Skip to main content

बाळूकाकांचं गाई-वासरातलं वास्तव्य.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 08/09/2015 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
“पहाटे खळ्यात पडलेला पौर्णिमेच्या मावळत्या चंद्राचा लख्ख प्रकाश पाहून माझा थकवा पार निघून गेला.” आज बर्‍याच दिवसानी मी माझ्या आजोळी गेलो होतो.आता आमच्या वयाचे लोक बरेच कमी झालेले दिसत होते.सहजच हिंडत मी आमच्या शेजार्‍यांकडे गेलो होतो.त्यांच्या कडून कळलं की,बाळूकाका,आमचे दुसरे शेजारी, अजून हयात आहेत.ते हल्ली जास्त हिंडत फिरत नाहीत.त्यांच्या घरी गेल्यावर ते मला खचित भेटतील असं समजून मी त्यांच्या घरी गेलो होतो.कुतूहल म्हणून मी बाळूकाकाना भेटायला गेलो.

बंधन बँक

लेखक सतिश गावडे यांनी सोमवार, 07/09/2015 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला आयुष्यात केव्हा ना केव्हा आर्थिक मदतीची गरज भासते. काही वेळा आपण ही मदत नातेवाईकांकडून किंवा मित्रांकडून घेतो तर काही वेळा कर्ज पुरवठा करणा-या वित्त संस्थांकडून. जर आर्थिक साहाय्याची मागणी करणारी व्यक्ती सधन वर्तुळातील असेल किंवा पगारदार नोकर असेल किंवा त्या व्यक्तीचा चांगले उत्पन्न असणारा व्यवसाय असेल तर आर्थिक मदत मिळण्यास शक्यतो अडचण येत नाही. मात्र ही व्यक्ती जर का आर्थिकदृष्टया कनिष्ठ स्तरातील असेल किंवा जर गरीब असेल तर मात्र अशी मदत मिळण्याची शक्यता खूपच कमी असते. बरेचदा नातेवाईकही या व्यक्तीसारखेच गरीब असतात. वित्त संस्था परतीची हमी नसल्याने कर्ज देत नाहीत.

सकाळ - त्यांच्या नजरेतुन

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 07/09/2015 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
(थोडा वेगळा प्रयोग करायचा प्रयत्न करतोय, गोड मानुन घ्या. चु.भु.द्या.घ्या) ललित- सकाळची कोवळी किरणे हळुचकन अंगाला चिटकली. नयनरम्य स्वप्नांचे बाण इंद्रधनुष्य ऊधळत गेले. किलकिल्या डोळ्यांना खिडकीबाहेरची हिरवाई खुणावत होती. ऊफाळत्या चहाचा कप घेऊन सौभाग्यवती बाजुलाच ऊभी होती. टक्क जागा झालो. ग्राम्य- रामाधरमाच्या पाऱ्याला आंग घाम्याजलं हुतं. उनाचं कवुडसं डोळ्यावर आलं. मक्याची कणसं छटायला खळ्यावर जावं लागणार.

अन्नदाता सुखी भव भाग २ - डॉ नॉर्मन बोरलॉग, डॉ स्वामिनाथन आणि इतर चेले

लेखक शेखरमोघे यांनी सोमवार, 07/09/2015 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
अन्नदाता सुखी भव भाग १ - PL 480 (मागील भागाच्या सुरवातीला थोडीशी छपाईची गल्लत झाल्याने "अन्न दाता सुखी भव" या नंतर दिसणारा विसर्ग असा दिला गेला की "भव" हा शब्द "…सुखी भव : भाग १" असा दिसण्याऐवजी "…. सुखी भवः भाग १" असा दिसत होता. त्यांत आता योग्य ती सुधारणा केली आहे. सध्याच्या काळांत संस्कृत भाषेचा असा अजाणता देखील केलेला चुकीचा वापर अक्षम्य ठरेल. तरीही क्षमस्व!) काळाच्या गरजेनुसार लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती हे उत्सव सुरू केले. हे उत्सव लोकांना एकत्र जमवून जनजागृती करण्याकरता केंद्र बिंदू ठरावेत हे अपेक्षा होती.

