Skip to main content

हंपीचा ध्यास -हंपी इतिहास

लेखक Bhakti यांनी शनिवार, 09/05/2026 12:47 या दिवशी प्रकाशित केले.

हंपी नावाचा एक मराठी सिनेमा आहे. ठीकठाक आहे, पण तेव्हापासून हंपीचा ध्यास लागला होता.

हंपीला जाण्याआधी मी मिपावर जयंत कुलकर्णी यांची "विजयनगर साम्राज्याची मालिका" नीट वाचून काढली. युट्युबवर शेकडो व्हिडिओ पाहिले. प्रत्यक्ष हंपी फिरताना "सफर हंपी - बदामीची आणि गदग परिसराची" हे आशुतोष बापट यांचे पुस्तक सतत सोबत होते. एक-दोन ठिकाणी गाईड घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, तेही केले.

तमिळनाडूचा मुख्यमंत्री कोण

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 08/05/2026 17:03 या दिवशी प्रकाशित केले.

सध्या तामिळनाडूमध्ये नेहमीचे डी एम के आणि ए आय ए डी एम के हे दोन पक्ष आळीपाळीने पूर्वी सत्तेत होते ते आता तमिळ मतदारांनी कडेला बसवले आहेत. त्यांनी अभिनेता असणारा आणि आता राजकारणी बनलेला विजय चंद्रशेखर जोसेफ याच्या तमिळग वेट्री कळगम या पक्षाला तब्बल 108 जागा देऊन सर्वाधिक संख्येचा पक्ष बनवले आहे. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापन करायचे असेल तर किमान 118 जागा ताब्यात असणे आवश्यक आहे. म्हणजे विजेच्या पक्षाला जर सत्ता स्थापन करायचे असेल विजय जोसेफ ला जर मुख्यमंत्री व्हायचे असेल तर अजून दहा जागांची गरज आहे. डी एम के किंवा ए आय ए डी एम के हे दोघे मिळून जरी एकत्र आले तरी देखील 118 जागा होत नाहीत.

मुलाचं शिक्षण आणि मुलीचं लग्न.

लेखक आजी यांनी शुक्रवार, 08/05/2026 13:05 या दिवशी प्रकाशित केले.

आपण सगळेच व्यवहारात बोलताना हेच वर लिहिलेले शब्द नेहमी वापरतो. पूर्वीपासून वापरत आलोय. आपल्याला नेहमीच मुलाचं शिक्षण महत्त्वाचं वाटतं. आणि मुलीचं फक्त लग्न महत्त्वाचं वाटतं. फक्त लग्न. तिच्या जन्मापासूनच तो आईबापांना चिंतेत टाकणारा प्रश्न. एखाद्या बचतयोजनेची जाहिरात असो किंवा पर्सनल लोन.

 

पुणेरी पाट्या... नकोश्या

लेखक किल्लेदार यांनी बुधवार, 06/05/2026 14:07 या दिवशी प्रकाशित केले.

गेल्या काही दिवसांपासून टेनिस एल्बोच्या दुखण्यानं डोकं वर काढलंय त्यामुळे फारसं आवडत नसतानाही, सकाळी पायी फिरायला जाण्यावाचून व्यायामाचा दुसरा पर्याय नव्हता. पायी फिरायला लागलो आणि एरवी पटकन निसटून जाणारे आजूबाजूचे देखावे आता हळूहळू सरकू लागले अन् आधी कानाडोळा केलेले, जागोजागी लावलेले विद्रूप फलक डोळ्यात चांगलेच खुपायला लागले. यावर अनेकांनी आजवर आक्षेप घेतलाय, वरपर्यंत तक्रारी केल्यात, आंदोलनं केलीत आणि त्यावर मोठमोठ्या अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी पोकळ आश्वासनंही दिलीत आणि तरीही विद्रुपीकरण चालूच आहे.

बंंगालची झालमूरी अन एका मिपाकराची मनकी बात.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी मंगळवार, 05/05/2026 19:17 या दिवशी प्रकाशित केले.

पश्चिम बंगालच्या राजकारणात बदल हा अपवाद नसून परंपराच आहे. या भूमीने नेहमीच सत्तेला प्रश्न विचारले, विचारसरणींना आव्हान दिले आणि आवश्यक वाटल्यास प्रस्थापितांना नाकारण्याचे धाडस दाखवले. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीने हा वारसा पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. या निकालाकडे केवळ सत्तांतर म्हणून पाहणे म्हणजे बंगालच्या राजकीय मानसशास्त्राचा अपमान ठरेल; कारण इथे मतपेटीतून उमटलेला कौल हा नेहमीच अधिक खोल, अधिक सूक्ष्म आणि अधिक बहुपदरी असतो, असे म्हणता येते.