संस्कृती
काल: क्रीडति (भाग ४) - ग्रेगोरिअन कॅलेंडर आणि Leap Years.
भाग १ - आठवड्याचे सात दिवस.
भाग २ - अधिकमास आणि क्षयमास.
भाग ३ - तिथिवृद्धि आणि तिथिक्षय.
आकाशातील गोलांची दैनन्दिन गति हे एक कालगणनेचे निसर्गनिर्मित साधन आहे. त्यांपैकी चन्द्राची दैनंदिन गति ही अन्य कोठल्याहि गोलापेक्षा मोजायला सोपी असल्याने रोमन संस्कृतीच्या शेतीप्रधान काळातील कालगणना चान्द्रमासांच्या होत्या. त्यांमध्ये मार्च ते डिसेंबर असे दहा महिने होते.
आर्य की याम्नाया-पशुपालक ?
धागा लेखास कारण sciencenews.org या वेबसाईटवर, 'भटक्या आशियायी पशुपालकांचा ताम्रयुगीन (ब्राँझ एज) सांस्कृतीक घडणीवर प्रभाव कसा पडला असावा ?' अशा अर्थाचा एक लेख आला आहे. लेखास त्यांनी जनुकीय, पुरातत्वीय अनुवंशशास्त्र असा टॅग लावल्याचे दिसते.
राणी एलिझाबेथ, साधी एलिझाबेथ.
राणी एलिझाबेथ, साधी एलिझाबेथ.
[ही एक रूपककथा. लावू तितके अर्थ. करू तसा विचार.]
एक होती राणी एलिझाबेथ. दुसरी होती साधी एलिझाबेथ. दोघींचाही आपापल्या मामांवर भारी जीव होता. मामांचाही त्यांच्यावर. एके दिवशी घरात अचानक गर्दी दिसू लागली. गर्दीतच मामा झोपलेला दिसला. शेलाट्या अंग काठीचा मामा एकदम जाडसर दिसू लागला. त्याच्या अंगा खांद्यावर कसली कसली हारफुलं घातली जाऊ लागली.
साधी एलिझाबेथ मामाजवळ जायचा हट्ट धरते. राणी एलिझाबेथ सगळे प्रोटोकॉल्स सांभाळत, मूक अश्रू गाळीत उभी राहते. जराशाने आपले कोणच ऐकत नाही म्हटल्यावर, साधी एलिझाबेथ रडून रडून हलकल्लोळ माजवते.
पसायदानातील समतोलाचे एक आगळेपण
नियमीतपणे छानशा बोलीभाषेतून बाल कविता करणार्या एका (#) कवि महोदयांच्या सहज म्हणून लिहिलेल्या एका कवितेकडे माझ्या छिद्रन्वेषी स्वभावाने लक्ष वेधले. कवितेतील वेगवेगळ्या पशुपक्षांना आपल्या स्वभाव वैशिष्ट्याचाच कंटाळा आलेला असतो. जसे की मांजर म्हणते की मी म्याऊ म्याऊच कधी पर्यंत म्हणू? कोंबडी म्हणते कुकूचकू करून कंटाळ्चा आलाय, तर कावळा म्हणतो मी काळाच रहाणार का ?
मी कविंना विचारले की न्यूनगंड असू नये असा काही बोध अभिप्रेत आहे का ? संवादातून लक्षात आले की कविच्या बाल कवितेचा उद्देश बोध नव्हे केवळ रंजन होता.
काल: क्रीडति (भाग ३) - तिथिवृद्धि आणि तिथिक्षय.
काल: क्रीडति (भाग ३) - तिथिवृद्धि आणि तिथिक्षय.
भाग १ - आठवड्याचे सात दिवस.
भाग २ - अधिकमास आणि क्षयमास.
एक चान्द्रमास (एक अमावास्या ते पुढची अमावास्या) २९.५३०५८९ दिवसांचा (प्रत्येकी २४ तासांचा मध्यम मानाचा दिवस) असतो असे पूर्वी लिहिलेले आहे. म्हणजे चान्द्रमास तीस दिवसांहून सुमारे अर्धा दिवस कमी आहे. अमावास्येला चन्द्र आणि सूर्य एकाच रेखांशावर असतात आणि एकाच वेळेस मावळतात.
