Skip to main content

संस्कृती

योगशिबीरातले दिवस १- ओळख, दिनचर्या

लेखक आर्या१२३ यांनी सोमवार, 21/11/2016 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
विवेकानन्द केन्द्र, योग शिबिर तसे कॉलेजात असताना रोटरॅक्टचा युथ कॅम्प अटेन्ड केला होता. पण तो अगदीच ४ दिवसाचा. ४ दिवस भुर्र्कन उडुन गेले होते. त्या त्या वयातले अनुभव वेगळेच असतात. तेव्हा शरीर, मन दोन्हीही तरल असते. इतरांसोबत कुठल्याही सवयीचे अ‍ॅब्सॉर्बीन्ग चटकन होत असते.

कर्मयोगी श्री एकनाथजी रानडे- भाग २ कार्य

लेखक आर्या१२३ यांनी शनिवार, 19/11/2016 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
एकनाथजी रानडे यांचे कार्य शिलास्मारकाची कथा एकनाथजींच्या आत्मचरित्रापासून वेगळी करणे अशक्य आहे. ज्यांनी प्रत्येक अडथळा संधीमध्ये परिवर्तित केला, प्रत्येक आव्हानाचे रूपांतर विजयात केले, अश्या असामान्य व्यक्तित्वाचे गुण सांगणे एका छोट्या लेखात शक्य नाही. तरीही हा छोटासा प्रयत्न: अशी कोणतीही समस्याच नव्हती त्यावरचा उपाय त्यांच्याजवळ नव्हता, त्यांचे स्वतःचे शब्दच द्यायचे तर ," प्रत्येक डावपेचाला प्रति-डावपेच, प्रत्येक शस्राला प्रतिशस्त्र असतेच ", या सत्याने समग्र दर्शन, निवारण होणारच अशा अडचणीतून एकनाथजींनी कसा मार्ग काढला यातून होते.

खरा पुत्र : बोधकथा

लेखक संदीप डांगे यांनी मंगळवार, 15/11/2016 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
(लहानपणी कधीतरी वाचली होती, आज आठवली काही निमित्ताने) तीन स्त्रिया पाणवठ्यावरून पाणी भरून डोईवर मडकी घेऊन घराकडे निघतात, मान डूगडुगते तिघींची, वय झालंय. त्यांची एक मैत्रीण बऱ्याच वर्षांनी गावात आलेली असते, तीही त्यांना सामील होते, गप्पा सुरु होतात, बायकाच त्या! साहजिक गोष्ट मुलांवर येते, तिघींपैकी दोघींचे चेहरे अभिमानाने उजळतात. पहिली सांगते माझा मुलगा पंचक्रोशीतला सर्वात बुद्धिमान मनुष्य आहे, संस्कृत, वेद, शास्त्रे यावर त्याच्याशी कोणी जिंकू शकत नाही, त्याने भल्याभल्याना पाणी पाजलं आहे!

लग्न कशासाठी

लेखक नर्मदेतला गोटा यांनी मंगळवार, 15/11/2016 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वीच्या काळी एकदा लग्न झाले की ते आयुष्यभर टिकवावे लागत असे. लग्न ही संस्था वास्तविक जीवनातल्या काही गरजा भागवण्यासाठी निर्माण झाली, अनेक गरजांपैकी महत्त्वाची एक गरज शारीरीक होती. पण हे लक्षात न घेता लग्न हा एक प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला गेला. एखाद्याचे लग्नच झाले नसेल तर त्याच्याबद्दल फार विचित्र मते व्यक्त केली जातात, याच्यात काहीतरी कमतरता असली पाहीजे असे बोलले जाते. स्त्रियांना तर बिन लग्नाचे राहण्याची परवानगीच नाही. "आई" होण्या मधेच तिच्या जन्माचे सार्थक आहे. आता आई ही जगातली सर्वात महान गोष्ट आहे. आई होण्यासाठी आधी कुणाची पत्नी झाले पाहीजे.

रंगभूमी दिन

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 05/11/2016 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधीं नमितों । विघ्‍नवर्गनग भग्‍न कराया विघ्‍नेश्वर गणपति मग तो ॥ कालिदासकविराजरचित हें गानीं शाकुंतल रचितों । जाणुनियां अवसान नसोनि हें महत्कृत्यभर शिरीं घेतों ॥ ईशवराचा लेश मिळे तरि मूढयत्‍न शेवटिं जातो । या न्यायें बलवत्कवि निजवाक्पुष्पीं रसिकार्चन करितो ॥ या नांदी बरोबर तिसरी घंटा झाल्यावर रंगमंचावर नटाचा परकाया प्रवेश होतो. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, केशवराव भोसले, अण्णासाहेब किर्लोस्कर, बालगंधर्व, राम गणेश गडकरी यांसारख्या दिग्गजांनी रुजवलेलं हे रोपटं विजय तेंडुलकर, पु.ल. देशपांडे, सतीश आळेकर यांनी याला जोपासून त्याचं वटवृक्षात रूपांतर केलं.

