Skip to main content

ही वाट भटकंतीची १४: गोवा - भाग १

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 05/05/2015 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
२०१४ म्हणजे खुप कमी ट्रीप झालेले वर्ष असे मला वाटत होते. पण सहज काल ट्रवल डायरी हातात आली, आणि आपण २०१४ ला नाही नाही म्हणता, ऑफिस मधील टीम बरोबर गोवा(मार्च), कोलाड व्हाईट वाटर राफ्टींग( ऑगस्ट), आनि काशीद बीच(डिसेंबर) या ट्रीप केल्या आहेत शिवाय स्वता, दूधसागर ट्रेक ( सप्टेंबर) आणि विसापुर ( जुलै) आणि अजिंठा-वेरुळ फॅमिली ट्रीप (डिसेंबर) केलेली आहे असे जानवले. म्हणजे ट्रेक खुप कमी केले आहेत पण २०१४ सहलींच्या बाबतीत अगदीच नाखुष करणारे नव्हते जेव्हडे मी समजत होतो. फक्त ही माहीती मी इतर कोठे लिहिली नव्हती बस्स.

एलापुरातील चित्रे - उत्तर अजिंठा चित्रशैली.

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 05/05/2015 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
अजिंठा लेणीसमूहाच्या निर्मितीनंतर विशेषतः पहिल्या क्रमाकांचा विहाराचा निर्माता राजा हरिषेणाच्या मृत्युनंतर वाकाटकांच्या वैभवशाली राजवटीचा लवकरच अस्त झाला. तदनंतरच्या धामधुमीच्या काळात चालुक्य, कलचुरी अशा राजवटींनंतर येथे राष्ट्रकूटांची प्रबळ सत्ता निर्माण झाली. कलचुरींच्या काळातच एलापूर - वेरूळ येथे लेण्यांची निर्मितीची सुरुवात होऊ लागली त्या शिल्पकलेचा राष्ट्रकूटांच्या कारकिर्दित कळस गाठला गेला.

छायाचित्रण स्पर्धा क्र. ९ सावली: निकाल

लेखक संपादक मंडळ यांनी मंगळवार, 05/05/2015 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रण स्पर्धा क्र. ९ सावली: निकाल या स्पर्धेलाही छान प्रतिसाद मिळाला. छायाचित्रे जरा कमी आली पण सगळीच अतिशय सुंदर होती. पहिल्या क्रमांकावर आलेले छायाचित्र वगळता इतर सर्वांनाच फार थोड्या फरकाने गुण मिळालेत.

एक आठवण - उन्हाळ्याच्या तो दिवस

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 05/05/2015 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या १०-१२ वर्षांपासून दिल्लीत ही नागपूर सारखा उन्हाळा पडू लागला आहे. मे महिन्यातच तापमान ४५ अंशापर्यंत जाते. सोफ्यावर बसून विजय वर्तमान पत्र वाचत होता, लू लागून मरणार्यांच्या आंकड्यांवर त्याची नजर गेली. वाचता-वाचता, अतुलचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर तरळला. पाच वर्षांपूर्वीचीच मे महिन्यात असाच उन्हाळा होता. आकाशात सर्वत्र पसरलेली राजस्थान मधून येणारी लाल धूळ आणि प्रचंड गरम वारे, दिवसाकाठी घर बाहेर निघणे दुष्कर होते. त्या दिवशी शनिवार होता, विजय काही कामानिमित्त, आर के पुरम येथे स्थित भिकाजीकामा पेलेस येथे गेला होता. काम संपवून, दीड एक वाजेच्या सुमारास बस घेण्यासाठी तो बस स्थानकावर आला.

झोपलेले नशिब

लेखक खंडेराव यांनी मंगळवार, 05/05/2015 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
आटपाटनगरात एक कोळी रहायचा. रोज सकाळी उठुन मासे पागायला जायचा. जे काय मासे मिळायचे ते बायकोच्या ताब्यात देउन दुपारी आराम करायचा, पोराशी खेळायचा. बायको काही मासे घरासाठी ठेवुन उरलेले विकायची, घरी येतांना टोपल्यात बाजार भरुन आणायची. अशीच काही वर्षे गेली. घरात अजुन एक बाळ आले. कोळ्याला वाटायला लागले, सभोवताल बदलतच नाहीये. तीच झोपडी, तेच जुने कपडे. रात्रीची झोप उडाली. एक दिवस स्वप्नात एक म्हतारा आला. स्वप्नात आला कि खरोखर आला हे काय कोळ्याला कळाले नाही. त्याने कोळ्याला सांगितले, की तुझे नशिब झोपलेले आहे. ते जोपर्यंत जागे होत नाही, काहीही बदलणार नाही.

