वाया जाण्याच्या आधीच्या गोष्टी
असं काय आहे की जे करण्यासारखं असतं, हा एक
प्रश्न त्याच्यापुढे आता असतो. आता असले प्रश्न
पडायला वाव आहे, म्हणजे त्याची परिस्थिती बरी
असणार, हे ओघाने आलेच समजा.
पण तेव्हा ती तशी नव्हती.
ती संध्याकाळची कातर वेळ होती. सूर्य अस्ताला
गेला होता. आकाश तांबूस लालसर छटांनी व्यापलं
होतं. पक्षी आपापल्या घरट्यांकडे निघाले होते.
अशा वेळी तो त्याच्या शैक्षणिक कारकीर्दीच्या एका
नव्या उंबरठ्यावर उभा होता. त्यामुळे त्याच्या मनात
एक प्रकारची हुरहूर दाटून आली होती.
कसं असेल हे नवीन गाव? कॉलेज कसं असेल? तारूण्याच्या वाटेवरचा आपला प्रवास कसा होईल?
नवीन मित्र चांगले मिळतील का?
मिसळपाव