Skip to main content

|| सुरजमल जाट आया भाऊके दरबार || भाग - २

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 05/06/2015 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
|| सुरजमल जाट आया भाऊके दरबार || भाग - १ || सुरजमल जाट आया भाऊके दरबार || भाग - २ हंऽऽ कुठेपर्यंत बरे आलो होतो आपण ? श्री जोशी यांना एक हकिकत ऐकण्यास मिळाली. ‘‘सुमारे वीस वर्षापूर्वी म्हणजे अंदाजे १९०० साली, काही मराठे उंट घेऊन या मैदानात उतरले. हे लोक दिवसा झोपा काढीत व रात्री तंबूत खणत असत. सात आठ दिवस ते खणत होते. एका दिवशी ते अचानक निघून गेले. सकाळी गुरे चारण्यासाठी जी गुराखी मुले त्या मैदानात गेली त्यांना तेथे अनेक खड्डे दिसले.

(नवमि)पाखरास...अर्थात दमामि म्हणे !

लेखक दमामि यांनी शुक्रवार, 05/06/2015 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हाला हेवनवासी होण्याचे डोहाळे लागले आहेत . त्याआधी लिहिलेली कविता/ उपदेश / म्रुत्युपत्र .
काव्यरस

गोव्याची साद - भाग ३

लेखक किणकिनाट यांनी शुक्रवार, 05/06/2015 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
गोव्याची साद - भाग २ गोव्याची साद - भाग १ गोव्याची साद - भाग ३ तर पुढचे दोन दीवस म्हणजे नुसते खाणे-पिणे, समुद्रात सकाळ संध्याकाळ २-२ तास डुंबणे आणि जवळपास भटकणे यात घालवले. भटकंतीमधे किल्ला काबो-डी-रामा ला भेट. पाळोळेकडून अगोंडा किनारा रस्त्याने अजून बरेच पुढे सरळ सरळ जायचे. जाताना डावीकडे अगोंडा, खोला किनार्यांकडे जाणारे रस्ते लागतात. हा छोटा प्रवाह/नदी जिथे समुद्राला मिळते तेथून अगोंडा किनारा चालू होतो.

बेफिकीर…पण काही क्षणापुरताच

लेखक ganeshpavale यांनी शुक्रवार, 05/06/2015 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
कागदावर रेखाटलेलं आयुष्य, ओरबडलेलं लेखन आणि कित्येक कागदांचा चुरा करून हिरमुसून सांडलेले अश्रू सारं काही तुझ्यासाठीच… तुझ्या सवयी, गोड आठवणी जपताना साऱ्या जखमां पुन्हा भळभळत ताज्या होतात, तीव्र वेदनेत त्या कळा नकोशा झाल्या की अभद्र ते सारे शिव्या शाप मीच मला देत कुढत बसतो. मनाची कवाडे केंव्हाच बंद केली पण त्यावरील तुझी दस्तक अजूनही तशीच. रोज तीळ तीळ तुटताना मगरमिठीत गवसल्याची जाणीव होते या भाबड्या जीवाला. नकोसा होतो हा देह, नकोसा वाटतो जीव. मी जातो ते फक्त तुझ्या निशाणीसाठी. तुझ्यासोबत जगलेले ते क्षण किती गोड होते. किती मदमस्त जीवन होतं.

तुझं प्रेम

लेखक ganeshpavale यांनी शुक्रवार, 05/06/2015 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
तुझं प्रेम कित्येक मैलाचा प्रवास केल्यावर मिळालेला विसावा म्हणजे तुझं प्रेम अथांग सागर पोहून पार केल्यानंतर मिळालेला किनारा म्हणजे तुझं प्रेम आयुष्याच्या खडतर प्रवासात लाभलेलं सुख म्हणजे तुझं प्रेम अपार कष्टानंतर सुखाची ओंजळ भरून मिळालेलं फळ म्हणजे तुझं प्रेम सुखादुखाच्या असह्य वेदनेनंतर क्षमलेली कळ म्हणजे तुझं प्रेम मायेचा ओलावा.. ममतेचा पाझर जीवनभराचा गारवा म्हणजे तू प्रेम - गणेश पावले लेखन संपादित केलेले आहे --------------------