हरल्या आशांनी बघतो, तू मंत्री आगळा नाही

लेखक माहितगार यांनी सोमवार, 07/09/2015 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा आणि प्रेरणा जणू खिशांत नागर मर्जी, जग माझिया वाणीवरती पण अवखळ नागरवासी, मज संत म्हणाले नाही ....... किती काळ उलटला मंत्र्या, नित नवीन म्हणशी तूही ....... जरी रूप पालटले तुही, तू मंत्री आगळा नाही मी परतून आलो तरीही, माझे ना सरले काही दमलो मी घेऊन माला, मज संत म्हटले नाही ....... समजता मोल खातीचे आलेला परतून जाई .......

बनलो असतो दादा, मज साहेब भेटला नाही

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 07/09/2015 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा सांगायलाच पाहिजे का? चहु दिशांत असे दु:कीर्ती, महाराष्ट्र टाचे खालती, तो , बारामती रहीवासी, मज साहेब भेटला नाही ....... किती निवडणुका झाल्या येड्या , निवडूनी येई परी हाची, ....... जरी मतदारसंघ बदलले त्याचे, तो साहेब पडला नाही तो परतून आला राज्यात, भुक न संपली त्याची जाहले अनेक घोटाळे , पण साहेब अडकला नाही ....... उमगता मोल जीवाचे, गेलेला झक मारत येई .......

दुष्काळवाडा भाग ८ इन्फ्रास्ट्रक्चरच्या कचाट्यात शेती

लेखक pradnya deshpande यांनी सोमवार, 07/09/2015 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
इन्फ्रास्ट्रक्चरच्या कचाट्यात शेती शेती मोठी धरणे, कालवे आणि प्रक्रिया उद्योगाच्या चर्चा कायम जोरात सुरु असतात. यांच्या होण्याने शेतकऱ्यांना लाभ होईल आणि त्यांचे प्रश्न चुटकीसरशी सुटतील अशी आशा जागवली जाते. तथापी मराठवाड्यातील शेतीला गरज आहे ती छोट्या छोट्या पायाभूत सुविधांची.

या पाच गोष्टी रोज सकाळी कराव्यात!

लेखक दमामि यांनी सोमवार, 07/09/2015 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
१ रोज सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा डोळे उघडावेत. यामुळे झोप निघून जाण्यास फायदा होतो. 2 नंतर चेहरा धुवावा. त्यामुळे ताजेतवाने वाटते. ३ यानंतर दात घासावेत. टुथपेस्ट आणि ब्रशने घासले तर फारच उत्तम, पण ते नसल्यास मीठ, हळद, लिंबू, कोळसा यापैकी काहिही वापरले तरी चालेल. मुख आरोग्यास लाभदायक असते. ४ यानंतर शौचास जाऊन यावे. कुणा थोर व्यक्तीने (म्हणजे मीच ) म्हटल्याप्रमाणे "पोट साफ तर मन साफ) ५ आणि नंतर पेला भरून वाफाळता चहा घ्यावा. या पाच गोष्टी नित्य नियमाने केल्यास दिवस चांगला जातो.

Silence used to grow around him....

लेखक मारवा यांनी सोमवार, 07/09/2015 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
1 कवी रायनर मारीया रिल्के ची पहीली भेट झाली कवी ग्रेस यांच्या ललित लेखनाच्या वाचनांतुन. तेव्हापासुन त्याच आकर्षण वाटु लागलं, त्याच्या काही कविता मिळवुन वाचल्या पण पहिल्या वाचनातुन काहीच गवसलं नाही, सर्व डोक्यावरुन गेलं.

भाजेलेणी कट्टा चित्रकथा थोडक्यात

लेखक कंजूस यांनी सोमवार, 07/09/2015 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
भाजेलेणी कट्टा-(६ सप्टेंबर २०१५ ). १)नादखुळा यांच्या रथाजवळ- डावीकडून -सौ• मुवि,सुधांशु नूलकर,वरद आणि बाबा नादखुळा,मुवि आणि आपले नम्र सुहास्यवदन प्रचेतस.फोटोत नसलेले कॅमर्यामागे कंजूस,काही अगत्याच्या कामावर बाहेर गेलेले धन्या उर्फ सगा. २) एक पुरावा म्हणून - ३)शिल्पांचं काय आहे--- प्रचेतस मुविंना सांगताहेत- ४)२०१५ मध्ये सुधांशु नूलकर भाजे च