट सोडून कुठे अन् कशाला उगाच देवाला थातूरमातूर गोष्टी मागत बसायचे !! शंभर टक्के सहमत. देव म्हणजे काय रेशन दुकानदार आहे काय?कार्डावरील युनिट बघून साखर वाटप करणारा. इथे मला कवी संदीप खरे यांच्या कवितेतल्या ओळी आठवतात. मी आस्तिक मोजत पुण्या‌ईची खोली, नवसांची ठेवून लाच लावतो बोली, तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या अन धन्यवाद देवाचे घेवून जातो.

मारवा 29/07/2025 - 05:25
अवघड आहे. कंदमुळे खाऊन एक लंगोट घालून (याचीही काय गरज म्हणा) बरे necessities सांभाळून संपूर्ण आयुष्य पूर्ण ताकद लावून नामस्मरण करणे हेच जीवनाचे सर्वस्व सार्थक फलित मानल्यास असे आयुष्य जगणाऱ्या समजा अशांची संख्या करोडोने झाली तर अशा अप्रगत रानटी समाजाचे जे चित्र डोळ्यासमोर उभे राहते ते भयावह आहे कुठलाही विकास नाही प्रगती नाही आनंद नाही सुविधा नाही भाव नाही भावना नाही केवळ नाम केवळ नाम अवघड आहे हेच करायचे तर मेंदूचा आणि इतर अवयवाचा उपयोग तरी काय केवळ मुखाने वाजत राहिले तरी खूप आहे. कल्पना करा 140 करोड सर्व शांत बसलेले आहेत सर्व चक्र कोरोना काळा सारखे थांबलेले आहे. सर्वत्र केवळ नामस्मरणाचा हुंकार अवघड आहे आण

In reply to by मारवा

विवेकपटाईत 29/07/2025 - 10:52
नामस्मरण करता करता पुरुषार्थ ही करता येतो. नामस्मरण हे सांसारिक माणसांसाठी आहे. हिमालयात साधू संत मानसिक आध्यात्मिक शक्ती प्राप्त करणे साठी तपस्या करतात.

In reply to by मारवा

Bhakti 29/07/2025 - 15:03
ज्यांना अध्यात्मिक उन्नती मिळवायची आहे त्यांना भक्तिमार्ग ही सहज वाट आहे.त्यातील नामस्मरण ही एक साधना आहे.परंतू शास्त्रात हे स्पष्ट आहे की ज्ञानमार्ग हा परब्रह्म एकरूपतेचा सर्व श्रेष्ठ मार्ग आहे.या मार्गाकडे सर्वांना वळवण्याचे काम ज्ञानी लोकांचे आहे.परंतू यासाठी भक्तिमार्गातील जणांना कमी लेखने योग्य नाही,जो पर्यंत आपल्याला त्रास नाही तो पर्यंत त्यांना त्यांच्या मार्गाने जाण्यास बंदी नाही.

In reply to by Bhakti

चूक
ज्ञानमार्ग हा परब्रह्म एकरूपतेचा सर्व श्रेष्ठ मार्ग आहे
चूक. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते | ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ||

In reply to by प्रसाद गोडबोले

अभ्यासाहूनि गहन । पार्था मग ज्ञान । ज्ञानापासोनि ध्यान । विशेषिजे ॥ १४१ ॥ मग कर्मफलत्यागु । तो ध्यानापासोनि चांगु । त्यागाहूनि भोगु । शांतिसुखाचा ॥ १४२ ॥

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 30/07/2025 - 10:33
पण कर्मयोग लगेच समजत नाही त्यासाठी ज्ञान व्हावं लागत वा भक्ति करत 'कृष्णार्पणमस्तु' करत निष्काम कर्मयोग साधावा लागतो.दोघांची तुलना करत इथे श्रेष्ठ सांगत आहे. निष्काम कर्मयोग हे बुद्धीगम्य व्हायला हे दोन्ही आहेत ना.पण नामस्मरणाने हा कर्मयोग मिळवण्यात काहीच आनंद मला वाटतं नाही हं !

