Skip to main content

भक्तिभाव आणि काही प्रश्न

लेखक शुभान्कर यांनी सोमवार, 31/08/2009 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि संपूर्ण जोशात चालू आहे. आपण दररोज पेपरात आणि टीव्हीवर लालबागच्या राजाच्या विक्रमी गर्दीच्या बातम्या वाचतो. लोकं २०-२२-२४ तास रांगा लावून मुलाबाळांना घेऊन दर्शनासाठी ताटकळत उभे राह्तात. त्यातुन निर्माण होणार्‍या समस्यांचा (सामाजिक आणि वैयक्तिक) लोकं विचार करतात का? एवढा वेळ गर्दीत उभे राहील्याने मुलाबाळांचे जे हाल होतात. त्यामुळे ती आजारी पडण्याची शक्यताच जास्त. त्यामुळे ती बरी व्हावित म्हणुन पुन्हा एक नवस. आणि मग हे चक्र संपत नाही. शिवाय सुरक्षा यंत्रणेवर जो ताण पडतो. तो वेगळाच. भक्तिभाव मलाही मान्य आहे. पण हा भक्तिभावाचा अतिरेक नाही का?

गोष्ट------तेव्हांच्या गणेशोत्सवाची!

लेखक वैशाली हसमनीस यांनी सोमवार, 31/08/2009 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट ४०-४५ वर्षांमागची.ठाणे गावाची.गाव तसे मध्यमवस्तीचे.शहर आणि गाव यांच्या सीमारेषेवर असलेले.बहुतेक माणसे एकमेकांच्या ओळखीची.अश्या त्या गावातल्या तेव्हांच्या गणेशोत्स्वाच्या आठवणी. आम्ही शाळकरी मुले गणपतिची सुट्टी लागण्यापूर्वीच आपापसात पैज मारीत असू,'यंदा आपण २१,११,५१ गणपतिंचे दर्शन घेणार !'आणि खरोखरच गणेशचतुर्थीला मोदकांच्या भरपेट जेवणानंतर आमच्यासारखी अनेक शाळकरी मुले आपापल्या मित्र-मैत्रिणींसह गटागटाने गणपतिदर्शनाला बाहेर पडत.घर ओळखीच

.. जगण्यात काय आहे?

लेखक राघव यांनी सोमवार, 31/08/2009 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
दुष्काळ, कर्ज यात बुडालेले शेतकरी असोत का नर्मदातीरी भंगलेली घरटी असोत.. दु:ख शेवटी काळीज पिळवटणारेच असते.. नाहीच आस जेथे जगण्यात काय आहे? आयुष्य ठेवलेल्या सरणात काय आहे? दिसतात येथ सारे मिठ्ठास बोलणारे.. स्वार्थात रंगलेल्या शब्दांत काय आहे? आता नको पुन्हा ती आश्वासने, दिलासे.. बोलावयास सारे.. पोटात काय आहे? तू सांग देवराया आता कसा जगू मी.. काळीज फाटलेले.. ठिगळात काय आहे? देऊ कसा भरवसा कोमेजल्या मनाला.. तुटतात जेथ नाती मैत्रात काय आहे? असतो असाच थोडा पाऊस सांडलेला.. भेगाळल्या धरेला पुरणार काय आहे? पडत्या घरास माझ्या सोडून मीच जातो.. अवशेष दावणार्‍या दगडांत काय आहे? (विषण्ण) राघव
काव्यरस

गूढ कॉस्टींगचे...

लेखक वेदश्री यांनी सोमवार, 31/08/2009 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
ऑगस्ट महिन्यात घरगुती गॅसची सोय झाल्याने माझा जीभेचा आणि तब्येतीचा प्रश्न हे कळीचे मुद्दे निकाली निघाले आहेत. आर्थिक दृष्टीने बघता खर्चही कमी झाला आहेच (असे वाटतेय सद्ध्यातरी!) पण तो नक्की किती टक्क्याने कमी झाला हे समजण्यासाठी रोजच्या एकवेळच्या स्वयंपाकाचे कॉस्टींग काढून गणित मांडून फायद्या (आणि असेलच तर तोट्या)चे प्रत्यक्ष गणित काढायचे असे ठरवले. कॉस्टींग हा प्रकार मला नविन असल्याने अख्खा शनिवार नेटवर यासंदर्भात माहिती गुगलत बसले होते पण नक्की कल्पना येईल कॉस्टींगची असे काहीच मिळाले नाही. कोणाला याबाबत माहिती असल्यास अथवा अभ्यास असल्यास मार्गदर्शन करू शकाल का?

थोडी जाणीव हवी...

लेखक विमुक्त यांनी सोमवार, 31/08/2009 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
ट्राफिक सिग्नलवर एक मुलगा भीक मागायला येतो... आळशी आहेत... ह्यांना भीक मागायची सवय लागलीयं असं आम्ही म्हणतो... खीशातून २ रुपये काढून त्याच्या हातावर टेकवतो... आज फार उपकार केले ह्या अविर्भावात मग आम्ही मिरवतो... खरंच ते आळशी आहेत का? हे आम्ही पडताळत नाही... आणि पडताळणार तरी कसे?...

गादी

लेखक कपिल काळे यांनी सोमवार, 31/08/2009 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
फार दिवस गादीचे..फार दिवस गादीचे.. |धृ| अशी असावी गादी जवळी. श्रीमंतीची जणू ही गोळी. द्रौपदीची असेच थाळी विक्रेत्याची मग गुपचिळी ग्राहकाची बसे दातखिळी फार दिवस गादीचे..फार दिवस गादीचे.. |धृ| साधीसुधी गादी नसे नशिबाचे फिरले फासे भागामागून भाग येतसे मिपाकरांना वेठितसे सर्व्हरवरती ताण बसे फार दिवस गादीचे..फार दिवस गादीचे.. |धृ| गादी घेतो भाग आवरा मालिकेचा रस्ता सावरा लेख पाहुनी जीव घाबरा मिपाच्या ह्या "व्होल वावरा" जाउ नका "एनी व्हेअरा" फार दिवस गादीचे..फार दिवस गादीचे.. |धृ|
काव्यरस

स्थलांतराचा धार्मिक संदर्भ

लेखक भोचक यांनी सोमवार, 31/08/2009 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
स्थलांतरीतांच्या प्रश्नाला प्रांतिक किंवा भाषक संदर्भच नसतात. त्याला धार्मिक संदर्भही बराच आहे. आपल्या देशात बांगलादेशातून होणारे स्थलांतरही याच सदरात मोडते. बांगलादेशीय मुस्लिमांच्या आसाममधील वाढत्या संख्येने तिथे जातीय दंगली पेटल्याचा इतिहासही ताजाच आहे. अधून मधून ही धुसफुस पुन्हा डोके वर काढते. पण त्यापलीकडे जाऊनही भारतात धार्मिक स्थलांतराचा प्रश्न अजूनही म्हणावा तितका गंभीर नाही. (किंवा आपण तो घेतला नाही, असंही असू शकेल.) पण युरोपात मात्र या धार्मिक आणि स्पष्टपणे सांगायचे तर मुस्लिमांच्या स्थलांतराने मोठीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. भारतात मुस्लिम आले त्याला हजार वर्षे झाली.