गोष्ट ४० तासांची
माणसाच्या जन्मापासूनच त्याचा प्रवास सुरु झालेला असतो. कधी तो शारीरिक असतो, कधी तो बौद्धिक असतो तर कधी मानसिक असतो. पण राणीचा प्रवास मात्र तिच्यासाठी धम्माल आणि तिच्या आईसाठी झोप उडवणारा ठरला.
राणी एक पंचविशीची बिनधास्त तरुणी. सेल्स आणि मार्केटिंग मध्ये असल्यामुळे थोडी रोकठोकच होती. तिच्या रोकठोकणामुळे पंचविशीच्या तरुणीच्या आईच्या मनात जी काळजी यायला हवी तीच तिच्या आई च्या मनात देखील यायला लागली होती, " हिचे सासरी कसे होणार?" त्यामुळे घरात साहजिकपणे कोणतेही शुभ कार्याचे आमंत्रण आले मग ते मुंज असो व लग्न कि त्याचे शेपूट राणीचे लग्न ह्या एकाच विषयाला जोडले जायचे.
मिसळपाव