भक्तिभाव आणि काही प्रश्न
सध्या गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि संपूर्ण जोशात चालू आहे.
आपण दररोज पेपरात आणि टीव्हीवर लालबागच्या राजाच्या विक्रमी गर्दीच्या बातम्या वाचतो. लोकं २०-२२-२४ तास रांगा लावून मुलाबाळांना घेऊन दर्शनासाठी ताटकळत उभे राह्तात. त्यातुन निर्माण होणार्या समस्यांचा (सामाजिक आणि वैयक्तिक) लोकं विचार करतात का? एवढा वेळ गर्दीत उभे राहील्याने मुलाबाळांचे जे हाल होतात. त्यामुळे ती आजारी पडण्याची शक्यताच जास्त. त्यामुळे ती बरी व्हावित म्हणुन पुन्हा एक नवस. आणि मग हे चक्र संपत नाही. शिवाय सुरक्षा यंत्रणेवर जो ताण पडतो. तो वेगळाच.
भक्तिभाव मलाही मान्य आहे. पण हा भक्तिभावाचा अतिरेक नाही का?
मिसळपाव
गोष्ट ४०-४५ वर्षांमागची.ठाणे गावाची.गाव तसे मध्यमवस्तीचे.शहर आणि गाव यांच्या सीमारेषेवर असलेले.बहुतेक माणसे एकमेकांच्या ओळखीची.अश्या त्या गावातल्या तेव्हांच्या गणेशोत्स्वाच्या आठवणी.
आम्ही शाळकरी मुले गणपतिची सुट्टी लागण्यापूर्वीच आपापसात पैज मारीत असू,'यंदा आपण २१,११,५१ गणपतिंचे दर्शन घेणार !'आणि खरोखरच गणेशचतुर्थीला मोदकांच्या भरपेट जेवणानंतर आमच्यासारखी अनेक शाळकरी मुले आपापल्या मित्र-मैत्रिणींसह गटागटाने गणपतिदर्शनाला बाहेर पडत.घर ओळखीच