मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

करुण

नाही ... (गझल)

स्वानंद मारुलकर ·
लेखनविषय:
काव्यरस
नाही मला कधीही नव्हते म्हणायचे 'नाही'च शब्द पण का ओठात यायचे ? अवरुन घेत जातो माझ्या मनास मी तू यायचे त्वरेने ते विस्कटायचे मी झेलतो निखारे वणव्यात तू उभी कोणा कुणास आता मग शांतवायचे ? घालीत भीक नाही मी संकटा तुला तू सारखे कशाला दारी फिरायचे ? माझ्याच काळजाचे खत घातले तरी कोमेजती ऋतू का माझे फुलायचे मजला उसंत नाही आहेस व्यस्त तू आभाळ फाटलेले कोणी शिवायचे ? - स्वानंद

नव्या वर्षाची हीच जिंगळ.....

विजुभाऊ ·
अंगळ मंगळ टंगळ चंगळ शनीवारात येता चम्बळ फुफाट्यातला फाटका फटाका मोजून सटका. चालुनी चालुनी ;चप्पल दमली घालु जाता अंगठा तुटका येता ध्वनी फीमेल कानी. क्यूमेल होऊनी काया फुलते. हलते डूलते निर्लज्ज लाजते अंगळ मंगळ टंगळ चंगळ चेहेरा मात्र अम्मळ अमंगळ नव्या वर्षाची हीच जिंगळ घेऊनी सज्ज मद्यमंडळ खळ्ळ खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ दादोजींचा दुर्दम्य दंगा , औरंगनगरी थेट पंगा अशोकाची निष्पर्ण छाया बारामतीत जाई वाया विलासातले सुशील सारे नारायणाच्या शीडात वारे. दंगा घाला पिंगा घाला हातात हात ..हळू चाला नव्या वर्षाची हीच जिंगळ घेऊनी सज्ज मद्यमंडळ खळ्ळ खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्य

कसे वर्ष गेले हरवून ...!!!

प्रकाश१११ ·
लेखनविषय:
काव्यरस
वर्ष कसे गेले कळलेच नाही कसे दिवस जातात पटकन हरवून किती वर्ष गेली हे तरी कोठे समजले कधी .त्याला .?? जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत केले जुने वर्ष संपताना ते बिचारे हताश होऊन गेले फटाके कुणासाठी वाजले हे त्याला कळले देखील नाही हिरमुसले रुसले हलकेच निघून गेले काय दिले त्याने ? काय घेतले तुम्ही ?? काय घेतले ठाऊक नाही काय हिरावून नेले हे फक्त लक्षात राहिले त्याचा जिवाभावाचा भाऊ गेला आठवण आली की , काळीज फुटून जातेय त्याचे जगणे फक्त ढकलून दिले जाते काळोखाच्या समुद्रात विरघळून जावेसे वाटते त्याला शप्पत ...

अर्धवट

विश्वेश ·
लेखनविषय:
काव्यरस
स्वताभोवतीच्या ह्या पिंजर्यात पक्ष्याने कुठे उडायचे... त्याच त्याच भिंती चहुकडे नविन त्यात काय पहायचे ... तितक्यात त्याला दिसला समोर आइना पाहावे त्यात वाटले पण धाडस कही होइना दिसेल आपलाच भेसूर चेहरा ह्या जाणिवेने काळजाचा ठोका चुकला आणि जीवन्त पणाचा आभास जपत त्याने आपला एक पंख छाटला आता नको ते उडणे, नको तो स्वच्छंद हट्ट मिटून घेतले अंग अंग मिटून घेतले डोळे घट्ट पसरला जीवघेणा काळोख, दाटला अंधार मिट्ट वाटले आला शेवट ... भेदरून मी घाबरून मी मिटलो अर्धवट ... मी उरलो अर्धवट ...

शेतकरी गीतः आम्ही शेतात कसणारे शेतकरी

पाषाणभेद ·
लेखनविषय:
काव्यरस
शेतकरी गीतः आम्ही शेतात कसणारे शेतकरी
आम्ही शेतात कसणारे शेतकरी मेहनत मजूरी करणारे कामकरी ||धृ|| आम्ही चालवतो गाडी बैलांची तिला गरज नाही इंधनाची धान्याची पोती आणतो घरी आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||१|| पोळा साजरा करतो दरवर्षी दुधासाठी पाळतो गाईम्हशी भुमातेची करतो चाकरी आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||२|| रात संपून उजाडती पहाटं भल्या सकाळी कारभारीन उठं घेवून परातीत जवारी बाजरीचं पिठं न्याहारीसाठी करती झुनका भाकरी आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||३|| उन्हातान्हात कामं सारी करतो रातंदिस राबराब राबतो कर्ज काढूनी खत पि

कंटाळून गेलेय ...!!!

