मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आयुष्य

जागतिक महिला दिन विशेष कविता: 'अक्षरांचे पंख'

श्वेता२४ ·
लेखनविषय:
अक्षरांचे पंख होऊनी परकी मला मी प्रश्न आज विचारते बेहिशेबी जीवनाचा ताळमेळच मांडते का कला साहित्य सारे ठेविले वेशीवरी अन् कुणाची पत्नी होऊन माप हे ओलांडते त्या नळाचे गीत सोबत ताल साधे भाकरी तान्हुल्याचा गोड चेहरा चंद्र म्हणूनी पाहते चांदण्यांचे शब्दमोती विखुरले दारी सडा कल्पना सारूनीही घर लख्ख माझे झाडते सोडुनी मज अन्य सर्वांना इथे प्राधान्य पण मीच मजला उचलूनी मग अग्रस्थानी ठेवते! अक्षरांचे पंख मजला हार का मग मानू मी? घेउनी स्वप्ने आभाळी मुक्त मी झेपावते...!! — श्वेता माईणकर सूर्यवंशी © 2026

संध्येच्या व्याकूळ छाया.

Deepak Pawar ·
लेखनविषय:
काव्यरस
संध्येच्या व्याकूळ छाया अंधार माखुनी येती हा डोह अंतरीचा दुःखाने ढवळून जाती. मी व्याकूळ होतो जेव्हा दुःखाने मेघही झरती अश्रूंनी विझुनी गेल्या नभीच्या चांदणं ज्योती. सावली उन्हाची व्हावी तशीच शीतल माया गेले प्रहर निघुनी छळती स्मृतींच्या छाया. अंधार भारल्या राती नभी चांदणे झरते अंधाऱ्या डोही दुःखाच्या सुख तसे पाझरते. https://youtu.be/dIeVgVYuzAI?si=SXcompql_binlOVa

नरो वा कुंजरो वा

चांदणे संदीप ·
पोटाची खळगी भरणे कारणी स्वार्थें, वैऱ्याची हो मनधरणी हसणे होईल पातक घोर भवती मूर्खांचा वाढेल जोर सत्य नित्य नको ओठी वाचेत मुग्धतेची पराकोटी आणि... मती निकामी होय तेधवा म्हणावे, नरो वा कुंजरो वा - संदीप भानुदास चांदणे

कोडी

युयुत्सु ·
लेखनविषय:
काव्यरस
कोडी === -राजीव उपाध्ये १६. नोव्हें २०२५ तो सरळ चालत होता... चालता चालता त्याला आयुष्याने कोडी टाकायला सुरुवात केली. तो कोडी सोडविण्यात मग्न असताना त्याला कुणीतरी धडक देऊन पाडले. तो पडला जखम झाली भळभळा वाहू लागली. मग आजुबाजुच्या लोकांनी त्याला आणखी दगड मारायला सुरुवात केली. त्याला आणखी जखमा झाल्या. पण तरीही त्याने सर्व ताकद एकवटली. नियतीचा धावा केला. धडपडतं परत उठून उभा राहिला. आणि मग... ... ... ... मग त्याने आयुष्याला कोडी टाकायला सुरुवात केली. ती कोडी सोडवता येईनात तेव्हा दगड मारणारे पळाले. त्याला ’शांत’ करण्यासाठी मोठे दगड शोधू लागले.

उंदीर

युयुत्सु ·
लेखनविषय:
काव्यरस
घरात पडला उंदीर मरूनी थकलो सगळे शोध घेऊनी चंद्रावर गेला मानव तरीही उंदीर शोधण्या गॅजेटच नाही...

असं कुठं लिहिलंय?

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
पेरणा मागे वळून बघू नये, म्हातार्‍याने चळू नये, आठवणीत जळू नये, असं कुठं लिहिलंय? अवचिता परिमळू नये, शरदी मेघांनी पळू नये, अवकाळी झरू नये, असं कुठं लिहिलंय? कातरवेळी झुरू नये, कांचनसंध्यी उमलू नये, गजरा भाळी माळू नये, असं कुठं लिहिलंय? एकांताशी बोलू नये, भरल्या डोळी डोलू नये, ओल्या शब्दीं भिजू नये, असं कुठं लिहिलंय? उंबऱ्याशी थांबू नये, गवाक्षी झांकू नये, प्रेमागंधी गंधू नये, असं कुठं लिहिलंय? सावलीं मागे धावू नये, भूतकाळाशी भांडू नये, शब्द मागे फिरवू नये , असं कुठं लिहिलंय? हसू ओठी बांधू नये, आंसू कुणा

गेले द्यायचे राहून.....

