Skip to main content

महाराष्ट्रातील पाणि व्यवस्थापन आणि सिंचनाच्या समस्यांचा मान्सून

लेखक माहितगार यांनी सोमवार, 16/06/2014 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
गोदावरी नदीचा इतिहास अभ्यासताना गौतम ऋषिंनी गोदावरीचा प्रवाह महाराष्ट्रात आणण्यापुर्वी म्हणे २१ दुष्काळ पडले हि झाली आख्यायीका, पण नवीनतम हवामान पुरातत्व संशोधनांनुसार भारतातील दुष्काळांचा इतिहासही सिंधू संस्कृती इतकाच जुना म्हणजे चार साडे चार हजार वर्षे पर्यंत मागे जातो आहे असे दिसते; हा झाला प्राचीन इतिहास. अलिकडच्या इतिहासाकडे पाहीलतरी आधून मधून दुष्काळ हे महाराष्ट्राच्या पाचवीला नेहमीच पुजलेले.

तुम्हाला कोणत्या (प्रमाणेतर) मराठी बोलीभाषा येतात अथवा परिचय आहे? सोबत बोलीभाषांमधील शब्दार्थ चर्चा

लेखक माहितगार यांनी रविवार, 15/06/2014 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
मोकळेपणाने सांगावयाचे झाल्यास मला स्वतःला एकही बोलीभाषा येत नाही.
काव्यरस

मनः सामर्थ्य

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 15/06/2014 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
हि मी दहावी पास झाल्याच्या वेळेची गोष्ट आहे. माझा भाऊ बारावीत गेला होता आणि त्याचे कॉलेज चालू झाले होते त्यामुळे तो आणि आई आले नव्हते मी आणि आमचे वडील आमच्या गावी कोकणात गेलो होतो. परशुराम येथे आमचे वडिलोपार्जित घर आहे. मागच्या अंगणात फणसाचे झाड आहे त्या झाडाचे दोन फणस आणि गावात विकत घेतलेले शेकडा हापूस आंबे( तेंव्हा ६५ रुपये पक्का शेकडा म्हणजे शंभर (अधिक १२) म्हणजे ११२ आंबे असे एका पाटीत टाकून चिपळूण ठाणे एस टी च्या टपावर चढवले( परशुराम तिठ्ठायेथे ) आमच्या नेहेमीच्या शिरस्त्याप्रमाणे आम्ही मुंब्र्याला उतरलो.तेंव्हा नवी मुंबई चा रस्ता नव्हताच.

मॄगजळ

लेखक मंदार कात्रे यांनी शनिवार, 14/06/2014 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
"त्याचं" येणं मला फारसं रुचलं नव्हतं ...काळ्या रंगाचा ,उंचापुरा , कुरळे केस, इनशर्ट... आणि त्यातून अडचणीचं म्हणजे तो चक्क बूट घालून घरात आला होता... कोण गं तो? ...मी संगीताला विचारलं . संगीता ही म्हात्रेकाकांची एकुलती एक मुलगी .तसा मधूनमधून मुंबईला गेल्यावर मी म्हात्रेकाकांकडे उतरत असे. "तो" आला की म्हात्रेकाकांची वृद्ध आई त्याला शिव्या घालत असे . नशीब त्याला मराठी अजिबात कळत नव्हतं.... म्हात्रे आणि त्यांची मिसेस घरात असले की सतत "त्या"च्याविशयीच चर्चा सुरू असे. तो मित्र आहे माझा...संगीता म्हणाली.अगं पण मित्र झाला म्हणून असा वेळी अवेळी घरी?...मी विचारलं...

कावळा बायकांनाच का शिवतो?

