परवाना !
लाईट जाणं वगैरे प्रकार परदेशात राहून विसरायला झाले होते. भारतात आलो आणि थोड्या वेळातच विजेने सायोनारा केले आणि धूम ठोकली. दिवेलागणीची वेळ, आणि वर बेभरवशाचा कारभार आपल्याकडे सगळा, वीज कधी परत येणार माहित नाही. इनवर्टर पण एन वेळी खराब झालेला. सणासुदीच्या दिवसांमध्ये त्याची डागडुजी करायला पण कुणी येत नव्हतं. बाहेर रिमझिम सुरु झाली होती नुकतीच पावसाची. जीव वैतागून गेला , पण करणार काय ? पर्याय नव्हता. वीज परत येण्याची वाट बघायचं नुसतं!
काडेपेटी शोधून मेणबत्ती पेटविली. त्या प्रकाशात घर कसं अगदीच वेगळं भासायला लागलं. निरनिराळ्या वस्तूंच्या लंबुळक्या सावल्या भिंतीवर कशा दिमाखानं डौलू लागल्या.
मिसळपाव
साहित्य
2 वाटया बासमती तांदुळ
5 मिडियम टोमॅटो प्युरी करून
2 मोठे कांदे
3 मिरच्या
आलं लसूण पेस्ट 2 मोठे चमचे.
साजूक तूप 1/2 वाटी
पाव वाटी काजू
मीठ
साखर
कोथिंबीर (सजावटीसाठी)
कृती
प्रथम तांदूळ धुवून निथळत ठेवा. कांदा बारीक व उभा चिरा.
छोट्या कुकरमध्ये तुप घालुन जिरं व कांदा घालून परतून घ्या.त्यात
तांदूळ घालून परतावे.नंतर मिरचीचे तुकडे आणी आलं लसुण पेस्ट घालून परतून घ्यावे. थोडा वेळाने 5 वाट्या गरम पाणी घालावे.