श्वेता२४ 29/07/2025 - 14:57
त्यामुळे केवळ करमणुक म्हणून पाहणे गरजेचे. बाकी वास्तव व अवास्तव गोष्टींची छान मिसळ आहे. चांगला प्रयत्न. लिहीत राहा.

स्वधर्म 29/07/2025 - 16:16
खरे तर या कथेवर अजिबात प्रतिसाद लिहिणार नव्हतो. पण वरती काही जणांनी लिहिल्याने मला धाडस (होय धाडसच) करावेसे वाटले. आपल्या श्र्ध्देला धक्का लावण्याची आजिबात इच्छा नाही, त्यामुळे आधीच क्षमा असावी. कृपया पटले नाही तर सोडून द्या. आपण ही काल्पनिक कथा म्हणून लिहिली असली तरी त्यातून आपल्या अत्यंत श्रध्दावान अंतःकरणाचे दर्शन घडते. आपल्यासारखे अनेक सश्रध्द नातेवाईक स्वामी समर्थांचे भक्त झालेले आहेत. त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. पण ज्या अर्थी आपण कथा लिहिताय त्या अर्थी आपल्याकडे विचार करण्याची किमान शक्ती अजून असावी असे वाटून आपणांस भानावर या अशी विनंती करावीशी वाटत आहे. >>रोज एक तास जप याप्रमाणे १० वर्ष जप झाला आहे. तो जवळजवळ १ कोटी ८०,०००. त्यातला खरा मनापासून केलेला ७३लाख ८० हजार . १५ लक्ष मुलाचा ऍक्सीडेन्ट झाला, मुलगा आय सी यु मध्ये होता तेव्हा खर्च झाला, २३ लक्ष नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून लागले. स्वतःच्या मालकीचा फ्लॅट व्हावा म्हणून सद्गुरूंपाशी मागणे केले होते तेव्हा १७ लक्ष खर्च झाला. नवऱ्याची कोर्ट केस जिंकावी म्हणून महाराजांना केलेले मागणे यात १४ लक्ष जप खर्च झाला. मुलाला योग्य ठिकाणी ऍडमिशन मिळावी म्हणून मागणे मागितले त्यात २ लक्ष जप खर्च झाला. राहता राहिला २लक्ष ८०,००० जप. यातला १ लक्ष ७७००० हजार जप हा मनापासून झाला आहे. हे म्हणजे एखाद्या गल्लीच्या कोपर्‍यावरच्या सोनाराच्या भीशी योजनेसारखे वाटत आहे. स्वतः च्या मालकीचा फ्लॅट जर नामस्मरण मोजून घेता येतो असे मानणे हे आपल्या श्रध्देशी सुसंगत असेलही, पण काबाडकष्ट करून, प्रामाणिकपणे पैसे साठवून फ्लॅट घेणार्‍या तमाम सरळमार्गी पण स्वामी समर्थांवर श्रध्दा नसलेल्या लोकांचा घोर अपमान आहे. तसेच काहीही अपराध करा (कोर्ट केस का ते सांगितले नाही) पण जप केला तर सुटाल असे म्हणणे हा कदाचित स्वामींचाही अपमानच आहे की काय असे वाटते. कोणी तरी म्हटले आहे, की देव जर केवळ नामस्मरणाने प्रसन्न होत असेल तर त्याच्यासारखा आत्मस्तुतीची आस असणार कोत्या मनाचा दुसरा कोणी नाही. देव किंवा साधू नामाचा असा सौदा करतात असे म्हणणे हा त्यांचाच अपमान नाही का?

