Skip to main content

संस्कृती

स्टार माझा तर्फे आयोजित केलेल्या "ब्लॉग माझा" स्पर्धेत पारितोषिके मिळवणारे मिपाकर

लेखक अजय भागवत यांनी शुक्रवार, 20/11/2009 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
स्टार माझा तर्फे आयोजित केलेल्या "ब्लॉग माझा" स्पर्धेत पारितोषिके मिळवणारे मिपाकरः [सुरुवातीला मला फक्त डॉन बद्दल कळाले होते व त्याप्रमाणे मी येथे धागा दिला होता. म्हणून सुरुवातीचे काही प्रतिसाद डॉनचे अभिनंदन करतांना दिसत आहेत. नंतर देवकाकांनी कळवल्याप्रमाणे इतर्ही मिपाकरांना हे पारितोषिक मिळाल्याचे कळाले. त्यानुसार मी हा धागा संपादीत केला आहे] नीरजा पटवर्धन(नीधप) ह्यांचा दुसरा क्रमांक आलाय. छोटा डॉन, देवदत्त, राजे, आणि आनंदघन ह्यांना स्पर्धेत विषेश पारितोषिक मिळालंय. ह्या सर्वांचे सहर्ष अभिनंदन!

सुखांत

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी गुरुवार, 19/11/2009 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात 'सुखांत' या चित्रपटाच्या निर्मितीच्या निमित्ताने एक दयामरण विषयावर चर्चासत्र कोथरुडच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित केले होते. परिसंवादाला जाईपर्यंत हा चित्रपटावर आधारलेला परिसंवाद आहे हे मला माहित नव्हत. डॊ मोहन आगाशे, लोकसत्ताचे निवासी संपादक मुकुंद संगोराम, साप्ताहिक सकाळच्या कार्यकारी संपादिका संध्या टाकसांळे, पुण्यातील नामवंत डॊ शिरिष प्रयाग, चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद लेखक किरण यज्ञोपवित, अभिनेते अतुल कुलकर्णी, अभिनेती ज्योति चांदेकर, निर्माती अनुया म्हैसकर उपस्थित होते. परिसंवाद उत्तमच झाला.

अपत्य संगोपन-समाधान कीं समस्या?

लेखक सुधीर काळे यांनी बुधवार, 18/11/2009 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
अपत्य संगोपन-समाधान कीं समस्या? हा PDF format मिपाचे एक सभासद श्री. अक्षय पुर्णपात्रे यांनी स्वेच्छेने व स्वयंस्फूर्तीने आपल्या व्यवसायातून वेळात वेळ काढून पुनर्टंकित केला याबद्दल सर्वप्रथम त्यांचे मनःपूर्वक आभार. हा लेख मी सहा महिन्यापूर्वी लिहिला होता उत्तम कथा या मासिकाच्या निबंधस्पर्धेसाठी. पण मला १००० शब्दांच्या शब्दसंख्येबद्दलची मर्यादा सांगायला तिथले कर्मचसरी विसरले. माझा लेख ३००० शब्दांचा झाला पण संपादिकाबाईंना तो आवडला व तो त्यांनी थोडासा संक्षिप्त करून प्रसिद्धही केला.

एक अजनबी पाकिस्तानी नागरिकाशी झालेली चर्चा!

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 16/11/2009 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
ही एक १०० टक्के सत्य घटना आहे. मागे मी एकदा मलेश्यातील क्वाला लुंपूर या शहरी गेलो होतो. संध्याकाळी काम संपवून जरा दिवसा-उजेडी हॉटेलवर परत आलो. हॉटेल शेजारीच एक पार्क होता म्हणून एक चक्कर मारायला तिथं गेलो. का कुणास ठाऊक, पण पार्कमध्ये कोणी चिटपाखरूही नव्हतं. एक-दोन फेरफटके मारल्यावर हिंदुस्तानी चेहेर्‍याचा एक पंचविशीतला तरुण कांहींसा "खोया-खोयासा" चेहरा करून एका बाकड्यावर बसलेला दिसला. आधी आपल्या देशाचा असावा म्हणून मी त्याला "हॅलो" केले. तो थोडासा बुजलेला दिसत होता. कांहींसा बिचकत-बिचकत अवघडतच तो उभा राहिला व "आप कहाँसे हैं?" असे त्याने मला विचारले. मी म्हटलं "मै हिंदुस्तानी हूँ|".

कातरवेळ

लेखक निखिल देशपांडे यांनी सोमवार, 16/11/2009 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी सकाळी लवकर ११-१२ वाजे पर्यंत उठायचा प्लॅन होता. पण कुठले काय??? सकाळी ७ वाजता फोन वाजला... पहातो तर सिंगापुरातुन फोन..!!! नाही हो सिंगापुरच्या काकांचा नव्हता... एक जुना कलिग सकाळी सकाळी एक इश्श्यू मधे अडकला होता. त्याचा प्रॉब्लेम सोडवता सोडवता झोप चांगलीच उडाली.... आता इतक्या भल्या पहाटे(!) उठून काय करावे ते कळतच नव्हते. पेपर वाचून झाला... त्यात काही तरी सचिन च्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी मराठी वृत्तपत्रांना बोलवले नव्हते तरी दुसर्‍या दिवशीचा अंक सचिन स्पेशल काढण्यात येणार असे लिहिले होते. चालू द्या!!!!

यांच असं का होतं ते कळतं नाही ... विचारवंताना समर्पित !

लेखक छोटा डॉन यांनी शुक्रवार, 13/11/2009 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : त्या दिवशीच्या विधानसभेतल्या अभुतपुर्व प्रसंगानंतर संकेतस्थळांवर "विचारवंतांच" एकदम पेव फुटलं.
काव्यरस

उचललेस तू मीठ मुठभर

लेखक भोचक यांनी गुरुवार, 12/11/2009 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते. 'उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया' या वाक्याच्या उत्तरार्धाविषयी मनात का कुणास ठाऊक खिल्लीच दाटून येते. पण या लेखातून या सत्याग्रहामागची गांधीजींची व्यापक भूमिका समजायला मदत होते. आणि खरोखरच या साध्याशा वाटणार्‍या सत्याग्रहातून ब्रिटिश साम्राज्याचा पाया गांधींनी कसा हादरवला हेही कळते.

लोहगडची सफर

लेखक झकासराव यांनी मंगळवार, 10/11/2009 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
लोहगडला जाउ जाउ अस करत करत बरेच रविवार नुसतेच येत आणि जात होते. प्रत्येक वेळी प्रत्येकाची वेगळी कारण. होय नाही करत शेवटी मी आणि राजा दोघच जायच फिक्स केल. तर आता नमनालाच जास्त तेल न घालता घ्या फोटू. हा जाताना पायवाटेवरुन काढलेला फोटु. हा जाताना दिसणारा विसापुर. अवाढव्य आहे हा किल्ला. हा दिसतोय लोहगड. हा त्याचा डावीकडचा भाग. बुलंद किल्ला आहे एकदम.

सुनीता देशपांडे यांचे निधन...

लेखक विद्याधर३१ यांनी शनिवार, 07/11/2009 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
अत्ताच म्.टा. मध्ये वाचलेल्या बातमी नुसार श्रीमती सुनिता देशपांडे यांचे पुण्यात निधन झाले. "आहे मनोहर तरी" या आत्मचरित्राने प्रसिध्द झालेल्या सुनिताबाईना आदरांजली.