Skip to main content

एका कोळियाने

लेखक आकाश खोत यांनी मंगळवार, 16/06/2015 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
आज पार्किंगमधून माझी मोटरसायकल काढायला गेलो, आणि तिथे मला माझी गाडी, एका बाजूची गाडी आणि दुसऱ्या बाजूचा खांब या सगळ्याचा आधार घेऊन कोळ्याने विणलेलं बरंच मोठं जाळं दिसलं. सकाळच्या उन्हात त्या जाळ्याच्या रेषा छान चमकत होत्या. फोटो काढावा असंच दृश्य होतं. पण मी घाईत होतो. एका बाजूला हाताने जाळे साफ करत मी गाडीपर्यंत पोचून गाडीवर बसलो. आणखी हात फिरवून थोडं चेहऱ्यावर आलेलं जाळं काढलं. गाडी काढताना उरलंसुरलं जाळं संपलं. मला थोडं वाईट वाटलं.

सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 16/06/2015 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! लदाख़! भारताचा विलक्षण रमणीय प्रदेश! वस्तुत: ते एक ठिकाण किंवा पर्यटन स्थळ नसून एक अद्भुत जगत् आहे! लदाख़ असे जग आहे ज्यामध्ये बर्फाच्छादित पर्वत, नद्या, धबधबे, जंगल, दंग करणारे सरोवर, वाळवंट हे सर्व आहे! जणू लदाख़ एक युनिव्हर्स आहे ज्यामध्ये ह्या सर्व गोष्टी एकत्र बघता येतात. चार वर्षांपूर्वी पहिल्यांदा जेव्हा ह्या विश्वाचा थोडा आस्वाद घेतला होता, तेव्हापासून इथे परत येण्याची तीव्र ऊर्मी होती. त्यानंतर जेव्हापासून विलक्षण भारतीय ट्रेकर आणि साहसी प्रवासी नीरज जाटचा लदाख़ सायकल प्रवास वाचला, तेव्हापासून मनाशी ठरवलं की, लदाख़ला सायकलवरूनच जायचं.

पाऊस .. तेव्हाचा

लेखक गोल्या यांनी मंगळवार, 16/06/2015 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
खर्‍याखुर्‍या प्रेमासारखा पाऊस तेव्हा दाटायचा बरोब्बर सात जूनला येवून तो भेटायचा....!! अडचणी होत्या चिकार सर्व दूर करायचा, मन हुरहुरलं की हात तो धरायचा ....!! तेव्हाचा पाऊस खरा खरा पाऊस वाटायचा, प्रत्येकाच्या आठवांत घर तो थाटायचा ....!! लहान, थोर, वडीलधारे आदर तो राखायचा, सार्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद तो माखायचा....!! रसायन, फवारे वगैरे लाडावलेला नसायचा, येरे येरे पावसाच्या गाण्यालाही फसायचा....!!!!
काव्यरस

थांबव लपंडाव तुझा रे पावसा

लेखक यल्लप्पा सट्वजी कोकणे यांनी मंगळवार, 16/06/2015 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
थांबव लपंडाव तुझा रे पावसा! घे आता तु मनसोक्त बरसुनी. आतुर झाली धरती सजण्यास, जा हीरवा शालू तिला पांघरूनी. यल्लप्पा सटवाजी कोकणे ११ जून २०१५

जाणवतो तुझा सहवास

लेखक यल्लप्पा सट्वजी कोकणे यांनी मंगळवार, 16/06/2015 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
छबी नजरेसमोर तुझी येते पावसाच्या सरी कोसळताना जाणवतो तुझा सहवास पावसाच्या सरी झेलताना यल्लप्पा सटवाजी कोकणे ११ जुन २०१५

उत्तरदायकत्वास नकार (माहितगारकृत)

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 16/06/2015 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार मिसळपाव संकेतस्थळ हे एक येथे नमुद धोरणांच्या परिघात सामुदायिक लेखन वाचन सहभागास अनुमती देणारे खाजगी मालकीचे संकेतस्थळ आहे. सदर संकेतस्थळाने दिलेल्या नियमांच्या चौकटीच्या मर्यादा सांभाळून संगणक वापरणार्‍या व आंतरजाल जोडणी उपलब्ध असलेल्या कुणालाही लेख धागे काढता येतील प्रतिसाद देता येतील अशी या संकेतस्थळाची रचना आहे. माझे या संकेतस्थळावरील लेखन मुख्यत्वे हौशी लेखन असून ज्या धागालेखांवर प्रताधिकार मुक्ततेची सुस्पष्ट सूचना दिलेली नाही ते लेखन प्रताधिकारीत समजावे.

