Skip to main content

वाट

लेखक अनिल रामेश्वर लांडे यांनी बुधवार, 10/06/2015 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा लागली जीवाला, ओढ तुला टिपण्याची, साक्ष देईल प्रेमाची, भाषा ओल्या पापण्यांची. नाही हा भाव मनाचा द्वेष जरी हा डोळ्यांत, वाट पाहतो दारात पुन्हा घेण्यास घरात . चुका विसरुनी साऱ्या दुखं ठेवील पोटांत , मिरवीन चार-चौघात गोड बोलुनी ओठांत. फक्त विचारीन काय होती चुक माझ्या मागण्यांची, शिक्षा दिली एवढी दिशा पांगण्यांची. केले केव्हाच माफ सख्या आता आहे तुझी पाळी, फक्त वाट त्या क्षणाची केव्हां चुकवशील हि उधारी. @अनिल …

देवलसीकर्मकांडिपणा : माझे विचार

लेखक संदीप डांगे यांनी बुधवार, 10/06/2015 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
अत्रुप्त यांच्या ह्या धाग्यावरील प्रतिसादांतून सुचलेलं पण बराच काळ मनात साचलेलं...
देवलसीकर्मकांडिपणा >> म्हणजे जगातील कुठल्याही प्रकारच्या अज्ञाताला शरण जाण्याची निसर्गदत्त मूलभूत प्रवृत्ति. धर्मात ती देवाप्रधान कर्मकांडात्मक असते,आणि अधर्मात निधर्मात कुठल्याही गोष्टी अथवा गृहितकांवरचि संपूर्ण शरणागत अंधनिष्ठा असते. दोन्हीकडे कर्मकांडां सारखं काहीतरी करून समाधान/फ़ायदा/फलप्राप्ति मिळवण्याचि प्रवृत्ति असते. तिलाच मी या शब्दसंहतित कोंडलं आहे.

सांधण दरीतील थरार

लेखक बज्जु यांनी बुधवार, 10/06/2015 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी संध्याकाळी नाक्यावर बसलो असताना अचानक सांधण दरी चा विषय निघाला आणि जायच असेल तर आताच गेलं पाहिजे नंतर पाऊस लागला कि पुढच्या वर्षी शिवाय जायला जमणार नाही, दरीत काही ठिकाणी छातीभर पाणि असतं वगैरे वगैरे चर्चा झाल्या आणि उद्याच म्हणजे रविवारी पहाटे निघायचं ठरलं. एक दिवसात सामरद मार्गे पुर्ण सांधण दरी उतरून पुन्हा सामरदला येउन मग घरी एव्हढ सगळं करायचं तर पहाटे लवकर निघ्ण्याशिवाय पर्याय न्हवता. पहाटे ४.३० ला मी, सुजीत, गिरीष आणि भूषण, भूषणच्या गाडीतून निघालो, म्हणजे मोटारच्या यंत्राचा आवाज पहाटे ४.३० ला चालु झाला. ठाणे ते सामरद अंतर साधारण १७० कि.मी.

माझी केरळ आणि तामिळनाडु सहल भाग-२

लेखक प्रमोद देर्देकर यांनी बुधवार, 10/06/2015 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ मागील भागात :- तेव्हा कळले की याच मरिन ड्राईव्हला जावुन तिथुन बोटीने शिपयार्ड, डचपॅलेस, पाहुन संध्याकाळी मुन्नारसाठी रवाना व्हायचे आहे. अशा रितीने पहिला दिवस पार पडला.>>>>> मग सकाळी ८.०० वाजता सर्वांना कालच्या मरिन ड्राईव्हवर घेवुन गेले. तिथे एक बोट उभी होती. माणशी काहीतरी रुपये १५०/- घेतले. त्या बोटीत वरच्या डेकवर एकंदर १०० खुर्च्या होत्या त्यावर स्थानापन्न झालो. आता आमच्या व्यतिरिक्त तिथे अजुन दुसरा तामिळनाडुचा एक मोठा २० लोकांचा ग्रुप होता. तर इतरही काही लोक होते.

गाणं बघणं 

लेखक शेखर काळे यांनी बुधवार, 10/06/2015 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका ज्येष्ठ मित्रांनी प्रश्न केला की गाणं प्रत्यक्ष ऐकतांना जास्त का भावतं, किंवा जास्तं भावावं का ? जर मी तेच गाणं तबकडीवर किंवा कुठल्या ध्वनिक्षेपकावरून ऐकलं आणि तेच गाणं प्रत्यक्ष गायकाला गाताना ऐकलं तर ते श्रोत्याला वेगळं आवडेल का ? प्रत्यक्ष गाण्याचा परिणाम अधिक चांगला का वाटतो ? गाणार्याला श्रोत्याला समोर बघून अधिक चांगले गायचा हुरूप येतो का ? की श्रोत्यालाच द्रुक-श्राव्य असे दोन्ही तर्हेने ते गाणी अधिक भावते ? केवळ स्वरांतून श्रवण-जादू निर्माण करायला फार कमी लोकांना जमते.

