Skip to main content

संस्कृती

आता मला वाटते भिती

लेखक राजेंद्र देवी यांनी शुक्रवार, 09/09/2016 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
आता मला वाटते भिती कोठे गुंड त्रास देती कोठे पोलीस मार खाती अशा या समाजाची आता मला वाटते भिती कधी तरुणाईचे भांडण तर कधी रस्त्यावरचे भांडण सुशिक्षित समाजातले असंस्कृत जन अशा या जनाची आता मला वाटते भिती रामराज्याची अपेक्षा पण वागण्याची रावणनिती या समाजाला आता नाही कोणाची भीती अशा या समाजाची आता मला वाटते भिती या समाजाच मी एक भाग मला माझ्या सावलीची आता मला वाटते भिती राजेंद्र देवी

जाणिवांच्या जखमा

लेखक महेश रा. कोळी यांनी शुक्रवार, 09/09/2016 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
हे असे दिवसा उजेडी आभाळ आंधारू नये करावे उपकार कुणी केस मोकळे सोडू नये. हसतोच आहे हाय मी मंदिरात अन् मसणातही काय याला दुःख कसले?असे कुणा वाटू नये. काल शिकलो मी धडा प्राक्तनाच्या बेदिलीचा क्षणासाठी तोडले मोगऱ्याला , मग वाटले तोडू नये का अशा जाणिवानां होतात जखमा सारख्या? काळीज चिरणार्या अशा आठवां कुणी काढू नये. ....म्हैश्या
काव्यरस

उथळ

लेखक तिमा यांनी सोमवार, 05/09/2016 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
पुल देशपांडे उर्फ भाई यांस, उथळ उथळ उथळ किती नवसमाज भाई सूज्ञांची परिवशता अंत कळत नाही. उथळ ....... रंगवूनी स्त्रीपात्र हिडीस पुरुष लचकती नाटक वा सिरियल हो तेच सूत्र भाई उथळ ........ अकलेला साजिशी गोष्ट निर्मिती लांबण किती चालावी हेच कळत नाही उथळ ....... नवल मनीं हे वाटे 'गुरु' जनांचे 'पीजे' ला ' सिद्धु' हास्य खंत उरी राही उथळ उथळ उथळ किती नवसमाज भाई !
काव्यरस

माहिती हवी आहे.

लेखक उपयोजक यांनी रविवार, 04/09/2016 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
खालील माहिती हवी आहे.बरीचशी शोधाशोध करुनही न मिळाल्याने मिपाकरांकडे आलो आहे.अाता सर्वजण गणेश आगमनाच्या तयारीत असतील.त्यामुळे नमनाला घडाभर तेल न घालता थेट प्रश्न विचारतो. 1)पूर्वी CNBC या वाहिनीवर GE (General Electric)corporation ची एक जाहिरात लागत असे.बरीच मोठी अशी ही जाहिरात होती.या जाहिरातीत tion वरुन शेवट होणार्या बर्याचश्या शब्दांचा,विशेषणांचा वापर केलेलं हे गाणं होतं याचा व्हिडिओ किंवा Mp3 आंजावर कुठे मिळेल? 2)संगीतकार यशवंत देव यांनी मल्याळी गायक के जे येसुदास यांच्याकडून गाऊन घेतलेलं "शब्दमाळा पुरेशा न होती स्पर्श सारेच सांगून जातो" हे सुप्रसिध्द गीत Mp 3 किंवा व्हिडिओ स्वरुपात आंजावर

हिशेब हिशेबाचा

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 03/09/2016 06:37 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा मागच्या रविवारी संध्याकाळी बायको बरोबर फिरताना माझ्या मित्राची भाची रुचिरा रस्त्यावरील शाहरुकच्या पोस्टर समोर उभी राहून, तोंडाचा चंबू करत सेल्फी घेताना दिसली. हाय - हॅलो झाल्यावर तिला विचारले एकटी इकडे कुठे फिरते आहेस. त्यावर ती म्हणाली आम्ही इथे जवळच नवीन अपार्टमेंट घेतले आहे. एवढे बोलून थोडा वेळ ती सेल्फी फॉरवर्ड करण्यात गुंतली, मग पाठ वळवून निघाली पण आम्हीच आग्रह धरल्याने नाईलाजाने ती आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली.

