महामाया निळावंती
लेखक-सुमेध
दोन वर्षांत २५ वी आवृत्ती प्रकाशित झालेली ही मराठी साहित्यातील आताची उत्कृष्ट कादंबरी आहे.
जीवनाची लालसा मृत्यूला हरवायला पाहते.
आधी रापचीक,
आता लवचिक,
सत्ते साठी विक,
पक्ष निष्ठा ||
आधी ताताथय्या,
काढ एकमेक मैया,
आता एक शय्या,
विरोधकांशी ||
सर्व पक्षांची भेळ,
ना कुणाचा मेळ,
आकड्यांचा खेळ,
खुर्ची साठी ||
पक्षफुटी ची भीती,
अनीती हीच रीती,
समर्थन शब्द किती,
बुडबुडे ||
खडकवाडीची वस्ती गावाच्या बाहेर नव्हती.
ती गावातच होती—पण जिथे रस्ता अचानक अरुंद होतो, तिथे, एका अदृश्य रेषेच्या पलीकडे.
इथे सकाळ कोंबड्याच्या आरवण्याने सुरू न होता रिकाम्या हंड्यांच्या आवाजाने होत असे. भांडी एकमेकांवर आपटल्यासारखा आवाज हा पाणी भरण्याचा नव्हे, तर दिवस सुरू झाल्याची खूण देणारा होता.
वस्तीकरता एक हौद आणि गावासाठी एक विहीर—अशी पिढ्यान्पिढ्यांची रचना होती. ती आता इतकी सवयीची झाली होती की कुणालाच ती प्रश्न वाटत नव्हती.
लक्ष्मी रोज पहाटे चारला उठायची. घरात पाणी उरलं नसेल, तर तिला राग येत नसे. राग करण्याची सवयच नव्हती. हंडे आतून धुऊन ठेवायचे.
निष्काम कर्मयोग: आत्ममुक्तीचा मार्ग की शोषणाचा सुसंस्कृत मुखवटा?
-राजीव उपाध्ये
भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरेत काही संकल्पना इतक्या तेजस्वी वाटतात की त्या ऐकतानाच मन आपोआप नम्र होतं.
“निष्काम कर्मयोग” ही त्यातलीच एक. फलाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे, कर्तव्यनिष्ठ राहणे, अहंकार कमी करून समत्वाने जगणे—हे सगळं ऐकायला जितकं सुंदर आहे, तितकंच ते वास्तवात गुंतागुंतीचं आणि कधी कधी धोकादायकही ठरू शकतं. कारण कोणतीही उच्च किंवा आकर्षक कल्पना जेव्हा समाजाच्या असमान रचनेत उतरते, तेव्हा तिचं रूपांतर “आत्मविकासा"तून “सत्तेचं साधन” होण्यात वेळ लागत नाही.
उत्कट, उत्स्फूर्त हे शब्द आणि या भावना आपण विसरत चाललोय का? अनंताची अगाध ओढ असणाऱ्या आपल्या जीवांना सगळं मिळमिळीत का आवडू लागलंय? पाण्याने बोजड झालेले अवाढव्य ढग एकमेकांना घासावेत असं गडगडाटी हास्य कुठे कोसळून कायमचं संपलं? बांध फुटल्यासारखे रडणारे डोळे आता कुठे आहेत? कुठल्या वाळवंटात गडप झाले? चहूकडे फक्त कोरडे डोळे दिसतात - खाली माना घातलेले; लाजेने! वर तरी कुणाकडे पाहतील? सगळ्याच माना खाली असतात. हनुमानाने भक्तीचा पुरावा दाखवायला स्वतःची छाती फाडली होती म्हणतात. इथे स्वतःचा हात स्वतःच्या छातीवर ठेवला तरी ऊर दडपायला होतं. अंत्ययात्राही निघत नाहीत राव आता. प्रेताकडे टक लावून पाहता यायचं.
जायचेच होते दूर तर केलीस सलगी कशासाठी?
वाजवलीस अंगावर शहाऱ्यांची हलगी कशासाठी?
शेवटचे बोल मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या,
नकार देण्याआधी करतेस दिल्लगी कशासाठी?
जायचे होते माझ्या लाडीला घेऊन सासरवाडीला,
स्वप्नकोंबड्यांवर टाकलीस तू डालगी कशासाठी?
फुटक्या तोंडास या, तेरे गली में बघती राठ बाया ,
दगड व्ह्यायचे सोडून झालीस तू मुलगी कशासाठी?
प्रेरणा : https://youtu.be/XfivqjQzu8Y?si=K7ZmBaWFo6e86hDc
मूळ थोर लिरिक्ष :
बोल मै हलगी बजावू क्या
ए माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं
कोण कोण नाचणार ?
बदललो कधी ना समाजाप्रमाणे
सदा वागलो मी मनाच्याप्रमाणे
कसा मार्ग चुकला कळेना कुणाला
जरी चालले ते गुगलच्याप्रमाणे
स्वतःची बनावी इथे खास ओळख
कशाला लिहावे कुणाच्याप्रमाणे
खरे सांग मित्रा, असा वागला तू
कशाला कुणाच्या इशाऱ्याप्रमाणे
उगा भावना का दुखाव्या कुणाच्या
कला पाहिली जर कलेच्याप्रमाणे
लिहाया हवे आणखी चांगले तुज
हवी दाद जर का पुण्याच्याप्रमाणे
बराच वेळ वाट पाहून अखेर युधिष्ठिर आपल्या भावंडांना शोधायला निघाला. दूर-दूर पसरलेल्या वाळवंटात एकही वृक्ष दिसत नव्हता. सूर्य आग ओकत होता. तहानेने त्याचा गळा कोरडा पडला होता. अखेर त्याला वाळवंटात दूर एक सरोवर दिसले. "आता पाणी मिळेल, तहान भागेल," या आशेने तो त्वरित सरोवराजवळ पोहोचला.
पाहतो काय, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव सरोवराच्या काठावर निष्प्राण पडलेले! हे दृश्य पाहून युधिष्ठिर व्यथित झाला. त्रिलोक विजयी भीम आणि अर्जुनाची अशी अवस्था कुणी केली असावी? बहुतेक सरोवराचा रक्षक यक्ष असावा.
२०२५ च्या दिवाळी अंकासाठी AI ही थीम ठेवावी अशी सूचना पुढे आल्यावर 'टीम दिवाळी अंक' च्या सदस्यांपैकी माझ्यासहित अनेकांच्या हृदयात एक बारीकशी कळ आली होती.