Skip to main content

संगीत

एक सुखद फ्युजन

लेखक प्रास यांनी शुक्रवार, 27/07/2012 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
काही गोष्टी अपघाताने घडतात. अशा अपघाताचा परिणाम बघता, ते वेळोवेळी का होत नाहीत याबद्दल खट्टू व्हायला होतं. अर्थात असे अपघात पैशापासरी न घडणं यातच त्यांचं महत्त्व अधोरेखित होत असतं, नाही का? असे हे उपरोल्लेखित अपघात आपल्या संगीत सृष्टीत ठराविक काळाने पुन्हा पुन्हा घडत असतात आणि त्यातून ते आपलं जीवन आणखी सुसह्य करून सोडतात असं आपलं मला वाटतं. असाच एक अपघात १९९२ मध्ये कधीतरी घडला आणि आपलं सांगीतिक विश्व समृद्ध करता झाला. जाहिरातींच्या जिंगल्सना संगीत देणारा संगीत दिग्दर्शक त्या वेळेला रेकॉर्डिंग रूममध्ये जिंगलचे शब्द अर्थात जिंगलचा फायनल ड्राफ्ट येण्याची वाट बघत होता.

दोशी मोहित मर्जर... (भाग १)

लेखक अन्तु बर्वा यांनी मंगळवार, 24/07/2012 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
"परदेसी परदेसी जाना नही...मुझेऽऽऽ छोडके... मुझे छोडके" स्वारगेट बस स्ट्यांड्च्या ३ नंबरच्या प्लाट्फार्म वर 'दोशी वडेवाले' या पुण्याच्या दोन नंबरच्या वडापाव सेन्टरच्या मालकाचा; गायधनी दोशीचा नोकिआ १२०० मोबाइल वाजला. अनोळखी नंबर मोबाईल स्क्रीन वर बघून तो बावचळला. पर्वतीहून तो फोन आला होता. गायधनी दोशी: "ह्यालो...?" पलीकडचा आवाज: "गायधनी, मी मोहित नाइक बोलतोय. एक कर्त्यव्य म्हणुन तुम्हाला कॉल केलाय. उद्या मोहित वडेवाले तुमच्या उपहारग्रूहामधे काम करणार्या सगळ्या पोरांना डबल पगाराची खुल्ली आफर देणार आहे. " क्लिक! (गायधनीने कॉल कट केला.) मोहित नाईक: "आयला! काय उमजेनासं झालयं...

हिंदी व मराठी सुगम संगीतात तालांचे वैविध्य

लेखक प्रदीप यांनी रविवार, 22/07/2012 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
'आर. डी. मल्हार' ह्या लेखात धागाप्रवर्तकाने ".....असा संगम कोणालाही जमला नाही , जमणार नाही" असे एक धाडसी व विषयावरील पुरेशी माहिती न घेताच विधान केले. त्यावर प्रतिक्रिया देतांना चौकटराजांनी लिहीले .."[आर. डीं]. नीकिती वाद्ये , किती ताल वापरले याला गणतीच नाही". माझ्या माहितीप्रमाणे आर. डी. ने नेहमीचे केहेरवा, दादरा, खेमटा वगैरे तीन चार तालच वापरले आहेत, 'घर आजा, घिर आये' ह्या त्याच्या पहिल्याच गाण्यात रूपकचा सुंदर वापर आहे. तेव्हा अगणित ताल त्याने वापरलेले नाहीत.

आर. डी. मल्हार !

लेखक मनोज श्रीनिवास जोशी यांनी शनिवार, 21/07/2012 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
एकंदर संगीताचा विचार केल्यास गाणे गाण्यापेक्षा संगीत रचना करायला अधिक “प्रतिभा” लागते असे मला नेहमी वाटते. गायक हा कवी व संगीतकार यांच्या मधला रसिक श्रोत्यांपर्यंत भावना पोहोचवणारा शेवटचा दुवा आहे. पण अनेक वेळा श्रेय नामावली मध्ये गायकाला विशेष स्थान असते आणि कवी व संगीतकार उपेक्षित राहतात. कवीला संगीताची ज्ञान असणे सक्तीचे नाही पण संगीतकारला काव्याची जाण असणे अनिवार्य आहे. तसेच गायकाला संगीताचे ज्ञान असणे हे अनिवार्य असले तरी काव्याची समज आवश्यक नाही. म्हणून चांगले गीत / काव्य “चांगले गाणे “ म्हणून रसिकांसमोर आणण्यात संगीतकार हा महत्वाचा दुवा आहे. तर संगीतकार आ.डी.

