रात्र-कोजागरीच्या निमित्ताने
कोजागरीच्या रात्री जागायचं लहानपणी खूप अप्रूप होतं. 'को जागर्ति' म्हणत देवी आली आणि मी झोपलेली असले तर कसं चालेल, असा माझ्या दृष्टीने बिनतोड प्रश्न बाबांसमोर केलेला आठवतो. 'मी खात्री पटवून देईन तिची तू झोपलेली असलीस तरी जागीच आहेस याची' हे तेवढंच बिनतोड उत्तर पेंगुळलेल्या डोळ्यांनी ऐकताना खरं वाटणारच! पुढे वर्षातून एकदा जागवायची रात्र रोजचीच होऊन गेली, तेव्हा रात्रीचं खरंखुरं रूप कळायला लागलं..
घरी असले, की रात्रीत निरनिराळे आवाज पावसाळ्यात येतातच, पण पावसाळा संपला की रातकिडे किरकिर करू लागतात. कित्येकदा घरच्या फोनवर रातकिड्यांचा आवाज ऐकू येतो आणि खूप शांत वाटतं.
मिसळपाव