आर्या१२३ 29/07/2025 - 17:42
पण काबाडकष्ट करून, प्रामाणिकपणे पैसे साठवून फ्लॅट घेणार्‍या तमाम सरळमार्गी पण स्वामी समर्थांवर श्रध्दा नसलेल्या लोकांचा घोर अपमान आहे. लेखातील वाक्यांचा असा विपरीत अर्थ निघत असल्यास क्षमा करा. लेखाचा हेतु हा नव्ह्ता. खरे तर आपले नामस्मरण कुठे खर्च होते हे स्वतःच स्वतःला जोखण्याचा हा प्रयत्न होता. अनेक वर्ष नाम घेउनही नाम सखोल का जात नाही? नामाचा परिणाम वृत्तीबदल, चित्तशुद्धी का होत नाही? या प्रश्नांची ही स्वत:च स्वतःला दिलेली उत्तरे होती. ती त्या बाडधारी व्यक्तीच्या मुखातुन घालण्यात आली असे म्हणा हवे तर. हे सुचण्यासाठी , वर सांगितल्याप्रमाणे श्रीमहाराजांचे ज्येष्ठ शिष्य श्री ल ग मराठे उर्फ बापुसाहेब मराठे यांच्याविषयीची एक गोष्ट कारणीभुत झाली, एवढेच म्हणेन इथे. नाम हे कुठल्या कारणासाठी न घेता, किंवा प्रपंच स्थीर व्हावा यासाठी न घेता केवळ नामासाठी नाम घ्यावे असे महाराज म्हणतात. हे सांगायच, होत इतकेच. ,अवघड आहे. कंदमुळे खाऊन एक लंगोट घालून (याचीही काय गरज म्हणा) बरे necessities सांभाळून संपूर्ण आयुष्य पूर्ण ताकद लावून नामस्मरण करणे हेच जीवनाचे सर्वस्व सार्थक फलित मानल्यासअसे आयुष्य जगणाऱ्या समजा अशांची संख्या करोडोने झाली तर अशा अप्रगत रानटी समाजाचे जे चित्र डोळ्यासमोर उभे राहते ते नामस्मरणासारखा दुसरा सोपा मार्ग नाही. ते प्रपंचात राहुनही करता येते. बर, याला काही कर्मकाण्डाची गरज नाही. सोवळे ओवळे नाही. गाडीत, प्रवासात, चप्पल घालुन, न घालता, माळ हातात न घेता, कसेही करता येते. त्यासाठी लंगोट लावुन वनात जायची गरज नाही. काहीवेळा स्तोत्र म्हणायला सुद्धा शुचिर्भुतता लागते. त्याची इथे गरज पडत नाही. बाकी, नामाने काय मिळते, काय साध्य होते हे नाम घेतल्याशिवाय कळणार नाही.

अनेक सश्रध्द नातेवाईक स्वामी समर्थांचे भक्त झालेले आहेत. त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. आपला प्रतिसाद चुकीचा नाही. पोटतिडीक साफ दिसत आहे. आमच्या एका नातेवाईकांनी आपल्या मुलाला बारावी नंतर लोणावळ्यात कुठल्यातरी आश्रमात शिकायला पाठवले. (नाव सांगणे उचित नाही) मी म्हणत होतो पुढील शिक्षणाचे काय तर म्हणाले याला आगोदरच तीथे पाठवायला हवे होते. ऊशीर झाला. मी कपाळावर हात मारून घेतला. दोन तीन वर्षानंतर काढून घेतले कसाबसा पदवीधर झाला. इकडे तिकडे नोकरी करत आयुष्य घालवत आहे. जवळचा असल्याने वाईट वाटते. दुसरी एक अशीच केस, स्वामी भक्त,खुप लोकांची अर्थिक फसवणूक केली. वारंवार सुचना देऊन,अर्थिक संकटातून बाहेर काढल्यानंतर ही सुधारत नाही. त्यामुळे सर्व नातेवाईकांनी संबध तोडले. आता ज्यांना फसवले त्याचां ससेमिरा चुकवण्यासाठी गावोगाव भटकत असतो .(अर्थात स्वांमीचा काही दोष नाही. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीमागे आहे या स्वामींच्या आशिरवचनाचा चुकीचा अर्थ घेतला.) श्रद्धे बरोबर सबुरी आणी स्वधर्मानुसार कर्म हे ही हवे.

