मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संस्कृती

मनाचा एकांत - काळे पाणी

शिव कन्या ·
अंदमानातले काळे पाणी, कोलूबेड्याहंटरकदान्न सोबत तीव्र अपमानाचा overtime ! साम्राज्याचा उग्र दर्प अन देशाने केलेली प्रेमळ उपेक्षा....... असे सगळे, अन वरती थोडी जयहिंदची जाळी ! या जीवघेण्या विषाणूजिवाणूंमध्येही, काही काही रक्तांचे malnourishment कि काय ते झालेच नाही! उलट, तुरुंगाच्या अजस्त्र काळभिंतीही त्यांच्या जहालहळव्या लेखणीने cultured झाल्या! मातृभूमीच्या मृत्युंजय विरोत्तमांसाठी, . . . दुसरं काय होता एकांत म्हणजे तरी! - शिवकन्या

मला आवडलेले शायर २ : दुष्यंतकुमार

महासंग्राम ·
लेखनप्रकार
असं म्हणतात गझल अनुभवण्याची गोष्ट आहे. मानवी मनाचं प्रतिबिंब गझलेत कायम दिसत आलं आहे. मीर तकी मीर, गालिब यांसारख्या कित्येक मोठ्या शायरांनी गझल रुजवली. मुघल काळात गझलेला राजाश्रय लाभला, एवढे भाग्य क्वचितच कोणत्या काव्य प्रकाराला लाभले असेल. पुढे दुष्यन्त कुमार, बशीर बद्र, निदा फाजली यांसारख्या लोकप्रिय शायरांनी हिंदुस्तानी भाषेत गझल लिहून ती अधिकच लोकप्रिय केली.

मनाचा एकांत - चिमण्या

शिव कन्या ·
डाव्या हाताच्या मुठी एवढ्या चिमण्या हा हा करतात या जीवघेण्या ओसाडीत.... कुठे दाणे टिपत असतील? कुठे पाणी शोधत असतील? घरटे कुठल्या आडोशाला असेल? यांच्यात यांचे दफन कसे करत असतील? कोण करत असेल? चिमण्या निमित्त असतात............ आपल्याच छाटलेल्या मनाचे हे तासनतास भिरभिरणे असते..... . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! ---- शिवकन्या

हेमलकसा

राजेंद्र देवी ·
हेमलकसा रंजले गांजले आदिवासी जमात त्यांची माडीया लुटुनी त्यांचे अनुदान अधिकाऱ्यांनी बांधल्या माड्या नक्षलवादाचा घेऊन संशय मांडला त्यांचा छळ जन्मताच ज्यांची ठेचली गेली नाळ जगण्यासाठी करती कसबसे मेळ वर्दीतील जनावरे करिती शरीराशी खेळ निबिड अरण्यात शिरला प्रकाशाचा एक कवडसा घेऊन मानवतेचा वसा गाव वसवले हेमलकसा अनाथ प्राण्यांसाठी काढले त्यांनी निवास बनले प्राणिमित्र गौरविले त्यांस भारतरत्न सहकारी भेटले सारे होते ध्येयाने भारलेली सहचरी पण अद्वितीय भुवरी देवमाणसे पेरलेली राजेंद्र देवी

पुस्तकपरिचय: 'भय इथले...' - आतिवास सविता.

एस ·
लेखनप्रकार
‘भय इथले... तालिबानी सावट : प्रत्यक्ष अनुभव’ लेखिका – आतिवास सविता. आतिवास यांच्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर नजर जाताच वाचकाला आतील शब्दानुभवांमध्ये भरलेल्या ताणाचे दडपण जाणवायला सुरूवात होते, इतके हे मुखपृष्ठ भेदक झाले आहे. आणि याचे श्रेय अर्थातच ‘रविमुकुल’ यांना आहे. एका भिंतीवर गोळीबाराच्या असंख्य खुणा आणि शेजारी एक बंद खिडकी. सेपिया रंगसंगतीवर खरवडल्यासारखं शुभ्र रंगातील शीर्षक. जणू भीतीचं सावट पुसण्याचा, जिवंत राहण्याच्या अनिवार ओढीतून केला गेलेला आकांत.