तू एक विश्वकर्मा

लेखक Sanjay Uwach यांनी मंगळवार, 16/06/2015 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
आई मला लहानपणी मांडीवर घेऊन थापटायची. मी तिचा पदर अंगभर पांघरून घ्यायचो. तिच्या पदरात जगातील मी फारच सुरक्षित व्यक्ती आहे, असे मला वाटायचे. ती मला प्रेमाने विचारीत असे, 'तू मोठेपणी कोण होणार ?' माझे मात्र उत्तर ठरलेलं, 'सुतारमामा!' मग मात्र तिचा माझ्या तोंडावर, नाकावर थोपटण्याचा वेग वाढायचा. "जळलं मेलं तुझं लक्षण! परत अस कुणाला सांगू नकोस," असं ती म्हणायची. मला मात्र याचे कधीच वाईट वाटले नाही. माणसाला ज्या गोष्टी कराव्याश्या वाटतात त्या त्याने मनसोक्तपणे कराव्यात. लहानपणी सुतार व्यवसायाचे मला खूपच आकर्षण होते.

मी होतो किनारा.................

लेखक झंडुबाम यांनी सोमवार, 15/06/2015 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
मी होतो किनारा आणि ती होती उधाणलेली लाट थांबवावं वाटलं खूप तरी निसटून जायची स्पर्श करून . येताना यायची धावत,खळखळत अल्लड मुलासारखी जाताना जायची माझ्याजवळ आठवणींचे शिंपले सोडून तिचं येणं ,कधी अलगद कधी बेभान होऊन आदळणं झिजवत होतं मला कणकण जाणीव करून देत होतं काय ठेवलय वाढून आता उरलोय कणाकणातून , अंगावर घेऊन भरावाची ओझी आठवणींचे मोती घेऊन उरलोय तळाशी तिच्या परत येण्याची आशा घेऊन …………

थोड्ड्स्स्स्स्सं खोटं...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 15/06/2015 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
थोड्ड्स्स्स्स्सं खोटं लागतच मला तंबाखुतल्या चुन्या इतकं त्याच्याशिवाय मेली खर्‍याला कीकच येत नाही,हवी तशी.! मी लै चांगला आहे, हे जनात. आणि मनात??? मायला..., कुठंतरी थोडा वाइटंहि आहे की! हे उत्तर ठरलेलं! भरपूर खय्रा बरोबर खोट्याचा सूड काढायला येणारं. देव? धर्म?? आध्यात्म??? छ्या! छ्या! आपुन येकदम विज्ञाननिष्ठ! हो का?????? मग मन दमून गेल्यावर ,अजूनही "अरे रामा...पांडुरंगा तूच आहेस रे बाबा!" हे कसं येतय बरं अजुन तोंडातून ! ( मनात काहीही असलं तरी! ) शाळेतले जुने मित्र भेटतात. काही जुने चष्मे असलेले! काही नवे धारण केलेले!
काव्यरस

आठवणींचा पाऊस

लेखक पुजा क यांनी सोमवार, 15/06/2015 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल पाऊस म्हणलं की प्रत्येकाच्या मनात, डोक्यात पहिली येणारी गोष्ट म्हणजे आवकाळी …. :) मग तो फायद्या साठी आलेला असू की तोट्यासाठी .प्रत्येकजण आपल्याला जमेल तसा आनंद घेतो, तर काहीजण दुःखाच्या जगात सामाऊन जातात. तर काहीजणांना काहीच फरक पडत नाही ,जणू त्यांचे आयुष्य त्यावर आवलंबूनच नाही असे . तसचं आठवणीचं असत. यांना ना वेळ न काळ… आवकाळी कधीही मनात घर करून जातात. मग त्या काहीजणांनसाठी सुखाच्या असतात तर काहीजणांना साठी दुःखाच्या.प्रत्येकजण आपापल्या आठवणीच्या घरात सामाऊन जातो . प्रत्येकाच्या जगण्याला अर्थ देणारी आठवण असतेच..