Skip to main content

मोहक दरबारी

लेखक अन्वय यांनी रविवार, 06/09/2009 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
मोकळ्या हवेत, अगदी नीरव शांततेत चांदण्यांनी भरलेले आकाश न्याहाळताना दुरावलेल्या प्रेयसीचा आठव यावा. तिच्या सहवासात घालविलेला क्षणन्‌ क्षण पुढ्यात उभा राहावा, असे दरबारी कानडाचे रुप वाटते. हा राग मंद्र आणि मध्यम सप्तकात रमणारा असल्याने यात आतर्तबरोबरच गंभीरताही आहे.

रांगोळी

लेखक जयवी यांनी रविवार, 06/09/2009 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
ही माझ्या बाप्पा समोरची रांगोळी ! आजकाल साचे मिळत असल्यामुळे रांगोळी काढणं खूपच सोप्पं झालंय.

(शोध)

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी रविवार, 06/09/2009 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - "अजून कच्चाच आहे" यांची शोध ही कविता हे "पझल" आहे का ते जाणकार सांगतीलच. मी मात्र यांना 'पझल सदृष्य' प्रश्न म्हणेन फारतर. मिपावरील "विडंबन पझल" लेखनाचा हा माझा पहीलाच प्रयत्न आहे. (परीक्षेला जाताना होत असे तशी धडधड होतेय छातीत.) ............... सकाळचा चहाचा माझ्यापर्यंत पोचलाच नाहीत चहा संपला की गॅस? माझं मी शोधीत राहीलो शब्दाशब्दांची ठिगळं की ठिगळा-ठिगळांचे शब्द? माझ्या साहित्यासाठी मीच संकेतस्थळ शोधीत राहीलो सडक्या अन्नाचे सुटलेले वास आलेच नाहीत ट्रॅश कॅन रिकामी की सर्दी झाली?
काव्यरस

मी बदलणार नाही

लेखक अमृतांजन यांनी रविवार, 06/09/2009 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
कॉंन्क्रिटच्या भल्यामोठ्या इमारती बांधीन त्यावर काचेचे आवरण बसवेन आत भट्टी झाल्यावर येसी बसविन भरमसाठ वीज वापराने लोडशेडींग झाले तरी पण मी बदलणार नाही मोठ्या शहरात राहून प्रगती करेन स्टायलिश सोसायट्यांमधे राहीन ब्रॅडेड वस्तू वापरुन नद्या-नाले घाण करेन तरी पण मी बदलणार नाही सहापदरी रस्ते बांधेन ते लहान गावात आणून सोडेन गावाच्या मागे ५-स्टार औद्योगिक वसाहत बांधेन ट्रॅफिक जाम होऊन लोकांचा वेळ पैसा आणि पेट्रोल वाया गेले तरी पण मी बदलणार नाही माझे विचार तेच इतरांचे असे गृहीत धरेन कशाला खुलासा करायचा प्रश्न विचारुन माझेच विचार पुढे रेटून काहीच साध्य झाले नाही तरी पण मी बदलणार नाही मला घाई आहे

विकृत बुद्धिवादाची इस्त्री

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 06/09/2009 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
मला असं वाटतं की ज्योतिष शास्त्र आहे की नाही यावर वाद घालून धूळ उड्वत बसण्यापेक्षा ज्योतिष उपयुक्त आहे की नाही हा मुद्दा महत्त्वाचा आहे. उपयुक्ततता सिद्ध होण्यास शास्त्रीयत्वाच्या कसोटीची गरज नाही, फक्त अनुभव पुरेसा आहे. मागे एकदा आय आय टी मधल्या प्राध्यापक जोगांनी लोकसत्तेमधल्या एका लेखाचा संदर्भ दिला होता. लेखकाचे नाव आठवत नाही, पण त्यातील शेवटचे वाक्य माझ्या लक्षात राहिले आहे. ते असे, "विज्ञान माणसाला जगण्याचे बळ देत नाही". ज्यांना या विधानातील विदारक सत्य पटेल, त्यांनाच ज्योतिषाची उपयुक्ततता पटेल.