तीन दिवस दोन रात्री : भाग १

संदीप डांगे ·
लेखनप्रकार
(अनुभव खरा, नावे खोटी) त्या नोटांच्या बंडलातून सराईतपणे एक एका नोटेवर अंगठ्याचे बोट फिरत होते. ती दहाची नवी कोरी करकरित नोट हळुवार निसटली. अंमळ झटका घेऊन तीच्या डोक्यावरुन खाली घरंगळली. मऊसूत खांद्यावरुन येऊन उभारलेल्या वक्षावर क्षणभर स्थिरावली, पुढच्या क्षणी फिरून खाली ओघळली. घागर्‍याच्या निर्‍यांमधून लपत-छपत कार्पेटवर पडली. त्या निर्जीव नोटेवरल्या हसर्‍या गांधीजीच्या चष्म्यावर तिच्या टोकदार हायहिलची टाच पडली. गांधींचा चष्मा फुटला नाही पण माझ्या आतमधे खोल कुठेतरी, काहीतरी खळ्ळंकन फुटलं.

दिशा

राजेंद्र देवी ·
दिशा स्थापना तुझी करतात गणेशा पण मागत नाहीत बुद्धी हे ईशा धांगडधिंगा अन सैराट वागणे लाज वाटत नाही लवलेशा कोठे चाललो आहोत आपण सारे कधी करणार विचार हे गणेशा तूच कर आता चमत्कार काही थांबव या मानवाच्या विनाशा ढोल, ताशे, डिजे कल्लोळ नुसता फाटून गेले कर्ण या कर्कशा नाही ठेवीत पावित्र्य सणांचे सापडत नाही यांना योग्य दिशा राजेंद्र देवी

आमचा मेलबर्न मधला गणेशोत्सव 2016

फिझा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी , वसुधैव कुटुंबकम मानणारी आपली भारतीय संस्कृती. अशाच संस्कृती मधून आलेले , आपल्या परंपरेचे आणि भाषेचे जतन करणारे काही मराठमोळे लोकं मेलबर्नच्या वेस्ट भागात राहतात . त्यातल्याच काही उत्साही आणि रसिक लोकांनी एकत्र येऊन २०१६ च्या सुरुवातीपासून आपली मराठी संस्कृती जपण्यासाठी , आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीचा , भाषेचा , रितीरिवाजांचा विसर पडू नये म्हणून छोटे मोठे मराठी सांस्कृतीक प्रोग्रॅम करायचे ठरवले. हळू हळू हाच ग्रुप वेस्ट मेलबर्न मराठी WMM या नावाने चालू झाला. लोकांचा मराठी उत्साह आणि आपल्या संस्कृतीची ओढ सगळ्यांनाच !

आंतरजालावरचा भेंडीपणा !!

इरसाल ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्वसाधारण कोणा एका मित्राने, ओळखीच्याने तो आधीच कार्यरत असलेल्या एखाद्या मराठी संस्थळाची माहिती दिली आणी आपणही त्यात सामील व्हावे अशी गळ घातली की "त्या" लाही वाटते की बघुया तरी की ही आभासी दुनिया आहे तरी कशी ? हो नाही करता करता "तो" सगळे सोपस्कार पार पाडुन या लोंढ्यात एकदाचा सामील होतो. रंगीबेरंगी असणारी ही दुनिया त्याच्या मनाला, मनात येणार्‍या लेख्/कविता/विचारांना कधी एकदा जालावर ओसंडुन वाहु ह्याच्या कळा द्यायला सुरुवात करते. जर आधीच कोणी सखा/मित्र/पाठीराखा असेल तर हा प्रवेश सुकर ठरतो.