मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घरगुती हिंसा व पोटगी

बाजीगर ·
लेखनविषय:
https://marathi.freepressjournal.in/maharashtra/court-slaps-dhananjay-munde-order-to-pay-alimony-to-karuna-munde घ्या कविता faster than instant coffee कुणाची घ्यावी बाजू, confuse झाला तराजू ।। महीना 15 लाख मागणा-या पीडीतेची, कि बीडच्या दलाल, अडत्याची !! सामाजिक न्याय मंत्री, घरगुती हिंसाचाराची जंत्री ।। एकीकडे पैसा आणि सत्ता धन अन् जय, दूसरीकडे कोर्टाने दिला, करुणामय विजय ।। द्विभार्या कायद्याचा सविनय भंग, बीडमधे सामाजिक कार्य दबंग ।। तिकडे त्रासले दादा, मित्राला वाचवायचा वादा ।। जनता पहातेय तमाशा, डेमोक्रेझी चा ढोलताशा ।।

क्रिकेटचा इसाप हरपला

जे.पी.मॉर्गन ·
लेखनप्रकार
"एकदा काय झालं.... तर विराटाने आदेशच दिला की रे बल्लवाला - "तू माझा दास आहेस. काहीही करून तुला मल्लयुद्धात त्या जीमूताला हरवावंच लागेल!" आता आली का पंचाईत? पांडव तर होते अज्ञातवासात! आता भीमाला आलं टेन्शन!" आजोबा अगदी 'हरीतात्या' स्टाईलमध्ये आम्हाला गोष्ट सांगायचे आणि आम्ही डोळे विस्फारून ती ऐकायचो! आज लक्षात येतं की आयुष्य ह्याच गोष्टींनी घडलं. रामायण महाभारत, भक्त प्रह्लाद, छत्रपती शिवाजी, संभाजी महाराज, संताजी-धनाजी, भगतसिंह-राजगुरु-सुखदेव, सावित्रीबाई, गाडगेबाबा...ह्यांच्याच कणा कणानी बनलेलं आहे.

गीतारहस्य चिंतन-१

Bhakti ·
लेखनविषय:
मला साधारणतः खुप प्रश्न‌ पडतात.त्यात जर भारतीय अध्यात्मावर प्रश्न असतील तर किती तरी काळ ते अनुत्तरितच राहायचे.पण जानेवारी २०२५ पासून हा जो लोकमान्य टिळकांनी लिहिलेला गीतारहस्य ग्रंथ वाचनास सुरूवात केली आहे.त्यामुळे अनेक प्रश्नांची सहज उत्तरे मिळत आहेत.या ग्रंथातील आकलन वा लिहून काढावे असे वाटलेले ज्ञान इथे देत आहे.हे सर्व टिळकांचे मत ,विचार आहेत,जे तुम्हाला नक्कीच भरघोस ज्ञान देईल. गीतारहस्य -कर्मयोगशास्त्र प्रकरण १ १.विषयप्रवेश अद्वैत मोक्ष द्वैत विशिष्टाद्वैत, पातंजलयोग हे निवृत्तिपर मार्ग गुलामी होती असे कोणी म्हटले तर ? भगवद गीतेवर टीका

सिद्धी आणि मोक्षप्राप्तीचे विज्ञान

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सिद्धी आणि मोक्षप्राप्तीचे विज्ञान ================ सध्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने भारताच्या तेजस्वी संस्कृतीचं जे प्रदर्शन चालू आहे, त्यामुळे या संस्कृतीचे आकर्षण किती जणांना निर्माण झाले, आणि कितीजण लांब गेले हा एक संशोधनाचा विषय होईल. एखादा श्वेतकाय जरी कुंभमेळ्यात दिसला तरी तो गर्दी गोळा करतो, पण जे मनात निर्माण झालेली घृणा, तिरस्कार दाखवू शकत नाहीत, त्यांचा हिशेब मात्र कुणी ठेवत नाही.