Skip to main content

वकीलाना टाटा-बायबाय

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 02/06/2025 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
ए० आय० ने अनेक क्षेत्रात धूमाकूळ घालत आपले पाय रोवले आहेत. ए० आय० मुळे आता वकीलांना लवकरच "टाटा-बायबाय" करायची वेळ आली आहे. असे झाले तर कायद्याच्या लढाया लढण्यासाठी उर्मट आणि स्वत:च्याच अशीलांचे रक्त पिणार्‍या, तसेच फसवणार्‍या वकीलांना मोठी जरब बसेल अशी चिन्हे आहेत. अर्थात अडाणी लोकांना ही जमात फसवत राहीलच... https://youtu.be/WoqcSIcdx-Y?si=FURG5R1kytIfSUeB

गवळण

लेखक रामदास यांनी सोमवार, 02/06/2025 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
शिणवतो मजला छंद मनाचा काही सुचेना काम रे, हरि वाजवी वाजवी .... वेणू वाजवी वाजवी.. मन रिझवी रिझवी .. माझे रे....॥ कशी सोडवू जीवास माझ्या झाली मजला बाधा, कधी रुक्मिणी कधी भामिनी मध्यरात्री मी राधा हरवून गेले मीच मला मी दे आता आधार रे ॥ हरि वाजवी वाजवी ....।ध्रु। धडधड होते उरात माझ्या अंगी भासे कणकण अशी भुलावण,कशी लागली विसरून गेले मंथन या तीरावर कशी हरवले विसरून गेले मी पण हरि वाजवी वाजवी ....।ध्रु।

समाधी....

लेखक मंदार कात्रे यांनी रविवार, 01/06/2025 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
.. 45 सन 1982.महाराष्ट्र आणि गोवा सीमेवरचा तिल्लारी गाव. तिलारी गावांमध्ये धरणाचे काम जोरात सुरू होते. कर्नाटक आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातूनही त्या ठिकाणी कामगार आले होते.त्यामध्येच मल्लाप्पा नावाचे कामगार होता. मल्लाप्पा आणि त्याच्याबरोबरचे सहकारी एका दिवशी जमीन खणत होते आणि अचानक एक मोठा काळा पत्थर लागला. महत्प्रयासाने त्यांनी तो काळा पत्थर बाजूला केला आणि खाली पाहतात तर एक जिवंत मनुष्य त्या पत्थरखाली बसलेला होता. हा प्रकार बघून मल्लाप्पा बेशुद्ध पडायचा बाकी राहिला.

सुट्टी

लेखक माहितगार यांनी शनिवार, 31/05/2025 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
सुट्टी चालत्या घड्ञाळासारखी असावी बाकीच्या जगाला चालू दिसताना आत ते नियमीत निवांत अनवाईण्ड होत असते. ते इतरांच्या वेळेवर नाही पळत, इतरांना स्वतःच्या वेळेवर पळवते. जेव्हा ते पुर्ण अनवाईण्ड होते तेव्हा त्याचा आराम चालू होतो पुन्हा कोणी रिवाईण्ड करे पर्यंत

बाजाराचा कल : २ जूनचा आठवडा

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 31/05/2025 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
बाजाराचा कल : २ जूनचा आठवडा ==================== मंडळी, मागील आठवड्यात केलेले भाकीत चुकले आहे. बाजार अधांतरी लटकलेला आहे.

मागवणे

लेखक बाजीगर यांनी गुरुवार, 29/05/2025 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
ते मागत गेले आम्ही देत गेलो, ते हागत गेले आम्ही होतो मेलो || लाखो रुपये हुंडा 'कस्पटा'समान दिले, त्यांचे काम मा(ह )गवणे आम्ही भरली बिले || आता वकील करतील चारित्र्य हनन, व्यर्थ ठिकाणी हृदय गुंतले तन मन||

गंगा दशहरा

लेखक नूतन यांनी मंगळवार, 27/05/2025 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
आज ज्येष्ठ लागला. असं ! मग ? मग काही नाही, मी भूतकाळात गेले. पावसाळी वातावरण .सकाळी १० चा सुमार. मंदिराचं सभागृह, मध्यभागी प्रवचनकारांची बैठक मांडलेली. त्यावर बसण्यासाठी आसन. पुढ्यात चौरंग मांडलेला. त्यावर आच्छादन घातलेलं .आमच्या काकू.. हो.. आमच्या शेजारी रहायच्या नं , म्हणून आमच्या. तर कीर्तनचंद्रिका सौ. पद्‌मावतीबाई देशपांडे ... आसनावर विराजमान होत आणि खड्या स्वरात, हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा असा गजर सुरु होई. प्रतिपदेपासून दशमीपर्यंत रोज सकाळी पंडितराज जगन्नाथ यांच्या जीवनचरित्रावर आख्यान होई आणि दशमीला समाप्ती होई.

वारी !!!

लेखक किल्लेदार यांनी मंगळवार, 27/05/2025 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
में महीना पूर्ण भरात आहे. तळपत्या सूर्याखाली सगळंकाही भाजून निघतंय. हिमालयाच्या अगदी कुशीतलं उखीमठसुद्धा उन्हाच्या तडाख्यातून सुटलेलं नाही. चराचरांचा विधाता, देवांचा देव महादेवही कदाचित एवढ्या काहीलीनं त्रस्त झालांय. त्यामुळं दरवर्षीप्रमाणं भोलेनाथ आपल्या “समर हॉलिडे होमकडे” निघायची तयारी करू लागतात. भल्या पहाटे सगळं उरकून, वारी उखीमठातल्या ओंकारेश्वरामधनं मध्यमहेश्वर मंदिराकडे निघते. सगळ्यात पुढे मुख्य पुजारी घोड्यावर स्वार होऊन आणि त्यापाठोपाठ “डोलीचे” भोई भोलेनाथांना खांद्यावर घेऊन घाटातून झपझप चालू लागतात.

पुस्तकं..

लेखक आजी यांनी सोमवार, 26/05/2025 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सगळेच पुस्तकाला पवित्र मानतो. समग्र जगाचं ज्ञान देणारी खिडकी मानतो. "न हि ज्ञानेनसदृशं पवित्रं इह विद्यते", म्हणजे ज्ञानाइतकं पवित्र या जगात दुसरं काही नाही. असं वचन आहे. हे ज्ञान आपल्याला पुस्तकं देतात. जेव्हा माणसाला छपाईचं तंत्र अवगत नव्हतं तेव्हा मौखिक परंपरेने ज्ञान मिळवले जात होते. आपले ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, उपनिषदे,ही मौखिक परंपरेने चालत आलेली आहेत. नंतर त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली. या ग्रंथांचे लेखक अज्ञात आहेत, म्हणून त्यांना अपौरुषेय असं म्हटलं जातं.