शिवकल्याणराजा - ११ गाणी निवेदनासहित

लेखक कौन्तेय यांनी बुधवार, 18/07/2012 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
॥ शिवकल्याणराजा ॥ लहानपणापासून कॅसेटवर ऐकत असलेली ही गाणी. शिवचरित्राभोवतीचं सगळं भावविश्व चपखलपणे लघुरूपात उभं करणारी. समर्थ रामदास, वीर सावरकर, कुसुमाग्रज, शंकर वैद्य आदि दिग्गजांच्या रचना, हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत, लताबाईंचा आवाज नि खुद्द बाबासाहेब पुरंद्ऱ्यांच्या आवाजात ओजस्वी निवेदन! आणखी काय पायजे? हे संकलन काही वर्षांपूर्वी सीडी स्वरूपात आल्यावर एक एक गाणं वेगवेगळं ऐकता येत नाही ही बोच बरेच दिवस मनात होती. काल रात्री बैठक मांडून हे काम फ़त्ते केलं. सगळी गाणी अन्य उपकरणांवर सहज ऐकता तर येतीलच, पण आयफ़ोन/पॅड/पॉड सिंकेबलही आहेत.

हुस्ना.

लेखक इरसाल यांनी मंगळवार, 17/07/2012 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
४/५ दिवसांपुर्वी असच चॅनल बदलता बदलता एमटीव्ही वर गेलो असताना काही ओळी कानावर पडल्या आणी एक गायक वैविध्यपुर्ण हातवारे करत गाताना दिसला, त्या १०-१२ सेकंदाच्या अवधीत जे काही कानावर पडले त्याने मनमोहुन्,एक प्रकारे उद्विग्न करुन गेले. अधिक खोदकाम केले असता असे कळले की हा कोक स्टुडिओचा कार्यक्रम असुन गाणारी व्यक्ती ही पियुश मिश्रा आहे आणी ह्यानींच ह्या गाण्याची रचना व पुनर्लेखन केले आहे. वस्तुतः हे गाणे जावेद नावाच्या माणसाने फाळणीच्या वेळेस स्वतःच्या हुस्ना ह्या प्रेयसीच्या विरहापोटी लिहीले ज्यामधे त्याची तिला पुन्हा न भेटता येण्यामुळेची लाचारी व होणारे अगतिकतेचे दु:ख ह्याचा मिलाफ दिसुन येतो

कै. दारासिंह यांना सादर संगीतमय श्रद्धांजली,

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 13/07/2012 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
कै. दारासिंह यांना सादर संगीतमय श्रद्धांजली, फार पुर्वी दारासिंहानी आम्हाला आनंद दिला त्यांच्या फ्लाईंग किक्स व फ्री स्टाईल डावपेचांमुळे. आम्ही फिदा होतो 'लुटेरा' (१९६५) पाहून. त्यात लप्याचे संगीत, सिनेमा फार लक्षात राहिला. त्यातील गाण्यामुळे.... १ पतली कमर नाजुक उमर....... स्त्री वेषातील दारासिंहची नृत्यकला !

एक ठुमरी, एक भावना, एक राग : अनेक कलाकार.

लेखक मनोज श्रीनिवास जोशी यांनी रविवार, 08/07/2012 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नानंतर नववधूला “बिदा” करणे हा भारतीय कुटूंबामधला एक अतिशय नाजूक ,कोवळा , भावोत्कट क्षण ! आयुष्याचा एक अध्याय पूर्ण करून नवा अध्याय सुरु करायला सासरी निघालेली मुलगी. आई –आणि ती मुलगी रडून आपल्या भावना व्यक्त करतात . पण दुर्दैवाने सगळ्यांनाच असे रडून मोकळे होता येत नाही. मग हया भावना व्यक्त करण्यासाठी कविता गाण्यांचा आधार घेण्यात येतो.

डॉ.अशोक रानडे यांचे स्मरण

लेखक मनोज श्रीनिवास जोशी यांनी सोमवार, 02/07/2012 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राला विचारवंताचे वरदान लाभले आहे. संगीत क्ष्रेत्रात ही परंपरा पं.भातखंडेनी सुरु केली. पुढे दि.ब. देवधर , कुमारजी , पु.ल. असे अश्या अनेकांनी संगीता बरोबर संगीताचे विचार पुढे नेले. डॉ. अशोक रानडे त्याच परंपरेचा विचारवंत होता. हया जुलै महिन्यात त्यांच्या निधनाला एक वर्ष होते आहे. त्यानिमित्त त्यांचे स्मरण. आपल्या जवळजवळ पाउणशे वर्षाच्या आयुष्यात डॉ.६० वर्षे संगीता क्षेत्राशी निगडीत होते. स्वतः गजाननबुवा जोश्यांचे शिष्य होतेच पण त्याही पेक्षा ते संगीतावरचे अधिकारी व्यक्तिमत्व होते. त्यांचा व्यासंग “संगीताचा” होता आणि तो भारतीय शास्त्रीय संगीता इतकाच लोकसंगीताचा ही होता.