Skip to main content

सेकंड लाईफ - भाग ३

लेखक अक्षरमित्र यांनी शनिवार, 18/05/2013 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
सेकंड लाईफ सेकंड लाईफ - भाग २ --------------------------------------------------------------- मेकींग ऑफ "भाऊसाहेब दत्तू पाटील" आय.टी. मध्ये असल्यामुळे शनिवार रविवार सुट्टयाच असायच्या. भाऊसाहेब दत्तू पाटील बनायचे तर ह्या मोकळ्या कालावधीचा उपयोग करावा लागणार होता. दर शनिवार-रविवार घराबाहेर राहायचे तर बायकोला काही ना काही पटणारे कारण सांगणे भाग होते. दरम्यान मला नुकताच रु. ३० हजार इन्सेन्टीव्ह मिळाला होता जे मी अजून बायकोला सांगीतले नव्हते. आता ती वेळ आली होती.

केसरिया बालम...

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 18/05/2013 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
केसरिया बालमा आओनी पधारो म्हारे देस.. हे राजस्थानी लोकगीत अनेक कलाकार, अनेक शब्द वापरून गातात. काही चित्रपटातूनही हे गाणं आपल्याला ऐकायला मिळतं.. केसरिया.. ज्याची कांती केशरी रंगाची. केशरासारखी आहे असा.. शिवाय केशरी रंग हे शुद्धतेचं आणि शौर्याचं प्रतिक.. ज्याची कांती केशरी रंगाची आहे, ज्याचं मन केशरासारखं शुद्ध आहे आणि ज्याच्या ठायी शौर्य आहे असा केसरिया बालमा... किंवा केसरिया बालम. देशांतराला, लढाईला गेलेल्या मांगनियार राजस्थान्याची प्रेयसी/पत्नी त्याला बोलवत आहे..

विक्रांत वरील आयुष्य ४

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 18/05/2013 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
मार्च १ ९ ९ ० मध्ये विक्रांत सर्व डागडुजी झाल्यावर समुद्रात युद्ध सरावासाठी निघणार असे नक्की झाले होते. माझा समुद्रावरील पहिला दिवस हा अतिशय वादळी झाला होता ते वर्णन खाली दिलेल्या दुव्यावर वाचता येईल. http://www.misalpav.com/node/23980 आणि http://www.misalpav.com/node/23987. यामुळे मी जर धास्तावलेला होतो परंतु विक्रांतचा एकंदर आकार आणि त्यावर चालणार्या घडामोडी यामुळे त्याबद्दल एक उत्सुकता सुद्धा मनात होतीच.

'छूकर मेरे मन को'

लेखक हर्षद खुस्पे यांनी शनिवार, 18/05/2013 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
परवा मला 'छूकर मेरे मन को' या गाण्याबद्द्ल ऐकले की हे गाणे (कविता) रविंन्द्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे या गाण्याची गोष्ट मोठी रंजक आहे. रविंन्द्रनाथ टागोर दररोज सकाळी फ़िरायला जात असत तेव्हा एक वेडसर दिसणारा माणुस येउन त्यांच्या छातीला हात लावुन म्हणत असे " काही तरी आहे इथे" आणि निघुन जात असे। असा क्रम बरेच दिवस चाले.

समीर.प्रिया.तेजस

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 18/05/2013 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
समीर हा जानकिबा‌ई व रामभा‌ऊ जोश्यांचा एकुलता एक लेक. घरची परिस्थिती बेताची.. रामभा‌ऊ औरंगाबाद मध्ये नगर पालिकेत लिपिक होते. वडलोपार्जित २ खोल्यांत संसार थाटलेला ..समीर एकुलता एक मुलगा पण समीर खूप हुशार व बुद्धिमान होता १२ वीला टॉपर लिस्ट मध्ये आला अन पुण्याच्या ईंजीनीरिंग च्या कॉलेज मधे त्याला प्रवेश मिळाला... खरं तर कॉलेज चा खर्च राम भा‌ऊंना तसा जडच होता पण त्यांनी तो पार पाडला. समीर ने पण अभ्यास करून खर्चाचे चीज केले ..व अव्वल दर्ज्यात पास झाला अन एका मल्टी नॅशनल आय टी कंपनीत त्याला नोकरी लागली .. अन सुखाचे दिवस आले भरपूर पगार..

अंकानाम वामतो गति:

लेखक शरद यांनी शनिवार, 18/05/2013 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
अंकानाम वामतो गति: " उर्दू-फारसी-अरबी ." या धाग्यावर लिहीतांना श्री. बॅटमन लिहीतात "अक्षरन अक्षर उजवीकडून डावीकडे लावत जायचे. आता यात अजून एक मजा अशी, की उर्दू-फारशी-अरबी लिहीतांना आकडे मात्र डावीकडून उजवीकडे लिहतात...भारतीय पद्धत ढापल्यामुळे श्री. इस्पिकचा एक्का ... हा एक मोठा पुरावा असे म्हणतात व त्यावर परत श्री. बॅटमन +११११११११११११११ असा मोठा पाठिंबा देतात. आता खरी गम्मत पहा. प्राचीन भारतात आकडे उजवीकडून डावीकडे लिहीत, आज आपण लिहिते त्याच्या बरोबर उलटे. षड् द्विक पंच् द्वि असे लिहले तर त्याचा अर्थ २५२६ . अंकानाम वामनो गती हा नियम. प्राचीन संस्कृतात हीच पद्धत वापरेली आपणास आढळेल.

<नौर्‍याची व्य्था!!>

लेखक पिवळा डांबिस यांनी शनिवार, 18/05/2013 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
खालिल कविता पूजाबै हीस सप्रेम अर्पण ************************************************* ती माऊली आली होती मझाकडे आज एकदम खुशित, हिने तिचे एकदम हसत स्वागत केले. हि तिला म्हनाली " सासुबै ,मि काहिहि करेन तुमाला हसत पाहन्यासाटि, तुमी फक्त एकदा हो म्हना हो " तिनेही हसत उत्तर दिले " हो गं सुनबै, तुझ्या घोडचुका मि पाण्याच्या घोटासकट गिळल्यात गं, काय करणार , माझ्या लेकाला तुझि गरज आहे गं " (मनातः त्यानं झक मारली आणि तुझ्याशी पाट लावला नं!!) आनि तिच्या कुशित ही विरुन गेली आता ही सुन राहिली नवती ,ती सासु राहिली नवती , (असं हिला आपलं उगीचच वाटलं!!!) लगेचच मग हिने चिकन बिर्यानीची ऑर्डर सांगितली

अमानवीय- मला पडलेले काही प्रश्न?

लेखक चिखल्या यांनी शुक्रवार, 17/05/2013 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या काही दिवसात भरपुर भुतं स्वप्नात आली आणि आमच्यावर संशोधन करा, लेख पाडा असं म्हणु लागली, अर्थात तुम्ही यावर विश्वास ठेवणार नाही याचा मला विश्वास आहेच. पण जौद्या आता भुतच मानगुटीवर बसल्यावर लेख तर लिहावाच लागणार आणि पाडायचं मी तुमच्यावर सोडुन देतो. कसं? नक्की कुठली व्यक्ती कोणते भुत होणार हे कसं ठरवलं जातं? पिशाच्च, देवचार, भुत, हडळ, डाकीण हे वर्गीकरण नक्की कोणत्या आधारावर होते? नक्की कोणत्या बायका हडळ होतात? म्ह्ण्जे हडळ व्हायचं काय क्वालिफिकेशन असावं?