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म 29/07/2025 - 19:28
या कथेत पण दहा वर्षे नियमितपणे जप करणार्‍या स्त्रीचा नवरा करोनात अकाली गेला ज्याच्या मागे कोर्ट कचेरीचा त्रास होता. तिच्या मुलाचा आय सी यूत ठेवण्याएवढा गंभीर अपघात झाला. स्वत: तिला ५५ व्या वर्षी 'नुसते फॅन साफ करताना स्टूलावरून पडण्याचे निमित्त झाले आणि डोक्याच्या मागच्या भागाला जबरदस्त दुखापत' झाली. तेही गुरूपौर्णिमेच्या आधल्या दिवशी. शिवाय तीन महिने ज्युपीटरचे आय सी यूचे बील म्हणजे... ज्यांना त्याची कल्पना आहे तेच जाणोत अशा दवाखान्याचे बील किती असते ते. दहा वषे मनापासून जप करून इतके सारे दुर्दैव वाट्याला आले. तरी पण श्रध्दावानांना इथे 'नामाचा महिमा'च दिसणार. म्हणून म्हणालो, जे लोक पूर्णपणे अतिश्रध्देच्या आहारी गेले आहेत, त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. तुंम्ही समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by स्वधर्म

मारवा 29/07/2025 - 20:55
नवऱ्याची केस जिंकली आता विरोधी जो होता त्याने किंवा त्याच्या बायकोने नामस्मरणाचा घडा काउंटर करून भरला असता तर मग महाराजांनी निकालच रोखून धरला असता का ? बरे दोघांचे 10 लाख 10 लाख झाले मग टाय केला असता का ? सर्वात रोचक बाब बघा महाराजांना न्याय्य काय याची चाड नाही. नामस्मरण किती झाले हे नवऱ्याने जरी काही गैर वर्तन केले असले तरी त्याहूनही महत्वाचे आहे. नामस्मरण हे त्याला त्या गैरकृत्याला अधिकृत करून घेईल. नवऱ्यावर कितीही गंभीर गुन्हा असो. हे ही सोडा जे मन केवळ मोजदाद करत आहे ते किती अस्थिर आहे. मानस सरोवराची कल्पना केली समजा तर त्यावर किती तरंग उमटत आहेत. यात पलायनवाद आहे याला spiritual bypassing म्हणतात. हे निरर्थक बिनडोक आवर्तन सातत्याने करून स्वतःला स्वतःच्या नैसर्गिक संवेदनांना बधिर करून घेणं आहे. अशी बधिर झालेली व्यक्ती जीवन सन्मुख राहू शकते का ? कुणाच्या सुख दुःखात भाव भावनेत समरस होऊ शकते का ? असे बधिर असे अस्थिर मोजदाद करणारे भयभीत मन जीवनाला सकारात्मक सोडा मूलभूत प्रतिसाद देण्यास सक्षम असते का ? Can it appreciate life ?