#एकादशी #
तू उभा विटेवर तुझे हात कमरेवर
आलो विठू तुझ्या रे मी दर्शनाला
तू उभा विटेवर तुझे हात कमरेवर
आलो विठू तुझ्या रे मी दर्शनाला
आलो विठू तुझ्या रे मी दर्शनाला
तारी भवसागरी करी मज मोकळा
देई तुझ्या रे चरणी तू ठाव मला
झालो चिंब भक्तीत मीपणा नुरला
माझा देह हा चंदनाचा रे झाला
नामाचा गोडवा माझ्या ओठी आला
पामर रे तुझा हा भक्ती रस प्याला
पाहूनी राधेसी तुझिया रे अंकावरी
होई रुकमाई रे कावरी बावरी
झाले सहन न तिला आली दिंडीरवनाला
देवा आला तू पाठी समजूत घालण्याला
पाहूनी झोपडी रे चंद्रभागेतीरी
देवा क्षण दोन क्षण तू थबकला
देवा क्षण दोन क्षण तू थबकला
आतून वीट फेकली पुंडलीक बोलला
तू थांब मातापित्याची सेवा करु दे
काळाची उबळ
खोकल्याची उबळ यावी
तशी आज मला काळाची उबळ आलीए,
तरुणाई तर म्हणते ती सगळ सर करत चालली
पण त्यांचे सर तर मला खाली दिसतात आणि पाय हवेत !
खोकल्याची उबळ यावी
तशी आज मला काळाची उबळ आलीए,
जेव्हा माणूस विचार करावयास शिकला
तेव्हा पासून मला कलीयुगच दिसत
तो माकड होता तेव्हा सुखी होता कदाचित
ते सुख मला वापस हवय स्वछंद माझ्या स्वप्नातल्या सारखं
पण त्यांच्या स्वप्नातल्यासारख नसलेल.
सगळच कसं सडक नासलेल दिसतय आज
गुन्हेगारी आभाळाला टेकली
राक्षसी प्रवृत्ती वाढीस लागली
महागाईचा पारावर गेला
प्रदुषणाने कळस केला
प्रगती कशी प्रतिगामी झाली
प्रत्येक स्त्रीची अब्रू गेली
प्रत्येक पुरुषाचे वस्त्रहरण झाले
स्
काल: क्रीडति (भाग २) - अधिकमास आणि क्षयमास.
काल: क्रीडति (भाग २) - अधिकमास आणि क्षयमास.
भाग १ - आठवड्याचे सात दिवस.
अतिप्राचीन कालामध्ये कालगणनेची नैसर्गिकपणे उद्भवलेली पहिली संकल्पना ’दिवस’ असे निश्चितीने म्हणता यावे. एका सूर्योदयापासून दुसर्या सूर्योदयापर्यंत लोटणारा काळ म्हणजे एक दिवस. तो प्रत्येक मानवाला सहजच जाणवतो. त्या नंतरची निर्माण झालेली संकल्पना म्हणजे मास किंवा महिना. अमावास्या १ म्हणजे सूर्य-चंद्र युती किंवा सूर्य आणि चन्द्र ह्यांचे रेखांश (Right Ascension) सारखे असणे. अशा एका अमावास्येपासून त्याच्या पुढच्या अमावास्येपर्यंतचा कालावधि म्हणजे एक चांद्रमास होय.
विकासाच्या गोष्टी. .
मोखाड्यातलं एकदम दरीतला पाडा ' आमले ' गाव. जंगलात वसलेलं. वाड्याहुन खोडाळ्याकडे जाणार्या बाजुला हमरस्ता सोडुन दरीत उतरायचं. इनमिन ६५ कुटुंब. गावाशेजारुन वाहणार्या नदीमुळे पावसाळ्यातला चार महिने बाहेरच्या जगाशी संपर्क नाही अशी अवस्था होती, अगदी मागच्या वर्षापर्यंत.
आता नदीवर लोखंडी पुल टाकलाय चालत जाण्यासाठी.
मिसळपाव