Skip to main content

सरदार दिठेरीकरांची गढी ----- भाग २ ----- कथा ------ काल्पनीक

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 22/05/2016 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
सरदार दिठेरीकरांची गढी ---- भाग १ ---- कथा ---- काल्पनीक सरदार दिठेरीकरांची गढी - भाग २ ----- कथा ------ काल्पनीक -- पुढे चालु --- एक झोकदार वळण घेउन बस गढीच्या मुख्य दारापाशी येउन थांबली . बाहेरुन दिसणारी गढीची भव्य तटबंदी पाहुन सर्व प्रवाशांची उत्सुकता चाळवली गेली . गढीचा मुख्य दरवाजाही चांगलाच भव्य , बुलंद दिसत होता . "चला मंडळी . आपले मुक्कामाचे ठिकाण आले . सरदार दिठेरीकरांची गढी ." कारेकरांनी सुचना दिली . सर्व प्रवासी लगबगीने खाली उतरले .

चालवायचंच म्हटलं तर...

लेखक जव्हेरगंज यांनी शनिवार, 21/05/2016 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
चालवायचंच म्हटलं तर अगदी काहीही चालतं चालून बिघडोस्तोर सगळंच चालवलं जातं चालून चालून बिघडल्यावर मात्र चालण्यासारखं काहीच नसतं बिघडवायला काय हो अगदी काहीही चालतं बिघडून पुन्हा चालनं मात्र चालण्यासारखं नसतं

दिवेआगार / मोडलेली कंबर / दोन निर्मनुष्य समुद्रकिनारे

लेखक बाबा योगिराज यांनी शनिवार, 21/05/2016 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक २२ जानेवारी २०१६ रात्रीचे सव्वा दहा वाजलेत, केदार, श्रीहास, अमोल आणि विशाल पुण्याला पोहचत आहेत. मी सुद्धा दुकान वाढवून घरी पोहोचलोय. इतक्यात केदारचा फोन आलेला, केडी :- निघालास का रे? मी :- आत्ताच घरी पोहोचलोय, जेवनार आणि निघणार. आणि .......... धप्प. धडाम. केडी :- का रे कसला आवाज येतोय? मी :- काही नाही. बारा वाजता निघेन, सकाळी ६ वाजेच्या आसपास शिवाजीनगरला घ्यायला या. फोन बंद. च्यामारी असा कसा पडलो? दिवे लावून बघितल, पायात मोज़े आणि गुळगुळीत फरशीवर पडलेल्या कपड्या वरुण पाय सटकला आणि जोरात पडलो. ठीक आहे, पडलो आणि उठलो. काय झाल?

त्या मंतरलेल्या रात्री होत्या...

लेखक महामाया यांनी शनिवार, 21/05/2016 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
त्या मंतरलेल्या रात्री होत्या... काय सांगता राव...! हो, त्या मंतरलेल्या रात्री होत्या. कारण रात्रभर समोर हालीवुडचा भूतकाळ आपल्या शाही लवाजम्यासह घरातील ड्राइंगरूम मधे थाटामाटात अवतरित होत असे.

....तेव्हा तू मला फार फार आवडतेस....प्रवास ५

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शनिवार, 21/05/2016 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
....तेव्हा तू मला फार फार आवडतेस....प्रवास ५ अशाच एका कमपॉप्युलर हिल स्टेशनच्या कमविख्यात्/कमकुविख्यात सुसाईड पॉईंटवर आपण दोघेच असताना त्याच्या अगदी टोकावरुन भणाणत्या वार्यात खाली वाकुन बघत असताना मी मस्करीने तुझा केसांचा विळखा तुला नकळत नाजुकपणे सोडवतो..अलगद.. तू चपापतेस... तुझे केस अगदी चोहोदिशांनी उधाणलेल्या लाटांसारखे उसळी घेतात. तु वळुन प्रथम व्याकुळ व मग क्रुध्द नजरेन माझ्याकडे पाहतेस! मला समजते अब तो मै गया.!!!

गोंदेश्वराच्या शिवपंचायतनात

लेखक प्रचेतस यांनी शनिवार, 21/05/2016 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
सिन्नरचं आयेश्वर मंदिर पाहण्याच्या आधीच जवळपास दोनेक तास गोंदेश्वर मंदिरात थांबलो होतो. माध्यान्ह संपून नुकतीच कुठे मावळतीला सुरुवात होत होती. भर एप्रिलचाच काळ असल्याने उन्ह मात्र अगदी रणरणत होतं. सिन्नर हा दुष्काळी भाग, सगळं कसं रखरखीत, कोरडं, रुक्ष. उन्ह अक्षरशः भाजून काढत होतं. मात्र त्या उन्हातही मंदिर सोन्यासारखं झळकत होतं. गोंदेश्वराचं आवार विस्तीर्ण. भलं प्रशस्त. तटबंदीयुक्त. तटबंदीतच यात्रेकरुंसाठी देवड्या बांधलेल्या. तटबंदीच्या आत पटांगण, इतकं मोठं की क्रिकेटची मॅच सहज खेळता यावी. पटांगण मोकळं ठेवूनही मध्यभागी भलं थोरलं अधिष्ठान.

<मी टाकलेल्या एकूण (धागा)पिंका>

लेखक नाखु यांनी शनिवार, 21/05/2016 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
मी टाकलेल्या एकूण (धागा)पिंका एकोणवीस शोधण्यात खूप वेळ जातो काथ्याकुटात एक धागा हुकला आहे त्याच्या जरासं खाली एक किडा वळवळतोय दुर्लक्षण्यात खूप वेळ जातो टंकाळा आल्यावर मी एखादा प्रतिसाद लिहायला घेतो अर्थ? समजण्यात खूप वेळ जातो तोल सुटलाय मिपावरचाही रोज उठून कोण साव्ररणार त्याला? सल्ला, मागण्यातही तूचभेळ खातो मिपा ! ही तर एक रिक्षाच आहे वाट पाहण्यात (चांगल्या धाग्याची) खरंच खूप वेळ जातो -नजरबंद

रेस...सिंहगड ते आयएटी पर्यंत...!

लेखक महामाया यांनी शनिवार, 21/05/2016 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
माझा पहिला मुंबई प्रवास-एक हाईस्कूल मधे असतांना मी शेजारच्या मुलांसोबत रोज पहाटे जॉगिंग करितां जायचो खरा...! तेव्हां कल्पना देखील नव्हती की पुढे मला सिंहगडापासून रेस करावी लागेल. बिलासपुरला वडील रेलवेत असल्यामुळे आम्ही रेलवे कालोनीत राहायचो. शहरात माझे काका होते-व्यंकटेश शंकर तेलंग. त्यांच्या खासगी लायब्ररीत कपाट भरून पुस्तकं होती (1970 च्या दशकात). लहानपणी मला त्या पुस्तकांचं भारी कौतुक वाटे. पण वाचण्याकरितां पुस्तक मागण्याची हिंमत होत नसे. कारण एक तर मराठी वाचनात गती नव्हती आणी दूसरं महत्वाचं कारण म्हणजे या काकांकडे सगळेच कसे जणूं जिराफच्या कुटुंबातले होते-ऊंचच ऊंच.