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 14/06/2014 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
कावळा बायकांनाच का शिवतो?
पूर्वी कित्येकदा घरोघरी वडील स्वयंपाकी बनून कामाला लागलेले दिसत. 'आमच्या आईला कावळा शिवलाय' अशी ओळ कानावर येणे अंगवळणी पडलेले असे. कावळे बायकांनाच कसे काय शिवतात बुवा? असे मनोमन वाटून बालपणात ही विचारणा तशीच राहून गेली. मोठे झाल्यावर ते आपोआप समजून आले! मात्र ते कळायला मला माझा मठ्ठपणा कारणीभूत झाला. त्याचे झाले असे की सैन्य दलातील कँन्टीन स्टोअर्स मधे टूथपेस्ट पासून फ्रिज, टीव्ही, कार पर्यंत सर्व वस्तू विकत घ्यायला झुंबड असते.

संवेदना वगैरे

लेखक चाणक्य यांनी शनिवार, 14/06/2014 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
तसं तर रोज असते तिथे ती पण आज दिसली मला डोळ्यांना अंधाराची सवय झाली असताना अनपेक्षितपणे प्रकाशाचा झोत शिरावा थेट डोळ्यात असं काहीसं झालं मला सा-या जगाने टाकलेल्या कच-यात तिचं जगणं वेचत असते ती रोज आणि बहुतेक वेळेला जवळच असलेल्या झाडाच्या सावलीत तिचं कळकटलेलं पोर खेळत असतं पण आज जरा लांब ठेवलं होतं तिने त्याला अरे हो, काल ते झाड तोडत होते नाही का.... तिने संगितलं असेल का, त्या झाड तोडणा-यांना तिला ते झाड हवय म्हणून? पण संगितलं असेल तरी तिचं कोण ऐकणार म्हणा अगदी एकविसाव्या शतकातली स्त्री झाली म्हणून काय झालं खरं तर नसेलच सांगितलं तिने कोणाला काही कारण त्या झाडापेक्षाही तिथली कचराकुंडी न हालणं जा

आठवणीनो………….

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 14/06/2014 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
नाही म्हटले तरी तुम्ही सतत येत राहता …… मी अलिप्तपणे दूर व्हायचा प्रयत्न करतो …. तरी बघता बघता कळत नाही … कधी आणि कसा तुमच्या ओढीने खेचला जातो …. एक आली की दुसरीही येते … शृंखला अव्याहत सुरू असते आजूबाजूच्यांना काय माहीत … मन कुठल्या गाळात रुतून बसते आपणच अडकायचं नी धडपडत बसायचं…. हा जुनाच नकोस खेळ रोज खेळणं… तुम्हाला दूर लोटायच आहे हे ठरवूनही तुमच्याच कुशीत नकळत शिरणं … नेहमीच्या ह्या ओढाताणीत जीवाची किती घालमेल…. जो ह्या चक्रात एकदा तरी सापडलाय फक्त त्यालाच हे कळेल…. एक दिवस तुमच्याबरोबर मलाही क्षितिजाकडे घेऊन चला …… तेव्हाच शांतपणे मागे वळून म्हणू शकेन….
काव्यरस

राजमाची : काजवे (जंगलातले आणि डोळ्यांपुढचे)

लेखक वेल्लाभट यांनी शनिवार, 14/06/2014 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
'अजून किती वेळ लागेल लोणावळ्याला पोहोचायला?' अंदाजे पन्नास वेळा पन्नास जणांना विचारून झालेला हा प्रश्न स्वानंदने आणखी एका काकांना विचारला आणि त्यांच्या `दोन तास लागतील' या काळजाचा थरकाप उडवणा-या उत्तरानंतर स्वानंदची झालेली भावमुद्रा बघून आम्हाला हसू आवरणं केवळ अशक्य होतं. ट्रेकचा पूर्वार्ध काजव्यांनी गाजवला असला तरी उत्तरार्ध मात्र स्वानंदच्या नावे झाला. a राजमाची, काजवे, जंगलातून मातीच्या रस्त्यावरून चालणं, मग दिसणारा नजारा हे सगळं खरं तर गेल्या वर्षीपासूनच डोक्यात होतं. पण गेल्या वर्षी हुकलेला हा ट्रेक या वेळी अखेर घडलाच.