Skip to main content

पदपथ झोपण्यासाठी नसतो, पण..

लेखक चलत मुसाफिर यांनी शुक्रवार, 08/05/2015 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
मानवस्वरूपाभिमानी, दबंगोत्तम, वाण्टेडनामधारी युगपुरुष श्री सलमानानंद यांच्यावर येऊ घातलेल्या कारावासरूपी अग्निदिव्यामुळे सकल भूतलतारामंडलात होहो हाहाकार होऊ घातला आहे. पैकी काहीजण जालीय गुंजारवाद्वारे पदपथशयनाच्या प्रसाराबद्दल आपल्या रोषयुक्त भावना दाहक शब्दात प्रकट करीत आहेत. तसेच काही स्वघोषित विवेकाधिपती याउलट भूमिका घेऊन सदर तारे-तारकांचा उद्धार करीत आहेत. या दोहोंना विचारले जावेत असे काही प्रश्न: १. पदपथ हा झोपण्यासाठी नसतो. पण गाडी चढवण्यासाठीही नसतो. या मुद्द्यावर मौनव्रत बाळगण्याचे काय कारण असेल? २. पदपथ जसा झोपण्यासाठी नसतो, तसाच सामान्य रस्ता हा वाहने उभी करून ठेवण्यासाठी नसतो.

सलमानचा जामिन !

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 08/05/2015 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
उच्च न्यायालयाला योग्य वाटत असेल तर त्यांनी सलमानला जामिन जरूर द्यावा. नंतर त्याची निर्दोष सुटका सुद्धा करावी. फक्त जामिनाच्या किंवा सुटकेच्या निर्णयाला खालील पुरवणी जोडावी १. विनापरवाना (without license) गाडी चालवणाऱ्या चालकावर इथून पुढे कोणतीही कारवाई करू नये. कारण -- अपघात करण्याचा त्यांचा हेतू नसतो. २. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर इथून पुढे कोणतीही कारवाई करू नये. कारण -- प्रत्येक नियमाला अपवाद असलाच पाहिजे. ३. मद्य पिऊन गाडी चालवताना एखादा अपघात झालाच तर केवळ ताकीद देऊन सोडून द्यावे. कारण -- इतर वेळी त्यांचे समाजातील वर्तन चांगले असते. ४.

१० हजार एकर जमीन बांगलादेशला दिली

लेखक आशु जोग यांनी शुक्रवार, 08/05/2015 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
भारत-बांगलादेश यांच्यामधील जमीन देवाण घेवाणीचे विधेयक सर्व संमतीने पास झाले. सरकारला यासाठी सर्व विरोधी पक्षांनीही सहकार्य केले. या विधेयकाबाबत काही मतभेदाचे मुद्दे होते. बांगलादेशला जमीन देण्याला भारतातील काही गटांचा विरोध होता. त्यांना ही एक प्रकारची माघार वाटत होती. आजच्या पास झालेल्या विधेयकामुळे भारताकडून बांगलादेशला १० हजार एकरचा भूभाग मिळेल तर बांगलादेशकडून भारताला ५१० एकरचा प्रदेश मिळेल. हेतु हा आहे की यामुळे दोन्ही देशांच्या सीमा मानवनिर्मित न राहता नदी, पर्वत अशा नैसर्गिक घटकांच्या सहाय्याने बनतील असा अंदाज आहे. ज्यामुळे सीमांचे रक्षण करणे सोपे होइल.

रविंद्र पाटील : नाव ओळखीचं वाटतंय ???

लेखक नीलमोहर यांनी शुक्रवार, 08/05/2015 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
रविंद्र पाटील या नावाला स्वतंत्र ओळख नाही पण 'सलमान खान' हा संदर्भ दिला की त्यांची ओळख पटू शकेल. रविंद्र पाटील हे सलमानचा अंगरक्षक म्हणून नेमलेले पोलिस काँस्टेबल होते, होते म्हटले कारण आता ते या जगात नाहीत. पैसा आणि अधिकार या दोहोंच्या ताकदीने मिळून एका निष्पाप प्रामाणिक माणसाचा कसा बळी घेतला त्याचीच ही कहाणी. गेले काही दिवस लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनलेल्या चि.कु.सलमान खान खटल्याबाबत माहिती करून घेतांना काही धागे मिळाले.

फक्त इंग्रजीने भागेल..? भविष्यवेध २०३०.

लेखक संदीप डांगे यांनी शुक्रवार, 08/05/2015 05:23 या दिवशी प्रकाशित केले.
विशेष सूचना: हा लेख 'माझे बरोबर का तुझे बरोबर' ह्या वादासाठी नसून सगळ्या बाजूने विचार करून एखाद्या किंवा अनेक पर्यायांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न समजूया. नुकत्याच झालेल्या ह्या धाग्यावरच्या चर्चेत बरेच मुद्दे मांडले गेले. त्यात काही बाबतीत गोंधळ आहे असं वाटतंय म्हणून नवीन धागा काढतोय. हा सगळा खटाटोप पुन्हा करण्याचं कारण आजच्या ५-८ वयोगटातली मुलं असलेल्या पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून. आधीच्या धाग्यात चर्चिले गेलेले महत्त्वाचे दोन मुद्दे: १.