प्रकाश१११ ·
लेखनविषय:
काव्यरस
किती वर्ष झाली किती काळ गेला कुठे अपेक्षा संपतात नवरोबाच्या पोरांच्या नातेवाईकांच्या संसाराचे ओझे ..! कर्तव्याचे ओझे ..!! ह्याच्या पुढे कर त्याच्या पुढे कर करण्याचे ओझे हु...श्श ..!! कंटाळून गेलेय आता . ह्या सुखी {?} संसाराला प्रत्येकाची तर्हा निराळी पोरांच्या , पोरींच्या छान केलेय म्हणत..... सतत फटकारत , कधी कुरवाळत नि बळजबरीने मुद्दाम उत्साहाचे सलाईन.... थकून गेलेय्रे आता .. गोड शब्दाचे पेग घशात ढकलायचे नि उत्साह आणायचा ओढून ताणून.....

तुझी माझी प्रित होती

पाषाणभेद ·
लेखनविषय:
काव्यरस
तुझी माझी प्रित होती
तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा जिवनात आले वादळ कधी, विसरूनी जा ||धृ|| हातांना ना कधी, गुंफण आता मिळायची पावलांना सवय होवूदे, एकटेच चालायची भेटलो तो किनारा, विसरूनी जा तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा ||१|| त्या आर्त नजरा, ते नजरेतले बोलणे न बोलताच कळणारे मनातील हुरहुरणे आठवणींना सांग, स्मरणातूनी निघूनी जा तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा ||२|| आठवते मला दिलेले मोरपीस निळेगार तूही वहीत ठेवले होते पिंपळपान जाळीदार भेट दिली घेतली, परत घेवूनी जा तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा ||३||

ती येणार आहे ...!!

प्रकाश१११ ·
लेखनविषय:
काव्यरस
संध्याकाळ झाली आहे नि ती येणार आहे तो वाट बघतोय तिची आतुरतेने ..चातकासारखी .!! तिन्हीसांजा झाल्यात ..... चुकून- माकून मागे राहिलेली पाखरांची भिरी घरी परततेय .... आकाशी रंगाची साडी नि कपाळवरचा घाम त्याला अजूनही आठवत असते त्याचे कासावीस होणे तिच्या नुसत्या आठवणीने तिचा हलकासा वावर तिची लगबग तिने केलेला चहा देवाजवळ लावलेला दिवा सुख सुख निव्वळ ..... कसे असते हो ..? पाखरे तर गेली उडून दूरदेशी आपल्या पोटापाण्यासाठी स्वताचे घरटे बनवून पण ती येणार आहे तो वाट बघतो आहे तिची ती गेलीय खूप दूर जेथे जाण्याचे मार्ग असतात पण येणारे मार्ग हरवून जातात गच्च काळोखात ....! तरीही त्याला

बहादुर शाह जफर के कुछ आखरी अशार...

अश्फाक ·
लेखनविषय:
काव्यरस
१८५७ च्या उठावा नंतर इंग्रजांनी बहादुर शाह जफर यांच्या दोन्ही मुलांचे शीर धडा वेगळे करुन ताटात सजवुन पेश केले आणि त्यांना रंगुनं येथे बंदिस्त केले , तेव्हा तिथल्या वातावरणात ही गजल लिहिली होती ( आज ही लाल किल्ल्यात स्मरण म्हणुन गजल लिहिली आहे) लगता नहीं है जी मेरा उजड़े दयार में !

लेवू दे निळाई..

स्वानंद मारुलकर ·
काव्यरस
झेपावत्या धरेला गगना कवेत घेई अंगांग तृप्त कर तू मज लेवू दे निळाई आधार मीच होते दुबळ्या जगास सार्य़ा माझ्या मनातूनी का पण शोधते निवारा जेव्हा तुला पहाते हरपून भान जाई देतोस रंग ओले माझ्या सुन्या मनाला क्षितिजास रेखिसी अन सौभाग्यरूप माला घे जिंकूनी मला तू अपुल्या गृहास नेई - स्वानंद