Skip to main content

मन इंद्रधनू

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 01/09/2009 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
कधी दंवात भिजावे, कधी चांदणे वेचावे येता आभाळ भरून मन इंद्रधनू व्हावे ऊन-पावसाचा लपंडाव, श्रावणाची गाणी मेघांतून झरणारी वेड्या यक्षाची कहाणी निळ्यासावळ्या दूताने माझ्या दारी बरसावे तहानेली काळी धरा जसा यशोदेचा कान्हा धारा पावसाच्या जसा झरे देवकीचा पान्हा प्राशून त्या अमृताला तनमन तृप्त व्हावे दूर मंदिरात घुमे टाळ-मृदुंगाची वाणी सुरावटी त्या वाहते गावयमुनेचे पाणी सूर गुंफून शब्दांत हरीरूप रंगवावे
काव्यरस

अद्भुत प्रकाराचा अनुभव.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 01/09/2009 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
"मला त्या जागा शोधण्यासाठी एव्हरेस्टवर किंवा ऍमॅझॉनच्या जंगलात हा अवर्णनीय अनुभव घ्यायला जायला नको." फास्कूच्या घरी मी खूप दिवसानी गेलो.खरं त्याचं नांव पास्कल.पण आम्ही सर्व त्याला फास्कूच म्हणायचो.तशी मला समुद्राची ओढ लहानपणापासूनची.फास्कू हा कोळी जमातीतला.समुद्र ही त्याची कर्मभुमी.माडाच्या झावळ्या शिवून त्याची झापं बनवून ती झापं झोपडीवर शाकाहरतात.आणि झोपडीच्या आत ह्या झापांच्या आडोशाच्या भिंती करून खोल्या बनवतात.बाहेर उन खूप असलं तरी झोपडीच्या आत एकदम थंड वाटतं. झोपडीच्या आजूबाजूला बांबूंची तिरकांडी उभी करून एकपदरी सुंभाच्या दोर्‍या बांधून पिळाच्या चिमटीत बांगडे,तारल्या किंवा कोलंबी अडकवून

क्विक गन मुरूगन -माईंड ईट

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 01/09/2009 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
क्विक गन मुरूगन हा एक ईंडियन काऊबॉय असतो ज्याचा जिवनाचा उद्देश हा गाईंना वाचवण्याचा असतो. क्विक गन मुरूगन ची लॉकेट लव्हर ही गेल्या जन्मीची प्रेयसी असते. राईसप्लेट रेड्डी हा गाईंना मारून त्यांना डोशात घालून सगळे व्हेज हॉटेल नॉन व्हेज करण्याचा त्याचा डाव असतो. क्विक गन मुरूगनला राईसप्लेट रेड्डी मारतो. मुरूगन स्वर्गात जातो. चित्रगुप्ताकडे तो गाईंना वाचवण्यासाठी पुन्हा प्रूत्थीवर जाण्यासाठी अ‍ॅप्लिकेशन करतो. तो नंतर परत मुबंईला येतो. राईसप्लेट रेड्डी ईकडे डोसा बनवण्यासाठी मॅक डोसा नावाची कंपनी टाकतो. त्यात डोशाची आर अँन्ड डी स्थापन करून सायंटीस्ट लोकांना नोकरीला ठेवतो.

ग्रंथालय्/वाचनालय, पुणे पत्ता हवा आहे

लेखक सखाराम_गटणे™ यांनी मंगळवार, 01/09/2009 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रंथालय्/वाचनालय चा पत्ता हवा आहे. आप्पा बंळवंत चौक, खडक पोलिस स्टेशन, स्वारगेट, गुरुवार पेठ च्या जवळपास असावे. घरी पुस्तके नेता आली पाहीजेत.

तात्या अभ्यंकरानू.. आमचा एवढा आयकाच...

लेखक वि_जय यांनी मंगळवार, 01/09/2009 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
तात्या अभ्यंकरानू.. माझा एक सझेशन आसा ... तुमच्या मिसळपावान तर मराठी बेब दुनयेत चमचमीत मेजवानी दिलेली हाच.. आमच्या 'मालवण्यांसाठी' अशीच एक रसरशीत वेबसायट सुरु केलास तर बरा होयत.. नाव ठेवया 'वडे-सागोती'.