In reply to by मारवा

मूकवाचक 29/07/2025 - 21:34
मुखी भगवंताचे नाम । हाती प्रपंचाचे काम । ऐसा जोडा मनी राम । सद्गुरू शिष्याचे भोग टाळीत नाहीत, पण भोग भोगत असताना ते त्यांचे समाधान टिकवतात. नामावरची निष्ठा कसे काम करते, हे निष्ठेने नाम घेणाऱ्यालाच कळते. व्यवहारातील कामे करण्यासाठी कर्तव्याचे स्मरण हवे आणि समाधानी वृत्तीत जगण्यासाठी कर्तव्यात भगवंताचे स्मरण हवे. आपल्या सोबत सदैव भगवंत आहे असे वाटणे हेच खरे अनुसंधान होय. स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो हेच आपले चुकते. परमार्थी माणसाने दैन्यवाणे राहायचे कारण नाही, पैसा असेल तर रोज त्याने श्रीखंड पुरी खावी, पण उद्या उपवास पडला तर मात्र आजच्या पक्वान्नाची आठवण होता कामा नये. नाम घेणाऱ्याला सत्कर्मे टाळू म्हणून टाळता येणार नाहीत. नाम मुखी आले की सत्कर्मे हातून आपोआप घडू लागतात. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असे समजून वागावे, म्हणजे दुष्कर्मे हातून घडणार नाहीत. बाकी असो ...

कथा म्हणून आवडली. अति सर्वत्र वर्जयेत् ! माझ्यासाठी नामस्मरण ही मन रिकामे असताना आपण फालतू विचार, चिंता करत बसतो तेव्हा करण्याची गोष्ट आहे. सगळा प्रपंच आणि पुरुषार्थ सोडून करण्याची गोष्ट नक्कीच नाही. उगीच विचारांच्या लूप्स मध्ये मन जायला लागलं की नामस्मरण ध्यानवत कार्य करते, मोजणी कधी केली नाही पण आजपर्यंत :)
मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक "हे पहा, आम्हाला अशी माहिती मिळाली आहे, की तुम्हाला चुकून इथे आणले गेले. त्यावेळी तुमच्या पत्रिकेतील आणि आकाशातील ग्रहयोग जुळून आला होता आणि अतिगंड योग होता. पण नुकतेच तुमचे गुरु प.पु. श्री गोंदवलेकर महाराज यांनी शिफारस केल्यावरून वैकुंठातून श्रीरामांचा निरोप आला आहे की हा जीव चांगला आहे, आणि अजून नामस्मरण करू शकतो. यास्तव तुम्हाला परत पृथ्वीवर पाठवण्यात येणार आहे. " परलोकातील मोठ्या दालनात सिंहासनाधिष्ठित व्यक्तीने तिला जवळ बोलावून सांगितले. ती सुन्न होऊन ऐकत होती. हॉस्पिटलमध्ये त्या कुठल्याश्या क्षणी घेतलेल्या नुसत्या नामाचा हा परिणाम होता तर!

भाषिक अधःपतन आणि लिमिट n->0

प्रसाद गोडबोले ·

पूर्ण जगच मटेरिअलिस्टीक ( मराठी शब्द?) होत आहे त्यात भाषा सुध्दा सध्याच्या मागणीनुसार वळण घेत आहे. प्रत्येक चॅनेल गणिक डान्स रिअ‍ॅलिटी शोज चे पेव फुटले आहे आणि त्यात किती चॅनेल वर शुध्द शास्त्रीय नृत्य स्पर्धा असतात हे पाहणे शोधाचे विषय ठरेल. त्यानुसार कसरत वाटावे लागणारे नृत्य व त्यांना पूरक गाणी हेच चलनी नाणे बनले आहे. खुद्द जावेद अख्तरे भाषेच्या र्‍हासाबद्दल खंत व्यक्त केली होती. त्याची अपत्ये हे हिंदी चित्रपट बनवतात पण त्यांची प्राथमिक भाषा इंग्रजी आहे आणि हिंदी चे स्क्रिट जे देवनागरी अथवा उर्दूत पाहण्याची जावेद अख्तरला सवय होती तिथे ही जनरेशन रोमन लिपी वापरुन हिंदी चित्रपटाचे संवाद अथवा कथानक लिहितात. अर्थात हे लोण घरोघरी पसरलेले आहेच.

