बोचरी संध्याकाळ
मुंबई हून निघताना विमानाची चाकं take off च्या वेळी जेव्हा जमीन सोडतात ना, तो एक क्षण श्राव्याला नेहमी अस्वस्थ करतो. त्या क्षणी एक हुरहूर उगाच दाटून येते. "सगळं घेतलंस ना गं नीट…काही विसरू नकोस बाई… तू येणार म्हणून तुझ्यासाठी महिनाभर आधी पासूनच लक्षात येतील तशा गोष्टी घेवून ठेवत होते गं…तू आल्यावर मग खूप धावपळ होते ना, वेळ पण नाही पुरत…तिकडे मिळतंच म्हणा हल्ली सगळं, तरी उगाच आपलं माझं समाधान गं…" श्राव्याच्या आईची अशी सगळी मायेची वाक्यं take off च्या त्या क्षणी तिच्या कानांत तिला परत परत ऐकू येत होती.