डॉ.अक्षयकुमार काळे : एक ओळख. (अ.भा.मराठी साहित्य संमेलन उमेदवार)

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी मंगळवार, 01/11/2016 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी. डोंबिवली येथे नियोजित ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची रणधुमाळी सुरु झाली आहे. आमच्या मराठवाडा साहित्य परिषद शाखेत डॉ.अक्षयकुमार काळे यांनी नुकताच आपला अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला. आम्ही त्यांचे पाठीराखे, आणि मतदार असल्यामुळे आम्हीही त्यांच्या सोबत होतोच. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साहित्य समाज आणि संस्कृतीच्या चिंतनाचं एक व्यासपीठ आहे, असे आम्ही समजतो. मराठी समाज, भाषा आणि संस्कृतीचा विचार त्या विचारपीठावरुन मांडल्या जातो हे अनेकांना माहिती आहेच.

प्रो.के एस कृष्णमुर्ती

लेखक उपयोजक यांनी मंगळवार, 01/11/2016 07:17 या दिवशी प्रकाशित केले.
ज्योतिषशास्त्र हा ज्यांचा आवडीचा विषय आहे त्यांना, कृष्णमुर्ती ही ज्योतिषपध्दती नक्कीच परिचयाची किंवा निदान ऐकून तरी नक्की माहिती असेल. कोण होते हे कृष्णमुर्ती? काय योगदान होतं त्यांचं ज्योतिषशास्त्रात? या कृष्णमुर्ती पध्दतीचे जनक प्रोफेसर के.एस.

(ओम नमः) शिवाय

लेखक तिमा यांनी शनिवार, 29/10/2016 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
हिन्दी चित्रपट बघायच्या बाबतीत मी फार चोखंदळ आहे. सहसा परीक्षण वाचल्याशिवाय पहात नाही. तरीही कित्येकदा अपेक्षाभंग होतोच. तर नेहमीच्या पद्धतीला फाटा देऊन एकतरी अ‍ॅक्शन चित्रपट, परीक्षण न वाचता, कुठलाही पूर्वग्रह न ठेवता पहायचा असे ठरवले होते. त्यामुळे 'शिवाय' ची जाहिरात बघितली आणि सरळ तिकीटेच बुक केली. नरकचतुर्दशीच्या सुमुहूर्तावर थेटरात स्थानापन्न झालो. रिकाम्या खुर्च्या मनांत धडकी भरवत होत्या. पण एकदा चित्रपट सुरु झाला आणि आम्हाला, दर क्षणाला, साक्षात त्या भगवान शंकराचे दर्शन होऊ लागले. अजय देवगण हा साक्षात 'शिवाय' म्हणजे शंकराच्या रुपात हिमालयाच्या उंच शिखरांमधे लीलया बागडत होता.

एका वर्सात

लेखक संदीप डांगे यांनी गुरुवार, 27/10/2016 07:16 या दिवशी प्रकाशित केले.
एका वर्षाच्या बाद अकोल्यात येऊन रायलो परवाच्या दिवशी, अजून बी तसाच अशीन का माला गाव जसा व्हता मांगल्या वर्षी ? अजून बी पिकवित लोक सकाळी फिराले जात असतीन काय? दिवसभर मंग धूळ्ला खायाले तयार होत असतीन काय? च्या प्याले कप देतात, का अजूनही वापरतात बशी? अजून बी तसाच अशीन का माला गाव जसा व्हता मांगल्या वर्षी ? अजून बी दुपारच्या जेवनाले मंग वांग्यावर तर्री असते काय? गरमागरम वरणभातावर तुपाची धार खरी असते काय? इंजेक्शनवालं दुध देत नाहीत ना आपल्या म्हशी? अजून बी तसाच अशीन का माला गाव जसा व्हता मांगल्या वर्षी ? अजून बी सांजच्या पाराले लेकरं शुभंकरोती म्हणतात काय? गांदीरोळच्या त्या पानिपुरीलेच चौपाटी म
काव्यरस

दिवाळी

लेखक संदीप डांगे यांनी बुधवार, 26/10/2016 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी गिरणीत वेगवेगळ्या भाजण्यांचा खमंग दरवळतोय, अनेक छोट्या छोट्या डब्यात छोट्या छोट्या प्रमाणात गृहिणींची लगबग आहे, त्यापेक्षा जास्त गडबड गिरणीवाल्या काकांची आहे, तुफान गर्दी माजली आहे. जिन्नस एकसारखे पण प्रत्येकीचे प्रमाण वेगळं ठरलेलं आहे. धडधड डबे रिकामे होतायत.. सटासट भूरभुर करत पिठं बाहेर पडतायत... "दोन किलो आहे, आईने सांगितलंय भाजणीवरच टाका" कशावर काय जातंय बघतच नाही काका, एकावर एक, दुसऱ्यावर तिसरे, इकडून टाकलं कि तिकडून पसार, काकांची गिरणी लै फास्ट आहे, पाव-अर्धाकिलो कुठे तिला जास्त आहे? आपला डबा गिरणीत टाकायला काका उचलतायत असं पाहून एक ताई म्हणते, 'काका, लाडवाचं आहे बरंका, जरा