Skip to main content

आणि ............... श्री रुपनारायण !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 09/06/2015 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या रवीवारी पुन्हा एकदा कोकणवारीचा योग घडून आला. विशेष म्हणजे हा दौरा दोस्तांबरोबर होता, त्यामुळे रंगत अजुनच वाढली होती. निमित्त होते एका मित्राच्या आमंत्रणाचे. त्याच्या लाडक्या लेकीचा तिसरा वाढदिवस त्यामुळे तिच्या लाडक्या काका लोकांस आमंत्रण होते. नाहीतरी कोकणात जायला आम्ही निमीत्तच शोधत असतो. आताही पडत्या फळाची आज्ञा घेवून निघालो. श्रीवर्धनला त्याच्या घरी एक दिवस मुक्काम केला आणि दुसर्‍या दिवशी परत येताना पुन्हा एकदा दिवे आगारला भेट दिली. माझ्या मागील लेखावर मिपाकरांनी आवर्जून दिवेआगारच्या रुपनारायणाचे दर्शन घेतलेस का अशी विचारणा केली होती.

नाडी ग्रंथ भविष्य आणि नवग्रह शांती अर्थात कर्म महात्म्य भाग २

लेखक योगविवेक यांनी मंगळवार, 09/06/2015 16:42 या दिवशी प्रकाशित केले.

नाडी ग्रंथ भविष्य आणि नवग्रह शांती अर्थात कर्म महात्म्य भाग २

प्रा अद्वयानंद गळतगे

अशा रितीने ग्रहांचा मानवावर प्रभाव पडत नसेल तर नाडी ग्रंथात त्यांची शांती-पुजा करण्यास का सांगितले जाते? (वरील प्रश्नातील दुसरा मुद्दा ) त्या पूजेचा काय उपयोग? ( तिसरा मुद्दा) असे साहजिकच प्रश्न निर्माण होतात. येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की ब्रम्हविज्ञानानुसार ग्रहांची शांती-पुजा ही खरे तर त्या व्यक्तीची आपल्याच कर्मांची शांती पुजा असते. ग्रह हे त्या व्यक्तीच्या कर्मांची केवळ प्रतिके (symbols) आहेत. त्या प्रतिकांची शांती-पुजा म्हणजे त्या व्यक्तीची आपल्या कर्माची शांती-पुजा असते.

पुन्हा एकदा दमामि म्हणे …

लेखक दमामि यांनी मंगळवार, 09/06/2015 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
चर्चा उगा कशाला? (मी) भलताच "शाय" आहे विल्लू म्हणून गेला, नावात काय आहे …. कोणी म्हणे टका तर गिरिजा कुणास वाटे समजे सगाच कोणी, सूडात पाय आहे … चिमण्यास येई शंका, कोठून धूर येतो मृत्युंजयास वाटे बैलात गाय आहे… आत्मुस फक्त पडली चिंता दहा दिसांची जेपी करून गेला टेम्पोत "बाय" आहे…. नियमात नाही त्यांच्या तरी लावतात फास डुआयडिंवरी हा उलटाच न्याय आहे …. चुकलात यार तुम्ही , अंदाज फार झाले पूर्वी कधी न झाला (मी ) अज्ञात "भाय" आहे …
काव्यरस

वांग्याचे काप

लेखक टक्कू यांनी मंगळवार, 09/06/2015 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
अतिशय tasty असा हा वांग्याचा प्रकार. मुळात वांगे न आवडणा-यांना देखील आवडेल अशी ही recipe. अगदी पोळी बरोबर अथवा starter म्हणून नक्की hit आहे. साहित्य: १. एक लांबट जांभळे वांगे २. चणा डाळीचे पीठ ४ मोठे चमचे ३. हळद, तिखट, मीठ चवीनुसार ४. १ मोठा चमचा रवा कृती: १. प्रथम वांग्याचे मध्यम जाडीचे काप करावे. सुरीने अथवा काट्याने त्याला दोन्ही बाजूने टोचे मारावेत. २. एका ताटात चणा डाळीचे पीठ, रवा, हळद, तिखट, मीठ एकत्र करून घ्यावे. बेसन पीठ मध्ये १ मोठा चमचा रवा मिसळावा. त्यामुळे काप खुसखुशीत होतात. वांग्याचे काप या पिठात घोळवावेत. हाताने हलकासा दाब द्यावा जेणेकरून पीठ आतपर्यंत शिरेल. ३.