हिशेब हिशेबाचा

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 03/09/2016 06:36 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा मागच्या रविवारी संध्याकाळी बायको बरोबर फिरताना माझ्या मित्राची भाची रुचिरा रस्त्यावरील शाहरुकच्या पोस्टर समोर उभी राहून, तोंडाचा चंबू करत सेल्फी घेताना दिसली. हाय - हॅलो झाल्यावर तिला विचारले एकटी इकडे कुठे फिरते आहेस. त्यावर ती म्हणाली आम्ही इथे जवळच नवीन अपार्टमेंट घेतले आहे. एवढे बोलून थोडा वेळ ती सेल्फी फॉरवर्ड करण्यात गुंतली, मग पाठ वळवून निघाली पण आम्हीच आग्रह धरल्याने नाईलाजाने ती आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली.

सरहद पर

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 26/08/2016 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
फाळणीच्या कथा तश्या वेदनादायकच असतात. गेले खूप दिवस हि कथा मनात घर करून होती, काल जयंत काकांच्या मंटोच्या कथा वाचतांना पुन्हा आठवली. उर्दू कथा : नन्दकिशोर विक्रम __________________________________________________________________________ "सोड रे मला सामान बांधून आवरू दे पटापट", शाहिदा पदर सोडवत म्हणाली. "मग सांग ना अम्मी ??

अमेरिकेत मी काय वाचतोय ? भाग २ रा

लेखक जयन्त बा शिम्पि यांनी शुक्रवार, 26/08/2016 06:58 या दिवशी प्रकाशित केले.
असाही एक अजब गजब दिन ! ! नुकताच भारतात व येथे अमेरिकेत सुद्धा, सर्वच भारतीयांनी १५ ऑगस्ट २०१६ ला " भारतीय स्वातंत्र्य दिन " मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला.त्याचे ' चलचित्रण ' ( म्हणजे व्हिडिओ ) मी सुद्धा, येथे अमेरिकेत बसल्या बसल्या, दुरून दर्शन करून ( दूरदर्शन संचावर ) अनुभवले. आणि सहज विचार केला कि आपण वर्षभरात किती तरी दिन साजरे करीत असतो.

रंजीश हि सही

लेखक महासंग्राम यांनी गुरुवार, 25/08/2016 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
तसं पाहिलं तर १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली त्यात खूप साऱ्या गोष्टी विभागल्या गेल्या. माणसं, नदी, पर्वत, संस्कृती वेगवेगळ्या झाल्या. पण अश्या काही गोष्टी होत्या ज्यांच विभाजन होणं कधीच शक्य नव्हतं ज्यात भाषा, साहित्य, कला यांचा समावेष होता, नशिबाने राजकीय वैर,वेगळेपण यांचा यावर काहीच प्रभाव पडू शकला नाही, त्यापैकी म्हणजे उर्दू भाषा. जी भारत आणि पाकिस्तान दोन्ही कडे तेवढ्याच आत्मीयतेने लिहिली वाचली जाते. अशाच या उर्दू भाषेचे अहमद फराज हे प्रतिभावान शायर होते. त्यांची गझल जेवढी पाकिस्तानी होती तेवढीच भारतीय सुद्धा.

गोविंदा!...

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 25/08/2016 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
थर थर वरवर लावून भरभर चढतो सरसर गोविंदा ... मनात हुरहुर भयाण काहूर धपापतो उर गोविंदा... अखेरचा थर निसटला जर लटकतो वर गोविंदा... खालुनि घुमतो गर्दीचा स्वर गोपाळा रे गोविंदा!!