शोध

लेखक अजुन कच्चाच आहे यांनी रविवार, 06/09/2009 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
हि "गझल" आहे का ते जाणकार सांगतीलच. मी मात्र याला 'गझल सदृष्य' काव्य म्हणेन फारतर. मिपावरील लेखनाचा हा माझा पहीलाच प्रयत्न आहे. (परीक्षेला जाताना होत असे तशी धडधड होतेय छातीत.) ............... सकाळची सोनेरी किरणे माझ्याशी पोचलीच नाहीत धुक्यात हरवला माझा मी गाव शोधीत राहीलो शब्दा शब्दातले अनुबंध हृदयांतरी पोचलेच नाहीत माझ्याच कवीतेसाठी मी नाव शोधीत राहीलो झुकल्या नजरेतून सुटलेले तीर दिसलेच नाहीत हृदयावर झाले ते मी घाव शोधीत राहीलो कानी पडलेल्या शब्दांचे अर्थ उमगलेच नाहीत ऐकल्या सुरांतील मी भाव शोधीत राहीलो देहगंधाच्या नशेने श्वास भरून घेतलेच नाहीत सोडावया नि:श्वास मी वाव शोधीत राहीलो

भरकटलेली चर्चा

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 05/09/2009 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
भरकटलेली चर्चा . वाचक हो, माझा नाडीग्रंथावरील लेखनाचा मूळ हेतू भाग 6 मधे बोध अंधश्रद्धा पुस्तकाची निर्मिती कशी व का झाली हे नोंदवायचा होता. त्यात एक माहिती म्हणून त्यातील मलपृष्ठवरील अवतरणे उद्धृत केली होती. मी कोणाला तेंव्हा किंवा आत्ता आव्हान दिलेले नव्हते व आज ही देत नाही. त्यामुळे आजून कच्चा किंवा खडूस किंवा अन्य कोणालाही नाडी भविष्य पहायचे असेल तर त्यांना सोईच्या नाडी केंद्रात जाऊन जरूर पहावे. जसे अन्य असंख्य लोक पाहतात.

मदत

लेखक पुष्कर यांनी शनिवार, 05/09/2009 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या निरीक्षणाप्रमाणे, मिसळपावावर प्रसिद्ध झालेल्या लिखाणांपैकी काही ढकलपत्रांमधे प्रसिद्ध होत आहेत.... त्यातून लेखकांचे नाव अत्यंत खुबीने वगळले जात आहे. हे होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी? नियम काय आहेत? इंटरनेट वरच्या कॉपीराईट संबंधी काही मार्गदर्शन मिळू शकेल का?

आकाशवाणी

लेखक सुबक ठेंगणी यांनी शनिवार, 05/09/2009 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
अवलियाची 'जखम' आणि मग ब्रिटिशची 'दगड' वाचून जे सुचलं ते. ह्या कवितेचा रस खरं "गंभीर" आहे असं मला वाटतं.पण तसा ऑप्शनच नव्हता! इथे मला देव म्हणजे (असेलच तर) खरा खरा देव असं अभिप्रेत आहे. मिपावरील सभासद नाही.
काव्यरस

वाट सागरदुर्गाची . . . .अर्थात सागरगडाचा ट्रेक

लेखक दत्ता काळे यांनी शुक्रवार, 04/09/2009 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
अलिबागजवळील डोंगरावर सागरगड वसलेला आहे. सागरगडावर जाण्यासाठी वाघेडे गावांत जावे लागते. पेण-पोयनाड मार्गावर असलेल्या पेझारी फाट्यावरुन वाघेडे गावाकडे रस्ता जातो. अंतर अंदाजे अर्धा कि.मी. हे अंतर काटल्यावर आपण वाघेडे गावांत येतो. हे सागरगडाच्या पायथ्याचे गांव. गावाच्या मागच्या ठाकरवस्तीपासनं रस्ता आहे. ठाकरवस्ती डाव्या हाताला ठेवून चालत निघालं कि एक डोंगर लागतो तो पार करायचा आणि चढाई कायम ठेवायची. रस्ता बरोबर असल्याची खूण म्हणजे वाटेतच उजव्या हाताला रस्त्यालगतच भग्न अवस्थेतील एक दगडी नंदी दिसतो. नंतर अजून एक डोंगराचा टप्पा लागतो इथे वाटेवर सागाच्या पानांचा सडा पडलेला दिसतो.