भावनेचा वेग

लेखक यल्लप्पा सट्वजी कोकणे यांनी मंगळवार, 09/06/2015 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनातल्या या चढ उतारात शोधतो फक्त जगण्याचा बहाणा नाते संबंध जपत असताना भावनेचा वेग किती जीव घेणा - यल्लप्पा सटवाजी कोकणे ०७ जून २०१५ ----------------------- धागा संपादित केला आहे

जगावेगळे... !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 09/06/2015 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
जगावेगळे मागणे मागतो मी तुझी याद नाही विसर मागतो मी स्मरावे तुला ना प्रभो मी कधीही तुझ्या दुश्मनांना शरण मागतो मी नको शाश्वती जीवनाची दयाळा हवे त्याच वेळी..; मरण मागतो मी किती आजवर मीच केलीत पापे नको श्वास आता, अभय मागतो मी इथे माजले धुर्त स्वार्थांध सारे जमावे मला वाकणे.., मागतो मी नुरे पात्रता रे तुला प्रार्थण्याची 'हरामीपणा' थोडका मागतो मी जगाला कळेना विनंत्या मनाच्या विषाचाच जहरीपणा मागतो मी कुणी ना म्हणावे पुरे रे 'विशाला'? जगावेगळ्या मागण्या मागतो मी ! विशाल..
काव्यरस

मला आवडलेले संगीतकार :- १. मदनमोहन

लेखक शशांक कोणो यांनी मंगळवार, 09/06/2015 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
संगीतकार madnmohn हिंदी चित्रपटसृष्टीला ज्या अनेक संगीतकारांनी सजविले त्या प्रत्येकाची शैली स्वतंत्र होती. मदनमोहन यांचे वेगळेपण अगदी ठळकपणे डोळ्यात भरते. मदनमोहन हे आर्मीमध्ये काही वर्षे सर्विस केल्यामुळे शिस्तप्रिय आणि अचूक कामासाठी प्रसिद्ध होते. गजलसम्राट म्हणून ते ओळखले जायचे. अनेक नितांतसुंदर अजरामर गाणी विशेषत गजल्स त्यांनी आपल्याला दिलीत. हिंदी चित्रपट गीते आवडत नाहीत असे म्हणणारा विरळाच. जसे मला आंबा आवडत नाही असे म्हणणारा असेल इतकी ही गाणी आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंग होऊन बसलेली असतात.

ती आणि मी

लेखक गरजू पाटिल. यांनी मंगळवार, 09/06/2015 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
(हे अगदी असं असायचं, म्हणून तसंच कवितेत लिहायचा प्रयत्न केलाय. ह्या सप्त्यातलं माझं भविष्य वाचलेलं असून देखील) तिच्या नी माझ्या एकच वाटा, फरक इतकाच... मी जायचा त्या वाटेने आणि ती यायची... आमच्या दिशा वेगळ्या होत्या. तिचे नी माझे थांबे ही एकच, फरक इतकाच...

आत्महत्या!

लेखक सटक यांनी मंगळवार, 09/06/2015 02:26 या दिवशी प्रकाशित केले.
आज तो येउन गेला. असे म्हणा ना की येण्याची नुसती वर्दी देउन गेला. आताशा तो असेच करतो, नुसते कळवतो आणि कित्येक दिवस मग तोन्ड्च दाखवत नाही. मग कित्येक दिवस मी नुसता तगमगत रहातो. तो आल्यावर काय करायचे याचे बेत डोक्यात घोळवत! पण त्याला सहसा सोयर-सुतक नसते त्याचे. तो ही काय करणार म्हणा...आज काल हवाच अशी वहाते की त्याचाही नाइलाज होत असणार. तो येणार म्हटले ना की खूप तरतरी असते पण....मी विचार करतो, आपण किती वेडे आहोत! तो काही आपल्याकरिता खचितच येत नाही. आपण आपले उगीच त्याला अवास्तव महत्व देउन त्याच्या आजुबजूला आपले जीवन जगत रहातो. मी मग निश्चय करतो, ह्या वेळी आपण तसे नाहीच वागायचे जसे नेहमी वागतो.

पावसात जळाया लागलो...

लेखक सतिश गावडे यांनी सोमवार, 08/06/2015 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: उभ्या पावसात जळायला लागलोय... चाल: तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं सोडून गेली रं मैना दोस्त टाळाया लागलो तुम्ही बोलवा फायरबंब पावसात जळाया लागलो आज काल दिस रात मला सुचंना कायी पार झालो देवदास आन्न पोटात जात न्हाई येईना हो झोप मला कुशीवर वळाया लागलो तुम्ही बोलवा फायरबंब पावसात जळाया लागलो कसं सांगू काय झालं खेळ खल्लास झाला उडवलेला पैसा सगळा आता वाया तो गेला पैलवान मी मर्द गडी आसू गाळाया लागलो तुम्ही बोलवा फायरबंब पावसात जळाया लागलो
काव्यरस