मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझी कविता

कविराज

गबाळ्या ·
नमस्कार मिपाकर! मी मिपाचा नवीन सदस्य. तुमच्यासाठी एक रचना घेऊन आलो आहे. तुमच्या प्रतिक्रियेची अपेक्षा आहे. अगदी परखडपणे तुमच्या प्रतिक्रिया मांडा. मग त्या सकारात्मक असोत, नकारात्मक असोत, तटस्थ असोत वा सल्ले/उपदेश असोत. स्वयंसुधारणेसाठी मला त्याचा नक्कीच उपयोग होईल. ( कवीला व्यासपीठ मिळणं, श्रोते मिळणं, हि पर्वणीच आहे. आणि कोणा कवीला जर श्रोते स्वतःहुन म्हणत असतील कि आम्ही तुमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आतुर झालो आहोत, तर ते त्या कवीचं अहोभाग्यच. असं भाग्य एका नवकवीच्या वाट्याला आलं. त्याची हि कविता.

ती त्सुनामी...

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
काव्यरस
सागराच्या गहनगर्भी ती अचानक प्रकटते मोडुनी दिक्काल तिथले, ती पुन्हा ते सांधते वितळणारा तप्त लाव्हा प्राशुनी ती झिंगते गूढ अंध:कार तिथला ढवळुनी फेसाळते गाज दर्याची चराचर भेदुनी रोरावते व्यापते भवताल अन मग ती अनावर उसळते आतले सगळे किनारी ओतुनी आक्रंदते प्रलयतांडव ती त्सुनामी आतले उधळून जाते साचले सांडून जाते घडविले उखडून जाते वेचले विखरून जाते मांडले मोडून जाते ....ती त्सुनामी विप्लवी पण केवढे शिकवून जाते !

बघ जरा झोळीत माझ्या काय आहे….

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
काव्यरस
बघ जरा झोळीत माझ्या काय आहे…. ....रंग-रेषा लांघणारे चित्र आहे ….वाचण्याला चांगदेवी पत्र आहे ….तप्तसूर्यावर उन्हाचे छत्र आहे ….सावळी आदित्यगर्भी रात्र आहे ...मुक्तीच्या पाशात वेडे गात्र आहे …शत्रूला भुलवेल इतके मैत्र आहे …फाल्गुनाला खेटुनी बघ चैत्र आहे …वास्तवाला तोलणारे यंत्र आहे … प्राणफुंकर घालणारा मंत्र आहे …अद्भुताचे इन्द्रजाली स्तोत्र आहे ....अंत ना आदि असे घटिपात्र आहे ... ....बघ जरा झोळीत माझ्या काय आहे…. .....बघ जरा कवितेत माझ्या काय आहे

उजाडताना उल्कांचे व्रण

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
काव्यरस
शिवधनुष्य एका हाताने सहज उचलले भात्यामध्ये शब्दच होते, नंतर कळले कवितेच्या दरबारी नवशब्दांची मनसब मिळता कोठे झुकायचे ते नाही कळले शब्दप्रभूंना वाट विचारीत इथवर आलो शब्द कधी रक्तातच भिनले, नाही कळले पुन्हा पुहा मी अंधाराशी केली सलगी उजाडताना उल्कांचे व्रण शब्दच झाले

जरी अज्ञात देशाचा

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
काव्यरस
जरी अज्ञात देशाचा किनारा गाठला होता तरी वारा शिडामधला जरा खंतावला होता दूरवरचे दिवे तिथले झळाळून पेटले होते तरी अंधार हटवादी जरा रेंगाळला होता वितळत्या चंद्रबिंबाने दशदिशा भारल्या होत्या तरी त्या चांदरातीचा कवडसा गोठला होता

नशिब

mr.pandit ·
लेखनविषय:
नशिबाच काय घेऊन बसलात हो ते कधी साथ देत तर कधी नाही मनगटात ताकद हवी खर तर नाहितर् राजयोग पण कामाचा नाही परीक्षेच्या वेळीच नेहमी देव आठवतो कारण अभ्यास मन लावुन केलेला नसतो कसेतरी त्या अवघड परीक्षेत पास होता नशिबाचा भाग म्हणुन त्यालाच दोष देता हिच सवय मग अंगवळणी पडत जाते अपयश आले की नशिबावर खापर फोडले जाते थोडे प्रयत्न कमी पडतायेत बाकी काही नाही प्रयत्नांती परमेश्वर उगाच म्हटलय का कुणी? आता आळस झटका आणि लागा कामाला आयतं बसुन कधी मिळतय का कुणाला परिश्रम केल्याशिवाय यश मिळायच नाही नशिब अस सहजासहजी बदलायच नाही. - निखिल १७-१०-१७

नवी मैत्री

तृप्ति २३ ·
लेखनविषय:

नवी मैत्री

नवी मैत्री आहे पण आहे खूप सुंदर कुठे ही असलो तरी कुणीच कोणाला देऊ नका अंतर.... आपलं ते गोड़ गुपित एकमेकींना सहज पणे बोलून गेलो तुझे तेच माझे म्हणत एकमेकींमध्ये रमत गेलो... नवीन आहे आपली मैत्री तरी जपतोय आपण फुलासारखी कायमच एकमेकींना साथ देऊ एकमेकींच्या आनंदासाठी. तृप्ती समीर टिल्लू http://www.truptiskavita.com

रमलखुणांची भाषा

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
काव्यरस
जरी तुटले आतून काही, तरी नकोस ओळख देऊ जाताना थांबून थोडे, तू नकोस मागे पाहू दिसतील अनाहूत इथल्या, सावल्या गडद होणाऱ्या हुरहुरत्या संध्याप्रहरी, पावलांत घुटमळणाऱ्या खोरणात तेवत असता, फडफडेल इथली दिवली मग उरेल काजळमाया, शोषून स्निग्धता सगळी ते वादळ येईल फिरुनी, पण सावर तोल जरासा ओठींचे स्मित लपवूदे, श्वासातील खोल उसासा ते विसर उमाळे इथले, पुसताना प्राक्तनरेषा उलगडेल अवचित अवघी, मग रमलखुणांची भाषा.....

अत्तर

शिव कन्या ·
लेखनविषय:
कपडे कितीही मळले, जुने झाले, रंग उडून गेला वीण उसवून गेली घड्या विस्कटून गेल्या तरी कधीतरी लावलेले मायेचे भरजरी अत्तर मंदपणे दरवळत राहते! . . . माणसं अशी अत्तर असती तर..! शिवकन्या