कोकण की विदर्भ?

लेखक सचिन७३८ यांनी बुधवार, 10/06/2015 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या सुट्टया चालू असल्यामुळे मित्रांसोबत फिरायला जाण्याचा बेत आखत आहे. १३ जून ते १९ जून या कालावाधीत. मग कोकणात जाणे योग्य ठरेल कि विदर्भात? कारण पावसाळा चालू आहे आणि दोन्ही ठिकाणाकडील सद्यस्थितीतील हवामानाची माहिती मला नाही. जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

ये दोस्ती ......

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 09/06/2015 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
( १८ एप्रिल २०१५ रोजी या http://www.bbc.co.uk/news/blogs-ouch-32325809 संकेत स्थळावर दोन मित्रांची एक प्रेरणादायी कहाणी वाचनात आली. तिचे मराठी कथेत रुपांतर करताना, केवळ आणि केवळ एकच हेतू मनात आहे – लिहिणाऱ्या/वाचणाऱ्या सर्वांनी ‘एक तरी झाड लावावे, जगवावे, वाचवावे!’ ) हेग्झिया आणि वेंकी. उत्तर चीन मधील येली या छोट्याशा खेड्यातील दोन शाळूमित्र. दोघांत एखाद वर्षाचा फरक. पाठच्या भावंडासारखे सोबत वाढले. हसले. खेळले. ..... आणि दोघांच्या वाट्याला आलेले दुर्दैव आणि त्यावर केलेली मातही जगावेगळी! ..... ........

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४७

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 09/06/2015 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. त्या माऊलीला तर अगदी अत्यंतिक आनंद झाला. आणि चहा झाल्यावर मला निघताना.. तिनी, "तिकडे गेलात की फोन करा हो न विसरता. मला माझ्या मुलिशी बोलायचय..!" असं अतिशय जिव्हाळ्यानी म्हणाली. मी मनातून प्रथम ह्या दोघिंच्या नात्याला नमस्कार केला. आणि त्यांनाही नमस्कार करून.. गावाची वाट धरली.......... पुढे चालू... ======================= शेवटी एकदाचा स्वारगेटाहून सकाळी नवाला सुटलेल्या त्या रणरणंत्या एस्टीनी..निघता जाहलो.आणि तिकडे स्टँडवर उतरल्यानंतर डायरेक हिच्या घरी जाऊन थडकलो.

आळी मिळी गुप चिळी!

लेखक सटक यांनी मंगळवार, 09/06/2015 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
आळी मिळी गुप चिळी! तू पेटव चिता, त्यावर मी भाजतो पोळी.. आळी मिळी गुप चिळी! तू शोध साधू, त्याना मी देतो सुळी.. आळी मिळी गुप चिळी! तू बनव शत्रू, त्याना मी देतो हाळी.. आळी मिळी गुप चिळी! तू लागल्यासारखे कर, मी ठोकतो आरोळी.. आळी मिळी गुप चिळी! अर्धे शतक माझे आता आली तुझी खेळी.. आळी मिळी गुप चिळी! मी नागवलेच आहे, आता तू फेडशील ती वेगळी..

वडा पाव रे........!!!

लेखक गोल्या यांनी मंगळवार, 09/06/2015 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
ती म्हणे : प्रत्येक जन्मी हाच नवरा मिळावा तो म्हणे : देवा , नविन चॉइस तरी कळावा.....!! ती म्हणे : बरा असतो एकच एक गडी माहीत होऊन गेलेल्या सार्या त्याच्या खोडी .....!! तो म्हणे : चांगली असे अंबाड्या ची भाजी तरीही खावी वाटे कधी तरी कांदाभजी ....!! नाठाळाला वठणी वर आणावयाचा त्रास हरेक जन्मात वाचेल बाई आमचा तो ख़ास....!! ताटाखालचे मांजर मी होणार असेल तर होवू दे प्रत्येक जन्मात देवा ताट तरी नविन दे ....!! जायचे तर जा नाथा नाजुक धागे तोडून हात तिने जोडले डोळे आले भरुन ....!! इथ
काव्यरस