रतीब

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 08/05/2015 03:26 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळ्याची सुट्टी लागल्यापासून शांताच एक काम हलक झाल होत, ते म्हणजे चंद्रीला चरायला नेण. दिगूने मोठ्या उत्साहाने ते काम अंगावर घेतलं होत. रोज दुपारी त्याचा मित्रांबरोबर कधी विटी दाण्डुचा डाव रंगत होता तर कधी पत्त्याचा. खेळ संपले की मग कैर्या, चिंचा पाडण, त्या मीठ लावून खाण आणि मग विहिरीत डुंबत बसण असा त्याचा उद्योग सुरु असे. संध्याकाळ झाली कि तो चंद्रीला घरी घेऊन येई. तोपर्यंत शांता कधी घर सारवून घेई, तर कधी दळण नीट करून ठेवायची. कधी बायका वाळवण करायला बोलवायच्या मग त्यांना जाऊन मदत करायची. आजही असाच दिगू चंद्रीला रानाकड घेऊन गेला. त्याच्या पाठोपाठ शांता धुण घेऊन गेली होती.

पुस्तक परिचय : हसरी किडनी अर्थात ‘अठरा अक्षौहिणी’

लेखक पारुबाई यांनी शुक्रवार, 08/05/2015 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
पद्मजा फाटक या लेखिका म्हणून आणि एके काळी दूरदर्शनवर सुंदर माझे घर सादर करणाऱ्या म्हणून बऱ्याच जणांना आठवत असतील. त्यांना वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी अचानकपणे ग्लुमेरेलो नेफ्रायटीस नावाच्या एका असाध्य रोगाला सामोरे जावे लागले. या आजारामध्ये किडन्या पूर्णपणे निकामी होतात. डायलिसीसवर किंवा किडन्या पुनर्रोपण करून आयुष्य वाढवता येते. पण ते असते सर्वसाधारणपणे २-३ वर्षाचे. अश्या अचानक उद्भवलेल्या जीवघेण्या आजाराशी त्यांनी १० वर्षे सर्व शक्तीनिशी झुंज दिली. या झुंजीची कहाणी त्यांनी ‘हसरी किडनी अर्थात अठरा अक्षौहिणी’ या पुस्तकात शब्दबद्ध केली आहे.

कुत्तेकी मौत

लेखक हुप्प्या यांनी गुरुवार, 07/05/2015 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
सलमान खानच्या शिक्षेवर प्रतिक्रिया देताना गायक अभिजित याने असे ट्वीट केले की कुत्ता रोड पे सोयेगा तो कुत्ते की मौत मरेगा. ही भाषा आक्षेपार्ह वाटली तरी त्यात थोडे तरी तथ्य आहे. खुलासा: सलमान खानची शिक्षा कमी व्हावी, त्याचे बाकी कर्तृत्व बघून त्याला माफ करावे वगैरे मला वाटत नाही. जे जे कायदे मोडले आहेत त्याची त्याला पूर्ण शिक्षा मिळावी. परंतू फुटपाथवर झोपणे हे सुरक्षित आहे का? झोपाळलेला ड्रायवर, नवशिका ड्रायवर, फोन वा अन्य कारणाने लक्ष विचलित झालेला ड्रायवर आणि अर्थात नशा केलेला ड्रायवर ह्यामुळेही असा अपघात होऊ शकतो.

'' अरे, ऐकतोस ना रे...''

लेखक संकेत२५ यांनी गुरुवार, 07/05/2015 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या स्वप्नवतं दुनयेत गाढ असता अचानकपणे जाग यावी अन ते स्वप्नचं कोलमडून जावे तसंच काहीसं आयुष्यात कधी घडतं . आयुष्यातले ' रंग ' एकाकी बदलतात.. अन होत्याच न्हवतं होवून जातं. 'क्षणा' चा हि विलंब न लागता... अशीच एक रविवारची रात्र ,हास्य आनंदा कडून वेद्नेकडे झुकलेली ... रात्रीचे साधारण सव्वा आठ होत आले होते .. पनवेल स्थानकाहून ठाण्यासाठी आम्ही लोकल पकडली अन सीट वर निवांत बसते झालो. . रेल्वे रुळावरून लोकलं अगदी धीम्या गतीनं पुढे सरत होती. डब्यात कमी अधिक रेलचेल होती. हळू आवजात कुणा एकेकाची, आप आपसात कुजबुज चाललेली . कुणी मोबाईल मध्ये डोकावलं होतं.

मनकवडा डॉक्टर …

लेखक पगला गजोधर यांनी गुरुवार, 07/05/2015 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
कल्पना करा, संध्याकाळच्या वेळेस आपण आपल्या घरात असताना, अचानक सर्व शहरातली लाईट गेली, आणि आपल्याकडे एकदम बुक्क अंधार झाला तर, अंधाराला डोळे सरवयापर्यंत, मनावर कशी एकप्रकारची अनामिक भीती एकटेपणाची काळोखी पसरते. आता त्या काही क्षणांच्या अनुभवावर अंध व्यक्तींचा जीवनातील काळोखीवर खर्‍या अर्थाने विचार करून, अंध बांधवांच्या दु:क्खाची भयाणता, डोळस व्यक्ती कल्पना करू शकते. स्पर्श आणि आवाज यांच्या माध्यमातूनच अंधांचा जगाशी संपर्क येतो.