प्रविण भुवड हुतात्मा आहे

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी मंगळवार, 01/09/2009 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
(सुचना हा लेख मी मटा मधुन सांभार घेतला आहे कारण ह्या विषयावर चर्चा होणे मला महत्वाचे वाटले जर मिपा प्रशासनाला संपादकांना ह्यात काहि वावगे वाटले किंवा जर हा लेख नियमाला धरुन नसेल तर खुशाल हा लेख ईकडुन उडवावा ) गणपती , गोविंदा आणि डबेवाले. या तीन गोष्टी सोडल्या , तर मुंबईवर सांस्कृतिक ठसा उमटवणारं अस्सल मराठी काहीही उरलेलं नाही. म्हणूनच दहिहंडीच्या पाचव्या थरावरून पडून मेलेला प्रवीण भुवड हा मराठी संस्कृती टिकवण्यासाठी धारातीर्थी पडलेला हुतात्मा ठरतो. ................... रफी अहमद किडवई रोडवरून परळ भोईवाड्याच्या दिशेने गेलो की बीएस्टी कॉलनी लागते.

(मादी)

लेखक sujay यांनी सोमवार, 31/08/2009 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा कपिल काळे यांची कवीता "गादी" ठार दिवस मादीचे..ठार दिवस मादीचे.. |धृ| अशी नसावी मादी जवळी गारीबीची जणू ही गोळी. दारीद्र्याची असेच थाळी मी बापड्याची मग गुपचिळी आई बापाची बसे दातखिळी ठार दिवस मादीचे..ठार दिवस मादीचे.. |धृ| साधीसुधी मादी नसे नशिबाचे फिरले फासे भोगामागून भोग येतसे घरच्यांना वेठितसे खिशावरती ताण बसे ठार दिवस मादीचे..ठार दिवस मादीचे.. |धृ| मादी नको भोग आवरा आयुष्याचा रस्ता सावरा खर्च पाहुनी जीव घाबरा लफड्याच्या ह्या"व्होल वावरा" येउ नका "एनी व्हेअरा" ठार दिवस मादीचे..ठार दिवस मादीचे..
काव्यरस

नारळ

लेखक प्रभो यांनी सोमवार, 31/08/2009 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
परवा घरी गौरीपूजेनंतर आई-बाबा-आज्जी सोबत गप्प मारत बसलो होतो... असंच विषय निघाला की देवाला नारळ का वाढतात? आमच्या तिर्थरूपांचं म्हणण पडलं की...बर्‍याच आधी देवास नरबळी देत असत...पण ते लोकांना पटेना..काहीतरी शाकाहारी अर्पण करावं पण भाव तोच रहावा म्हणून नारळाचा पर्याय समोर आला.... आला....

अश्रू

लेखक शरदिनी यांनी सोमवार, 31/08/2009 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लग्नाच विचार कदाचित त्यांच्या मनात घोळत असेल म्हणून त्यांनी त्याला बोलावलंय गप्पा मारायला आमच्याकडे गप्पा अशाच गमतीच्या धंद्यात काही पुढेमागे होतंय मिशा पिळत बोलायचं नफा तोटा चालायचाच. उमराव, सरदार घराणी कशी संपत चाललीएत आणि ते तेज उरलेलं नाहीये थोडंसुद्धा- असलं काहीबाही होणार अजून काही गप्पा मग मुख्य मुद्द्यावर त्यांची काळजी अजीजी आणि क्वचित वादावादी मग चहात बुडालेल्या मिशा वाळवत अंगणात बसायचं सार्‍यांनी निर्णयाच्या प्रतीक्षेत चेहरा आक्रसून अणि मी त्या वसंतातल्या चमकदार दिवशीसुद्धा खिडकीत बसून माझ्या निस्तेज शरीराला फुटलेल्या त्या निर्जीव पायाकडे पाहत अश्रू ढाळायचे ---
काव्यरस

लढा

लेखक प्रसन्न केसकर यांनी सोमवार, 31/08/2009 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी उठलो अन सहजच तारीख बघितली तर आज ३१ ऑगस्ट. हाच तो ऐतिहासिक दिवस. ५७ वर्षांपुर्वी याच दिवशी इंग्रजांनी केलेला कुप्रसिद्ध क्रिमिनल ट्राईब्ज अ‍ॅक्ट भारत सरकारने रद्दबातल केला अन शेकडो जमातींच्या लाखो भारतीयांना स्वतंत्र केले, भटक्या व विमुक्त जाती असे नाव देऊन अन देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी. हे एकदम लक्षात आले अन विचार आला, गेल्या सत्तावन्न वर्षांत या विमुक्त आणि भटके लोकांच्या आयुष्यात कितपत फरक पडलाय? या प्रश्नाला पहिले उत्तर होते अजिबात नाही. पण विषय जसजसा डोक्यात घोळत राहिला तसतसे मी पाहिलेले अनेक भटके विमुक्त लोक डोळ्यासमोर तरळले.