माझी केरळ आणि तामिळनाडु सहल भाग-१

लेखक प्रमोद देर्देकर यांनी शुक्रवार, 05/06/2015 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
"फिराला जायाचं , फिराला जायाचं" "पण कुठं जायाचं " "केरळला" "का? तिकडेच का?" तो आहे ना जळावु गणेशा त्याने त्याच्या केरळच्या धाग्यात जे काही फोटो टाकलेत त्यानं अशी जळजळ झाली की २ इनो पाकिटे घेवुनही जाईना, तेव्हा म्हंटले की तिकडे जावुनच यावे. मगच जीव शांत होईल. तरी एका नातेवाईकांनी पाय ओढलाच. वाss जावुन जावुन केरळलाच जाताय का? "अरे केरळांत आणि आपल्या कोकणांत फरक तो काय? आपल्या गावी जसे डोंगर तसेच तिकडचे त्यात विशेष ते काय? आणि हो छत्री घ्या नाहीतर पाऊस गाठेल. " म्हंटले येवुदे की, इथे उकाड्याने हैराण आहे म्हणुन तर भिजायला जातोय.

इतकाच अर्थ आता जगण्यास माणसाच्या

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 05/06/2015 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
आता नकोत गप्पा खोट्या पराक्रमाच्या येथे कितीक गाथा माझ्या पराभवाच्या खांद्यावरी रुढींच्या जो वाहतो पखाली इतकाच अर्थ आता जगण्यास माणसाच्या येती कितीक येथे मशहूर रोज होती गझला अजून माझ्या आधीन काफियांच्या लुचतात स्वार्थ होउन 'हव्यास' माणसाला विरते सदैव निष्ठा गर्दीत गारद्यांच्या झिम्माड पावसाचे दिसते न दु:ख कोणा लपतो विरह नभाचा धारेत आसवांच्या माथ्यावरी सुखांचे ओझे 'विशाल' झाले आधार शोधतो मी समवेत वेदनांच्या विशाल...
काव्यरस

माझी इटलीची भ्रमणगाथा - भाग ५-रोम

लेखक अजया यांनी गुरुवार, 04/06/2015 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझी इटलीची भ्रमणगाथा: भाग १, भाग २, भाग ३, भाग ४ काप्री करून आमची सहल परत नेपल्स मुक्कामी आली तोवर रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती.परत ते "प" पासून नाव असणारे पदार्थ खायची जराही इच्छा नव्हती! म्हणून एखादे फळ खाऊन घेऊ ठरवून भोजनगृहात गेले तर तिथे म्हणे आज व्हरायटी आहे इटालियन जेवणाची.खाऊन तर बघा! म्हंटलं बघूया!

निकाल (शतशब्दकथा )

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 04/06/2015 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज धाव्वीचा निकाल लागला. श्यात्तर टक्के पडले. आबांनी पेडे वाटले . मला बरं वाटलं, निकालात नाव बरोबर छापलंय म्हणून ! ''स्मिता गजानन यादव'' दादाच्या पाठीवर मी झाली त्यवाबी आज्जीला पोरगाच पायजेल व्हता . पन मी झाली. माजीच चूक जनु ! आज्जी रडली. माज्यावरच चिडली. म्या तिला फशिवलं म्हनं . नाव ठ्येवलं फशीबाई ! समद्या पोरी हासायच्या शाळंत. * * * धाव्वी सुरु झाली, तशी गेली हेडसरांकडं ! म्हनलं, ''सर नाव बदलायचंय माजं - पन घरला सांगायचं नाय ! धाव्वीच्या निकालावर स्मिता नाव यायला पायजेल'' . मास्तर द्येवमानुस. त्येनला पटलं - बदलूया म्हणालं ! लगीच कुटंकुटं फोन क्येले आन अर्जावर सही घ्येतली.

जकार्ताच्या आठवणी : ९ : परत मातृभूमीला

लेखक आकाश खोत यांनी गुरुवार, 04/06/2015 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ शनिवारी आम्ही बांडुंगला जाउन आलो आणि रविवार मी खरेदी आणि सामान बांधणीसा