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
काव्यरस
गेले द्यायचे राहून....., म्हणत आयुष्य Mute केलं प्रारब्ध, नशीब म्हणत ..... कण्हत,कण्हतआयुष्य Cute केलं जगण्याची मजा काय विचारता? स्वतःच्या मनाला mute करून, दुसऱ्यांच्या अपेक्षांना like करत जगतोय... Wi-Fi शिवाय चालणाऱ्या मोबाईलवर Google करून बघतोय! घे भरारी,स्काय इज द Limit....कुणीतरी greet केलं मागे वळून बघता, काय miss न् काय Meet केलं .... इच्छा,आकांक्षाना फाट्यावर मारत Telling lies करतोय.... worried असलो तरी हॅप्पीली married म्हणतोय. म्हटलं तर successful...म्हटलं तर blissful Stressful आयुष्य gressful करून जगतोय. "आकांक्षाशी", break up झालं तरी heart अजून lite आहे "अपेक्षा" ची साथ

शाळेचा पहिला दिवस...

कर्नलतपस्वी ·
उन्हाळ्याची सुट्टी संपली. शाळा सुरू झाल्या. वसंत ऋतूत जशी पालवी फुटते ,आनंदाचे वातावरण निर्माण होते तसाच उत्साह, उर्जा शाळेतल्या मुला मुलीं मधे असतो. आई बापाची लगबग,तगमग, व मुलांचा उत्साह बघताना काही पंक्ती सुचल्या.मोठी मुले आपापल्या मित्रांबरोबर पुनर्भेटीचा आनंद घेत होते तर पहिल्यांदाच जाणारी,छोटी आई बापाला बिलगुन होती. एकामागोमाग शाळेच्या बसेस आल्या,चौकात येवून थांबल्या. मुले आई-वडील पांगले. आपापल्या मुलांना बस मधे बसवले. सुचना थांबत नव्हत्या. बस भरली. ड्रायव्हरने निर्विकार पणे बस मार्गस्थ केली. आई-वडील आपापल्या घोळक्यात सामील झाले.

सुट्टी

माहितगार ·
लेखनविषय:
सुट्टी चालत्या घड्ञाळासारखी असावी बाकीच्या जगाला चालू दिसताना आत ते नियमीत निवांत अनवाईण्ड होत असते. ते इतरांच्या वेळेवर नाही पळत, इतरांना स्वतःच्या वेळेवर पळवते. जेव्हा ते पुर्ण अनवाईण्ड होते तेव्हा त्याचा आराम चालू होतो पुन्हा कोणी रिवाईण्ड करे पर्यंत

सतारीचे बोल

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
काव्यरस
जरा सोडला लगाम ढिला, अंग प्रत्यंगाने संकेत दिला. हळूहळू कुरकूर करू लागलं. गोबरे झाले गाल,टम्मं पोट फुगलं. हात पायाच्या झाल्या काड्या, कांट्यांनी चढल्या नव्वद माड्या. कधी नव्हे तो पिंगळा साद देत होता. दिवसा घोरासुर कुस्ती खेळत होता. कधी माझ्या भोवती जग फिरले, तर कधी डोळ्यासमोर तारे विरले. भर दुपारी जगाला भोवळ आली. आणी बोळवण धन्वंतरींच्या घरी झाली. काही रक्तपिपासू रक्त शोषू लागले, तर प्रकांड पंडीत कारण शोधू लागले. हृदयाची सतार बिघडली होती दिड दा दिड दा लय बेकाबू होती गवसणीतूनच तारा छेडल्या सतारीच्या खुंट्या पिळल्या सतार झाली म्हातारी... तारा नाजूक झाल्यात. तार सप्तक लावू नका. आर्त स्