भाषिक अधः पतनाचा मुद्दा सोडला तर गाणे एक प्रकारे आध्यात्मिक संदेशचं देत आहे. उद्याचा काही भरोसा नाही, तु कधीही चितेवर जाऊ शकतोस त्यामुळे तु अर्थीची तयारी करुन ठेव. म्हणजे खर्‍या अर्थाने आपल्या भविष्याबद्दलचे प्लानिंग करुन ठेव, आपला इहलोक आणि परलोकीचा प्रवास सुखकर होईल अशी तयारी आतापासूनच करुन ठेव अशा प्रकारचा आशय असावा. शिवाय तुम्ही हिमालयातून पंजाब मार्गे दिल्लीकडे प्रवास करत होता त्या अनुषंगाने देखील हा एक इशाराच होता. परंतू तुम्ही पडले संस्कृत चे प्रकांड पंडित. तुम्हाला साधी सोपी हरयाणवी भाषा कुठून कळणार ? बरं ते एक जाऊद्या. जाटांचा मेंदू गुडघ्यात असतो इतके देखील तुम्हाला माहिती असते तर तुमची इतकी चिडचिड झाली नसती. असो .

अभ्या.. 21/07/2025 - 17:33
आपल्या सर्वच प्रकारच्या ऊर्ध्वरोहणासाठी शुभेच्छा. ब्रिंगिटपम्यान........

In reply to by अभ्या..

अभ्या, ऊर्ध्वरोहण म्हणजे काय रे ? मी आपलं प्रयत्न करतो की ज्या भाषेत माऊली " अमृतातेही पैजा जिंके" असे म्हणाले त्या भाषेत किमान काहीतरी लिहायचा प्रयत्न करावा ! आणि माऊलींच्या माळेत स्वतःला ओवून घ्यावे ! सुवर्णाचे मणी केले। ते सोनियाचे सुतीं वोविले। तैसें म्यां जग धरिलें। सबाह्याभ्यंतरीं ॥ ३२ ॥ तुमच्यासारख्या अगदी मोजक्या मित्रांना कळतं काय लिहितोय ते . हे खूप आनंदाची बाब आहे माझ्यासाठी ! मनःपूर्वक धन्यवाद !

Bhakti 21/07/2025 - 19:43
अंध:पतन खुप हार्श (कठीण?)/डिसरिसपेक्टफूल शब्द वाटते.प्रत्येक काळातील भाषेचे एक एक सौंदर्य होते.तत्कालीन भाषांनी सामाजिक क्रांतीकारक साहित्य घडवले नसते तर भक्तीमार्गाची/सलोख्याची चळवळ उभी राहिली नसती.बाकी लेख ब्रम्हा पर्यंत तसाही पोहचला असता.चराचर अद्वैत असताना,कशाला एका गाण्यामुळे इतकी चिड चिड करायची ;) :)

In reply to by Bhakti

एका गाण्यामुळे
>>> गाडी चालवताना झोप येते म्हणून ड्रायव्हरने पंजाबी हिप हॉप , ढांग डांग गाणी लावली होती, तब्बल 12 तास तेच.

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 22/07/2025 - 07:41
अच्छा,मी अशावेळी माझे हेडफोन्स वापरते.१२ तास तर माझ्यासाठी खुपच मोठा बोनस झाला असता.एखादी खुप दिवसांपासुन पाहायची राहिलेली सिरीज, लेक्चर्स पाहून ऐकून झाले असते.जरा वेळ कापसाचे बोळे कानात टाकून बाहेर पाहत बसले असते ;) असो,चिड चिड करून काही बदलणार नसेल .तेव्हा आपल्या आनंदाचे उपाय करण्याचा प्रयत्न केला तर सोपं होईल.

