Skip to main content

मराठी कविता : नया दिन !

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 12/06/2014 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
।। नया दिन ।। नवा दिवस उगवलाय! घेवून नवी पहाट! आलाय नवा प्रहर! टाकून जुनी कात! कालचाच मावळलेला तो सूर्य, आला आहे! नव्या आशेचा नवा सोनेरी किरणांचा शर्ट घालून! प्रत्येकाला जगण्याची नवी उमेद द्यायला! प्रत्येकाच्या जीवनात अंधार दूर करुन प्रकाश वाटायला! चला रोज स्वागत करुया त्या सूर्याचे ! जो घेवून येतो आपल्या जीवनात, रोज एक नवी पहाट! नवे चैतन्य! नवा दिवस! नया दिन !! # लेखक - निमिष सोनार

भय, निरुत्साह, साशंकता, ढळलेला आत्मविश्वास....

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 12/06/2014 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
एका मानसिक ताणतणावासंबधित लेखाला मी दिलेला प्रतिसाद (किंचित फेरफार करून) येथे लेख म्हणून टाकत आहे. बर्‍याच लोकांना असे छोटे-छोटे मनःस्वास्थ-विषयक त्रास होत असतात. कदाचित उपयोग होऊ शकेल हा लेख टाकण्याचा हेतू. शिवाय यातून चर्चा होऊन काही उपाय, अनुभव, निरीक्षणे शेअर करता आली तर सगळ्यांनाच त्याचा उपयोग होईल. -------------------------------------------------------------------------------- अनामिक भय हे थोड्या-फार फरकाने सगळ्यांनाच असते. ते एखाद्या झाडाच्या कुजलेल्या अजस्त्र फांदीप्रमाणे कधी कधी खळखळ वाहणार्‍या निरुंद भागात अडकते आणि आपल्या मनाच्या प्रवाहीपणाला अडथळा ठरते.

सेव्हन कप केक

लेखक लव उ यांनी गुरुवार, 12/06/2014 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
सेव्हन कप केक 7cup_cake मिपावर पाककृती द्यायचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तस म्हणायला केक पण चविला मात्र बर्फीसारखी अस काहिस आहे. 7cup_cake साहित्य: बेसन १ कप साजुक तूप १ कप दुध १ कप ओल्या नारळाची चोय १ कप साखर ३ कप कृती:
  1. वरील सर्व साहित्य कढईत एकत्र करून घ्यावे.
  2. मंद आचेवर १५ मिनिटे सतत ढवळत रहावे.
  3. कडा सुटायला लागल्यावर गस बंद करवा.

अस्थी कृषीवलांच्या

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 12/06/2014 03:56 या दिवशी प्रकाशित केले.
अस्थी कृषीवलांच्या

पाया रचून गेले कर्तव्य जागणारे
होते तसेच आहे नुसतेच बोलणारे

होऊ नकोस कष्टी चिंतातुराप्रमाणे
जालिम इलाज कर तू विध्वंस रोखणारे

माजून तर्र काही दिसतात कर्मचारी
प्रत्येक कागदाला पैशात घोळणारे

देणार साथ काया नाही मनाप्रमाणे
उडत्या मनास छळते हे शल्य बोचणारे

रस्ता नवीन नवखा दुर्गम-दरी-पहाडी
संगे हवे कशाला वाटेत धापणारे?

धर्मांध शोषकांच्या झुंडी तयार झाल्या
जातीत पांगलेले अन्याय सोसणारे

मेट्रो ट्रेनचा अनुभव

लेखक साधा मुलगा यांनी गुरुवार, 12/06/2014 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक दिवस प्रतीक्षेत असलेली मुंबई ची मेट्रो रेल्वे रविवार दिनांक ८ जून २०१४ ला सुरु झाली. त्याचे श्रेय कोणाला याचा वाद सुरु राहील परंतु माझासारख्या असंख्य मुंबईकरांना हि अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक घटना आहे. ज्यांना सेन्ट्रल ते वेस्टर्न प्रवास करायचा आहे, जास्तकरून जे रोज ठाणे, डोंबिवली , कल्याण आणि खाली ते अंधेरी, बोरीवली असा प्रवास करतात त्यांच्यासाठी नक्कीच वेळेची बचत करणारी आहे. मेट्रो रेल्वे चालू झाल्याच्या दोन तीन दिवस मी जो प्रवासाचा अनुभव घेतला आहे तो आपल्यासमोर मांडत आहे. सध्या मला इंटर्नशिप साठी चांदिवलीला जावे लागते.