काय दुखलंय...?

लेखक संदीप डांगे यांनी मंगळवार, 05/05/2015 06:38 या दिवशी प्रकाशित केले.
एका प्रश्नाचे उत्तरः प्रसंग एकः बांद्र्याचे जे जे होस्टेल. रात्रीचे २ वाजलेत. अगदी पाप्याचे पितर असलेला एक मुलगा लघुशंकेला गेला असता चक्कर येऊन तिथेच पडला. बेशुद्ध झाला नाही. पण अंगात उठण्याचे त्राण बिल्कुल नाही. त्याला उचलून रेक्टरच्या गाडीत घालून जवळच्या एकमेव उपलब्ध असलेल्या मल्टी-स्पेशॅलिटी हॉस्पीटल मधे नेले. निवासी डॉकने छातीला स्टेथो लावून तपासले. काही प्रश्न विचारले. ताबडतोब रक्त/लघवी तपासणी, छातीचा एक्स-रे वैगेरे काढायला लावला. आम्ही जाम टेंशनमधे.

सांगली किंवा मिरज मध्ये कधी कट्टा झाला आहे का ?

लेखक दा विन्ची यांनी सोमवार, 04/05/2015 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
सांगली किंवा मिरज मध्ये कधी कट्टा झाला आहे का ? batman आणि point blank सोडून कुनी स्थानिक मेम्ब्र हाईत काय ?

टाईमपास २ - बकवास फुल्ल टू

लेखक समीरसूर यांनी सोमवार, 04/05/2015 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
जवळपास २० वर्षांपूर्वीची माझी शोकांतिका सांगतो. देवाच्या दयेने (मार्कांच्या बाबतीत आम्ही अगदीच कंगाल होतो) एका शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आम्हाला प्रवेश मिळाला. दिल खुश हो गया. महाविद्यालय सुरू होण्याची तारीख जशी जशी जवळ येऊ लागली तसे तसे आमचे निरागस मन कल्पनेच्या उंच उंच आकाशात एखाद्या मोरपीसासारखे तरंगू लागले. ऐन तारुण्याचे दिवस ते. आणि हिंदी सिनेमातल्या तारुण्यसुलभ प्रेमाविष्कारावर पोसलेले आमचे कोवळे मन ते! निष्पाप होते.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४४

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 04/05/2015 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. मग देवळातून बाहेर आल्यावर बाकिच्या पुरोहितां बरोबर 'एकंदर दिवस कसा-गेला?' याची एक लहानशी ठरलेली चर्चा झडते..आणि घोड्याला टाच मारल्यासारखी गाड्यांना किका मारून..आमचं हे काहिसं आनंदी झालेलं देहाचं गाठोडं घराची वाट धरतं! ........ पुढे चालू... ============================= मग येतो श्रावणामधला ठरला मंगळवार .. हल्ली हे शिवंमंगलागौरी व्रत ,व्रत म्हणून कोणी करत असलं नसलं..तरी त्यात मिळणारी एंजॉयमेंट राहिलेली आणि काळानुसार अगदी वाढलेली सुद्धा असल्यानी, कमी अधिक प्रमाणात का होइ ना?

मी नाही बोलणार जा.............

लेखक एक एकटा एकटाच यांनी सोमवार, 04/05/2015 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
अवनी आज प्रचंड घुश्श्यात होती. घरी आल्या आल्या तिने सोफ्यावर दफ्तर आपटलं आणि तडक वर आपल्या खोलीत निघून गेली. ज्योती किचनमधुन बाहेर पाणी घेउन येईपर्यंत वरुन धाडकन दरवाजा आपटल्याचा आवाज आला. तिला आजच हे प्रकरण थोड विचित्रच वाटलं. सहसा अवनी अस कधी वागायची नाही. हा थोड़ी हट्टी होती, ती तर सगळीच मुलं ह्या वयात असतात पण इतरांप्रमाणे अवनी कधी आततायीपणा करायची नाही. आईविना पोर म्हणून ती तिच्या आजीची ज़रा जास्तच लाडकी होती एव्हढंच. पण बाक़ी अवनी होती अगदी गोड आणि लाघवी. पूर्वी दंगा करून घर डोक्यावर घेणारी अवनी मम्मा गेल्यापासून मात्र थोडी बदलली होती.