कॉमी 21/07/2025 - 23:51
कला, संगीत, भाषा - ह्यांची "गुणवत्ता" ही सापेक्ष गोष्ट आहे. ही साधी सिंपल सत्य बाब आहे. आजचे संगीत कसे कनिष्ठ आहे ह्यावर अत्यंत विनोदी संवाद खाली देतो आहे. त्या संवादातला माणूस सुद्धा एका प्रकारचा मनुवादी म्हणावा का? (थोडा मोठा व्हिडीओ आहे पण मजेशीर आहे.) https://youtu.be/B4KYTUNg8lc?si=1krpvzKhUNgNDPYw

पूर्ण जगच मटेरिअलिस्टीक ( मराठी शब्द?) होत आहे त्यात भाषा सुध्दा सध्याच्या मागणीनुसार वळण घेत आहे. प्रत्येक चॅनेल गणिक डान्स रिअ‍ॅलिटी शोज चे पेव फुटले आहे आणि त्यात किती चॅनेल वर शुध्द शास्त्रीय नृत्य स्पर्धा असतात हे पाहणे शोधाचे विषय ठरेल. त्यानुसार कसरत वाटावे लागणारे नृत्य व त्यांना पूरक गाणी हेच चलनी नाणे बनले आहे. खुद्द जावेद अख्तरे भाषेच्या र्‍हासाबद्दल खंत व्यक्त केली होती. त्याची अपत्ये हे हिंदी चित्रपट बनवतात पण त्यांची प्राथमिक भाषा इंग्रजी आहे आणि हिंदी चे स्क्रिट जे देवनागरी अथवा उर्दूत पाहण्याची जावेद अख्तरला सवय होती तिथे ही जनरेशन रोमन लिपी वापरुन हिंदी चित्रपटाचे संवाद अथवा कथानक लिहितात. अर्थात हे लोण घरोघरी पसरलेले आहेच.

भाषिक अधः पतनाचा मुद्दा सोडला तर गाणे एक प्रकारे आध्यात्मिक संदेशचं देत आहे. उद्याचा काही भरोसा नाही, तु कधीही चितेवर जाऊ शकतोस त्यामुळे तु अर्थीची तयारी करुन ठेव. म्हणजे खर्‍या अर्थाने आपल्या भविष्याबद्दलचे प्लानिंग करुन ठेव, आपला इहलोक आणि परलोकीचा प्रवास सुखकर होईल अशी तयारी आतापासूनच करुन ठेव अशा प्रकारचा आशय असावा. शिवाय तुम्ही हिमालयातून पंजाब मार्गे दिल्लीकडे प्रवास करत होता त्या अनुषंगाने देखील हा एक इशाराच होता. परंतू तुम्ही पडले संस्कृत चे प्रकांड पंडित. तुम्हाला साधी सोपी हरयाणवी भाषा कुठून कळणार ? बरं ते एक जाऊद्या. जाटांचा मेंदू गुडघ्यात असतो इतके देखील तुम्हाला माहिती असते तर तुमची इतकी चिडचिड झाली नसती. असो .

अभ्या.. 21/07/2025 - 17:33
आपल्या सर्वच प्रकारच्या ऊर्ध्वरोहणासाठी शुभेच्छा. ब्रिंगिटपम्यान........

In reply to by अभ्या..

अभ्या, ऊर्ध्वरोहण म्हणजे काय रे ? मी आपलं प्रयत्न करतो की ज्या भाषेत माऊली " अमृतातेही पैजा जिंके" असे म्हणाले त्या भाषेत किमान काहीतरी लिहायचा प्रयत्न करावा ! आणि माऊलींच्या माळेत स्वतःला ओवून घ्यावे ! सुवर्णाचे मणी केले। ते सोनियाचे सुतीं वोविले। तैसें म्यां जग धरिलें। सबाह्याभ्यंतरीं ॥ ३२ ॥ तुमच्यासारख्या अगदी मोजक्या मित्रांना कळतं काय लिहितोय ते . हे खूप आनंदाची बाब आहे माझ्यासाठी ! मनःपूर्वक धन्यवाद !