भटकंती कर्नाटकातली

लेखक कंजूस यांनी बुधवार, 11/06/2014 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
((अपडेट २०२१ जुलै Photobucket या साईटवरून या लेखात दिलेले फोटो ती साईट बंद ( फ्री साईटचे शेअरिंग बंद झाले) झाल्याने बदलावे लागले आहेत.

हिंदु अस्मितेचा उदय

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 10/06/2014 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
'संतसूर्य तुकाराम' व 'लोकसखा ज्ञानेश्वर' ही पुस्तके फाडून टाका http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Saint-Tukaram… आत्ताच ही बातमी वाचनात आली , वाचुन अत्यंत आनंद झाला ! जरा कुठे हिंदु अस्मितेचा उदय होत आहे असे वाटले :) (आता हा अब की बार ... चा इफेक्ट आहे की नाही देव जाणे ) पण काही का असेना हिंदुंनाही , अल्पसंख्य नसले तरीही , भावना असतात आणि त्याचा आदर करायला शिकले पाहिजे हळुहळु लोकांना कळायला लागले आहे .

दुखरी नस...!

लेखक वटवट यांनी मंगळवार, 10/06/2014 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळची वेळ... मला ही संध्याकाळची वेळ खूप आवडते... काय होतं देव जाणे पण खूप हळवं वाटतं... म्हणजे दरवेळेस मनात दुःख, वेदनाच असायला हवी असं नाही पण तरीही फार भावनिक व्हायला होतं... ज्या गोष्टींचा आपण संपूर्ण दिवसात कधीच विचार करत नाही त्या गोष्टी आठवू लागतात... काही गोष्टींचे संदर्भ बदलतात..तर काही गोष्टींचे संदर्भ अजून पक्के होतात... संध्याकाळची वेळ ही आत्म्यानं जागं व्ह्यायची वेळ असते. आपलं खरं आस्तित्व काय आहे? आपण नक्की कोण आहोत? आपले नक्की कोण आहेत? आपण नक्की कोणाचे आहोत? ह्या सगळ्या गोष्टींचा त्रयस्थ दृष्टीकोनातून विचार करायचा असेल तर संध्याकाळच्या वेळेसारखी दुसरी कुठलीही वेळ नाही...

दाखला

लेखक बेसनलाडू यांनी मंगळवार, 10/06/2014 02:08 या दिवशी प्रकाशित केले.
मागितलाच कोणी कधी माझ्या जिवंतपणाचा पुरावा, की शोधाशोध चालू होते असंख्य कवितांची, वह्या-कागदांची, ई-मेल्स् ची, अश्रू पडून फुटलेल्या शाईची, (त्यातलं काही नाहीच मिळालं,तर) आपल्या दिवसरात्रींची, उन्हापावसाची, हसण्यारडण्याची (पण हे सगळं कधीच संपून गेलंय!) फोटो, मिस्ड् कॉल्स्, मेसेजेस्, फॉरवर्ड्स् ची (आता तर तुझा नंबरही माहीत नाही) ... न गवसणाऱ्या, न उरलेल्या, निरुपयोगी निरर्थक, निर्जीव, निर्माल्य सगळ्यात सतत, केवळ तुलाच धुंडाळत राहणं, इतकाच माझ्या सजीवतेचा दाखला पुरेसा नाहीये का तुला? (का पुरेसा नाहीये तुला?)