Bhakti 21/07/2025 - 19:43
अंध:पतन खुप हार्श (कठीण?)/डिसरिसपेक्टफूल शब्द वाटते.प्रत्येक काळातील भाषेचे एक एक सौंदर्य होते.तत्कालीन भाषांनी सामाजिक क्रांतीकारक साहित्य घडवले नसते तर भक्तीमार्गाची/सलोख्याची चळवळ उभी राहिली नसती.बाकी लेख ब्रम्हा पर्यंत तसाही पोहचला असता.चराचर अद्वैत असताना,कशाला एका गाण्यामुळे इतकी चिड चिड करायची ;) :)

In reply to by Bhakti

एका गाण्यामुळे
>>> गाडी चालवताना झोप येते म्हणून ड्रायव्हरने पंजाबी हिप हॉप , ढांग डांग गाणी लावली होती, तब्बल 12 तास तेच.

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 22/07/2025 - 07:41
अच्छा,मी अशावेळी माझे हेडफोन्स वापरते.१२ तास तर माझ्यासाठी खुपच मोठा बोनस झाला असता.एखादी खुप दिवसांपासुन पाहायची राहिलेली सिरीज, लेक्चर्स पाहून ऐकून झाले असते.जरा वेळ कापसाचे बोळे कानात टाकून बाहेर पाहत बसले असते ;) असो,चिड चिड करून काही बदलणार नसेल .तेव्हा आपल्या आनंदाचे उपाय करण्याचा प्रयत्न केला तर सोपं होईल.

कॉमी 21/07/2025 - 23:51
कला, संगीत, भाषा - ह्यांची "गुणवत्ता" ही सापेक्ष गोष्ट आहे. ही साधी सिंपल सत्य बाब आहे. आजचे संगीत कसे कनिष्ठ आहे ह्यावर अत्यंत विनोदी संवाद खाली देतो आहे. त्या संवादातला माणूस सुद्धा एका प्रकारचा मनुवादी म्हणावा का? (थोडा मोठा व्हिडीओ आहे पण मजेशीर आहे.) https://youtu.be/B4KYTUNg8lc?si=1krpvzKhUNgNDPYw
भाषिक अधःपतन आणि लिमिट n->0 ______ #स्वांत:सुखाय् #मनुवादी सनातनी लेखन ________ काही आठवड्यांपूर्वी हा लेख सुचलेला पण सारखं सारखं तेच तेच काय लिहित बसायचं म्हणून कंटाळा करत होतो. पण आता हे निमित्त झाले आहेच तर लिहीन म्हणतो. बाकी हे म्हणजे अगदीच शास्त्रीय संगीतात एखाद्या रागाचे सादरीकरण करताना वारंवार तेच तेच शब्द वेगळ्या अंगाने परत परत सादर केले जाते तसे काहीसे चालू आहे. हां तर निमित्त असे झाले की हिमालयातून मधून पंजाब मार्गे दिल्ली असा प्रवास करत होतो. नुसते गाडी चालवताना झोप येते म्हणून ड्रायव्हरने पंजाबी हिप हॉप , ढांग डांग गाणी लावली होती, तब्बल 12 तास तेच. ढिंच्याक ढिंच्याक.

गर्भलिंग आणि पर्यावरण

युयुत्सु ·
गर्भलिंग आणि पर्यावरण =====================  गर्भाचे लिंग निश्चित होण्यास वाय-गुणसूत्र कारणीभूत असते असे मानले गेले आहे. पण वाय गुणसूत्रावरील Sry या जनुकाचे गर्भधारणेच्या काळात काम बिघडले तर लिंगदोष निर्माण होतात. पर्यावरण यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पाडत असते. निसर्गाच्या या चुकीचे उंदरांमधले कारण शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे. गर्भधारणेच्या काळात लोहाची कमतरता या दोषाला कारणीभूत ठरते, असे उंदरावरील संशोधनात आढळले आहे.